शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात अतिवृष्टीचे थैमान, उभ्या पिकांचा चिखल, मुंबईत ५६ वर्षांतील तिसरा थंड दिवस
2
वक्फ कायद्याला ‘स्टे’ नाही, सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय; कायद्यातील तीन बदलांना अंतरिम स्थगिती
3
इ-बाईक टॅक्सीचा मार्ग अखेर मोकळा; पहिल्या १.५ किमीसाठी १५ रुपये भाडे, परिवहन विभागाकडून उबर, रॅपिडो कंपन्यांना तात्पुरते परवाने
4
अखेरच्या दिवशी आयटीआर भरणे रखडले, करदाते वैतागले : आयकर विभागाचा मुदतवाढीस नकार
5
‘जेएनपीए’त १२ कोटींचा पाकिस्तानी मुद्देमाल जप्त; मुंबई डीआरआयच्या पथकाची कारवाई, २८ कंटेनर जप्त; दोघांना अटक
6
अपहरणामध्ये पूजा खेडकरच्या वडिलांसह बाउन्सरचा हात; आई मनोरमा खेडकर यांच्यावरही गुन्हा दाखल
7
...तर बिहारमधील मतदार पुनरावलोकन प्रक्रिया रद्द करू : सर्वोच्च न्यायालय
8
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
9
Asia Cup 2025 Points Table : हे २ संघ 'आउट'; Super Four च्या शर्यतीत टीम इंडियाचा पहिला नंबर
10
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
11
SL vs HK : ६ कॅच सोडूनही हाँगकाँगनं मॅचमध्ये आणलेलं ट्विस्ट; Free Hit सह जयसूर्या झाला टेन्शन फ्री
12
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
13
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
14
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
15
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
16
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
17
Abhishek Sharma Record : फक्त १३ चेंडूत गुरु युवीसह किंग कोहलीचा मोठा विक्रम मोडण्याचा पराक्रम
18
Vidarbha Rain : २४ तास धोक्याचे ! नागपुरात पावसाचा कहर; वस्त्या जलमय, शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीने काढले बाहेर
19
T20I मध्ये UAE च्या कर्णधारानं साधला मोठा डाव! कमी चेंडूत ३००० धावांसह सेट केला नवा रेकॉर्ड
20
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार

‘द राष्ट्रसंत’मुळे जगभरात विचार पोहोचतील

By admin | Updated: April 7, 2017 02:49 IST

राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी कुठलेही शिक्षण घेतलेले नसताना सर्वसामान्यांच्या थेट काळजात घुसतील

मान्यवरांचा विश्वास : ‘द राष्ट्रसंत’च्या दुसऱ्या आवृत्तीचे प्रकाशन थाटातनागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी कुठलेही शिक्षण घेतलेले नसताना सर्वसामान्यांच्या थेट काळजात घुसतील असे प्रभावी विचार मांडून समाजप्रबोधन केले. आजच्या पिढीसाठी त्यांचे विचार उपयुक्त असून, प्राचार्य पद्माकर काणे यांनी लिहिलेल्या ‘द राष्ट्रसंत’ या इंग्रजी ग्रंथामुळे राष्ट्रसंतांचे विचार जगभरात पोहोचतील, असा विश्वास मान्यवर वक्त्यांनी व्यक्त केला.यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान विभागीय केंद्र नागपूर आणि विजय प्रकाशनच्या संयुक्त विद्यमाने प्राचार्य पद्माकर काणे यांच्या ‘द राष्ट्रसंत’ या इंग्रजी ग्रंथाच्या दुसऱ्या आवृत्तीचे प्रकाशन शंकरनगरातील श्रीमंत बाबूराव धनवटे सभागृहात झाले. व्यासपीठावर राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सिद्धार्थविनायक काणे, श्री गुरुदेव राष्ट्रधर्म प्रचार समिती गुरुकुंज मोझरीचे सचिव रामदासपंत चोरोडे, लेखक प्राचार्य पद्माकर काणे, ज्येष्ठ पत्रकार विजय फणशीकर, विजय प्रकाशनचे सचिन उपाध्याय, डॉ. प्रदीप विटाळकर उपस्थित होते. यावेळी बोलताना पुस्तकाचे अनुवादक संजय साल्पेकर म्हणाले, ‘द राष्ट्रसंत’मध्ये काणे यांनी ग्रामगीतेतील सर्व प्रश्न आणि उत्तरांचे संशोधन करून आढावा घेतल्याची माहिती दिली. गिरीश गांधी म्हणाले, अनेक संत मठाधिपती झाले. परंतु राष्ट्रसंत तुकडोजी महाराज कोणत्याही मठात गेले नाही. त्यांच्यावर गांधी विचारांचा प्रभाव होता. राष्ट्रसंतांची भूमिका आणखी विशद करण्यासाठी या ग्रंथाचा उपयोग होणार असल्याचे त्यांनी सांगितले. कुलगुरू डॉ. सिद्धार्थविनायक काणे यांनी आपल्या वडिलांचे हे पुस्तक त्यांचे अभ्यासपूर्ण संशोधन असल्याचे सांगून राष्ट्रसंतांचा एवढा अभ्यास असलेले वडील घरात असल्यामुळे घरातच विद्यापीठ असल्यासारखे वाटत असल्याचे सांगितले. ज्येष्ठ पत्रकार विजय फणशीकर यांनी आधुनिक काळात ओस पडलेली गावे समृद्ध करण्यासाठी राष्ट्रसंतांचे विचार तरुण पिढीपर्यंत पोहोचविण्याची गरज असल्याचे सांगितले. लेखक पद्माकर काणे म्हणाले, पुस्तकाच्या प्रकाशनाला येण्याचे आश्वासन माझे मित्र जांबुवंतराव धोटे यांनी दिले होते. परंतु आज ते येथे नसल्याची खंत वाटत आहे. राष्ट्रसंतांचा रूढ अर्थाने भक्त नसलो तरी लहाणपणापासून त्यांना पाहत असल्यामुळे त्यांची भजने मूकपाठ होती. त्यातूनच हे पुस्तक लिहिण्याची प्रेरणा मिळाल्याचे त्यांनी सांगितले. राष्ट्रसंतांच्या आठवणींना त्यांनी उजाळा दिला. व्यासपीठावर उपस्थित मान्यवरांच्या हस्ते पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. प्रास्ताविक डॉ. प्रदीप विटाळकर यांनी केले. संचालन श्याम धोंड यांनी केले. आभार रमेश बोरकुटे यांनी मानले. कार्यक्रमाला विद्यापीठातील अधिकारी, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. (प्रतिनिधी)