शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
4
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
5
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
6
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
7
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
8
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
9
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
10
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
11
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
12
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
13
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
14
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
15
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
16
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
17
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
18
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
19
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

राष्ट्रीय स्वेच्छा रक्तदान दिवस; १.४ टक्के रक्तदाते हिपॅटायटिस-बी बाधित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 1, 2018 10:40 IST

‘सुरक्षित रक्त व रक्त घटक पुरविणे’ हे प्रत्येक रक्तपेढीचे ब्रीद आहे. मात्र राज्याच्या एकाही शासकीय रक्तपेढीत रक्त व रक्त घटकांच्या सुरक्षेसंदर्भातील पूर्णत: स्वयंचलित असलेली अत्याधुनिक ‘नॅट’ (न्यूक्लिक अ‍ॅसिड अ‍ॅम्पलिफिकेशन टेक्नॉलॉजी) तंत्रज्ञान उपलब्ध नाही.

ठळक मुद्देकसे मिळणार सुरक्षित रक्त?शासकीय रुग्णालयांमध्ये ‘नॅट’ तंत्रज्ञानाचा अभाव

सुमेध वाघमारे ।लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : ‘सुरक्षित रक्त व रक्त घटक पुरविणे’ हे प्रत्येक रक्तपेढीचे ब्रीद आहे. मात्र राज्याच्या एकाही शासकीय रक्तपेढीत रक्त व रक्त घटकांच्या सुरक्षेसंदर्भातील पूर्णत: स्वयंचलित असलेली अत्याधुनिक ‘नॅट’ (न्यूक्लिक अ‍ॅसिड अ‍ॅम्पलिफिकेशन टेक्नॉलॉजी) तंत्रज्ञान उपलब्ध नाही. धक्कादायक म्हणजे, ‘इंडियन सोसायटी आॅफ ट्रान्सफ्युजन मेडिसीन’चे अध्यक्ष डॉ. आर. एन. मकरू यांच्यामते, भारतात ‘१.४’ टक्के रक्तदाते हे ‘हेपेटायटिस बी’ पॉझिटिव्ह तर ‘०.२’ टक्के रक्तदाते हे एचआयव्हीबाधित आहेत. परिणामी, सामान्य रुग्णांना कसे मिळणार सुरक्षित रक्त, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.दरवर्षी १ आॅक्टोबर हा राष्ट्रीय स्वेच्छा रक्तदान दिवस म्हणून साजरा केला जातो. या निमित्ताने ‘सुरक्षित रक्तदात्याची निवड करण्याच्या प्रक्रियेला’ किती रक्तपेढ्या गंभीरतेने घेतात याकडे आता लक्ष वेधले जात आहे.उपराजधानीत दोन खासगी रक्तपेढ्या सोडल्या तर मध्यभारतात शासकीय व इतर खासगी रक्तपेढ्यांमध्ये ‘नॅट’ तंत्रज्ञान उपलब्ध नसल्याचे वास्तव आहे. सामान्यपणे रुग्णाला रक्त देताना ‘एचआयव्ही-१’, ‘एचआयव्ही-२’, ‘हिपॅटायटिस -बी’, ‘हिपॅटायटिस-सी’, गुप्तरोग आणि मलेरिया या चार प्रकारच्या चाचण्या केल्या जातात. यातून रक्तात रोगजंतू नसल्याची खात्री करून घेतली जाते. आजही या चाचण्या जिथे ‘नॅट’ नाही तिथे ‘एलायजा’पद्धतीने केल्या जातात.‘एलायजा’ पद्धतीने एचआयव्ही चाचणीचा रिपोर्ट यायला ‘विंडो पिरियड’ कालावधी तीस दिवसांचा लागतो. परंतु ‘नॅट’ तंत्रज्ञानाने केवळ सहा ते आठ दिवसांमध्ये या चाचणीचा अहवाल मिळतोे. जेथे ‘हिपॅटायटीस-बी’ निष्पन्न होण्याचा कालावधी ‘एलायजा’ने ५८ दिवसांचा आहे, तेथे ‘नॅट’मुळे हे १२ ते १५ दिवसांवर येतो. ‘एलायजा’ने ‘हिपॅटायटीस- सी’चे निदान होण्यास ७० दिवस लागतात, मात्र ‘नॅट’मुळे आठ ते बारा दिवसांत त्याची माहिती मिळते. ‘नॅट टेस्ट’ तंत्रज्ञान ‘विंडो पिरियड’ कमी करत असल्याने विषाणू बाधेची शक्यता अनेक पटींनी कमी होते. रक्त संक्रमणदरम्यान सुरक्षित रक्ताचे महत्त्व लक्षात घेऊन रुग्णांनी ‘नॅट टेस्टेड’ रक्ताला प्राधान्य देणे आवश्यक आहे. मात्र, शासन याला कधी गंभीरतेने घेत नसल्याचे वास्तव आहे.

दूषित रक्ताचे प्रमाण वाढत आहे४नुकत्याच झालेल्या एका कार्यशाळेत ‘लोकमत’शी बोलताना डॉ. मकरू म्हणाले, भारतात रक्तपेढीत किंवा शिबिरात आलेल्या रक्तदात्याला एकापेक्षा जास्त जणांसोबत शरीरसंबंध आहेत का, हे विचारलेच जात नाही. परिणामी, दूषित रक्ताचे प्रमाण वाढत आहे. आपल्याकडे रक्तामधील विषाणूंचे अस्तित्व ओळखण्याचे काम बहुतांश रक्तपेढ्यांमध्ये ‘एलायजा’ पद्धतीने केले जाते. परिणामी, रु ग्ण त्या-त्या संसर्गाने बाधित होण्याची शक्यता असते. शस्त्रक्रिया करताना डॉक्टर जसे रुग्णाकडून ‘ना हरकत’ प्रमाणपत्र लिहून घेतो, तसेच रक्ताबाबतही लिहून घेणे आवश्यक आहे.प्रत्येक रक्तपेढीला ‘नॅट’ तंत्रज्ञान आवश्यक आहे. नागपूर मेडिकलमधून नॅट तंत्रज्ञानाचा प्रस्ताव शासनाकडे पाठविला आहे. शासनस्तरावर तो विचाराधीन आहे. शासनाने हे अद्यावत यंत्र उपलब्ध करून दिल्यास व केंद्रीकरण झाल्यास याचा फायदा मेडिकलसह, डागा, मेयो व सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलच्या रक्तपेढ्यांना होऊ शकेल.-डॉ. संजय पराते,रक्तपेढी प्रमुख, मेडिकल

टॅग्स :Blood Bankरक्तपेढी