शहरं
Join us  
Trending Stories
1
हनी ट्रॅप प्रकरणात भाजपा नेत्याच्या निकटवर्तीयाला मुंबईत अटक; अनेक मोठी नावे उघड होणार
2
Suraj Chavan :'सुरज चव्हाणांना अटक करा, गुंडगिरी खपवून घेणार नाही'; अंजली दमानियांचा हल्लाबोल
3
परस्पर समझोता करून तक्रार मागे, पोलीस हतबल; राज्यातील हनी ट्रॅप प्रकरणात आतापर्यंत काय घडलं?
4
ऑपरेशन सिंदूर, ट्रम्प टॅरिफ मुद्द्यांवर विरोधक आक्रमक, आजपासून संसद अधिवेशन; सर्व मुद्द्यांवर चर्चेस सरकार तयार
5
आजचे राशीभविष्य, २१ जुलै २०२५: नोकरी - व्यवसायात लाभदायी अन् यशदायी दिवस
6
सिद्धार्थ-कियाराच्या लेकीचं घरी जंगी स्वागत, सोशल मीडियावर दिसली झलक
7
श्रावणाची सुरुवात गजलक्ष्मी योगात: ७ मूलांकांचे कल्याण, भरघोस लाभ; सुबत्ता-समृद्धी, शुभ काळ!
8
एपीएमसीच्या १७९ एकर जमिनीवर कोणाचा डोळा? नवी मुंबईतील एपीएमसी मार्केट हलणार?
9
उड्डाण करताच डाव्या बाजूचं इंजिन पेटलं; आगीमुळे बोईंगचे इमर्जन्सी लँडिंग
10
Latur: मारहाणीनंतर ‘छावा’चे कार्यकर्ते रात्री उशिरा रस्त्यावर; राष्ट्रवादीचे बॅनर फाडले
11
आधी ‘तिने’ तीन कोटी उकळले,  नंतर आणखी १० कोटी मागितले! ‘हनी ट्रॅप’ची चर्चा
12
सूक्ष्म धूलिकण करतात फुप्फुसांवर हल्ला; मुंबईतील प्रदूषणाचे गंभीर आरोग्य परिणाम
13
ईडी कोणी ड्रोन नाही की सुपरकॉप नाही...मद्रास उच्च न्यायालयाचे ईडीच्या कार्यशैलीवर ताशेरे
14
आमचा हात, तुमचा गाल... ही युती किती काळ? मुंबईतील मराठीच्या अस्तित्वाची लढाई
15
हे कार्यकर्ते आहेत की गुंडांच्या टोळ्या?
16
पालिकांच्या मदतीने प्रदूषण रोखण्याचा प्रयत्न; मुंबईत हवा गुणवत्ता सुधारण्याचे प्रयत्न सुरू!
17
रुग्णांसाठी समुद्रात उतरणार हेलिकॉप्टर..! मुंबईत कोस्टल रोडवर 'सी-हेलिपॅड'ची संकल्पना
18
हेरगिरी, ‘हनिट्रॅप’ आणि लाखोंची हकालपट्टी! हेरगिरीच्या संशयामुळे अफगाण निर्वासितांचे हाल
19
हायकोर्टाचे कोल्हापूर खंडपीठ स्थापन होणार ना? चर्चांना उधाण
20
कोल्हापुरी चप्पल ‘चोरण्याची’ हिंमतच होऊ नये म्हणून...

प्रत्येक क्षेत्रात नीतीमूल्ये आवश्यक

By admin | Updated: October 6, 2014 00:54 IST

नीतीमूल्य जीवनाचा एक भाग आहे. मग डॉक्टर असो, की इंजिनिअर. शिक्षक असो, की उद्योजक, प्रत्येक क्षेत्रात नीतीमूल्यांचे पालन करणे आवश्यक आहे. व्यवसायात त्याला फार मोठे महत्त्व आहे.

पीस फाऊंडेशन : अरुण भार्गव यांचे प्रतिपादननागपूर : नीतीमूल्य जीवनाचा एक भाग आहे. मग डॉक्टर असो, की इंजिनिअर. शिक्षक असो, की उद्योजक, प्रत्येक क्षेत्रात नीतीमूल्यांचे पालन करणे आवश्यक आहे. व्यवसायात त्याला फार मोठे महत्त्व आहे. याशिवाय प्रगती शक्य नसल्याचे प्रतिपादन पीस फाऊंडेशनचे अध्यक्ष डॉ. अरुण भार्गव यांनी केले. पीस फाऊंडेशनच्यावतीने रविवारी पहिला वार्षिक दिन साजरा करण्यात आला. यावेळी ‘नीतीमूल्यांचा प्रसार आणि निरंतर शिक्षण’ या विषयावर ते बोलत होते. कार्यक्रमाला डॉ. मिराज शेख, रंधीर जव्हेरी व प्रीतेश टंक उपस्थित होते. सिव्हिल लाईन्स परिसरातील उद्योग भवनामधील व्हीआयएच्या सभागृहात हा कार्यक्रम पार पडला. कार्यक्रमाला प्रामुख्याने उपस्थित एस. प्रभुरामन यांनी नीतीमूल्यांचे कुणासाठी पालन करायचे, स्वत:साठी की, समाजासाठी याचा सर्वप्रथम विचार करण्याची गरज असल्याचे स्पष्ट केले. ते पुढे म्हणाले, नीतीमूल्यांचे पालन करताना, अनेक समस्या व अडचणींचा सामना करावा लागतो. त्यामुळे प्रथम त्यांना तोंड देण्याची तयारी करावी लागते. राजेंद्र मिश्रा यांनी विद्यार्थ्यांमध्ये नीतीमूल्य रुजविण्याची गरज असल्याचे स्पष्ट करून, यातून समाजात चांगले नागरीक तयार होतील, असे सांगितले. मात्र सध्या शाळा-कॉलेज केवळ कारखाने बनले असल्याची खंत यावेळी त्यांनी व्यक्त केली. शाळा-कॉलेजमध्ये नीतीमूल्यांचे कोणतेही शिक्षण मिळत नाही. अशा शाळा-महाविद्यालयांनी स्वत: पुढाकार घेऊन पीस फाऊंडेशनशी जुळले पाहिजे, असे त्यांनी आवाहन केले. तसेच प्रीतेश टंक यांनी पीस फाऊंडेशनच्यावतीने गतवर्षभरात राबविण्यात आलेल्या विविध उपक्रमांची माहिती देत, शहरातील विविध शाळांमध्ये ‘यंग चॅप्टर’ ची स्थापना करण्यात आल्याचे सांगितले. यावेळी गतवर्षभरात विविध प्रसंगी समाजातील गरजूंची मदत करणाऱ्या धाडसी चिमुकल्यांना पाहुण्यांच्या हस्ते एक पुस्तक व प्रमाणपत्र प्रदान करून त्यांचा गौरव करण्यात आला. तसेच एस. प्रभुरामन व राजेंद्र मिश्रा यांना स्मृतिचिन्ह देऊ न त्यांचाही सत्कार करण्यात आला. संचालन डॉ. रिता भार्गव व डॉ. वृंदा अग्रवाल यांनी केले. (प्रतिनिधी)