शहरं
Join us  
Trending Stories
1
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
2
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
3
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
4
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
5
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
6
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
7
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
8
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
9
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
10
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
11
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
12
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
13
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
14
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
15
Health Tips: लघवीला दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
16
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
17
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
18
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
19
Summer Special: सुकी भेळ करायची तर 'हा' सिक्रेट' मसाला हवाच, वाढवतो सुक्या भेळेची लज्जत
20
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
Daily Top 2Weekly Top 5

लॉकडाऊन वाढीच्या चर्चेमुळे निसर्ग पर्यटन अडचणीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 29, 2020 23:26 IST

राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणाच्या आदेशानंतर बंद पडलेले निसर्ग पर्यटन अद्यापही सुरू झालेले नाही. मात्र या पर्यटनाला राज्यात मान्यता दिली जाणार आहे. याच पार्श्वभूमीवर राज्यातील लॉकडाऊन ३० जुलैपर्यंत वाढण्याचीही चर्चा सुरू आहे. त्यामुळे या काळात हे पर्यटन अडचणीत सापडण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

ठळक मुद्दे१ जुलैपासून बफरमध्ये पर्यटन : कडक निर्बंधात पर्यटक येणार कसे?

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणाच्या आदेशानंतर बंद पडलेले निसर्ग पर्यटन अद्यापही सुरू झालेले नाही. मात्र या पर्यटनाला राज्यात मान्यता दिली जाणार आहे. याच पार्श्वभूमीवर राज्यातील लॉकडाऊन ३० जुलैपर्यंत वाढण्याचीही चर्चा सुरू आहे. त्यामुळे या काळात हे पर्यटन अडचणीत सापडण्याची शक्यता वर्तविली जात आहे.देशात कोरोनाचा शिरकाव झाल्यापासून वन पर्यटनावर बंदी घालण्यात आली आहे. मागील १०० दिवसाहून अधिक काळापासून राज्यातील अभयारण्य आणि व्याघ्र प्रकल्प कुलूपबंद आहेत. यामुळे या व्यवसायावर अवलंबून असलेल्या अनेकांचा रोजगार हिरावला आहे. टुरिस्ट गाईड, जिप्सी चालक , हॉटेल्स, स्थानिक उद्योगांना या बंदीचा तीन महिन्यापासून चांगलाच फटका बसला आहे. त्यामुळे विदर्भातील ताडोबा, पेंच व्याघ्र प्रकल्प व टिपेश्वर अभयारण्याजवळील या व्यावसायिकांनी आपल्या उपजीविकेचे कारण पुढे करून बफरमधील पर्यटनाला अनुमती देण्याची मागणी केली होती. शासनाचा खालावलेला महसूल, ग्रामस्थांच्या गरजा लक्षात घेऊन नियमांच्या अधीन राहून या पर्यटनाला मंजुरी देण्याचे जवळपास ठरले आहे. मध्य प्रदेशात १५ जूनपासून कोअरमध्ये वन पर्यटन सुरू झाले आहे. ताडोबा, अंधारी, टिपेश्वर, पेंचमध्ये बफरमधील पर्यटनाचा मार्ग जवळपास मोकळा झाला आहे. पेंचसाठी आदेश मंगळवारी निघण्याची शक्यता आहे तर ताडोबासाठी परवानगी मिळाली आहे.दरम्यान, राज्यातील लॉकडाऊन ३० जुलैपर्यंत वाढण्याची शक्यता वर्तविली जात आहे. या काळात वाहतूक बंद असल्यावर पर्यटक येणार कसे, हा महत्त्वाचा मुद्दा आहे. पर्यटकांचे बुकिंग ऑनस्पॉट होणार असल्याने त्यांना प्रवासासह बऱ्याच अडचणींचा सामना करावा लागणार आहे.कोटींवर व्यवसाय बुडालावन पर्यटन बंद असल्याने विदर्भात कोटींवर रुपयांचा व्यवसाय बुडाला आहे. एकट्या ताडोबा, अंधारी व्याघ्र प्रकल्पात सव्वातीन कोटी रुपयांवर नुकसान झाले आहे. पेंच, मेळघाट, बोर, टिपेश्वर या सर्व ठिकाणचेही बुडालेले उत्पन्न कोटींच्या घरात आहे. त्याचा फटका या व्यवसायावर अवलंबून असलेल्या सर्वच घटकांना बसला आहे.बफरमधील निसर्ग पर्यटन सुरू करण्यासंदर्भात आदेश आले आहेत. शासनाच्या नियमांच्या अधीन राहूनच पर्यटनाला मान्यता दिली जाईल. पेंचसाठी मंगळवारी दुपारपर्यंत आदेश निघण्याची अपेक्षा आहे. जिल्हाधिकारी यांच्यास्तरावर मंजुरीसाठी पत्र गेले आहे.रविकिरण गोवेकर, मुख्य वनसंरक्षक व क्षेत्र संचालक, पेंच व्याघ्र प्रकल्प

टॅग्स :forestजंगलtourismपर्यटन