शहरं
Join us  
Trending Stories
1
ही घरे नाहीत तर पुढच्या पिढ्यांसाठी ‘सोन्यासारखी’ गुंतवणूक; CM देवेंद्र फडणवीसांचा BDD वासियांना सल्ला
2
"जबान संभालें, वरना...!"; पाकिस्तानच्या चिथावणीखोर वक्तव्यांवर भारताचं चोख प्रत्युत्तर
3
दिल्ली, बीजिंग आणि मॉस्कोच्या लागोपाठ बैठका; काय आहे पंतप्रधान मोदींची SCO रणनीती?
4
Vir Chakra: दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करणाऱ्या फाइटर पायलट्सना 'वीर चक्र'! कोण आहेत ते नऊ जवान?
5
ढगफुटीनंतर किश्तवाडमध्ये मृत्यूचं तांडव, आतापर्यंत ३३ जणांचा मृत्यू, १२० हून अधिक जखमी, २०० जण बेपत्ता
6
आमदार पतीची हत्या, पुढे 3 वेळा जिंकली निवडणूक; आता सपाने केली हकालपट्टी, कोण आहे पूजा पाल?
7
India-Pakistan Tension : '...तर तुम्हाला सोसणार नाही', पाकिस्तानच्या धमकीला भारताने फटकारले
8
सावत्र आईबरोबर मुलगा करत होता अश्लील चाळे, नेमकं त्याच वेळी बापाने पाहिलं अन् मग...
9
"आई...मी त्याला मारून टाकलं, खोलीत बॉडी पडलीय"; मोठ्या बहिणीनं छोट्या भावाला का मारले?
10
ललित प्रभाकर-हृता दुर्गुळेची रोमँटिक केमिस्ट्री, 'आरपार' सिनेमाचं पहिलं गाणं रिलीज
11
Donald Trump Tariffs : 'जर ट्रम्प-पुतिन यांची चर्चा अयशस्वी झाली तर आम्ही भारतावर अधिक शुल्क लादू...', अमेरिकेची नवी धमकी
12
राज कुंद्राने आशीर्वाद घेताच केली किडनी ऑफर, ऐकून काय म्हणाले प्रेमानंद महाराज? जाणून आश्चर्य वाटेल
13
"अजित पवार यांनी लाडकी बहीण योजना आणल्यानेच महायुतीला २३८ जागा मिळाल्या’’, सुनिल तटकरेंचा दावा   
14
मुंबईत शिवसेना-मनसेची ताकद जास्त, राज ठाकरेंचा दावा; CM फडणवीस म्हणाले...
15
War 2 Review: ॲक्शनच्या नादात कथेवर फेरलं पाणी, कसा आहे हृतिक रोशन-ज्यु. एनटीआरचा 'वॉर २'?
16
थरकाप उडवणारा व्हिडीओ! मृत्यूने घातली झडप, बापाने लेकीसमोर जागेवरच सोडला जीव; दिल्लीतील घटना
17
अर्जुन तेंडुलकर संदर्भात हवाई सुंदरीला झालेला गैरसमज! क्रिकेटच्या देवानं आधी गंमत केली; मग...
18
पहिल्यांदाच सुप्रीम कोर्टासमोर EVM मधील मतमोजणी झाली; पराभूत उमेदवार बनला 'विजयी', गावकरी अवाक्
19
Viral: माकड दादाने घेतली ‘डॉगेश भाऊं’ची मुलाखत, धम्माल VIDEO पाहून तुम्हीही पोट धरून हसाल
20
एकत्र जीवन संपवूया असं सांगून अल्पवयीन प्रेयसीला विष पाजून मारले, मग झाला फरार

लॉकडाऊन वाढीच्या चर्चेमुळे निसर्ग पर्यटन अडचणीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 29, 2020 23:26 IST

राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणाच्या आदेशानंतर बंद पडलेले निसर्ग पर्यटन अद्यापही सुरू झालेले नाही. मात्र या पर्यटनाला राज्यात मान्यता दिली जाणार आहे. याच पार्श्वभूमीवर राज्यातील लॉकडाऊन ३० जुलैपर्यंत वाढण्याचीही चर्चा सुरू आहे. त्यामुळे या काळात हे पर्यटन अडचणीत सापडण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

ठळक मुद्दे१ जुलैपासून बफरमध्ये पर्यटन : कडक निर्बंधात पर्यटक येणार कसे?

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणाच्या आदेशानंतर बंद पडलेले निसर्ग पर्यटन अद्यापही सुरू झालेले नाही. मात्र या पर्यटनाला राज्यात मान्यता दिली जाणार आहे. याच पार्श्वभूमीवर राज्यातील लॉकडाऊन ३० जुलैपर्यंत वाढण्याचीही चर्चा सुरू आहे. त्यामुळे या काळात हे पर्यटन अडचणीत सापडण्याची शक्यता वर्तविली जात आहे.देशात कोरोनाचा शिरकाव झाल्यापासून वन पर्यटनावर बंदी घालण्यात आली आहे. मागील १०० दिवसाहून अधिक काळापासून राज्यातील अभयारण्य आणि व्याघ्र प्रकल्प कुलूपबंद आहेत. यामुळे या व्यवसायावर अवलंबून असलेल्या अनेकांचा रोजगार हिरावला आहे. टुरिस्ट गाईड, जिप्सी चालक , हॉटेल्स, स्थानिक उद्योगांना या बंदीचा तीन महिन्यापासून चांगलाच फटका बसला आहे. त्यामुळे विदर्भातील ताडोबा, पेंच व्याघ्र प्रकल्प व टिपेश्वर अभयारण्याजवळील या व्यावसायिकांनी आपल्या उपजीविकेचे कारण पुढे करून बफरमधील पर्यटनाला अनुमती देण्याची मागणी केली होती. शासनाचा खालावलेला महसूल, ग्रामस्थांच्या गरजा लक्षात घेऊन नियमांच्या अधीन राहून या पर्यटनाला मंजुरी देण्याचे जवळपास ठरले आहे. मध्य प्रदेशात १५ जूनपासून कोअरमध्ये वन पर्यटन सुरू झाले आहे. ताडोबा, अंधारी, टिपेश्वर, पेंचमध्ये बफरमधील पर्यटनाचा मार्ग जवळपास मोकळा झाला आहे. पेंचसाठी आदेश मंगळवारी निघण्याची शक्यता आहे तर ताडोबासाठी परवानगी मिळाली आहे.दरम्यान, राज्यातील लॉकडाऊन ३० जुलैपर्यंत वाढण्याची शक्यता वर्तविली जात आहे. या काळात वाहतूक बंद असल्यावर पर्यटक येणार कसे, हा महत्त्वाचा मुद्दा आहे. पर्यटकांचे बुकिंग ऑनस्पॉट होणार असल्याने त्यांना प्रवासासह बऱ्याच अडचणींचा सामना करावा लागणार आहे.कोटींवर व्यवसाय बुडालावन पर्यटन बंद असल्याने विदर्भात कोटींवर रुपयांचा व्यवसाय बुडाला आहे. एकट्या ताडोबा, अंधारी व्याघ्र प्रकल्पात सव्वातीन कोटी रुपयांवर नुकसान झाले आहे. पेंच, मेळघाट, बोर, टिपेश्वर या सर्व ठिकाणचेही बुडालेले उत्पन्न कोटींच्या घरात आहे. त्याचा फटका या व्यवसायावर अवलंबून असलेल्या सर्वच घटकांना बसला आहे.बफरमधील निसर्ग पर्यटन सुरू करण्यासंदर्भात आदेश आले आहेत. शासनाच्या नियमांच्या अधीन राहूनच पर्यटनाला मान्यता दिली जाईल. पेंचसाठी मंगळवारी दुपारपर्यंत आदेश निघण्याची अपेक्षा आहे. जिल्हाधिकारी यांच्यास्तरावर मंजुरीसाठी पत्र गेले आहे.रविकिरण गोवेकर, मुख्य वनसंरक्षक व क्षेत्र संचालक, पेंच व्याघ्र प्रकल्प

टॅग्स :forestजंगलtourismपर्यटन