शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

जमीन अधिग्रहण कायद्यात सुधारणा करण्याची गरज : अमर हबीब

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 6, 2018 00:16 IST

जमीन अधिग्रहण कायद्याअंतर्गत शेतकऱ्यांचा कुठलाही विचार न करता त्यांची जमीन काढून एखाद्या व्यावसायिकाला दिली जाते. हा प्रकार एका व्यावसायिकाची जमीन दुसऱ्याला देण्यासारखे आहे. यामध्ये नेहमी शेतकऱ्यांच्या हक्काची पायमल्ली होते. हे योग्य नाही. त्यामुळे जमीन अधिग्रहण कायदा आणि कमाल जमीन धारण कायद्यात आमूलाग्र बदल करण्याची गरज आहे, असे मत किसानपुत्र आंदोलनचे नेते अमर हबीब यांनी आमदार निवास येथे व्यक्त केले.

ठळक मुद्देकिसानपुत्र आंदोलनाचे आजपासून दुसरे अधिवेशन

आॅनलाईन लोकमतनागपूर : जमीन अधिग्रहण कायद्याअंतर्गत शेतकऱ्यांचा कुठलाही विचार न करता त्यांची जमीन काढून एखाद्या व्यावसायिकाला दिली जाते. हा प्रकार एका व्यावसायिकाची जमीन दुसऱ्याला देण्यासारखे आहे. यामध्ये नेहमी शेतकऱ्यांच्या हक्काची पायमल्ली होते. हे योग्य नाही. त्यामुळे जमीन अधिग्रहण कायदा आणि कमाल जमीन धारण कायद्यात आमूलाग्र बदल करण्याची गरज आहे, असे मत किसानपुत्र आंदोलनचे नेते अमर हबीब यांनी आमदार निवास येथे व्यक्त केले.जनमंच संस्थेच्या सहकार्याने किसानपुत्र आंदोलनचे द्वितीय अधिवेशन येत्या ६ व ७ जानेवारीला नागपूर येथील आमदार निवास येथे होणार आहे. हबीब यांनी या उपक्रमाबाबत पत्रपरिषदेत माहिती दिली. त्यांनी सांगितले, कमाल जमीन धारण कायदा, अधिग्रहण कायदा आणि जमिनीसंदर्भातील इतर कायदे शेतकऱ्यांना घातक असून शेतकºयांच्या आत्महत्यांसाठी जबाबदार आहेत. काँग्रेसने हे कायदे केले असून डाव्यांनी याला समर्थन दिले. तर आता भाजप याची अंमलबजावणी करीत आहे. कमाल जमीन कायद्यानुसार शेतीची जागा निश्चित करण्यात आली आहे. मात्र सरकार जमीन संपादित करून उद्योगपती, संस्थांना देते. अशाप्रकारे सरकारने हस्तक्षेप करून शेतकऱ्यांची हजारो हेक्टर जमीन उद्योगपतींच्या घशात घातली आहे. शेतकऱ्यांचा प्रश्न भाववाढीपुरता मर्यादित ठेवला जातो. मात्र असे अनेक शेतकरीविरोधी कायदे रद्द करण्याची आवश्यकता असल्याचे ठाम मत त्यांनी व्यक्त केले. यावेळी शरद पाटील, श्रीकांत दौंड, अमिताभ पावडे, संजय भरडे आदी उपस्थित होते.अधिवेशनाचे उदघाटन  आजजनमंचच्या सहकार्याने आयोजित किसानपुत्र आंदोलनाचे दुसऱ्या अधिवेशनाचे उदघाटन  ६ जानेवारीला सकाळी १० वाजता आमदार निवास येथे होणार आहे. यावेळी कृषी विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. शरद निंबाळकर प्रामुख्याने उपस्थित राहणार आहेत. दुपारी १२ वाजता ‘शेतकऱ्यांच्या आत्महत्या : कारणे व उपाय’ विषयावर प्रश्नोत्तरे व गटचर्चा होणार आहे. दुपारी २ वाजता ‘शेतकरीविरोधी घटनादुरुस्त्या’ विषयावर गटचर्चा तर दुपारी ४ वाजता ‘कमाल जमीन धारण कायदा’ विषयावर अमर हबीब यांचे व्याख्यान होईल. ७ जानेवारीला जमीन अधिग्रहण कायदा व अन्य शेतकरीविरोधी कायदे या विषयावर अ‍ॅड. महेश भोसले यांचे व्याख्यान तसेच ‘आवश्यक वस्तूंचा कायदा’ या विषयावर जनमंचचे अ‍ॅड. अनिल किलोर यांचे व्याख्यान होणार आहे. विविध विषयावर तज्ज्ञ मान्यवर मार्गदर्शन करणार असून राज्यभरातून शेतकरी येथे सहभाग होणार आहेत.

टॅग्स :nagpurनागपूर