शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
2
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
3
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
4
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
5
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
6
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
7
कमाल झाली..! कुणाच्या स्वप्नातही नाही आली; ती गोष्ट टीम इंडियातील या तिघांनी सत्यात उतरवली
8
मालेगाव २००८; बॉम्बस्फोटातील तपासात एटीएस आणि एनआयएचा विरोधाभास 
9
सात महिन्यांत अक्षय कुमारने ११० कोटींची मालमत्ता विकली, कुठे किती रुपयांना केली विक्री? जाणून घ्या
10
महिलांसाठी मोठी संधी! LIC ची नवी योजना, फक्त ‘हे’ काम करा आणि दरमहा ७,००० रुपये कमवा!
11
भारतीय शेतकरी चुकून गेला पाकिस्तानात; न्यायालयाने सुनावली तुरुंगवासाची शिक्षा, वडील म्हणतात....
12
सरकारचा पैसा आहे, आपल्या बापाचं काय जातंय? संजय शिरसाटांचे विधान; सुप्रिया सुळे म्हणाल्या, "इशारा देऊन पण..."
13
कुलगाममध्ये तिसऱ्या दिवशीही चकमक सुरू; आतापर्यंत तीन दहशतवादी ठार, या वर्षातील सर्वात मोठी कारवाई
14
पनवेलमध्ये राडा झाला...! राज ठाकरेंच्या इशाऱ्यानंतर पनवेलमधील लेडीज बारवर मनसेचा हल्ला 
15
भारतीय निवडणूक प्रणाली मृत, निवडणुकीत घोटाळे! विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
16
मुद्द्याची गोष्ट : टॅरिफच्या खेळीने चेकमेट कोण? कुणाला बसणार फटका?
17
आजचे राशीभविष्य ३ ऑगस्ट २०२५ : सांसारिक गोष्टी बाजूला ठेवाल, गूढ रहस्यमय विद्येत रमाल
18
‘भीमराया…’ गीताची जन्मकथा सांगताना सरन्यायाधीश गवईंचा गळा दाटला! सुरेश भटांनी कसे लिहिले भीमरायाचे वंदना गीत? ऐकवली संपूर्ण कहाणी
19
प्रज्वल रेवण्णाला बलात्कारप्रकरणी जन्मठेप, १० लाख रुपयांचा दंडही; पीडित महिलेला ७ लाख रु. भरपाई देण्याचा आदेश
20
"हमे अयोध्या का मंदिर आरडीएक्स से उडाना है, पचास बंदे चाहिए..."; शिरूरच्या तरुणाला कराचीतून मेसेज, १ लाखाची ऑफर! गुन्हा दाखल

पराभवाच्या भीतीने नरेंद्र मोदी रडत आहेत, गुलाम नबी आझाद यांची टीका, सरकारविरोधात हल्लाबोल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 13, 2017 01:05 IST

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना गुजरातमध्ये पराभव दिसू लागल्यामुळेच काँग्रेसने पाकिस्तानसोबत सरकारविरुद्ध कट रचल्याचा आरोप करून ते रडू लागले आहेत, अशी टीका राज्यसभेतील विरोधी पक्षनेते गुलाम नबी आझाद यांनी केली.

नागपूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना गुजरातमध्ये पराभव दिसू लागल्यामुळेच काँग्रेसने पाकिस्तानसोबत सरकारविरुद्ध कट रचल्याचा आरोप करून ते रडू लागले आहेत, अशी टीका राज्यसभेतील विरोधी पक्षनेते गुलाम नबी आझाद यांनी केली.काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आणि इतर विरोधी पक्षांनी राज्य सरकारविरुद्ध नागपूर विधिमंडळावर काढलेल्या जनआक्रोश व हल्लाबोल मोर्चात आझाद बोलत होते.ते म्हणाले, मणिशंकर अय्यर यांच्या घरी झालेल्या कथित बैठकीत माजी पंतप्रधान मनमोहन सिंग, माजी उपराष्ट्रपती हमीद अन्सारी, माजी सैन्यप्रमुख, राजदूत, विदेश सचिव आदींनी पाकिस्तानसोबत हातमिळवणी करून सरकारविरुद्ध कट रचल्याचा आरोप मोदींनी केला आहे. अशा पंतप्रधानांवर मला शरम वाटते. गुजरातेत पराभव दिसू लागताच त्यांची एवढी पातळी खालावली? बिहारच्या निवडणुकीतही पराभव दिसू लागला असताना ‘नितीश जितेगा, तो पाकिस्तान मे जश्न मनेगा’ असे मोदी म्हणाले होते. आता तेच नितीशकुमार मोदींच्या मांडीवर जाऊन बसले तेव्हा पाकिस्तानात जल्लोष झाला का, असा सवालही त्यांनी केला.पंतप्रधान मोदी हे एकतर कोणत्या ना कोणत्या राज्यात निवडणुकीत व्यस्त असतात, नाहीतर विदेशात असतात. आम्ही त्यांना कधी जपान, जर्मनी, अमेरिकेत शोधायचे, तर कधी आसाम, बिहार, उत्तर प्रदेशात शोधायचे. ते पंतप्रधान म्हणून देशासाठी कधी काम करतात, असा सवाल त्यांनी केला. पंतप्रधानांसह भाजपाचे मुख्यमंत्री, मंत्री हे दोन-दोन महिने निवडणुका असलेल्या राज्यात डेरा टाकतात. भाजपाचे सरकार हे आता निवडणुका लढविण्याची मशिन झाली आहे, अशी टीका त्यांनी केली.जो भाजपाला साथ देत नाही त्याला देशद्रोही ठरविले जात आहे. जो भाजपाच्या धोरणांचा विरोध करतो त्याला दहशतवादी ठरविले जात आहे, असे सांगत भाजपाच्या या भूमिकेपासून सतर्क राहा, असा सावधगिरीचा इशाराही त्यांनी दिला.सामान्यांच्या प्रश्नाला वाचा फोडली - दर्डाशेतकरी आणि शेतमजुरांचे प्रश्न घेऊन ‘लोकमत’च्या माध्यमातून आम्ही लढत आहोत. संपूर्ण राज्य आणि देश शेतकरी आणि सर्वसामान्यांच्या प्रश्नाने अस्वस्थ असताना काँग्रेसने राज्यात प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली मोर्चा काढून या प्रश्नांना वाचा फोडली आहे. शेतकºयांची सर्वच स्तरांवर कुचंबना होत आहे. त्याचा कुणी वाली नाही. राहुलजी आता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष झाले आहेत. त्यांच्या नेतृत्त्वाखाली या देशातील गरीब, दलित, शोषित, वंचितांचे प्रश्न सुटायला मदत होईल, असा विश्वास काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व माजी खासदार विजय दर्डा यांनी जनआक्रोश-हल्लाबोल रॅलीचा शुभारंभ करताना व्यक्त केला.दोन्ही काँग्रेस एक होऊ शकतात : काँग्रेस आणि राष्ट्रवादी हे दोन पक्ष असले तरी त्यांची विचारसरणी एकच आहे. त्यामुळे पुन्हा दोन्ही पक्ष एकच होतील, अशी भविष्यवाणी आझाद यांनी या वेळी केली.

टॅग्स :nagpurनागपूर