शहरं
Join us  
Trending Stories
1
अभिनेता विजयला पाहण्याचा नादात तमिळनाडूत चेंगराचेंगरी; ३६ जणांचा गेला जीव, मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता
2
'मी थरथर कापतोय कारण...'; चेंगराचेंगरीत ३६ जणांच्या मृत्यूनंतर अभिनेता विजयने सोडलं शहर
3
९ वर्षांच्या बेपत्ता मुलीला शोधायला लागले अन्... चेंगराचेंगरीचे कारण समोर, पाण्याच्या बाटल्या फेकत होता विजय
4
तामिळनाडूत सुपरस्टार विजयच्या रॅलीत चेंगराचेंगरी, महिला आणि मुलांसह 31 जणांचा मृत्यू, अनेक जखमी 
5
Mumbai Rain: मुंबईत उद्या अतिवृष्टीचा इशारा; कामाशिवाय घराबाहेर पडू नका, BMC च्या सूचना
6
'दारुल इस्लाम'वर विश्वास ठेवणाऱ्यांना आधी 'जहन्नुम'मध्ये जावे लागेल, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा इशारा
7
"ठाकरेंना हात जोडून विनंती की...!" उद्धव ठाकरे यांच्या शेतकऱ्यांसंदर्भातील 'त्या' विधानावर गुलाबराव पाटलांची एका वाक्यात प्रतिक्रिया
8
शेतकऱ्यांना मदत कधीपर्यंत मिळणार? DCM एकनाथ शिंदेंनी दिली आनंदाची बातमी; बळीराजाची दिवाळी गोड होणार!
9
पनवेलकडे जात असताना बाईक बेलापूर खाडीत कोसळली; एकाचा शोध लागला, दुसरा तरुण बेपत्ता
10
Asia Cup Final 2025: भारत की पाकिस्तान, कोण जिंकणार? ग्रहांची साथ कुणाला? मोठी भविष्यवाणी...
11
प्रेरणादायी! सामान्य भाजी विक्रेत्याचे असामान्य दान; पूरग्रस्तांसाठी दिले १ लाख, माणुसकी जपली
12
विदर्भात 'या' जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा फटका, पिकांचे अतोनात नुकसान ! अजून किती दिवस जोर राहणार कायम?
13
यावेळी बिहारमध्ये चार-चार दिवाळी उत्सव, किती जागा जिंकणार NDA? अमित शाह यांनी सेट केलं टार्गेट; राहुल-तेजस्वी यांच्यावरही बरसले
14
“आई कृपा कर, सरकारला बुद्धी दे!”; बाळासाहेब थोरातांचे मोहटादेवी चरणी साकडे, नुकसानीची पाहणी
15
“सोनू सूद पंजाबच्या मदतीला धावला, मराठी कलावंतांनी मराठवाड्याला मदत करावी”: अमोल मिटकरी
16
“भाजपाला प्रशासन चालवता येत नाही, CM सहायता फंडाबाबत फडणवीसांनी बोलू नये”; ठाकरेंचा पलटवार
17
महाराष्ट्रावर प्रचंड मोठे संकट असताना पंतप्रधान का फिरकले नाहीत? काँग्रेसचा सवाल
18
कंटाळा आला म्हणून मुलींनी मागवले ऑनलाइन जेवण; मद्यधुंद आईला राग अनावर, लेकींना बेदम मारहाण
19
३० सेकंदात रुग्णवाहिका तिथून निघून गेली; आरोपी गगनप्रीत कौरला जामीन मंजूर, कोर्टाने काय म्हटले?
20
१ ऑक्टोबरपासून लागू होणार ट्रेन तिकीट बुकींगचा नवा नियम, झटपट आटोपून घ्या हे काम, अन्यथा...

वन विभागातर्फे निसर्ग संवर्धनासाठी उपक्रम

By admin | Updated: October 30, 2016 02:42 IST

वन विभागाच्या सामाजिक वनीकरण विभागाच्यावतीने विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरण, वृक्षसंवर्धन आणि जलसंवर्धन या विषयाबद्दलची जिज्ञासा निर्माण व्हावी,

नागपूर : वन विभागाच्या सामाजिक वनीकरण विभागाच्यावतीने विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरण, वृक्षसंवर्धन आणि जलसंवर्धन या विषयाबद्दलची जिज्ञासा निर्माण व्हावी, त्यांना पर्यावरण संवर्धनाविषयाचे ज्ञान मिळावे तसेच वृक्षलागवड, पडीक जमीन विकास आणि जलसंवर्धन कार्यक्रमात त्यांचा सक्रिय सहभाग वाढवा या उद्देशाने विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. यात प्रामुख्याने निबंध लेखन, चित्रकला व वक्तृत्व स्पर्धा होणार आहे. या जिल्हास्तरीय स्पर्धेतील प्रथम व द्वितीय क्रमांकाच्या प्रवेशिकांचे राज्यस्तरावर परीक्षण करून त्यातून राज्यस्तरीय विजेत्यांची निवड केली जाणार आहे. याशिवाय राज्यस्तरावर सर्वांसाठी स्वतंत्र खुली छायाचित्र (फोटोग्राफी) स्पर्धा होणार आहे. या स्पर्धेतील प्राथमिक गटासाठी ‘नैसर्गिक साधन संपत्तीचे जतन व संवर्धन’ हा विषय निश्चित करण्यात आला आहे. तसेच महाविद्यालयीन गटासाठी ‘मानव-वन्यजीव संघर्ष जबाबदार कोण?’ आणि चित्रकला स्पर्धेतील प्राथमिक गटासाठी ‘वनमहोत्सव माझे वृक्षारोपण’ असा विषय राहणार आहे. यातील छायाचित्र स्पर्धेत क्रेयान पेस्टल खडू, कलर पेन्सिल किंवा स्केचपेन या माध्यमातून छायाचित्र तयार करणे बंधनकारक राहील. तरी प्रत्येक शाळा-महाविद्यालय प्रमुखांनी प्रथम आपल्या स्तरावर निबंध आणि चित्रकला स्पर्धा घेऊन त्यातील प्रथम तीन क्रमांकाची चित्रे व निबंध शिफारशीसह संबंधित जिल्ह्याच्या उपसंचालक सामाजिक वनीकरण, वन विभाग यांच्याकडे १५ नोव्हेंबर २०१६ पर्यंत सादर करावे, असे आवाहन करण्यात आले आहे. (प्रतिनिधी)