शहरं
Join us  
Trending Stories
1
"आम्ही इंग्रजी आहोत का? इथे लंडनमधून राहायला आलोय का?" बावनकुळेंनी ठाकरे बंधूंना सुनावलं
2
"भजन करायला थोडीच बसलोय, मठ पुरेसे आहेत...!"; हा श्लोक म्हणत CM योगी भरविधानसभेत कडाडले
3
शिवसेना-मनसे युती, संजय राऊतांना मानाचे स्थान, पण बाळा नांदगावकर कुठेच दिसेना; गेले कुठे?
4
ऐन महापालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत राज्य मंत्रिमंडळाची बैठक; चार मोठे निर्णय घेतले
5
टीम इंडियाचा ICC क्रमवारीत धुमधडाका! एक-दोन नव्हे, तब्बल ५ स्टार क्रिकेटर रँकिंगमध्ये अव्वल
6
अतिशय गुप्तपणे भारताने बंगालच्या खाडीत केला मोठा धमाका; कित्येक किमी पसरला आवाज, चीनला धडकी
7
"भगवा झेंडा पाहून TMC चा लाठीचार्ज, गुंडांना पोलिसांच्या मागे लपवणं..."; ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
8
Viral Video: भगवान विष्णूची कंबोडियातील मूर्ती लष्कराने पाडली, व्हायरल होत असलेला व्हिडीओचे सत्य काय?
9
"आमचं हिंदुत्व अस्सल, फक्त मतांसाठी भगवी शाल घालणारे आम्ही नाहीत"; मुख्यमंत्र्यांचे राज ठाकरेंना सडेतोड उत्तर
10
भाजपाला धक्का, महादेव जानकरांची काँग्रेससोबत आघाडी, एकत्र निवडणूक लढवणार  
11
Eknath Shinde: आपली पोरं सांभाळू शकत नाहीत, मुंबई काय सांभाळणार? एकनाथ शिंदेंची ठाकरे बंधूंवर टीका
12
'धुरंधर'च्या यशावर रणवीर सिंह गप्प का? सिनेमातील 'डोंगा'नेच दिली प्रतिक्रिया; म्हणाला...
13
Taurus Yearly Horoscope 2026: वृषभ राशीसाठी नवीन वर्ष 2026 कसं असेल, प्रतिभा आणि संयमाची कसोटी; 'या' वर्षात कुटुंबाची साथ ठरेल यशाची गुरुकिल्ली!
14
"पराभव समोर दिसताच भाजप पैसा आणि जातीचे राजकारण सुरू करते" आदित्य ठाकरेंची बोचरी टीका!
15
विराट सेंच्युरी! किंग कोहलीनं मोडला मास्टर ब्लास्टर सचिनचा रेकॉर्ड; वेगाने गाठला १६००० धावांचा पल्ला
16
नितेश राणे, प्रवीण दरेकर आणि प्रसाद लाड यांना कोर्टाचा दणका, बजावलं अजामिनपात्र वॉरंट
17
जपानमध्ये शंभरी पार करणार्‍यांची संख्या लक्षावधी, महिलांचे प्रमाण अधिक; दीर्घायुष्याचे गुपित काय?
18
युतीची घोषणा मात्र जागांचा सस्पेन्स; उद्धवसेना-मनसेत जागावाटपावर 'असा' ठरलाय फॉर्म्युला?
19
सोनं थांबेना, चांदी आवरेना! सोन्याच्या दरात ७०% तर चांदीत १५० टक्क्यांची वाढ; पाहा कुठे पोहोचतील किमती?
20
राष्ट्रवादीचे नेते राहुल कलाटे भाजपमध्ये;पक्षातील कार्यकर्त्यांचा विरोध डावलून दिला प्रवेश
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हा बँकेला नवसंजीवनी

By admin | Updated: March 15, 2016 04:51 IST

केवळ शेतकऱ्यांना बँकेच्या विविध सवलतीचा फायदा व्हावा, या उद्देशाने राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय

नागपूर : केवळ शेतकऱ्यांना बँकेच्या विविध सवलतीचा फायदा व्हावा, या उद्देशाने राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या प्रयत्नांमुळे रिझर्व्ह बँकेने नागपूरच्या नागपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला आपला कारभार सुरू करण्याची परवानगी दिली. त्यामुळे यंदाच्या खरीप हंगामात शेतकऱ्यांना कर्ज मिळण्याची प्रक्रिया लवकरच सुरू होणार आहे.बँकेचे कार्यक्षेत्र नागपूर जिल्हा सोमवारी रिझर्व्ह बँकेने जिल्हा बँकेला आपला कारभार पुन्हा सुरू करण्याची परवानगी बहाल करताना दोन अटी घालून दिल्या आहेत. या बँकेची कार्यकक्षा फक्त नागपूर जिल्हाच राहणार आहे. तसेच परवान्याची प्रत बँकेला प्राप्त झाल्यानंतर बँक आपले दैनंदिन काम सुरू करू शकेल.राज्यात काँग्रेस-राष्ट्रवादीचे आघाडी सरकार असताना बँकेत १५० कोटींचा घोटाळा झाला होता. त्यानंतर बँकेवर प्रशासक नेमण्यात आला होता. प्रशासकाच्या काळातही घोटाळे झाल्यामुळे अनेकांनी गुंतवणूक केलेल्या रकमा बँकेकडे अडकल्या. शेतकऱ्यांना मिळणारे कर्ज थांबले. अनेक कर्मचाऱ्यांचे पगारही थांबले होते. शेतकऱ्यांचे बरेच नुकसानही बँक बंद झाल्यामुळे झाले. १५ मार्चपर्यत नागपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक सुरू करण्यात येईल, असे आश्वासन बावनकुळे यांनी नागपूरच्या परिसरातील शेतकऱ्यांना दिले होते. तसेच मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून या बँकेचा कामकाज सुरू करण्यासाठी आवश्यक असलेला निधी मिळवून देण्यासाठी शासन दरबारी पुढाकार घेतला. अनेक बैठका झाल्यानंतर शासनाने बँकेला काही निधी देण्याची तयारी दर्शविली.कर्ज फेडणाऱ्या शेतकऱ्यांनाच कर्ज मिळणारबँकेचे आर्थिक व्यवहार सुरू होताच आॅक्टोबरनंतर कर्ज फेडणाऱ्या शेतकऱ्यांनाच कर्ज वाटप करण्यात येणार असल्याची माहिती आहे. पूर्वी कर्जाचा भरणा केलेल्या वा आता करीत असलेल्यांचा नंतर विचार करण्यात येणार आहे. मार्चच्या प्रारंभीपासूनच १०० कोटी, त्यानंतर ५० कोटींचे कर्ज वाटप करण्यात येणार आहे. बँक सुरू होताच एनपीए कमी होणार आहे. एक लाखापर्यंत शून्य टक्के आणि दोन लाखांपर्यंत दोन टक्के व्याजदराने कर्जवाटप होणार आहे. याशिवाय ठेवी परतची प्रक्रिया रिझर्व्ह बँकेचे नियम आणि अटींनुसारच होईल.(प्रतिनिधी)शासनाने आश्वासन पाळलेरिझर्व्ह बँकेने आता बँक चालविण्यासाठी परवाना दिल्यामुळे शेतकऱ्याच्या हक्काची बँक असलेल्या एनडीसीसी बँक पुन्हा जिवंत झाली आहे. नागपूर भागातील शेतकऱ्यांना आता बँकेच्या सर्व योजनांचा लाभ घेता येणार आहे. अनेकांना वेळोवेळी कर्जेही उपलब्ध होतील. शेतकऱ्यांसाठी ही बँक सुरू होणे अत्यंत गरजेचे होते. शासनाने दिलेले आश्वासन नियोजित वेळेत पाळले. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.