शहरं
Join us  
Trending Stories
1
पायलटकडूनच मोठी चूक? दोन्ही इंजिनांचा इंधनपुरवठा सेकंदाच्या फरकाने झाला बंद
2
तीन वेळा पदमुक्त होण्याची इच्छा व्यक्त केलेली, जयंत पाटलांचा राजीनामा? राष्ट्रवादी, भाजप म्हणतेय...
3
म्हाडाची जाहिरात आली; ५,२८५  घरांची लॉटरी, या दिवशी होणार बुकिंगला सुरुवात...
4
शत्रूचं ड्रोन ५ लाखांचं, पाडायला लागते १० लाखांचं मिसाइल...; ब्रिगेडिअरनी सांगितला ऑपरेशन सिंदूरचा खर्च...
5
मंत्री शिरसाट म्हणाले...पैशांची एखादी बॅग देऊ, आजकल हमारा नाम बहुत चल रहा है 
6
मेक इन इंडियाचे १०वे वर्ष;  येणार १०० रुपयांचे नाणे; कोलकाता टाकसाळीमध्ये तयार होणार विशेष नाणे
7
नवी मुंबई विमानतळाला ३० सप्टेंबरची डेडलाइन; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सिडको, अदानी समूहाला निर्देश
8
खंडाळा घाटातील ‘मिसिंग लिंक’ नोव्हेंबरपर्यंत सुरू करा; मुख्यमंत्र्यांचे आदेश
9
ईडी आरोपपत्रात रोहित पवारांचे नाव; २०२४ मध्येच चौकशी
10
बूट घ्यायलाही पैसे नव्हते; चिखलात सराव केला...
11
भारतीय न्यायव्यवस्थेपुढे अनोखी आव्हाने; सरन्यायाधीश भूषण गवई यांनी व्यक्त केली खंत
12
दुर्घटनेला महिना उलटला तरी अजूनही प्रवासी, नातेवाईक धास्तावलेलेच...
13
पोलंडची इगा स्वियातेक विम्बल्डनची नवी क्वीन
14
बुमराहला रोखण्याच्या नादात इंग्लंड स्वत: अडकला जाळ्यात!
15
ड्युक्स चेंडूंची समस्या म्हणजे ‘मार पायाला आणि मलम डोक्याला!’, टिकतच नाहीय...
16
भारतातील रस्त्यावरही टेस्लाच्या कार धावणार; या दिवशी पहिलं शोरूम सुरू होणार, लवकरच डिलिव्हरी सुरू होईल
17
Air India Plane Crash :'रिपोर्ट लीक कसा झाला?' अहमदाबाद विमान अपघाताच्या अहवालावर पायलट असोसिएशनने आक्षेप घेतला
18
पंतची मोठी चूक! चोरटी धाव घेण्याच्या नादात फुकटात फेकली विकेट! बेन स्टोक्सचा डायरेक्ट थ्रो अन्...
19
नरेंद्र मोदींनंतर PM म्हणून काँग्रेसकडून राहुल गांधींचा पर्याय? शं‍कराचार्यांचे मोठे विधान
20
“७५ वर्षांचा नियम RSSला लागू करायचा असेल, म्हणून मोहन भागवत तसे म्हणाले असतील”: शंकराचार्य

समाजाभिमुख संशोधनाची गरज

By admin | Updated: January 22, 2015 02:35 IST

विज्ञानाच्या युगात आपल्यासमोर अनेक समस्या आहेत. राज्यातील मराठवाडा तसेच उत्तर व पश्चिम महाराष्ट्रातील काही भागात कमी पावसामुळे ....

नागपूर : विज्ञानाच्या युगात आपल्यासमोर अनेक समस्या आहेत. राज्यातील मराठवाडा तसेच उत्तर व पश्चिम महाराष्ट्रातील काही भागात कमी पावसामुळे दुष्काळी परिस्थितीचा सामना करावा लागतो. तंत्रज्ञानाच्या माध्यमातून जलसंपदेचे व्यवस्थापन करण्याचे मोठे आव्हान आहे. त्यामुळे समाजाभिमुख संशोधनाला प्रोत्साहन द्यायला हवे, असे मत राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी व्यक्त केले. महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठातर्फे उपराजधानीत आयोजित करण्यात आलेल्या ९ व्या आंतरविद्यापीठ ‘अविष्कार’ या संशोधन महोत्सवाचे उद्घाटन राज्यपालांच्या हस्ते झाले. यावेळी त्यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.विद्यार्थ्यांमधील संशोधन गुणांना प्रोत्साहन देण्यासाठी दरवर्षी ‘आविष्कार’ या आंतरविद्यापीठ संशोधन स्पर्धेचे आयोजन करण्यात येते. २१ ते २३ जानेवारीदरम्यान होणाऱ्या या स्पर्धेचे उद्घाटन डॉ. वसंतराव देशपांडे सभागृह येथे बुधवारी झाले. उद्घाटनप्रसंगी भारतीय कृषी संशोधन परिषद, नवी दिल्ली येथील उपमहासंचालक डॉ. के. एम. एल. पाठक, ‘माफसू’चे कुलगुरू प्रा. आदित्यकुमार मिस्रा हे प्रामुख्याने उपस्थित होते.स्पर्धेत टिकून राहण्यासाठी विकासाची प्रक्रिया निरंतर सुुरू राहणे आवश्यक आहे. विद्यार्थीदशेतच संशोधनाचा अनुभव आयुष्याची शिदोरी म्हणून बनून राहतो. संशोधन ही प्रगती, समृद्धी व समस्यांचे निराकरण करणारी गुरुकिल्ली आहे. यातूनच नवनवीन संकल्पनांना प्रत्यक्षात आणणे शक्य होते असे ते म्हणाले. विद्यार्थ्यांमध्ये संशोधनाची आवड निर्माण करण्यासाठी शैक्षणिक संस्थांनी पुढाकार घेण्याची आवश्यकता आहे. संशोधन क्षेत्रातील तरुणांना विद्यापीठ व महाविद्यालयांत शिक्षक म्हणून बोलावले पाहिजे. विद्यापीठे व महाविद्यालये यांची समाजिक जबाबदारी असते व ती लक्षात घेऊन संशोधनावर भर दिला पाहिजे, असे आवाहन राज्यपालांनी केले. ‘अविष्कार’च्या माध्यमातून विद्यार्थ्यांना अनेक नवनवीन गोष्टी शिकायला मिळणार आहे. याचा फायदा व्यक्तिमत्त्व विकासासाठी तर होणारच आहे, परंतु त्यांच्या विचारांच्या कक्षा रुंदावण्यास मदत होईल, असे मत डॉ. पाठक यांनी व्यक्त केले. डॉ.मिस्त्रा यांनी स्वागतपर भाषणात विद्यापीठाबाबत माहिती दिली. यावेळी आमदार प्रकाश गजभिये, विभागीय आयुक्त अनुपकुमार, कवि कुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठाच्या कुलगुरू उमा वैद्य, संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.मोहन खेडकर उपस्थित होते. रेणुका देशकर यांनी संचालन केले.(प्रतिनिधी)