शहरं
Join us  
Trending Stories
1
India Into Final : सात वेळच्या चॅम्पियनसमोर ८ वर्षांपूर्वीचा रुबाब! विक्रमी विजयासह टीम इंडियानं गाठली फायनल
2
IND vs AUS : "ना फिफ्टीचं सेलिब्रेशन, ना सेंच्युरीचं! विजयी धाव घेताच जेमिमाला अश्रू अनावर; म्हणाली...
3
सरकार शेतकरी कर्जमाफी कधीपर्यंत करणार? मुख्यमंत्री फडणवीसांनी बैठकीनंतर सांगितला प्लॅन
4
"मुख्यमंत्री करा म्हणून किती लाचारी करायची?"; राज ठाकरेंनी एकनाथ शिंदेंना डिवचलं, चढवला हल्ला
5
Jemimah Rodrigues Century : शाब्बास जेमी! घरच्या मैदानात अविस्मरणीय शतकी खेळीसह लुटली मैफील
6
Sangli Crime: ‘व्हाईट हाऊस हॉटेल’च्या बारमध्ये मित्रानेच चिरला गळा, तरुणाचा जागेवरच मृत्यू
7
एकीकडे दिलासा, मात्र दुसरीकडे बच्चू कडू, राजू शेट्टी यांच्यासह हजारो शेतकरी आंदोलकांविरोधात गुन्हा दाखल
8
शेतकऱ्यांच्या कायमस्वरूपी कर्जमुक्तीसाठी उच्चाधिकार समितीची स्थापना; मुख्यमंत्री फडणवीस-बच्चू कडू यांच्या बैठकीत निर्णय
9
‘चाचा पीएमओ है हमारे’, एअरपोर्ट ऑथोरिटीत नोकरी मिळवून देण्याच्या नावाखाली बंटी-बबलीकडून ७ लाखांचा गंडा
10
Phaltan Doctor Update: "हॉटेलमध्ये हातावर सुसाईड नोट दिसली नाही, पोस्टमार्टम रुममध्ये दिसली"; वकिलाने कोर्टासमोर मांडली शंका
11
Maoist Leader: ‘देवजी’च्या महासचिवपदी निवडीचा दावा सपशेल खोटा, आत्मसमर्पण करणाऱ्या 'चंद्राण्णा'वर साधला निशाणा
12
IND vs AUS : ७ वेळच्या वर्ल्ड चॅम्पियनसमोर जेमी-हरमनप्रीतची हवा; दोघींनी मिळून सेट केला नवा विक्रम
13
बिहार निवडणुकीत काँग्रेस-राजदला किती जागा मिळणार?; PM नरेंद्र मोदींची 'भविष्यवाणी'
14
विदर्भाला बसला ‘माेंथा’ चक्रीवादळाचा फटका ! पुढचे तीन दिवस अवकाळीचे संकट ; नोव्हेंबरपर्यंत जोर राहणार कायम?
15
शिवरायांच्या गडकिल्ल्यांवर मोदींच्या नावाने उघडणार 'नमो पर्यटन केंद्र'; राज ठाकरेंचा तीव्र विरोध
16
खासगी क्षणात अडथळा ठरत होती प्रेयसीची चिमुकली! प्रियकरानं उचललं टोकाचं पाऊल? जाणून तुमचाही थरकाप उडेल! 
17
याला म्हणतात शेअरचा धमाका...! गुंतवणूकदारांना केलं मालामाल; १०००० चे फक्त १० महिन्यांत बनवले 5 लाख; अजूनही तेजी कायम
18
महाराष्ट्रातला मोर्चा दणदणीत झाला पाहिजे, राज ठाकरेंचं आवाहन; मतचोरीवरून मेळाव्यात केले सादरीकरण
19
सरन्यायाधीश गवई यांच्यानंतर पुढचे सरन्यायाधीश कोण असतील? सरकारने केली मोठी घोषणा
20
Bihar Election: नितीश कुमारी की, तेजस्वी यादव, बिहारमध्ये कोणाचे सरकार येणार? फलोदी सट्टा बाजाराचा कौल काय?

रामटेक लोकसभेवर राष्ट्रवादीचा दावा; प्रदेशाध्यक्षांसमोर मांडले समीकरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 14, 2023 21:06 IST

Nagpur News काँग्रेसला जिल्ह्यात विधानसभेच्या सहापैकी चार दिल्या जातात. त्यामुळे लोकसभेची जागा राष्ट्रवादीने मागावी, अशी मागणी जिल्हाध्यक्ष बाबा गुजर केली.

नागपूर : काँग्रेसपाठोपाठ आता राष्ट्रवादी काँग्रेसनेही रामटेक लोकसभेच्या जागेवर दावा केला आहे. रामटेकची जागा शिवसेनेने जिंकली होती. मात्र, आता खा. कृपाल तुमाने व आ. आशिष जयस्वाल हे दोघेही शिंदे गटात सहभागी झाले आहेत. शिवसेना विभागल्यामुळे कमजोर झाली आहे. राष्ट्रवादी जिल्ह्यातील दोन विधानसभा मतदारसंघांत लढते. त्यामुळे रामटेक लोकसभेची जागा राष्ट्रवादी काँग्रेसला सोडावी, अशी मागणी स्थानिक पदाधिकाऱ्यांनी प्रदेशाध्यक्ष आ. जयंत पाटील यांच्याकडे केली.

वर्धा, अमरावती, गडचिरोली व नागपूर या चार लोकसभा मतदारसंघांची स्थिती जाणून घेण्यासाठी बुधवारी प्रदेशाध्यक्ष आ. जयंत पाटील यांनी मुंबईत बैठक बोलाविली होती. या बैठकीला ज्येष्ठ नेते खा. प्रफुल्ल पटेल, विरोधी पक्षनेते अजित पवार, दिलीप वळसे-पाटील, छगन भुजबळ, अनिल देशमुख हे प्रमुख नेते उपस्थित होते. बैठकीत जिल्हाध्यक्ष बाबा गुजर यांनी काँग्रेसला जिल्ह्यात विधानसभेच्या सहापैकी चार दिल्या जातात. त्यामुळे लोकसभेची जागा राष्ट्रवादीने मागावी, अशी मागणी केली. काँग्रेस लढत असलेल्या चार विधानसभा मतदारसंघांतही राष्ट्रवादीची बऱ्यापैकी ताकद आहे. जिल्ह्यात तिसऱ्या क्रमाकांवर असलेल्या शिवसेनेला (ठाकरे गट) लोकसभेची उमेदवारी देणे योग्य होणार नाही, अशीही बाजू गुजर यांनी मांडली. बैठकीत माजी आ. प्रकाश गजभिये, राजाभाऊ ताकसांडे व रमेश फुले यांनी पक्षाने उमेदवारी दिली तर आपली ताकदीने निवडणूक लढण्याची तयारी असल्याचे सांगितले. बैठकीला कार्याध्यक्ष विलास झोडापे, सलील देशमुख, लीलाधर धनविजय, राजाभाऊ आखरे, संतोष नरवडे, अनुप खराडे, बंडोपंत उमरकर, अनिल साठवणे, विलास कांबळे आदी उपस्थित होते.

जिल्हा परिषदेतही डावलले जाते

- विधानसभा निवडणुकीत आघाडीमध्ये राष्ट्रवादीला काटोल व हिंगणा हे दोनच मतदारसंघ दिले जातात. काँग्रेस उर्वरित चार मतदारसंघांत लढते. याचे परिणाम जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत भोगावे लागतात. या निवडणुकीतही आघाडीत राष्ट्रवादीच्या वाट्याला कमी जागा येतात. असेच सुरू राहिले तर जिल्ह्यात राष्ट्रवादी वाढणार कशी, असा प्रश्नही स्थानिक पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला.

टॅग्स :NCPराष्ट्रवादी काँग्रेस