शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

विवेक पाेलशेट्टीवार यांना रसायनशास्त्राचा राष्ट्रीय विज्ञान पुरस्कार

By निशांत वानखेडे | Updated: August 7, 2024 21:55 IST

वातावरणातील कार्बन पकडण्यात संशाेधन : नागपूर-यवतमाळचा सन्मान.

निशांत वानखेडे, नागपूर : वायू प्रदूषणासाठी कारणीभूत असलेल्या घटकांमध्ये सर्वात माेठा उल्लेख कार्बनचा हाेताे. मात्र प्रदूषणाच्या स्राेतांमधून हा कार्बन स्वतंत्र करून त्याचे उपयाेगी घटकात रुपांतर केले तर माेठी समस्या दूर हाेऊ शकते. यावरच महत्त्वपूर्ण संशाेधन करणारे प्रा. डाॅ. विवेक पाेलशेट्टीवार यांना यंदाचा रसायनशास्त्राचा एस.एस. भटनागर (राष्ट्रीय विज्ञान पुरस्कार) जाहीर झाला आहे. येत्या २३ ऑगस्ट राेजी भारताचे राष्ट्रपती यांच्याहस्ते राष्ट्रपती भवनात त्यांना पुरस्काराने सन्मानित करण्यात येईल.

भारतातील नोबेल पुरस्कार म्हणून हा पुरस्कार ओळखला जाताे व वेगवेगळ्या विषयात महत्त्वपूर्ण संशाेधनासाठी ताे प्रदान करण्यात येताे. मूळचे यवतमाळ जिल्ह्यातील मांगली (मुकुटबन) येथील रहिवासी पाेलशेट्टीवार यांचे प्राथमिक व उच्च शिक्षण अमरावती विद्यापीठातून पूर्ण केले. त्यानंतर त्यांनी अमेरिकेतूनही आपले शिक्षण पूर्ण केले. सध्या त्यांचे कुटुंब नागपूर येथे स्थायी झाले आहे. डाॅ. विवेक पाेलशेट्टीवार हे मागील ११ वर्षापासून टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च (टीआयएफआर) येथे प्राध्यापक व वैज्ञानिक म्हणून कार्यरत आहेत.

हवामान बदल, जागतिक तापमानवाढ या विषयावर संशाेधन करीत असून राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय वैज्ञानिक मासिकात त्यांचे १५० हून अधिक संशाेधन पत्र प्रसिद्ध झाले आहेत व १२ पेटेंट त्यांच्या नावाने नाेंदविले आहेत. वातावरणातील ‘कार्बन कॅप्चरिंग’साठी त्यांच्या टीमकडून संशाेधन सुरू आहेत. कार्बन कॅप्चरिंगचे वेगवेगळे प्रयाेग भविष्यात क्रांतिकारी ठरतील, असा विश्वास त्यांनी ‘लाेकमत’शी बाेलताना व्यक्त केला. हा पुरस्कार टीआयएफआर, मुंबईतील संशोधन समूहाच्या विज्ञान आणि उत्प्रेरक क्षेत्रातील उत्कृष्टता आणि नवकल्पनांच्या सततच्या प्रयत्नांचा पुरावा असल्याचे ते म्हणाले. या पुरस्कारासाठी त्यांनी आई-वडील, पत्नी तसेच मार्गदर्शक व सर्व सहकाऱ्यांचे आभार व्यक्त केले आहेत.

टॅग्स :nagpurनागपूर