शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Flood: "ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी होतेय, पण..."; CM फडणवीसांनी सांगितली निर्णय घेण्यातील अडचण
2
फायदाच फायदा...! गाजाच्या निर्मितीत भारताला मोठी संधी! पार पाडू शकतो महत्वाची भूमिका, असा आहे इस्रायलचा संपूर्ण प्लॅन?
3
पहलगाम हल्ल्यानंतर १६० दिवसांनी काश्मीरमधील 'ही' १२ पर्यटनस्थळे पुन्हा पर्यटकांसाठी खुली
4
भरधाव कारचा भीषण अपघातात! अनेक वेळा उलटल्यानं चुराडा, तरुणीही दूर फेकली गेली; बघा VIDEO
5
महात्मा गांधींना शरण जाणे हा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा वैचारिक पराभव; काँग्रेसचा खोचक टोला
6
पाकिस्तानात गेलं की ISI एजंट बनतं का? सोनम वांगचुक यांच्या पत्नीने हिंसाचारासाठी CRPF ला धरलं जबाबदार
7
गावात वास्तव्य, सायकलवरून प्रवास आणि..., असं आहे Arattaiचे संस्थापक श्रीधर वेंबू यांचं साधं राहणीमान
8
"आजकाल मुलांना वाढवणं कठीण...", मृण्मयी देशपांडेने व्यक्त केलं मत, पालकांबद्दल म्हणाली...
9
मोठी बातमी! दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात मदत पोहचणार; पुढच्या आठवड्यात घोषणा करू - CM देवेंद्र फडणवीस
10
Colab Platforms Stock Price: ७३ दिवसांपासून शेअरला लागतंय अपर सर्किट, वर्षभरात ८४२% ची वाढ; गुंतवणूकदार मालामाल
11
Motorola G35 5G: डॉल्बी साउंड असलेला मोटोरोलाचा 5G फोन ८,९९९ रुपयांत लॉन्च! 
12
Anju Yadav : चौकट मोडली, भरारी घेतली! २१ व्या वर्षी लग्न, पतीचा मृत्यू... सिंगल मदर झाली राजस्थानची DSP
13
Amravati: गर्लफ्रेंड पोलीस ठाण्यात जाताच ६व्या मजल्या गेला अन् व्हिडीओ कॉल केला; नंतर बॉयफ्रेंडने सगळ्यांनाच फोडला घाम
14
"तरुणांच्या मनातील शंका..."; थेट आंदोलक तरुणांना भेटण्यासाठी पोहोचले CM धामी, परीक्षा प्रकरणात CBI चौकशीला सहमती 
15
गुंतवणूकदारांची चिंता वाढवणारी बातमी! सलग आठव्या दिवशी बाजार कोसळला; 'ही' आहेत ४ कारणे
16
कुणी कर्ज देता का कर्ज?... पाकिस्तानने पुन्हा IMF पुढे पसरले हात, महापुराचं कारण देत मागितला मोठा निधी
17
Rule Change: उद्यापासून बदलणार 'हे' महत्त्वाचे आर्थिक नियम; सामान्यांवर होणार परिणाम, पटापट चेक करा लिस्ट
18
भारतीय शास्त्रज्ञ डॉ. संध्या यांचा जागतिक स्तरावर डंका, अव्वल २ टक्के शास्त्रज्ञांमध्ये स्थान
19
दिवाळीची भेट! सरकारच्या लाखो कर्मचाऱ्यांसाठी मोठा बोनस जाहीर; दसऱ्यापूर्वीच रक्कम हातात येणार
20
चमत्कार दाखवा आणि २१ लाख जिंका! अंनिसचे बुवा-बाबांना आव्हान; ३६ वर्षांत कोणीच पुढे आले नाही

प्रत्येक क्षेत्रात नीतीमूल्ये आवश्यक

By admin | Updated: October 6, 2014 00:54 IST

नीतीमूल्य जीवनाचा एक भाग आहे. मग डॉक्टर असो, की इंजिनिअर. शिक्षक असो, की उद्योजक, प्रत्येक क्षेत्रात नीतीमूल्यांचे पालन करणे आवश्यक आहे. व्यवसायात त्याला फार मोठे महत्त्व आहे.

पीस फाऊंडेशन : अरुण भार्गव यांचे प्रतिपादननागपूर : नीतीमूल्य जीवनाचा एक भाग आहे. मग डॉक्टर असो, की इंजिनिअर. शिक्षक असो, की उद्योजक, प्रत्येक क्षेत्रात नीतीमूल्यांचे पालन करणे आवश्यक आहे. व्यवसायात त्याला फार मोठे महत्त्व आहे. याशिवाय प्रगती शक्य नसल्याचे प्रतिपादन पीस फाऊंडेशनचे अध्यक्ष डॉ. अरुण भार्गव यांनी केले. पीस फाऊंडेशनच्यावतीने रविवारी पहिला वार्षिक दिन साजरा करण्यात आला. यावेळी ‘नीतीमूल्यांचा प्रसार आणि निरंतर शिक्षण’ या विषयावर ते बोलत होते. कार्यक्रमाला डॉ. मिराज शेख, रंधीर जव्हेरी व प्रीतेश टंक उपस्थित होते. सिव्हिल लाईन्स परिसरातील उद्योग भवनामधील व्हीआयएच्या सभागृहात हा कार्यक्रम पार पडला. कार्यक्रमाला प्रामुख्याने उपस्थित एस. प्रभुरामन यांनी नीतीमूल्यांचे कुणासाठी पालन करायचे, स्वत:साठी की, समाजासाठी याचा सर्वप्रथम विचार करण्याची गरज असल्याचे स्पष्ट केले. ते पुढे म्हणाले, नीतीमूल्यांचे पालन करताना, अनेक समस्या व अडचणींचा सामना करावा लागतो. त्यामुळे प्रथम त्यांना तोंड देण्याची तयारी करावी लागते. राजेंद्र मिश्रा यांनी विद्यार्थ्यांमध्ये नीतीमूल्य रुजविण्याची गरज असल्याचे स्पष्ट करून, यातून समाजात चांगले नागरीक तयार होतील, असे सांगितले. मात्र सध्या शाळा-कॉलेज केवळ कारखाने बनले असल्याची खंत यावेळी त्यांनी व्यक्त केली. शाळा-कॉलेजमध्ये नीतीमूल्यांचे कोणतेही शिक्षण मिळत नाही. अशा शाळा-महाविद्यालयांनी स्वत: पुढाकार घेऊन पीस फाऊंडेशनशी जुळले पाहिजे, असे त्यांनी आवाहन केले. तसेच प्रीतेश टंक यांनी पीस फाऊंडेशनच्यावतीने गतवर्षभरात राबविण्यात आलेल्या विविध उपक्रमांची माहिती देत, शहरातील विविध शाळांमध्ये ‘यंग चॅप्टर’ ची स्थापना करण्यात आल्याचे सांगितले. यावेळी गतवर्षभरात विविध प्रसंगी समाजातील गरजूंची मदत करणाऱ्या धाडसी चिमुकल्यांना पाहुण्यांच्या हस्ते एक पुस्तक व प्रमाणपत्र प्रदान करून त्यांचा गौरव करण्यात आला. तसेच एस. प्रभुरामन व राजेंद्र मिश्रा यांना स्मृतिचिन्ह देऊ न त्यांचाही सत्कार करण्यात आला. संचालन डॉ. रिता भार्गव व डॉ. वृंदा अग्रवाल यांनी केले. (प्रतिनिधी)