शहरं
Join us  
Trending Stories
1
“बेस्ट निवडणुकीत हसे करून घेतले, ब्रँडचा बँड वाजला”; CM फडणवीसांची ठाकरे बंधूंवर बोचरी टीका
2
“लिहून घ्या, काही झाले तरी आता मुंबईत...”; CM फडणवीसांनी मुंबई मनपा निवडणुकीचे रणशिंग फुंकले
3
Asia Cup 2025 : बांगलादेशनं मॅच जिंकली; अफगाणिस्तानला अजूनही स्वबळावर बाजी पलटण्याची संधी, पण...
4
'आपण दहशतवादी नाही… पाकिस्तानसाठी लढलो'; काय म्हणाला जैश कमांडर? भारताविरुद्धही ओकली गरळ
5
West Indies Squad For India Test Series : दिग्गजाच्या पोराला संधी; माजी कर्णधाराचा पत्ता कट
6
लाखो लोकांची फसवणूक, दीड वर्षांपासून फरार; अखेर ‘ज्ञानराधा’च्या अर्चना कुटे यांना अटक
7
७ तास चालली चर्चा, भारतावर लादलेला ट्रम्प टॅरिफ अमेरिका कमी करणार? पाहा, बैठकीत काय झाले...
8
दोन मुंबईकरांसोबत नेट प्रॅक्टिस करताना दिसला हिटमॅन रोहित शर्मा; फोटो व्हायरल
9
“सध्याचे वातावरण सरकारला पोषक नाही, पराजयाच्या भीतीने निवडणुका पुढे ढकलल्या”: विजय वडेट्टीवार
10
BAN vs AFG : 'चमत्कारी' खानचा हिट शो! भुवीचा विक्रम मोडला; हार्दिक पांड्यालाही संधी, पण...
11
म्युच्युअल फंड असावा तर असा...! ₹10000 ची SIP गुंतवणूक ₹1.79 कोटींवर पोहोचली, गुंतवणूकदारांना केलं मालामाल
12
इस्रायलचा येमेनच्या बंदरावर मोठा हवाई हल्ला, हुथी बंडखोरांचा दावा!
13
‘भारताने अमेरिकेच्या मध्यस्थीचा प्रस्ताव नाकारला’, पाकिस्तानने केली ट्रम्प यांच्या दाव्याची पोलखोल
14
IND vs PAK मॅचनंतर वातावरण तापलंय! बॉयकॉटची धमकी देणाऱ्या पाक संघानं घेतला हा निर्णय
15
जीएसटीत कपात अन् बँकांत गर्दी...! लोक कार लोन रद्द करू लागले, काय आहे कारण...
16
'या' मुस्लीम देशावर मोठा हल्ला करण्याच्या तयारीत इस्रायल, दिला बंदरं रिकामी करण्याचा अल्टीमेटम!
17
कोराडी परिसरात पर्यावरण पर्यटन प्रकल्पाला प्रतिवर्ष १ रूपये भाडे तत्वावर जमीन मंजूर
18
“सत्तेत नसूनही काँग्रेसकडून तरुणांच्या हाताला काम, प्रत्येक जिल्ह्यात रोजगार मेळावा”: सपकाळ
19
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह ७ जणांच्या निर्दोष मुक्ततेविरोधात उच्च न्यायालयात सुनावणी, आली मोठी अपडेट
20
केवळ ₹11,000 मध्ये आपली बनवा 'ही' नवी ढासू SUV, 52 भाषांसह AI असिस्टंन्ट अन् बरंच काही;  कंपनीनं सुरू केली बुकिंग

नेवाळीचा प्रश्न राष्ट्रवादी विधिमंडळात मांडणार

By admin | Updated: July 10, 2017 04:04 IST

नेवाळीतील शेतकऱ्यांच्या जमिनी परत करण्याचा प्रश्न कायद्याच्या कचाट्यात आहे

लोकमत न्यूज नेटवर्ककल्याण : नेवाळीतील शेतकऱ्यांच्या जमिनी परत करण्याचा प्रश्न कायद्याच्या कचाट्यात आहे. त्यावर तोडग्यासाठी राष्ट्रवादी शेतकऱ्यांच्या पाठीशी आहे. शेतकऱ्यांवर पोलिसांनी दाखल केलेले गुन्हे आणि जमीन परत करण्याच्या मागणीवर राष्ट्रवादी विधिमंडळ अधिवेशनात आवाज उठवेल, असे आश्वासन प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी शेतकऱ्यांना दिले आहे. कल्याणमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचा कार्यकर्ता मेळावा पार पडल्यानंतर तटकरे व माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नेवाळी पाडा, भाल आणि वसार या गावांना भेट दिली. पीडित शेतकऱ्यांसह महिलांची भेट घेतली. तेव्हा पवार यांच्यापेक्षा तटकरे यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधला. यावेळी सिडकोचे माजी अध्यक्ष प्रमोद हिंदूराव, बाजार समितीचे माजी सभापती वंडार पाटील, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा सारिका गायकवाड, जिल्हाध्यक्ष रमेश हनुमंते, गावातील संघर्ष समितीचे नेते गुलाब वझे आदी उपस्थित होते. राष्ट्रवादीने उपचार उरकल्याची भावनानेवाळी पाडा, वसार, भाल गावात राष्ट्रवादीच्या नेत्यांनी भेट दिली. खोणी गावात नेते जाणार होते. पण पवार यांची गाडी पुढे निघून गेल्याने ही भेट रद्द झाली. पवार यांनी शेतकऱ्यांशी संवादही न साधल्याने या भेटीचा फक्त उपचार उरकला गेला. काहीही साध्य झाले नसल्याची भावना नेवाळी आंदोलन पीडित शेतकऱ्यांनी व्यक्त केली. शेतकऱ्यांचे आंदोलन २२ जूनला झाले आणि दुसऱ्याच दिवशी विधानसभेतील विरोधी पक्ष नेते राधाकृष्ण विखे-पाटील आले, पण राष्ट्रवादीच्या नेत्यांना २० दिवसांनी आंदोलनकर्त्यांची आठवण झाली. स्थानिक नेत्यांनीही या काळत दुर्लक्ष केले. विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनीही पाठ फिरवल्याची प्रतिक्रिया गावकऱ्यांनी दिली. ‘आमच्या माणसांना बाहेर काढा’नेवाळी आंदोलनात अटक करण्यात आलेल्या शेतकऱ्याविरोधात पोलिसांनी गंभीर गुन्हे दाखल केले आहेत. त्यांना गुन्हेगारासारखी वागणूक दिली जात आहे. कर्ते पुरुष लॉकअपमध्ये आहेत. त्यांना मारहाण होते. फक्त महिला व मुलांना शेतीची कामे करता येत नाही. मुले शाळेत जात नाहीत. नेवाळी नाक्यावर भाजी घेण्यासाठीही कोणी गेले, तर त्याला पोलिस उचलून नेतात. पोलिसांची दहशत आहे. यावर काही तोडगा काढा, अशी मागणी गावातील महिलांनी राष्ट्रवादीच्या नेतेमंडळींकडे केली. या प्रश्नावर मुख्यमंत्र्यांची दोनदा भेट घेऊनही उपयोग झाला नसल्याचे गावकऱ्यांनी सांगितले. >आंदोलकांतही दुजाभावनेवाळी आंदोलनप्रकरणी हिललाईन पोलीस ठाण्यात तीन व मानपाडा पोलीस ठाण्यात एक असे चार गुन्हे दाखल करण्यात आले होते. ६७ जणांविरोधात कलमे सारखीच लावली होती. मानपाडा पोलीस ठाण्यातील २५ जणांना न्यायालयाने जामीन दिला. मात्र हिललाईन पोलिस ठाण्यातील गुन्ह्यांप्रकरणी अद्याप जामीन न मिळाल्याने आंदोलकांत दुजाभाव केल्याची कूरबूर नेवाळी परिसरातील ग्रामस्थांनी केली.