शहरं
Join us  
Trending Stories
1
पार्थच्या व्यवहाराचे ४२ कोटी कोण भरणार? मुंढव्यातील वादग्रस्त व्यवहार आज रद्द होणार?
2
तीन शहरांत रेकी, विषही तयार; अतिरेक्यांचा मोठा कट उधळला, गुजरात एटीएसने पकडले ३ अतिरेकी
3
महाराष्ट्र्रात १३ हजार बोगस कंपन्यांना टाळे; जीएसटीविरोधीत मोहीम
4
‘’राज्याच्या विकासासाठी महायुती एकदिलाने लढणार, जागा वाटपाबाबत कोणतेच मतभेद नाहीत”, एकनाथ शिंदे यांचं मोठं विधान 
5
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
6
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
7
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
8
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
9
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
10
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
11
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
12
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
13
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
14
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
15
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
16
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
17
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
18
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
19
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
20
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर

जमीन अधिग्रहण कायद्यात सुधारणा करण्याची गरज : अमर हबीब

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 6, 2018 00:16 IST

जमीन अधिग्रहण कायद्याअंतर्गत शेतकऱ्यांचा कुठलाही विचार न करता त्यांची जमीन काढून एखाद्या व्यावसायिकाला दिली जाते. हा प्रकार एका व्यावसायिकाची जमीन दुसऱ्याला देण्यासारखे आहे. यामध्ये नेहमी शेतकऱ्यांच्या हक्काची पायमल्ली होते. हे योग्य नाही. त्यामुळे जमीन अधिग्रहण कायदा आणि कमाल जमीन धारण कायद्यात आमूलाग्र बदल करण्याची गरज आहे, असे मत किसानपुत्र आंदोलनचे नेते अमर हबीब यांनी आमदार निवास येथे व्यक्त केले.

ठळक मुद्देकिसानपुत्र आंदोलनाचे आजपासून दुसरे अधिवेशन

आॅनलाईन लोकमतनागपूर : जमीन अधिग्रहण कायद्याअंतर्गत शेतकऱ्यांचा कुठलाही विचार न करता त्यांची जमीन काढून एखाद्या व्यावसायिकाला दिली जाते. हा प्रकार एका व्यावसायिकाची जमीन दुसऱ्याला देण्यासारखे आहे. यामध्ये नेहमी शेतकऱ्यांच्या हक्काची पायमल्ली होते. हे योग्य नाही. त्यामुळे जमीन अधिग्रहण कायदा आणि कमाल जमीन धारण कायद्यात आमूलाग्र बदल करण्याची गरज आहे, असे मत किसानपुत्र आंदोलनचे नेते अमर हबीब यांनी आमदार निवास येथे व्यक्त केले.जनमंच संस्थेच्या सहकार्याने किसानपुत्र आंदोलनचे द्वितीय अधिवेशन येत्या ६ व ७ जानेवारीला नागपूर येथील आमदार निवास येथे होणार आहे. हबीब यांनी या उपक्रमाबाबत पत्रपरिषदेत माहिती दिली. त्यांनी सांगितले, कमाल जमीन धारण कायदा, अधिग्रहण कायदा आणि जमिनीसंदर्भातील इतर कायदे शेतकऱ्यांना घातक असून शेतकºयांच्या आत्महत्यांसाठी जबाबदार आहेत. काँग्रेसने हे कायदे केले असून डाव्यांनी याला समर्थन दिले. तर आता भाजप याची अंमलबजावणी करीत आहे. कमाल जमीन कायद्यानुसार शेतीची जागा निश्चित करण्यात आली आहे. मात्र सरकार जमीन संपादित करून उद्योगपती, संस्थांना देते. अशाप्रकारे सरकारने हस्तक्षेप करून शेतकऱ्यांची हजारो हेक्टर जमीन उद्योगपतींच्या घशात घातली आहे. शेतकऱ्यांचा प्रश्न भाववाढीपुरता मर्यादित ठेवला जातो. मात्र असे अनेक शेतकरीविरोधी कायदे रद्द करण्याची आवश्यकता असल्याचे ठाम मत त्यांनी व्यक्त केले. यावेळी शरद पाटील, श्रीकांत दौंड, अमिताभ पावडे, संजय भरडे आदी उपस्थित होते.अधिवेशनाचे उदघाटन  आजजनमंचच्या सहकार्याने आयोजित किसानपुत्र आंदोलनाचे दुसऱ्या अधिवेशनाचे उदघाटन  ६ जानेवारीला सकाळी १० वाजता आमदार निवास येथे होणार आहे. यावेळी कृषी विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. शरद निंबाळकर प्रामुख्याने उपस्थित राहणार आहेत. दुपारी १२ वाजता ‘शेतकऱ्यांच्या आत्महत्या : कारणे व उपाय’ विषयावर प्रश्नोत्तरे व गटचर्चा होणार आहे. दुपारी २ वाजता ‘शेतकरीविरोधी घटनादुरुस्त्या’ विषयावर गटचर्चा तर दुपारी ४ वाजता ‘कमाल जमीन धारण कायदा’ विषयावर अमर हबीब यांचे व्याख्यान होईल. ७ जानेवारीला जमीन अधिग्रहण कायदा व अन्य शेतकरीविरोधी कायदे या विषयावर अ‍ॅड. महेश भोसले यांचे व्याख्यान तसेच ‘आवश्यक वस्तूंचा कायदा’ या विषयावर जनमंचचे अ‍ॅड. अनिल किलोर यांचे व्याख्यान होणार आहे. विविध विषयावर तज्ज्ञ मान्यवर मार्गदर्शन करणार असून राज्यभरातून शेतकरी येथे सहभाग होणार आहेत.

टॅग्स :nagpurनागपूर