शहरं
Join us  
Trending Stories
1
आम्हाला वाचवा...भारताच्या मित्रराष्ट्रांसमोर पाकने पसरले हात; अमेरिका-रशियाने दिले 'हे' उत्तर
2
संतोष देशमुखांच्या कन्येचे 12वीत घवघवीत यश; वैभवीने मिळवले 85.33 टक्के गुण...
3
कारमध्ये बसून आमदार मोजत होता रोकड; ACB च्या पथकानं रंगेहाथ पकडले, काय आहे प्रकरण?
4
HSC Exam Result 2025: १२ वी परीक्षेत १२४ केंद्रांवर गैरप्रकार; त्रुटी आढळल्यास केंद्र कायमस्वरूपी बंद करणार - शरद गोसावी
5
Maharashtra HSC Result 2025: कोकण पुन्हा नंबर 'वन'! बारावीचा निकाल जाहीर; मुलींचीच बाजी, जाणून घ्या निकाल
6
HI हर्षा, माझ्याशी लग्न करशील?; असलमच्या प्रपोजलला कुंभमधील व्हायरल गर्लचं बेधडक उत्तर
7
Instagram Crime News: इन्स्टाग्रामवर मैत्री, तरुणीवर अनेक वेळा बलात्कार अन् बनवले व्हिडीओ; लाखो रुपये उकळले
8
विश्वास बसला नसता...! युक्रेनने समुद्री ड्रोनद्वारे रशियाचे सुखोई फायटरजेट पाडले; अमेरिकेसह सर्व देशांच्या सैन्यांना धक्का
9
आमिर खानच्या बहुचर्चित 'सितारे जमीन पर'चं पहिलं पोस्टर आऊट, 'या' दिवशी रिलीज होणार सिनेमा
10
पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवाद्यांचा आणखी एक कट उघड; गुप्तचर विभागाची माहिती, अलर्ट जारी
11
"लग्नानंतर ४ वर्षांनी घटस्फोट झाला आणि...", Divorce बद्दल पहिल्यांदाच बोलला स्वप्नील जोशी
12
पहलगाम नरसंहाराला देशाचे गृहमंत्री अमित शाह जबाबदार; संजय राऊतांचा हल्लाबोल
13
Video - रेस्टॉरंटमध्ये टेबल न मिळाल्याने संतापले मंत्री; रातोरात बोलावली फूड सेफ्टी टीम अन्...
14
धक्कादायक! पुण्यात नऊ वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार; तरुणाविरोधात गुन्हा दाखल
15
Crime News: पंखा दाखवा म्हणाले अन् दुकानदारावर गोळी झाडून निघून गेले; घटना सीसीटीव्हीमध्ये कैद
16
निवेदिता सराफ यांच्याकडून घडलेली 'ती' चूक, अशोक सराफ यांनी पत्नीला चांगलंच सुनावलं
17
"मी पाकिस्तानात राहणाऱ्या मामे बहिणीशी लग्न केलं कारण..."; जवानाने उघड केलं मोठं रहस्य
18
घरातल्या कमोडमध्ये झाला मोठा धमाका, वेस्टर्न टॉयलेटचा स्फोट होऊन तरुण गंभीर जखमी!
19
"हिला पण गोळी मारायला हवी"; मुस्लिमांच्या विरोधात जाऊ नका म्हणणाऱ्या सैनिकाच्या पत्नीला केलं ट्रोल
20
"पाकिस्तानवाल्यांनो मी तुमच्या सोबत, जय पाकिस्तान!" राखी सावंतचा व्हिडीओ पाहून संतापले नेटकरी

जिल्हा बँकेला नवसंजीवनी

By admin | Updated: March 15, 2016 04:51 IST

केवळ शेतकऱ्यांना बँकेच्या विविध सवलतीचा फायदा व्हावा, या उद्देशाने राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय

नागपूर : केवळ शेतकऱ्यांना बँकेच्या विविध सवलतीचा फायदा व्हावा, या उद्देशाने राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या प्रयत्नांमुळे रिझर्व्ह बँकेने नागपूरच्या नागपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला आपला कारभार सुरू करण्याची परवानगी दिली. त्यामुळे यंदाच्या खरीप हंगामात शेतकऱ्यांना कर्ज मिळण्याची प्रक्रिया लवकरच सुरू होणार आहे.बँकेचे कार्यक्षेत्र नागपूर जिल्हा सोमवारी रिझर्व्ह बँकेने जिल्हा बँकेला आपला कारभार पुन्हा सुरू करण्याची परवानगी बहाल करताना दोन अटी घालून दिल्या आहेत. या बँकेची कार्यकक्षा फक्त नागपूर जिल्हाच राहणार आहे. तसेच परवान्याची प्रत बँकेला प्राप्त झाल्यानंतर बँक आपले दैनंदिन काम सुरू करू शकेल.राज्यात काँग्रेस-राष्ट्रवादीचे आघाडी सरकार असताना बँकेत १५० कोटींचा घोटाळा झाला होता. त्यानंतर बँकेवर प्रशासक नेमण्यात आला होता. प्रशासकाच्या काळातही घोटाळे झाल्यामुळे अनेकांनी गुंतवणूक केलेल्या रकमा बँकेकडे अडकल्या. शेतकऱ्यांना मिळणारे कर्ज थांबले. अनेक कर्मचाऱ्यांचे पगारही थांबले होते. शेतकऱ्यांचे बरेच नुकसानही बँक बंद झाल्यामुळे झाले. १५ मार्चपर्यत नागपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक सुरू करण्यात येईल, असे आश्वासन बावनकुळे यांनी नागपूरच्या परिसरातील शेतकऱ्यांना दिले होते. तसेच मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून या बँकेचा कामकाज सुरू करण्यासाठी आवश्यक असलेला निधी मिळवून देण्यासाठी शासन दरबारी पुढाकार घेतला. अनेक बैठका झाल्यानंतर शासनाने बँकेला काही निधी देण्याची तयारी दर्शविली.कर्ज फेडणाऱ्या शेतकऱ्यांनाच कर्ज मिळणारबँकेचे आर्थिक व्यवहार सुरू होताच आॅक्टोबरनंतर कर्ज फेडणाऱ्या शेतकऱ्यांनाच कर्ज वाटप करण्यात येणार असल्याची माहिती आहे. पूर्वी कर्जाचा भरणा केलेल्या वा आता करीत असलेल्यांचा नंतर विचार करण्यात येणार आहे. मार्चच्या प्रारंभीपासूनच १०० कोटी, त्यानंतर ५० कोटींचे कर्ज वाटप करण्यात येणार आहे. बँक सुरू होताच एनपीए कमी होणार आहे. एक लाखापर्यंत शून्य टक्के आणि दोन लाखांपर्यंत दोन टक्के व्याजदराने कर्जवाटप होणार आहे. याशिवाय ठेवी परतची प्रक्रिया रिझर्व्ह बँकेचे नियम आणि अटींनुसारच होईल.(प्रतिनिधी)शासनाने आश्वासन पाळलेरिझर्व्ह बँकेने आता बँक चालविण्यासाठी परवाना दिल्यामुळे शेतकऱ्याच्या हक्काची बँक असलेल्या एनडीसीसी बँक पुन्हा जिवंत झाली आहे. नागपूर भागातील शेतकऱ्यांना आता बँकेच्या सर्व योजनांचा लाभ घेता येणार आहे. अनेकांना वेळोवेळी कर्जेही उपलब्ध होतील. शेतकऱ्यांसाठी ही बँक सुरू होणे अत्यंत गरजेचे होते. शासनाने दिलेले आश्वासन नियोजित वेळेत पाळले. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.