शहरं
Join us  
Trending Stories
1
मनसेसोबत युतीसाठी उद्धव ठाकरेंची मविआतून बाहेर पडण्याची तयारी?; बाळा नांदगावकरांचं सूचक विधान
2
भंडाऱ्याचे काँग्रेस खासदार प्रशांत पडोळेंच्या गाडीचा भीषण अपघात; ट्रकची धडक, चौघांना किरकोळ दुखापत
3
Ladki Bahin Yojana: 'मुख्यमंत्री लाडकी बहीण योजने'च्या ऑगस्ट महिन्याचा हप्ता कधी येणार? आदिती तटकरेंनी दिली माहिती
4
तालिबानचे नवे फर्मान! इस्लामविरोधी असल्याचे सांगत अफगाण शाळांमधून काढून टाकले ५१ विषय
5
सणासुदीपूर्वी सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा घसरण; खरेदीपूर्वी पाहा १४ ते २४ कॅरेट सोन्याची नवी किंमत
6
'शिवाजीनगर मेट्रो स्टेशनचे नाव सेंट मेरी करा'; आमदाराच्या मागणीला CM सिद्धरामय्यांचा होकार
7
Navratri 2025: नवरात्रीची सुरुवात कधीपासून? घटस्थापनेचे महत्त्व, नऊ रंग आणि उत्सवाची पार्श्वभूमी जाणून घ्या
8
Milk Rate: ४ रुपयांनी स्वस्त होणारे का अमूलचं दूध? कंपनीच्या एमडींनी सांगितला संपूर्ण प्लान
9
भारताच्या 'या' राज्यात राहतात सर्वाधिक नेपाळी लोक, सरकारी सोयीसुविधांचाही घेतात लाभ!
10
"तुमची मुलगी नक्षलवादी आहे, तिचे आधारकार्ड द्या !" पोलिसांना माओवाद आणि मार्क्सवाद यातील फरक समजत नाही का?
11
विश्रांतीनंतर उपमुख्यमंत्री अजित पवार 'अँक्शन मोड'मध्ये! प्रशासनाला दिले महत्त्वाचे आदेश
12
पत्नीचं अफेअर, घराच्या छतावर चाळे करताना पतीने बॉयफ्रेंडसह पकडलं, त्यानंतर दिली ऐकून थरकाप उडेल अशी शिक्षा
13
भारतात राहून पोस्ट ग्रॅजुएशन अन् देशालाच उडवण्याची योजना; पोलिसांनी सांगितले अटक केलेल्या ५ दहशतवाद्यांचे मनसुबे! 
14
साखरेच्या डब्यात मुंग्याच मुंग्या; पाहून डोक्याचा होतो भुगा, 'या' घरगुती उपायाने होतील छूमंतर
15
VIDEO: बापरे... मगर आणि पाणघोडा आले समोरासमोर, दोघांमध्ये तुफान जुंपली... कोण जिंकलं?
16
"प्रत्येक खासदाराला १५ कोटी देऊन भाजपाने मत खरेदी केले"; 'क्रॉस व्होटिंग'वर सर्वात मोठा दावा
17
"आता पहिल्यासारखं आयुष्य नाही..."; एकाच मुलीशी लग्न करणाऱ्या २ भावांवर कोसळला दु:खाचा डोंगर
18
नवीन गाडीची डिलिव्हरी घेताना अपघात झाला तर? महिंद्रा थारच्या घटनेतून जाणून घ्या विमा क्लेमचे नियम
19
Google Pixel 9: चक्क अर्ध्या किंमतीत खरेदी करा गुगल पिक्सेल ९; कॅमेऱ्यानं अनेकांना लावलंय वेड!

नंदा खरे यांनी विदर्भ साहित्य संघाचा ‘जीवनव्रती’ही नाकारला होता!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 22, 2022 21:46 IST

Nagpur News प्रसिद्ध साहित्यिक अनंत यशवंत खरे उपाख्य नंदा खरे यांनी २०२१ साली जाहीर झालेल्या २०२० चा साहित्य अकादमी पुरस्कार नाकारण्याचा निर्धार पाळला होता.

ठळक मुद्देशुद्ध अंतकरणाचा साहित्यिक जाण्याने नागपूरचे साहित्य वर्तुळ हळहळले

 

नागपूर : ‘चार वर्षांपूर्वी मी पुरस्कार न स्वीकारण्याचा निर्णय घेतला आहे. समाजाकडून मला भरपूर मिळालं आहे व यापुढेही घेत राहणे मला इष्ट वाटत नाही. पुरस्कार देणाऱ्या सर्व संस्थांचा आदर राखून व त्यांचे आभार मानून ही माझी भूमिका मी मांडत आहे,’ अशी भावना जाहीर करत प्रसिद्ध साहित्यिक अनंत यशवंत खरे उपाख्य नंदा खरे यांनी २०२१ साली जाहीर झालेल्या २०२० चा साहित्य अकादमी पुरस्कार नाकारण्याचा निर्धार पाळला होता. यापूर्वीही त्यांनी विदर्भ साहित्य संघातर्फे २०१९ साठी जाहीर झालेला ‘जीवनव्रती’ हा पुरस्कार नम्रपणे नाकारला होता. विशेष म्हणजे, नकार कळविण्याला कोणतेही राजकीय, वैचारिक वा बायकॉटचे कारण नव्हते, हे त्यांच्या जाहीर स्पष्टीकरणानेच स्पष्ट झाले होते. नागपुरात जन्म व शिक्षण झालेल्या या साहित्यिकाचे नागपूर व विदर्भावर प्रचंड प्रेम होते आणि ते त्यांच्या साहित्यातूनही प्रकट झाले आहे. साहजिकच त्यांच्या निधनाने विदर्भाचे साहित्य विश्वही हळहळले आहे.

‘दक्षिणायन’च्या लढ्यातील प्रमुख शिलेदार

- गेल्याच महिन्यात २० जूनला पुणे येथे नंदा खरेंची भेट घेतली. राजकीय हुकुमशाही, आर्थिक भ्रष्टाचार आणि पर्यावरणाची नासाडी हे त्यांच्या सर्वच लेखनाचे मुख्य सूत्र होते. त्यांच्यासारखे नैतिक भूमिका घेऊन व्यवस्थेच्या विरोधात उभे राहणारे लेखक दुर्मिळ आहेत. त्यांच्या ‘उद्या’ कादंबरीला मिळालेल्या साहित्य अकादमीचा पुरस्कार त्यांनी याच भावनेतून नाकारला होता. अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या संदर्भात आम्ही महाराष्ट्रात उभारलेल्या ‘दक्षिणायन’च्या लढ्यातील ते एक प्रमुख शिलेदार होते. त्यांच्या जाण्याने केवळ मराठी साहित्याचीच नव्हे, तर सामाजिक-सांस्कृतिक क्षेत्राची मोठी हानी झाली आहे.

- प्रा. डॉ. प्रमोद मुनघाटे, मराठी विभागप्रमुख, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ

‘मागोवा’ गटातील महत्त्वाचे विचारक

- मराठी साहित्य विश्वाला भूषणावह ठरलेले प्रख्यात कादंबरीकार, प्रगतिशील, विवेकवादी, निर्भीड आणि वैज्ञानिक भूमिकेचे पुरस्कर्ते वैदर्भीय लेखक नंदा खरे यांच्या अकाली निधनाचे वृत्त अतिशय धक्कादायक आहे. मराठी लेखन विश्वावर त्यांच्या लेखनाच्या वेगळ्या शैलीची आणि जीवन जाणिवेची अमीट छाप उमटलेली आहे. पुरस्कार नाकारण्याचे धाडस आणि नम्रता त्यांच्यात होती. सुधीर बेडेकर स्थापित ‘मागोवा’ गटातील ते एक महत्त्वाचे विचारक होते. त्यांच्या निधनाने मराठीने एक शैली संपन्न आणि जीवनाला बांधील असा पुरोगामी, सहिष्णू, विवेकी विचारवंत देखील गमावला आहे.

- डॉ. श्रीपाद जोशी, माजी अध्यक्ष, मराठी साहित्य महामंडळ

काळाच्या पुढचा विचार करणारे लेखक

- नंदा खरे हे काळाच्या पुढचा विचार करणारे लेखक होते, हे त्यांच्या ‘उद्या’ या कादंबरीवरून स्पष्टच होते. विज्ञाननिष्ठ दृष्टिकोन ठेवून मानवी जीवनाकडे पाहणारे ते महत्त्वाचे लेखक होते. रचनेपासून ते आशयातले वेगळेपण त्यांच्या चिंतनातून लेखनात उतरले आहे. साहित्य अकादमी पुरस्कार नाकारणारे नंदा खरे हे मराठीतील पहिले व एकमेव लेखक आहेत. त्यांच्या जाण्याने मराठीला नवी दृष्टी देणारा तर्कसंगत कादंबरीकार गेला, ही दु:खद घटना आहे.

- डॉ. रवींद्र शोभणे, कार्याध्यक्ष, विदर्भ साहित्य संघ

...............

टॅग्स :Vidarbha Sahitya Sanghविदर्भ साहित्य संघ