शहरं
Join us  
Trending Stories
1
घाबरायची गरज नाही! ट्रम्प यांच्या H-1B व्हिसा बॉम्बनंतर उडालेल्या गोंधळात, अमेरिकन अधिकाऱ्यानंच दिली आनंदाची बातमी; म्हणाले, फक्त...
2
BCCI New President : ठरलं! पुन्हा एकदा माजी क्रिकेटर होणार बीसीसीआयचा 'कारभारी'; पण कोण?
3
ट्रम्प यांचा H-1B व्हिसाबाबत निर्णय, नियम बदलावर भारताची पहिली प्रतिक्रिया; सरकार म्हणते...
4
IND vs PAK यांच्यातील मॅच आधी PCB अध्यक्ष मोहसीन नक्वी यांच्यावर आली पळ काढण्याची वेळ! कारण...
5
“२३८ नवीन रेक, नववर्षांत स्वयंचलित दरवाजे असलेली लोकल, ६० टक्के प्रवासी वाढ”: अश्विनी वैष्णव 
6
IND vs PAK Live Streaming : टीम इंडिया पुन्हा पाकचा बुक्का पाडणार? मैदानातील माहोल कसा असणार?
7
SL vs BAN : 'काठावर पास' झालेल्या बांगलादेशचा टॉपर श्रीलंकेला दणका; पराभवाचा हिशोबही केला चुकता
8
GST कपातीनंतर Amul ची मोठी घोषणा! दूध, तूप, लोणी, आइसक्रीम स्वस्त; ग्राहकांना मोठा दिलासा, जाणून घ्या नवे दर
9
Asia Cup 2025 :मॅच संपल्यावर वडिलांच्या निधनाची बातमी! घरी जाऊन तो परत आला अन् देशासाठी मैदानात उतरला
10
२ लाख भारतीयांवर परिणाम, IT सेक्टर-नोकरीत फटका; ट्रम्प H-1B व्हिसा नियम बदलाने मोठे नुकसान!
11
स्मृतीनं केली विक्रमांची 'बरसात'! ४१२ धावा करून ऑस्ट्रेलियाला भरलेली धडकी; एक इंज्युरी ब्रेक अन्...
12
उद्योगांना दिलेली अवाजवी एमआरपी सवलत तात्काळ मागे घ्यावी, मुंबई ग्राहक पंचायतीची केंद्रीय मंत्र्यांकडे मागणी
13
“सरकारमधील मंत्र्यांचा बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव”; विजय वडेट्टीवारांचा आरोप
14
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
15
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
16
Mohanlal: ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांचा दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव, भारत सरकारची मोठी घोषणा
17
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
18
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
19
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ
20
उत्तराखंड : मुख्यमंत्री पुष्करसिंह धामींकडून चमोलीतील आपत्तीग्रस्त भागांची पाहणी, पीडितांना दिलं सर्वतोपरी मदतीचा विश्वास

पराभवाच्या भीतीने नरेंद्र मोदी रडत आहेत, गुलाम नबी आझाद यांची टीका, सरकारविरोधात हल्लाबोल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 13, 2017 01:05 IST

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना गुजरातमध्ये पराभव दिसू लागल्यामुळेच काँग्रेसने पाकिस्तानसोबत सरकारविरुद्ध कट रचल्याचा आरोप करून ते रडू लागले आहेत, अशी टीका राज्यसभेतील विरोधी पक्षनेते गुलाम नबी आझाद यांनी केली.

नागपूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना गुजरातमध्ये पराभव दिसू लागल्यामुळेच काँग्रेसने पाकिस्तानसोबत सरकारविरुद्ध कट रचल्याचा आरोप करून ते रडू लागले आहेत, अशी टीका राज्यसभेतील विरोधी पक्षनेते गुलाम नबी आझाद यांनी केली.काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आणि इतर विरोधी पक्षांनी राज्य सरकारविरुद्ध नागपूर विधिमंडळावर काढलेल्या जनआक्रोश व हल्लाबोल मोर्चात आझाद बोलत होते.ते म्हणाले, मणिशंकर अय्यर यांच्या घरी झालेल्या कथित बैठकीत माजी पंतप्रधान मनमोहन सिंग, माजी उपराष्ट्रपती हमीद अन्सारी, माजी सैन्यप्रमुख, राजदूत, विदेश सचिव आदींनी पाकिस्तानसोबत हातमिळवणी करून सरकारविरुद्ध कट रचल्याचा आरोप मोदींनी केला आहे. अशा पंतप्रधानांवर मला शरम वाटते. गुजरातेत पराभव दिसू लागताच त्यांची एवढी पातळी खालावली? बिहारच्या निवडणुकीतही पराभव दिसू लागला असताना ‘नितीश जितेगा, तो पाकिस्तान मे जश्न मनेगा’ असे मोदी म्हणाले होते. आता तेच नितीशकुमार मोदींच्या मांडीवर जाऊन बसले तेव्हा पाकिस्तानात जल्लोष झाला का, असा सवालही त्यांनी केला.पंतप्रधान मोदी हे एकतर कोणत्या ना कोणत्या राज्यात निवडणुकीत व्यस्त असतात, नाहीतर विदेशात असतात. आम्ही त्यांना कधी जपान, जर्मनी, अमेरिकेत शोधायचे, तर कधी आसाम, बिहार, उत्तर प्रदेशात शोधायचे. ते पंतप्रधान म्हणून देशासाठी कधी काम करतात, असा सवाल त्यांनी केला. पंतप्रधानांसह भाजपाचे मुख्यमंत्री, मंत्री हे दोन-दोन महिने निवडणुका असलेल्या राज्यात डेरा टाकतात. भाजपाचे सरकार हे आता निवडणुका लढविण्याची मशिन झाली आहे, अशी टीका त्यांनी केली.जो भाजपाला साथ देत नाही त्याला देशद्रोही ठरविले जात आहे. जो भाजपाच्या धोरणांचा विरोध करतो त्याला दहशतवादी ठरविले जात आहे, असे सांगत भाजपाच्या या भूमिकेपासून सतर्क राहा, असा सावधगिरीचा इशाराही त्यांनी दिला.सामान्यांच्या प्रश्नाला वाचा फोडली - दर्डाशेतकरी आणि शेतमजुरांचे प्रश्न घेऊन ‘लोकमत’च्या माध्यमातून आम्ही लढत आहोत. संपूर्ण राज्य आणि देश शेतकरी आणि सर्वसामान्यांच्या प्रश्नाने अस्वस्थ असताना काँग्रेसने राज्यात प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली मोर्चा काढून या प्रश्नांना वाचा फोडली आहे. शेतकºयांची सर्वच स्तरांवर कुचंबना होत आहे. त्याचा कुणी वाली नाही. राहुलजी आता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष झाले आहेत. त्यांच्या नेतृत्त्वाखाली या देशातील गरीब, दलित, शोषित, वंचितांचे प्रश्न सुटायला मदत होईल, असा विश्वास काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व माजी खासदार विजय दर्डा यांनी जनआक्रोश-हल्लाबोल रॅलीचा शुभारंभ करताना व्यक्त केला.दोन्ही काँग्रेस एक होऊ शकतात : काँग्रेस आणि राष्ट्रवादी हे दोन पक्ष असले तरी त्यांची विचारसरणी एकच आहे. त्यामुळे पुन्हा दोन्ही पक्ष एकच होतील, अशी भविष्यवाणी आझाद यांनी या वेळी केली.

टॅग्स :nagpurनागपूर