शहरं
Join us  
Trending Stories
1
Video - अग्निकल्लोळ! गुजरातच्या संघवी ऑर्गेनिक्स फॅक्ट्रीमध्ये भीषण आग, धुराचं साम्राज्य
2
टीम इंडियाला धक्का! पाकिस्तानविरूद्धच्या सामन्याआधी शुबमन गिलच्या हाताला दुखापत, अपडेट काय?
3
निष्काळजीपणाचा कळस! सरकारी शाळेत मध्यान्ह भोजन खाल्ल्यानंतर ९० मुलं पडली आजारी
4
अलर्ट मोड ऑन! फेस्टिव्ह सेलच्या स्वस्ताईला भुलू नका; एक चूक अन् गमवाल आयुष्यभराची कमाई
5
शेतकऱ्यांनो, दिवाळीआधी PM किसानचा २१वा हप्ता येणार का? वाचा कधी जमा होणार पैसे?
6
Mumbai: विरार- दादर लोकलच्या दरवाज्यात मनोरूग्णाचा धुडगूस, महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्‍न ऐरणीवर
7
GST कपातीनंतर ५, १०, २० रुपयांच्या बिस्किट, चिप्सची किंमतही घटणार की…?, कंपन्यांनी दिली अशी माहिती  
8
लोकप्रिय 'दामिनी' मालिका पुन्हा येतेय प्रेक्षकांच्या भेटीला, ही अभिनेत्री मुख्य भूमिकेत, या चॅनेलवर होणार प्रसारण
9
चालकाचं नियंत्रण सुटलं अन् कार थेट उड्डाणपुलावरून खाली रेल्वे रुळावर पडली!
10
निम्न तेरणा प्रकल्पातून ७६३६ क्युसेक पाण्याचा विसर्ग, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा
11
'चुल्लूभर पानी में डूब मरो...' भारत-पाकिस्तान क्रिकेट सामन्यावरून ओवैसी भाजपवर संतापले!
12
नफा वाढूनही फ्लिपकार्टला ५,१८९ कोटी रुपयांचा तोटा! एक निर्णय कंपनीच्या अंगलट?
13
खूशखबर! Instagram ची मोठी घोषणा; आता पटापट वाढेल रीच, पोस्ट करा अनलिमिटेड स्टोरी
14
‘सॉरी... आम्ही हे जग सोडतोय’, CA च्या पत्नीनं मुलासह १३ व्या मजल्यावरून मारली उडी, समोर आलं धक्कादायक कारण
15
पंजाब की शेरनी! चालत्या ऑटोमध्ये चोरांशी लढली, जीव धोक्यात घालून मदत मागितली अन्...
16
Pakistan: पाकिस्तानात दहशतवाद्यांच्या हल्ल्यात १९ सैनिकांचा मृत्यू; ४५ दहशतवाद्यांचा खात्मा
17
सूर्या, पांड्या की आफ्रिदी... IND vs PAK सामन्यात 'हे' १० खेळाडू ठरू शकतात 'गेमचेंजर'
18
'दशावतार' सिनेमासाठी रजनीकांतचा झालेला विचार? दिग्दर्शक म्हणाले- "दिलीप प्रभावळकरांनी नकार दिला असता तर..."
19
युपीआय व्यवहारांच्या नियमांत मोठे बदल; विमा, गुंतवणूक, क्रेडिट कार्ड पेमेंटसाठी मर्यादा वाढली
20
Dashavtar: दिलीप प्रभावळकरांच्या 'दशावतार'ने मनं जिंकली; दुसऱ्या दिवशी कमावले तब्बल 'इतके' कोटी

नाशिक पॅटर्न नागपुरातही राबवावा

By admin | Updated: January 13, 2017 02:11 IST

उपराजधानीत आता ‘ई-चालान’ प्रणालीमुळे जास्तीत जास्त वाहनांवर कारवाई होत आहे.

हेल्मेट न वापरणाऱ्यांना निबंध लेखनाची शिक्षा : आतापर्यंत दोन लाख वाहनचालकांवर कारवाईनागपूर : उपराजधानीत आता ‘ई-चालान’ प्रणालीमुळे जास्तीत जास्त वाहनांवर कारवाई होत आहे. गेल्या ११ महिन्यात दोन लाख वाहनचालकांवर कारवाई झाली आहे. परंतु दंडात्मक कारवाई करूनही ५० ते ६० टक्केच फरक पडल्याचे शहरातील रस्त्यांवरील चित्र आहे. यामुळे वाहतुकीचा नियम मोडणाऱ्याला याची आठवण कायमस्वरूपी राहावी म्हणून नाशिक पोलिसांचा अभिनव प्रयोग नागपुरातही व्हायला हवा, दोषी वाहनचालकांकडून हेल्मेटचे महत्त्व या विषयावर निबंध लिहून घ्यावे, अशी मागणी होत आहे.दुचाकीस्वाराने वाहन चालविताना हेल्मेट वापरणे बंधनकारक आहे. उपराजधानीत याची सक्ती ८ फेब्रुवारी २०१६ पासून करण्यात आली. परंतु हेल्मेटविषयी जनजागृती न करता व हेल्मेट विकत घेण्यास मुदत न दिल्याने याला विरोध झाला. दरम्यानच्या काळात वाहतूक पोलीस विभागाने सक्तीची कारवाई शिथिल करीत जनजागृतीचे कार्य हाती घेतले. परंतु नंतर कारवाईचा वेग वाढविण्यात आला. मात्र यात विनाहेल्मेट वाहनचालकांना थांबविल्यानंतर अनेक वेळा वाद व्हायचा. चालान फाडून शुल्क आकारण्यापर्यंत वेळ जायचा. यावर उपाययोजना म्हणून ६ आॅक्टोबर २०१६पासून ‘ई-चालान’ घरपोच पाठविणे सुरू झाले. यामुळे जास्तीतजास्त वाहनांवर कारवाई करणे शक्य झाले. सोबतच चौकाचौकात सीसीटीव्ही कॅमेरे लावून त्याद्वारेही ‘ई-चालान’ पाठविले जात आहे. हेल्मेट न वापरणाऱ्या वाहनचालकांवर कारवाईचा वेग वाढला असलातरी आजही ४० टक्के वाहनचालक विना हेल्मेट दुचाकी दामटताना दिसत आहे. नाशिक पोलिसांनी यावर उपाय म्हणून अशा दुचाकीस्वारांची ‘शाळा’च भरविणे सुरू केले आहे. यात ‘हेल्मेटचे फायदे’ या विषयावर मुद्देसूद निबंध लेखन लिहिण्याची शिक्षा दिली जात आहे. याच पद्धतीचा अभिनव प्रयोग नागपुरातही सुरू करावा, अशी मागणी जोर धरू लागली आहे. दंडासोबतच निबंध लेखनाला सुरुवात झाल्यास ‘हेल्मेट कळेलही आणि वळेलही’ असे मत व्यक्त होत आहे. (प्रतिनिधी)एका अपघातात एखाद्याचा जीव जात असेल. मात्र, त्याच्या जाण्याने संपूर्ण कुटुंबीयांचे कधीही भरून न निघणारे नुकसान होते. कुणाला अपघात झाल्यानंतर डोक्याला मार लागून जीव जाऊ नये, यासाठी दुचाकी चालकांनी हेल्मेट घालून वाहन चालवावे, अशी पोलिसांची भूमिका आहे. पोलिसांच्या या भूमिकेत नागरिकांचेच हित आहे. दुचाकीचालक त्याकडे दुर्लक्ष करतात. त्यांना वळण लागावे म्हणून पोलिसांकडून हेल्मेट न घालता दुचाकी चालविणाऱ्यांवर कारवाई केली जाते. कारवाईसोबतच जनजागरण आणि समुपदेशनाचेही उपक्रम पोलीस राबवीत आहेत. वाहनचालकांनी पोलिसांची भावना समजून घ्यावी.स्मार्तना पाटील, पोलीस उपायुक्त, वाहतूक शाखा, नागपूर.