शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Railway Accident: ठाण्याजवळ रेल्वे दुर्घटना! धावत्या ट्रेनमधून ट्रॅकवर पडले प्रवासी, पाच जणांचा मृत्यू; बचावकार्य सुरू
2
दारावर लटकून प्रवास, समोरच्या ट्रेनमधील प्रवाशांना धडक अन्...; मुंब्रामधील रेल्वे दुर्घटनेचे कारण समोर
3
'आम्ही कोणत्याही पक्षाशी...' ठाकरे बंधूंच्या युतीच्या चर्चेवर आदित्य ठाकरे स्पष्टच बोलले!
4
Mumbai Local: नव्या लोकलचे दरवाजे आपोआप बंद होणार, मुंबई रेल्वे अपघातानंतर प्रशासनाला जाग!
5
Raja Raghuvanshi : सोनम बेवफा! ११ मे ला लग्न, २० ला हनिमून, २३ ला हत्या; १७ दिवसांनी कोणाला केला पहिला फोन?
6
अहिल्यानगर : एमपीएल क्रिकेट सामना बघून परताना गाडीचा भीषण अपघात; जळगावमधील दोन ठार, ११ जखमी
7
मुलाचा जन्म, पण उपचारादरम्यान मातेचा मृत्यू; छत्रपती संभाजीनगरात पुण्याच्या घटनेची पुनरावृत्ती
8
"मला चुकीच्या पद्धतीने स्पर्श केला", २५ वर्ष लहान अभिनेत्रीने मिथुन चक्रवर्तींवर केलेला आरोप
9
पोलिस मेघालय-मध्य प्रदेशात शोधत राहिले; 'बेवफा' सोनम प्रियकरासोबत युपीत सापडली...
10
Vat Purnima 2025: वडाची पूजा झाल्यावर 'हा' श्लोक म्हणायला विसरू नका, तरच पूर्ण होईल व्रत!
11
Vat Purnima 2025: केवळ सौभाग्यासाठी नाही, तर दीर्घायुष्यासाठी करा वटवृक्षाची पुजा!
12
भारतात पहिल्यांदाच MCX नं केलं असं काम की विक्रमी उच्चांकी स्तरावर पोहोचले शेअर्स, जाणून घ्या
13
"आमची मुलगी असं का करेल? असं करायचं असतं, तर ती..."; सोनमच्या वडिलांची पहिली प्रतिक्रिया काय?
14
"गेल्या १० वर्षांपासून मी मानसोपचार...", अमृता सुभाषने केला खुलासा; कारणही सांगितलं
15
अनिल अंबानींची कंपनी करणार ₹५००० कोटींची गुंतवणूक; संरक्षण क्षेत्रात इतिहास रचण्यास तयार
16
७ वर्षांत एफडीआयमध्ये महाराष्ट्र टॉप, परदेशातील सर्वाधिक गुंतवणूक राज्यात; पायाभूत सुविधांतील सुधारणा ठरतेय मोठ्या फायद्याची
17
आऊट देताच महिला अंपायरवर भडकला अश्निन, रागाच्या भरात पॅडवर मारली बॅट!
18
हनिमूनसाठी नाही तर कायमचे संपवायला घेऊन गेली होती सोनम; पतीच्या हत्येप्रकरणी अखेर अटक
19
Sonam Raghuwanshi: राजा रघुवंशीची हत्या करण्यासाठी सोनमने घेतली तिघांची मदत; दोघांना अटक, एक फरार

नागरी समस्यांच्या जाळ्यात नरसाळा ()

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 8, 2021 04:07 IST

रस्ते अर्धवट, गडरलाईन अपूर्ण : उद्यानांचा अभाव, अस्वच्छता, दुर्गंधीमुळे आरोग्य धोक्यात नागपूर : नागपूर शहराची स्मार्ट सिटीकडे वाटचाल सुरू ...

रस्ते अर्धवट, गडरलाईन अपूर्ण : उद्यानांचा अभाव, अस्वच्छता, दुर्गंधीमुळे आरोग्य धोक्यात

नागपूर : नागपूर शहराची स्मार्ट सिटीकडे वाटचाल सुरू आहे. शहरातील रस्ते चकाचक होत असल्याचा दावा केला जात आहे. शहरातील नागरिकांना उत्तम दर्जाच्या नागरी सुविधा पुरविण्याचा दावा मनपातील पदाधिकारी व प्रशासनाकडून केला जात आहे. दुसरीकडे नागपूर शहरातील अनेक वस्त्यांमध्ये नागरिकांना गंभीर समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. ‘लोकमत’ने नरसाळा भागातील समस्यांची पाहणी केली असता नागरिकांनी आपल्या व्यथा मांडल्या. या परिसरात रस्त्याची समस्या गंभीर आहे. परिसरात गडरलाईन नसल्यामुळे नागरिकांना त्रास होत आहे. गार्डनमध्येही कुठलीच व्यवस्था नाही. अशा एक ना अनेक समस्यांमुळे नरसाळावासी त्रस्त झाले आहेत. याबाबत अनेकदा तक्रारी करूनही महापालिकेच्या वतीने काहीच उपाययोजना करण्यात आलेल्या नसल्याचे नागरिकांनी सांगितले.

गुलमोहरनगरात घाण पाणी विहिरीत

गुलमोहरनगरात गडरलाईन नाही. त्यामुळे शौचालयाचे पाणी नागरिकांच्या विहिरीत शिरत आहे. नागरिकांनी अनेकदा परिसरातील नगरसेवकांना तक्रारी केल्या. परंतु कुणीच या समस्येकडे लक्ष देण्यास तयार नाही. या भागात गार्डनसाठी जागा सोडली आहे. परंतु गार्डनमध्ये खेळणी नसल्यामुळे लहान मुलांची गैरसोय होत आहे. गार्डनमध्ये ग्रीन जीम आहे. मात्र तेथे गवत वाढल्यामुळे त्याचा फायदा नागरिकांना होत नाही. गार्डनमध्ये घाण पाणी साचलेले असल्यामुळे तेथे उभे राहण्याचीही इच्छा होत नसल्याची तक्रार नागरिकांनी केली. गडरलाईनअभावी या भागातील विहिरी प्रदूषित होत असल्यामुळे महापालिकेने त्वरित गडरलाईनची व्यवस्था करून देण्याची गरज आहे.

भारतमाता नगरात पावसाचे पाणी घरात

भारतमातानगर तसेच चाणक्यपुरम सोसायटीत पावसाळ्यात नागरिकांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते. या भागात गार्डनमध्ये खेळणी नाहीत. त्यामुळे लहान मुलांची गैरसोय होत आहे. पावसाळी नाल्या नसल्यामुळे पावसाळ्यात घाण पाणी नागरिकांच्या घरात शिरते. परिसरात रस्ते उंचावर आणि नागरिकांची घरे खोलगट भागात आहेत. त्यामुळे पावसाळ्यात अधिक पाऊस आल्यास नागरिकांची गैरसोय होते. सगळीकडे पाणी साचते. या भागात अनेक रिकामे प्लॉट आहेत. या रिकाम्या प्लॉटमध्ये पाणी साचते. तेथे डासांचा प्रादुर्भाव होत असल्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. महानगरपालिकेने रिकाम्या प्लॉटधारकांवर कारवाई करण्याची मागणी नागरिक करीत आहेत.

खराब रस्त्यांची जय अंबे सोसायटी

न्यू नरसाळा भागातील जय अंबे सोसायटीत रस्त्याची समस्या गंभीर आहे. या भागात बेसा पॉवर हाऊस ते न्यू नरसाळा रोडवर अर्धा सिमेंट रोड तयार करण्यात आला. परंतु अर्धा रस्ता खोदून ठेवल्यामुळे नागरिकांची प्रचंड गैरसोय होत आहे. रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले असून नागरिकांना धुळीचा सामना करावा लागत आहे. परिसरात गडरलाईन नाही. त्यामुळे पावसाळ्यात घाण पाणी नागरिकांच्या घरात शिरते. या भागात रिकाम्या प्लॉटमध्ये पाणी साचते. त्यामुळे डासांचा प्रादुर्भाव होत आहे. परिसरातील नागरिकांनी याबाबत अनेकदा नगरसेवकांकडे तक्रारी केल्या. परंतु या समस्यांकडे कुणीच लक्ष द्यायला तयार नाही. त्यामुळे महानगरपालिकेने या भागातील नागरिकांच्या समस्या सोडविण्याची मागणी होत आहे.

वाहनचालकांची कसरत

‘जय अंबे सोसायटीत रस्त्याची समस्या गंभीर आहे. अर्धा सिमेंट रोड तयार झाला आहे. परंतु अर्धा रस्ता खोदून ठेवल्यामुळे गिट्टी रस्त्यावर पसरलेली आहे. वाहनचालकांना वाहन चालविताना तारेवरची कसरत करावी लागते. परिसरात गडरलाईन नसल्यामुळे नागरिकांची गैरसोय होत आहे.’

- प्रशांत ढवंगाळे, नागरिक

गडरलाईन तरी करा

गुलमोहर कॉलनीत गडरलाईन नाही. त्यामुळे पावसाळ्यात घाण पाणी नागरिकांच्या घरात शिरत असल्यामुळे नागरिकांची गैरसोय होत आहे. परिसरातील गार्डनमध्ये गवत वाढले आहे. गार्डनमध्ये लहान मुलांना खेळणी उपलब्ध करून देण्याची गरज आहे. सेफ्टी टँकचे पाणी विहिरीत शिरत असल्यामुळे त्या दूषित होत आहेत.

- ताराचंद मेंढे, नागरिक

रिकाम्या प्लॉटधारकांवर कारवाई करा

भारतमातानगरात नागरिकांनी प्लॉट घेऊन ठेवले आहेत. रिकाम्या प्लॉटवर पावसाळ्यात पाणी साचते. या पाण्यामुळे डासांचा प्रादुर्भाव होतो. यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. त्यामुळे रिकाम्या प्लॉटधारकांवर महापालिकेने कारवाई करण्याची गरज आहे.

-राहुल डम्पलवार, नागरिक

सिव्हरेज लाईन महत्त्वाची

चाणक्यपुरम सोसायटीत सिव्हरेज लाईन नाही. त्यामुळे नागरिकांची गैरसोय होत आहे. पावसाळ्यात घाण पाणी परिसरात साचते. यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. महापालिकेने परिसरात सिव्हरेज लाईनची व्यवस्था करण्याची मागणी अनेक वर्षांपासून नागरिक करीत आहेत. परंतु अद्यापही ही मागणी पूर्ण करण्यात न आल्यामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत.

-संगीता रंगारी, गृहिणी

...............