शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
2
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
3
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
4
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
5
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
6
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
7
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
8
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
9
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
10
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
11
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
12
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
13
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
14
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
15
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
16
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
17
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
18
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

डिजिटल माध्यमांवर साहित्याचा आकृतिबंध राखणे आवश्यक : वसंत आबाजी डहाके

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 16, 2019 21:18 IST

आधुनिक युगाचा बदल स्वीकारून समूह माध्यमे किंवा डिजिटल माध्यमांवर व्यक्त होणे, लेखन करणे ही स्वागतार्ह अशी गोष्ट आहे. मात्र यावर लेखन करताना कथा ही कथेसारखी व कविता ही कवितेसारखी वाटली पाहिजे. आपण काय लिहितो, याचे भान ठेवून लेखन करणे अत्यावश्यक आहे. शिवाय स्वत:चे लेखन योग्य आहे का, याचे संपादन करण्याची जबाबदारीही तुमच्यावरच असते. बंधन नाही म्हणून काहीही आणि कितीही लिहिण्यात अर्थ नाही. डिजिटल माध्यमांवरही लेखन करताना साहित्याचा आकृतिबंध राखला जाणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिक व अ.भा. मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष डॉ. वसंत आबाजी डहाके यांनी केले.

ठळक मुद्देतिसऱ्या नुक्कड साहित्य संमेलनाला सुरुवात

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : आधुनिक युगाचा बदल स्वीकारून समूह माध्यमे किंवा डिजिटल माध्यमांवर व्यक्त होणे, लेखन करणे ही स्वागतार्ह अशी गोष्ट आहे. मात्र यावर लेखन करताना कथा ही कथेसारखी व कविता ही कवितेसारखी वाटली पाहिजे. आपण काय लिहितो, याचे भान ठेवून लेखन करणे अत्यावश्यक आहे. शिवाय स्वत:चे लेखन योग्य आहे का, याचे संपादन करण्याची जबाबदारीही तुमच्यावरच असते. बंधन नाही म्हणून काहीही आणि कितीही लिहिण्यात अर्थ नाही. डिजिटल माध्यमांवरही लेखन करताना साहित्याचा आकृतिबंध राखला जाणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिक व अ.भा. मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष डॉ. वसंत आबाजी डहाके यांनी केले.डिजिटल माध्यमांवरील लेखकांची साहित्य चळवळ व्यासपीठावर आणणाऱ्या नुक्कड व्यासपीठ व हंगामा बुक डॉट कॉम यांच्यातर्फे आयोजित तिसऱ्या नुक्कड साहित्य संमेलनाच्या उद्घाटनप्रसंगी डॉ. डहाके बोलत होते. याप्रसंगी कथा समीक्षक व अभ्यासक गणेश कनाटे, नुक्कडचे प्रवर्तक विक्रम भागवत, ज्येष्ठ चित्रकार चंद्रकांत चन्ने, माधवी वैद्य प्रामुख्याने उपस्थित होते. डॉ. डहाके पुढे म्हणाले, समूह माध्यमांवर काहीही लिहून स्वत:ला लेखक, कवी म्हणविणाऱ्यांची संख्या वाढलेली आहे, मात्र साहित्य लेखन ही सोपी गोष्ट नाही. त्यासाठी वाचन असणे आणि जगाचे ज्ञान असणे आवश्यक आहे, असे मत त्यांनी मांडले.कथालेखनात वैश्विक जाणीव महत्त्वाची : कनाटेयावेळी बोलताना गणेश कनाटे यांनी नवकथाकारांच्या उणिवा अधोरेखित केल्या. जगातील उत्तम कथा ज्यांनी लिहिल्या त्यांचे साहित्य शेकडो वर्षांपासून जिवंत आहे. मराठी साहित्यामध्ये जीएंच्या कथा जागतिक दर्जाच्या होत्या. गंगाधर गाडगीळ, व्यंकटेश माडगुळकर अशा लेखकांचे योगदानही स्मरणात येते. याचे कारण या लेखकांना आसपासच्या समाज वास्तवाची वैश्विक जाण होती. त्यांनी मनोरंजनासाठी, पैसा किंवा प्रसिद्धीसाठी लेखन केले नाही. कथा लिहिताना आपण काय आणि का लिहितो, याची प्रेरणा जाणली पाहिजे. आपण वास्तवाकडे कसे बघतो आणि त्याचे लेखन करताना आपल्या जीवनाची दृष्टी काय आहे, हेही ओळखणे गरजेचे आहे. कथा ही वास्तवाचे प्रतिरुपण आहे व त्यात तर्कतेची व शास्त्राची जोड देणे महत्त्वाचे ठरते. त्यासाठी पाश्चात्य चिंतनासह आपल्याकडील पारंपरिक साहित्याचा अभ्यास असणेही आवश्यक आहे.मराठी कथा या जागतिक कथाकारांच्या तुलनेत कमी पडतात, हे वास्तव आहे. कारण आपण चिंतनात कमी पडलो. कथा लेखकाला अर्थकारण आणि तत्त्वज्ञानाचीही जाणीव असणे आवश्यक आहे. कथा लिहीत असल्याने इतर गोष्टींकडे दुर्लक्ष करणे चालत नाही. लेखकांच्या भावनेनुसार कथेचा पोत बदलतो. त्यामुळे आत्मभान व विश्वभान राखून कथा लिहिली गेली तर त्याचा पोत सर्वोत्कृष्ट होतो. त्यामुळे पैसा आणि प्रसिद्धीसाठी लेखन करणार असाल तर लिहूच नका, असा सल्लाही कनाटे यांनी दिला. मराठीसह जागतिक लेखकांच्या साहित्याचा अभ्यास केला पाहिजे, परंपरेतील श्रेष्ठत्त्वाचे मूळ शोधले पाहिजे, असे आवाहन त्यांनी केले.संमेलनाच्या सुरुवातीला जम्मू काश्मीरच्या पुलवामा येथे दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. संचालन स्वाती धर्माधिकारी यांनी केले.बालचित्रकारांनी रेखाटला कवितांचा भावार्थसंमेलन परिसरात लागलेले एक चित्रप्रदर्शन सर्वांचे लक्ष वेधणारे आहे. ‘एक पान कवितेचे एक पान चित्रांचे’ या शीर्षकांतर्गत चंद्रकांत चन्ने यांच्या मार्गदर्शनात हे प्रदर्शन सजविण्यात आले आहे. विविध कवींच्या कवितांचा भावार्थ सांगणारी चित्रे चन्ने यांच्या बालकलावंतांनी रेखाटली असून हे प्रदर्शन आकर्षक ठरले आहे.

 

टॅग्स :digitalडिजिटलliteratureसाहित्य