शहरं
Join us  
Trending Stories
1
उल्हासनगर: शाखा ताब्यात घेण्यावरून उद्धवसेना व शिंदेसेना आमने-सामने, पोलिसांचा हस्तक्षेप
2
"खून का बदला चुकाने के लिए...!"; लंडनवरून परतताच तारिक रहमान यांनी स्पष्ट केला इरादा; काय म्हणाले?
3
‘परदेश दौऱ्यावर असताना राहुल गांधींवर पाळत ठेवली जातेय’, काँग्रेसचा केंद्र सरकारवर गंभीर आरोप
4
भाजपाचा मित्रपक्षाच्या आमदारांवरच डोळा? पक्षाच्या बैठकीला दांडी, बिहारमध्ये मोठी उलथापालथ होणार
5
VIDEO: Hardik Pandya चं 'लेडी लव्ह'! गर्लफ्रेंड Mahieka Sharma ला सांभाळून कारमध्ये बसवलं...
6
Crime: आईला प्रियकरासोबत रंगेहाथ पकडलं; त्यानंतर मुलानं जे केलं त्यानं पोलीसही हादरले!
7
आधी तरुणीवर गोळ्या झाडल्या, मग स्वत:ही संपवलं जीवन, एकतर्फी प्रेमातून घडली भयंकर घटना
8
Shocking: पाळीव कुत्र्याचा आजार बरा होईना; नैराश्यातून २ सख्ख्या बहि‍णींनी संपवलं जीवन!
9
Sangli: जिच्यावर प्रेम केलं तिच्याशी विवाहाचं स्वप्न साकारलं, पण नियतीनं हिरावून घेतलं; तरुण प्राध्यापकाचा हार्ट अटॅकने मृत्यू
10
राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर! मुंडे, मलिकांची नावे; कोकाटेंना वगळले
11
ठाण्यात एकनाथ शिंदेंना मोठा धक्का! निष्ठावंतांना डावलताच माजी महापौरांकडून पदाचा राजीनामा
12
बिहारच्या राजकारणात पुन्हा एकदा खळबळ; भाजपा मित्रपक्षालाच देणार धक्का?; आमदार फुटीची चर्चा
13
२०२६ मध्ये कोणाची साडेसातीतून मुक्तता होणार? ५ राशींवर शनि वक्री दृष्टी; सतर्क-सावध राहावे!
14
Devayani Farande: डोळ्यात पाणी, आवाजही गहिवरला...! नाशिकमधील पक्षप्रवेशानंतर भाजपा आमदार देवयानी फरांदे भावूक
15
"मूर्ती तोडण्यामागे धार्मिक हेतू नाही, तर...!"; भगवान विष्णू यांची मूर्ती पाडल्याबद्दल भारतानं व्यक्त केली होती चिंता, आता थायलंडनं दिलं असं स्पष्टीकरण
16
"चीन भारतासोबतचे संबंध विकसित करण्यावर भर देतो, कोणत्याही तिसऱ्या देशाला..."; अमेरिकेच्या अहवालावरून चीन भडकला
17
‘मी स्नेहाची हत्या केलेली नाही…’, पँटवर लिहून प्रियकरानं संपवलं जीवन, पोलिसांवर गंभीर आरोप
18
क्रिश का गाना सुनेगा..? अचानक २० वर्षांनी रंगली तुफान चर्चा, 'ले बेटा' वाला Video Viral
19
श्रीमंत व्हायचंय? 'रिच डॅड पुअर डॅड'च्या लेखकाचा गुंतवणुकीचा नवा 'मंत्र', चांदी विषयी केलं मोठं भाकित
20
मुंबईतील उत्तर भारतीयांना OBC आरक्षण मिळणार?: शिंदेसेनेचे नेते संजय निरुपम यांनी दिले संकेत
Daily Top 2Weekly Top 5

जमीन अधिग्रहण कायद्यात सुधारणा करण्याची गरज : अमर हबीब

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 6, 2018 00:16 IST

जमीन अधिग्रहण कायद्याअंतर्गत शेतकऱ्यांचा कुठलाही विचार न करता त्यांची जमीन काढून एखाद्या व्यावसायिकाला दिली जाते. हा प्रकार एका व्यावसायिकाची जमीन दुसऱ्याला देण्यासारखे आहे. यामध्ये नेहमी शेतकऱ्यांच्या हक्काची पायमल्ली होते. हे योग्य नाही. त्यामुळे जमीन अधिग्रहण कायदा आणि कमाल जमीन धारण कायद्यात आमूलाग्र बदल करण्याची गरज आहे, असे मत किसानपुत्र आंदोलनचे नेते अमर हबीब यांनी आमदार निवास येथे व्यक्त केले.

ठळक मुद्देकिसानपुत्र आंदोलनाचे आजपासून दुसरे अधिवेशन

आॅनलाईन लोकमतनागपूर : जमीन अधिग्रहण कायद्याअंतर्गत शेतकऱ्यांचा कुठलाही विचार न करता त्यांची जमीन काढून एखाद्या व्यावसायिकाला दिली जाते. हा प्रकार एका व्यावसायिकाची जमीन दुसऱ्याला देण्यासारखे आहे. यामध्ये नेहमी शेतकऱ्यांच्या हक्काची पायमल्ली होते. हे योग्य नाही. त्यामुळे जमीन अधिग्रहण कायदा आणि कमाल जमीन धारण कायद्यात आमूलाग्र बदल करण्याची गरज आहे, असे मत किसानपुत्र आंदोलनचे नेते अमर हबीब यांनी आमदार निवास येथे व्यक्त केले.जनमंच संस्थेच्या सहकार्याने किसानपुत्र आंदोलनचे द्वितीय अधिवेशन येत्या ६ व ७ जानेवारीला नागपूर येथील आमदार निवास येथे होणार आहे. हबीब यांनी या उपक्रमाबाबत पत्रपरिषदेत माहिती दिली. त्यांनी सांगितले, कमाल जमीन धारण कायदा, अधिग्रहण कायदा आणि जमिनीसंदर्भातील इतर कायदे शेतकऱ्यांना घातक असून शेतकºयांच्या आत्महत्यांसाठी जबाबदार आहेत. काँग्रेसने हे कायदे केले असून डाव्यांनी याला समर्थन दिले. तर आता भाजप याची अंमलबजावणी करीत आहे. कमाल जमीन कायद्यानुसार शेतीची जागा निश्चित करण्यात आली आहे. मात्र सरकार जमीन संपादित करून उद्योगपती, संस्थांना देते. अशाप्रकारे सरकारने हस्तक्षेप करून शेतकऱ्यांची हजारो हेक्टर जमीन उद्योगपतींच्या घशात घातली आहे. शेतकऱ्यांचा प्रश्न भाववाढीपुरता मर्यादित ठेवला जातो. मात्र असे अनेक शेतकरीविरोधी कायदे रद्द करण्याची आवश्यकता असल्याचे ठाम मत त्यांनी व्यक्त केले. यावेळी शरद पाटील, श्रीकांत दौंड, अमिताभ पावडे, संजय भरडे आदी उपस्थित होते.अधिवेशनाचे उदघाटन  आजजनमंचच्या सहकार्याने आयोजित किसानपुत्र आंदोलनाचे दुसऱ्या अधिवेशनाचे उदघाटन  ६ जानेवारीला सकाळी १० वाजता आमदार निवास येथे होणार आहे. यावेळी कृषी विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. शरद निंबाळकर प्रामुख्याने उपस्थित राहणार आहेत. दुपारी १२ वाजता ‘शेतकऱ्यांच्या आत्महत्या : कारणे व उपाय’ विषयावर प्रश्नोत्तरे व गटचर्चा होणार आहे. दुपारी २ वाजता ‘शेतकरीविरोधी घटनादुरुस्त्या’ विषयावर गटचर्चा तर दुपारी ४ वाजता ‘कमाल जमीन धारण कायदा’ विषयावर अमर हबीब यांचे व्याख्यान होईल. ७ जानेवारीला जमीन अधिग्रहण कायदा व अन्य शेतकरीविरोधी कायदे या विषयावर अ‍ॅड. महेश भोसले यांचे व्याख्यान तसेच ‘आवश्यक वस्तूंचा कायदा’ या विषयावर जनमंचचे अ‍ॅड. अनिल किलोर यांचे व्याख्यान होणार आहे. विविध विषयावर तज्ज्ञ मान्यवर मार्गदर्शन करणार असून राज्यभरातून शेतकरी येथे सहभाग होणार आहेत.

टॅग्स :nagpurनागपूर