शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
2
Nagpur Election News: CM फडणवीसांच्या जिल्ह्यात कोणाचे किती नगराध्यक्ष, भाजपने कुठे-कुठे उधळला गुलाल?
3
Sanjay Raut : "'तेच' आकडे, 'तेच' मशीन, १२०-१२५..."; संजय राऊतांचा वेगळाच तर्क! संपूर्ण निकालावरच प्रश्नचिन्ह
4
T20 World Cup 2026: शुभमन गिलला का वगळलं? गंभीरला एअरपोर्टवर प्रश्न; काय मिळालं उत्तर?
5
नगर परिषदा, पंचायत निवडणुकीत भाजपाला भरघोस यश; प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण म्हणाले...
6
'घरी बसणाऱ्यांना मतदारांनी नाकारले' ; नगरपरिषद निवडणुकांवर एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया
7
वर्षाखेरीस IPO बाजारात 'धुमधडाका'! या आठवड्यात ११ नवीन कंपन्यांचे आगमन; गुंतवणुकीची मोठी संधी
8
चांदेकरवाडीत पाणंद रस्त्यावर लिंबू आणि बाहुली, अंधश्रद्धेचा प्रकार, ग्रामस्थांत भीतीची सावली
9
"मला मारताहेत, जबरदस्तीने काहीतरी खायला..."; विवाहितेचा ढसाढसा रडत आईला शेवटचा कॉल
10
दोन पराभवांनंतर अखेर संजयकाका पाटलांनी मैदान मारले, आर. आर. आबांचा रोहित पाटील पराभूत
11
Siddhi Vastre: अवघ्या २२ वर्षांची तरुणी भाजपवर पडली भारी; मोहोळमध्ये इतिहास घडवणारी सिद्धी वस्त्रे आहे तरी कोण?
12
"दरवाजे उघडून बाहेरच्यांना प्रवेश दिल्याचा हा परिणाम"; चंद्रपूरातील पराभवानंतर मुनगंटीवारांचा घरचा आहेर
13
Maharashtra Local Body Election Results 2025 : अख्खं मंत्रिमंडळ ईश्वरपुरात, तरीही जयंत पाटलांनी महायुतीला दिला धक्का; सांगली जिल्ह्यातील नगराध्यक्षांची यादी एका क्लिकवर
14
विमा घेताय? केवळ जाहिरातींवर जाऊ नका; 'या' ४ तांत्रिक गोष्टी तपासा, अन्यथा क्लेमवेळी होईल पश्चात्ताप!
15
उद्धवसेना-मनसे युतीची बोलणी संपली, संजय राऊतांनी दिली महत्त्वाची माहिती; "अजूनही ७२ तास..."
16
"म्हणून पुन्हा एकदा सांगतो, शून्य अधिक शून्य...", निकाल लागताच भाजपचा उद्धव ठाकरेंवर पहिला प्रहार
17
Shrivardhan Nagar Parishad Election Result 2025: रायगडमध्ये मोठा ट्विस्ट! श्रीवर्धनमधील ठाकरे गटाचा विजयी नगराध्यक्ष शिंदेसेनेत प्रवेश करणार?
18
Maharashtra Nagaradhyaksha Winners List: महाराष्ट्रातील नगरपरिषद, नगरपंचायतींमध्ये कोण झालं नगराध्यक्ष? वाचा, पक्षनिहाय यादी
19
Muktainagar Nagar Panchayat Election Result 2025: “रक्षा खडसे भाजपात एकाकी पडल्या”; मुक्ताईनगरातील शिंदेसेनेच्या विजयानंतर एकनाथ खडसेंचा दावा
20
"पैसे भरा, मृतदेह न्या", पोटच्या पोरासाठी बापाने मागितली भीक; घर गहाण ठेवलं, कर्ज काढलं, पण...
Daily Top 2Weekly Top 5

नागरी समस्यांच्या जाळ्यात नरसाळा ()

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 8, 2021 04:07 IST

रस्ते अर्धवट, गडरलाईन अपूर्ण : उद्यानांचा अभाव, अस्वच्छता, दुर्गंधीमुळे आरोग्य धोक्यात नागपूर : नागपूर शहराची स्मार्ट सिटीकडे वाटचाल सुरू ...

रस्ते अर्धवट, गडरलाईन अपूर्ण : उद्यानांचा अभाव, अस्वच्छता, दुर्गंधीमुळे आरोग्य धोक्यात

नागपूर : नागपूर शहराची स्मार्ट सिटीकडे वाटचाल सुरू आहे. शहरातील रस्ते चकाचक होत असल्याचा दावा केला जात आहे. शहरातील नागरिकांना उत्तम दर्जाच्या नागरी सुविधा पुरविण्याचा दावा मनपातील पदाधिकारी व प्रशासनाकडून केला जात आहे. दुसरीकडे नागपूर शहरातील अनेक वस्त्यांमध्ये नागरिकांना गंभीर समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. ‘लोकमत’ने नरसाळा भागातील समस्यांची पाहणी केली असता नागरिकांनी आपल्या व्यथा मांडल्या. या परिसरात रस्त्याची समस्या गंभीर आहे. परिसरात गडरलाईन नसल्यामुळे नागरिकांना त्रास होत आहे. गार्डनमध्येही कुठलीच व्यवस्था नाही. अशा एक ना अनेक समस्यांमुळे नरसाळावासी त्रस्त झाले आहेत. याबाबत अनेकदा तक्रारी करूनही महापालिकेच्या वतीने काहीच उपाययोजना करण्यात आलेल्या नसल्याचे नागरिकांनी सांगितले.

गुलमोहरनगरात घाण पाणी विहिरीत

गुलमोहरनगरात गडरलाईन नाही. त्यामुळे शौचालयाचे पाणी नागरिकांच्या विहिरीत शिरत आहे. नागरिकांनी अनेकदा परिसरातील नगरसेवकांना तक्रारी केल्या. परंतु कुणीच या समस्येकडे लक्ष देण्यास तयार नाही. या भागात गार्डनसाठी जागा सोडली आहे. परंतु गार्डनमध्ये खेळणी नसल्यामुळे लहान मुलांची गैरसोय होत आहे. गार्डनमध्ये ग्रीन जीम आहे. मात्र तेथे गवत वाढल्यामुळे त्याचा फायदा नागरिकांना होत नाही. गार्डनमध्ये घाण पाणी साचलेले असल्यामुळे तेथे उभे राहण्याचीही इच्छा होत नसल्याची तक्रार नागरिकांनी केली. गडरलाईनअभावी या भागातील विहिरी प्रदूषित होत असल्यामुळे महापालिकेने त्वरित गडरलाईनची व्यवस्था करून देण्याची गरज आहे.

भारतमाता नगरात पावसाचे पाणी घरात

भारतमातानगर तसेच चाणक्यपुरम सोसायटीत पावसाळ्यात नागरिकांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते. या भागात गार्डनमध्ये खेळणी नाहीत. त्यामुळे लहान मुलांची गैरसोय होत आहे. पावसाळी नाल्या नसल्यामुळे पावसाळ्यात घाण पाणी नागरिकांच्या घरात शिरते. परिसरात रस्ते उंचावर आणि नागरिकांची घरे खोलगट भागात आहेत. त्यामुळे पावसाळ्यात अधिक पाऊस आल्यास नागरिकांची गैरसोय होते. सगळीकडे पाणी साचते. या भागात अनेक रिकामे प्लॉट आहेत. या रिकाम्या प्लॉटमध्ये पाणी साचते. तेथे डासांचा प्रादुर्भाव होत असल्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. महानगरपालिकेने रिकाम्या प्लॉटधारकांवर कारवाई करण्याची मागणी नागरिक करीत आहेत.

खराब रस्त्यांची जय अंबे सोसायटी

न्यू नरसाळा भागातील जय अंबे सोसायटीत रस्त्याची समस्या गंभीर आहे. या भागात बेसा पॉवर हाऊस ते न्यू नरसाळा रोडवर अर्धा सिमेंट रोड तयार करण्यात आला. परंतु अर्धा रस्ता खोदून ठेवल्यामुळे नागरिकांची प्रचंड गैरसोय होत आहे. रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले असून नागरिकांना धुळीचा सामना करावा लागत आहे. परिसरात गडरलाईन नाही. त्यामुळे पावसाळ्यात घाण पाणी नागरिकांच्या घरात शिरते. या भागात रिकाम्या प्लॉटमध्ये पाणी साचते. त्यामुळे डासांचा प्रादुर्भाव होत आहे. परिसरातील नागरिकांनी याबाबत अनेकदा नगरसेवकांकडे तक्रारी केल्या. परंतु या समस्यांकडे कुणीच लक्ष द्यायला तयार नाही. त्यामुळे महानगरपालिकेने या भागातील नागरिकांच्या समस्या सोडविण्याची मागणी होत आहे.

वाहनचालकांची कसरत

‘जय अंबे सोसायटीत रस्त्याची समस्या गंभीर आहे. अर्धा सिमेंट रोड तयार झाला आहे. परंतु अर्धा रस्ता खोदून ठेवल्यामुळे गिट्टी रस्त्यावर पसरलेली आहे. वाहनचालकांना वाहन चालविताना तारेवरची कसरत करावी लागते. परिसरात गडरलाईन नसल्यामुळे नागरिकांची गैरसोय होत आहे.’

- प्रशांत ढवंगाळे, नागरिक

गडरलाईन तरी करा

गुलमोहर कॉलनीत गडरलाईन नाही. त्यामुळे पावसाळ्यात घाण पाणी नागरिकांच्या घरात शिरत असल्यामुळे नागरिकांची गैरसोय होत आहे. परिसरातील गार्डनमध्ये गवत वाढले आहे. गार्डनमध्ये लहान मुलांना खेळणी उपलब्ध करून देण्याची गरज आहे. सेफ्टी टँकचे पाणी विहिरीत शिरत असल्यामुळे त्या दूषित होत आहेत.

- ताराचंद मेंढे, नागरिक

रिकाम्या प्लॉटधारकांवर कारवाई करा

भारतमातानगरात नागरिकांनी प्लॉट घेऊन ठेवले आहेत. रिकाम्या प्लॉटवर पावसाळ्यात पाणी साचते. या पाण्यामुळे डासांचा प्रादुर्भाव होतो. यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. त्यामुळे रिकाम्या प्लॉटधारकांवर महापालिकेने कारवाई करण्याची गरज आहे.

-राहुल डम्पलवार, नागरिक

सिव्हरेज लाईन महत्त्वाची

चाणक्यपुरम सोसायटीत सिव्हरेज लाईन नाही. त्यामुळे नागरिकांची गैरसोय होत आहे. पावसाळ्यात घाण पाणी परिसरात साचते. यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. महापालिकेने परिसरात सिव्हरेज लाईनची व्यवस्था करण्याची मागणी अनेक वर्षांपासून नागरिक करीत आहेत. परंतु अद्यापही ही मागणी पूर्ण करण्यात न आल्यामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत.

-संगीता रंगारी, गृहिणी

...............