शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपाच्या सांगण्यावरून शिवसेना चालणार का?; संतप्त शिंदेसेनेच्या कार्यकर्त्यांचं पुण्यात आंदोलन
2
"ड्रग्ज... शिंदे... माजी पोलीस अधिकारी..., राज्याचं राजकारण नशेबाज झालंय!"; राऊतांचा फडणवीसांवर निशाणा
3
पुन्हा राज्यसभेवर संधी मिळेल का? मोदी सरकारमधील सहा मंत्र्यांची 2026 मध्ये ‘अग्निपरीक्षा’
4
सरकारी कर्मचारी दांपत्यांना दिलासा! पती-पत्नीची एकाच शहरात नियुक्ती करण्याचे केंद्राचे निर्देश
5
Accident : भाड्याने थार घेतली, गर्लफ्रेंडला भेटायला निघाला; समोर कुटुंब दिसताच गाडी पळवू लागला अन्... 
6
Ola Electric ला सरकारकडून मिळणार ३६६.७८ कोटी रुपयांचा मोठा दिलासा; शेअरमध्ये जोरदार तेजी, जाणून घ्या
7
क्रिकेटमधील उल्लेखनीय कामगिरीची दखल; वैभव सूर्यवंशीचा राष्ट्रपतींच्या हस्ते राष्ट्रीय बाल पुरस्काराने गौरव
8
सर्व (पक्ष) समावेशक भाजपा नीती! काँग्रेस रिकामी, उद्धवसेनेचे घर खाली, मनसेचा कणा मोडला
9
कोंबडी आधी की अंडं? शतकानुशतके पडलेल्या या जुन्या प्रश्नाचं उत्तर अखेर वैज्ञानिकांना सापडलं
10
तुम्ही सुद्धा 'हर्बल टी' पिता का? FSSAI नं कंपन्यांना दिला इशारा, नक्की प्रकरण काय?
11
Girish Mahajan : भाजपामध्ये प्रवेशाचे 'महाभारत'; मंत्री गिरीश महाजन यांना घेराव; निष्ठावंतांवरच अन्याय का?
12
गोपनीय बैठका अन् भाजपाच्या 'एकहाती' सत्तेला खिंडार पाडण्याची रणनीती; जळगावात 'कणकवली पॅटर्न'?
13
Viral : टेक्नोलॉजिया! अवघ्या एका विटेत पठ्ठ्याने तयार केला रूम हीटर; ५० रुपयांच्या खर्चात थंडी केली गायब
14
ऑनलाइन सेवा विस्कळीत होणार? 'या' ९ मागण्यांसाठी डिलिव्हरी बॉईजचे देशव्यापी आंदोलन
15
शिंदेसेनेकडून ४२ जागांचा प्रस्ताव, जागा वाटपाचा तिढा सुटेना; तीन मंत्र्यांसह नेत्यांची जंबो बैठक
16
"मला खूप दुखतंय...", उपचारांसाठी ८ तास वेटिंग; कॅनडात वडिलांसमोर भारतीयाचा तडफडून मृत्यू
17
Travel : 'या' देशात मुस्लिम  बहुसंख्य, पण नोटांवर आहे गणपती! भारतातून १००००० रुपये घेऊन जाल तर कोट्यधीश व्हाल
18
महापालिका निवडणूक: मतांचे विभाजन कोणाच्या पथ्यावर? काँग्रेसचे गणित बिघडण्याची शक्यता! 
19
Shyam Dhani Industries IPO: मसाला बनवणाऱ्या कंपनीनं मागितलेले ₹३८ कोटी, गुंतवणूकदारांनी झोळीत टाकले ₹२५,००० कोटी; पाहा डिटेल्स
20
कंपनीच्या CEO चा कारनामा, आयटी मॅनेजरसोबत गँगरेप; कारच्या डॅशकॅम सगळं रेकॉर्ड झालं, मग...
Daily Top 2Weekly Top 5

देशाच्या विकासासाठी वेगळ्या दृष्टीची गरज

By admin | Updated: January 12, 2015 00:59 IST

देशाला स्वातंत्र्य मिळून ६८ वर्षे झाली. या कालखंडात देशाचा विकास झाला नाही. भारताला स्वांतंत्र्य मिळाले त्यावेळेस जगातील काही देशांच्या तुलनेत भारताची स्थिती बरी होती.

अरुणकुमार : अखिल भारतीय सहसंपर्क प्रमुख राष्ट्र साधना संमेलनयवतमाळ : देशाला स्वातंत्र्य मिळून ६८ वर्षे झाली. या कालखंडात देशाचा विकास झाला नाही. भारताला स्वांतंत्र्य मिळाले त्यावेळेस जगातील काही देशांच्या तुलनेत भारताची स्थिती बरी होती. मात्र आज ते देश विकासाच्या बाबतीत पुढे निघून गेले. मात्र आपण विकासाची दृष्टी नसल्याने मागे राहलो, असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अखिल भारतीय संपर्कप्रमुख अरूण कुमार यांनी राष्ट्रीय स्वयंसेवकांच्या राष्ट्र साधना संमेलनात प्रमुख वक्ते म्हणून बोलताना केले.यवतमाळातीेल पोष्टल ग्राउंड मैदानावर रविवारी संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी व्यासपीठावर अध्यक्षस्थानी कृषी भूषण शेतकरी आणि निसर्ग चळवळीचे सुभाष शर्मा होते. यावेळी मंचावर बापूराव तायडे, दादाराव भडके, सुरेश गोफने, सुखदेव ढवळे, सुरेंद्र खोडवे, अण्णाजी कुरडे, प्रदीप वडनेरकर, विजय कोषटवार होते. अरूण कुमार पुढे बोलताना म्हणाले, भारताच्या विकासासाठी इंग्रजांच्या गुलामगिरीतून मुक्त करणे पहिले लक्ष होते. देश गुलामगिरीतून मुक्त झाला, पण इंग्रजी आणि त्यांच्या संस्कृतीत अधिक गुरफटल्या गेला. परिणामी आपला संपूर्ण विकास खुंटला. आतापर्यंत तीनवेळा वैचारिक परिवर्तन पहायला मिळाले. सन १९४७, १९७७ आणि २०१५ मध्ये हे परिवर्तन प्रामुख्याने जाणवले. केवळ जागृकतेनेच हे घडले. मात्र विकासाला दिशा देण्यासाठी ठोस उपाययोजना झाल्या नाही. देशाला दिशा देण्याची गरज आहे. आज पर्यंत कुठलीही दिशा नसल्याने आपण पुढे गेलोच नाही. चीन, जपान, जर्मनी यासारखे देश एक दृष्टी समोर ठेवून पुढे गेले आहेत. आपल्यालाही अशीच दिशा समोर ठेवून काम करायचे आहे. यासाठी कुठलाही एक व्यक्ती परिवर्तन घडवू शकणार नाही. समाजाचे मोठे योगदान आवश्यक लागणार आहे. हे वैचारीक परिवर्तन घडविण्यासाठी स्वयंसेवकांवर मोठी जबाबदारी राहणार आहे. देशातील मुलभूत समस्या सोडविण्यासाठी परिवर्तनाची गरज आहे. त्यासाठी सकारात्मक विचार वाढायला हवेत. आपल्या पतनासाठी आपन स्वत: कारणीभूत आहोत. कुठलाही देश याला जबाबदार नाही. पूर्वी श्रीमंत होण्यासाठी लोक भारतात येत होते. आता आपण विदेशात जातो. हे कशामुळे होत आहे. आपले मुलभूत चक्र नष्ट करण्याचे काम झाले. यामुळे आपण माघारलो असल्याचे ते म्हणाले. यावेळी खासदार भावना गवळी, हंसराज अहिर, पालकमंत्री संजय राठोड यांच्यासह अनेक गणमान्य व्यक्ती आणि संघाचे पदाधिकारी उपस्थित होते. (प्रतिनिधी)