शहरं
Join us  
Trending Stories
1
संपूर्ण यादीच आली, सर्वपक्षीय शिष्टमंडळाचे सदस्य ठरले, प्रत्येक टीममध्ये किती अन् कोण नेते?
2
पाकची नवी चाल! भारताच्या ‘डिप्लोमॅटिक स्ट्राइक’ला ‘शांतीदूता’ने उत्तर; जगाला सांगणार काय?
3
गिलख्रिस्टच्या IPL संघात विराटला स्थान नाही, Mumbai Indiansचे ५ जण, कर्णधार कोण?
4
आयडियाची कल्पना झाली फेल! बेपत्ता झालेला गुरुग्रामचा आयटी मॅनेजर पकडला गेला अन् समोर आलं खरं कारण
5
अटकेत पाकिस्तानी स्पाय? ज्योती मल्होत्राची कमाई किती? कोरोनात नोकरी गेली अन्... पाकिस्तानही फिरून आली...
6
Hyundai ने आखली मोठी योजना! भारतात लॉन्च करणार 20 पेट्रोल-डिझेल अन् 6 EV कार
7
तुम्हीही एकापेक्षा जास्त क्रेडिट कार्ड वापरता? मग फायद्यासोबत हे तोटे माहिती आहे का?
8
कोण आहे पाकिस्तानी अधिकारी, ज्याच्या जाळ्यात अडकली ज्योती?; भारताने देशाबाहेर काढले होते
9
"विराट कोहलीला क्रिकेटमधील योगदानासाठी 'भारतरत्न' द्या"; स्टार माजी क्रिकेटपटूने केली मागणी
10
हैदराबादमधील गुलजार हाऊसजवळ भीषण आग, ९ जणांचा होरपळून मृत्यू; अनेक जण गंभीर जखमी
11
Video: "असा धडा शिकवणार, की..."; सैन्यानं जारी केला 'ऑपरेशन सिंदूर'चा आणखी एक व्हिडिओ
12
केरळात मान्सून वाऱ्याच्या वेगाने दाखल होणारा, ढग भरभरून पाऊस देणार
13
करण जोहरच्या 'तख्त' सिनेमाचं पुढे काय झालं? पहिल्यांदाच प्रतिक्रिया देत म्हणाला, "तो सिनेमा..."
14
ज्योती मल्होत्रा पाकिस्तानी ISI अधिकाऱ्यासोबत बालीलाही गेलेली; वडील कारपेंटर, मुलीची लक्झरी लाईफ, नेमके करायची तरी काय...
15
टेरिफ वॉरची खुमखुमी अन् अमेरिकेचा तिळपापड! मूडीजने क्रेडिट रेटिंग घटविताच...
16
२५ लाख दे, नाहीतर मरून जा; पत्नीने दिली धमकी! शिक्षक पतीने उचलले दुर्दैवी पाऊल
17
सुसाइड नोटमध्ये मराठीत सही कशी?; डॉ. वळसंगकर आत्महत्या प्रकरणी वेगळाच संशय
18
"तेव्हा विराट कोहलीने मला लाथ मारली होती अन् म्हणाला होता..."; इशांत शर्माने सगळंच सांगून टाकलं
19
इस्रोचे १०१ वे मिशन अयशस्वी; तांत्रिक अडचणीमुळे रॉकेट तिसऱ्या टप्प्यावरच अडकले
20
भारत-पाकिस्तानमधील युद्धविरामाचा आज अखेरचा दिवस? पुढे काय होणार? भारतीय सेनेनं सांगूनच टाकलं!

उमेदवारांची नावे अजूनही गुलदस्त्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 5, 2021 04:06 IST

नागपूर : जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या पोटनिवडणुकीत आघाडी करून लढायचे की स्वबळावर, यासाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादीची गेल्या आठवड्याभरापासून ...

नागपूर : जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या पोटनिवडणुकीत आघाडी करून लढायचे की स्वबळावर, यासाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादीची गेल्या आठवड्याभरापासून सुरू असलेली कवायत रविवारी रात्रीपर्यंत थांबलेली नव्हती. भाजपाच्या तिकिटावर उमेदवारी अर्ज भरलेले ४ उमेदवार सोडल्यास, इतर १२ उमेदवारांची यादी त्यांनीही पाकीट बंद करून ठेवली. उमेदवारांची पळवापळवी होऊ नये व आघाडीचा फैसला रविवारी रात्रीपर्यंत सुटला नसल्याने उमेदवारी अर्ज भरायच्या अखेरच्या दिवसापर्यंत राजकीय पक्षांनी उमेदवारांची नावे गुलदस्त्यातच ठेवली.

जिल्हा परिषदेत काँग्रेस आपली सत्ता अबाधित ठेवण्यासाठी जोरकस प्रयत्न करीत आहे. कारण काँग्रेसच्या सर्वाधिक सात जागा रिक्त झाल्या आहेत. सातपैकी तीन किंवा चार जरी घसरल्या तरी काँग्रेसला सत्तेत राहणे अवघड होणार आहे. त्यामुळे राष्ट्रवादीच्या कुबड्यांचा आधार काँग्रेसला घ्यावा लागत आहे. २०१९ ला झालेल्या निवडणुकीत काँग्रेसने राष्ट्रवादीला सत्तेत अपेक्षित वाटा दिलेला नाही. त्यामुळे राष्ट्रवादीने ताणून धरण्याची भूमिका घेतली आहे. सूत्राच्या माहितीनुसार भाजपाकडे असलेल्या चार जागेपैकी राष्ट्रवादीने एका जागेसाठी आग्रही भूमिका घेतली आहे. तसेच निवडणुकीनंतर सत्तेतही समांतर वाटा मागितला आहे. सध्या राष्ट्रवादीला नावाचेच एक सभापतिपद आहे. पण ते पद राष्ट्रवादी आपले मानत नाही. त्यामुळे राष्ट्रवादीच्या या भूमिकेवर काँग्रेसमध्ये चांगलेच विचारमंथन सुरू आहे. त्यासाठी काँग्रेसला राष्ट्रवादीसोबत वारंवार बैठकाही घ्यावा लागत आहे. तसे तर काँग्रेसने जि.प.च्या १६ ही जागेसाठी इच्छुकांच्या मुलाखती घेतल्या आहेत. वाटाघाटी न जमल्यास काँग्रेस सर्वच जागेवर उमेदवार देण्याच्या मानसिकतेत आहे.

- रविवारी रात्रीपर्यंत चालल्या बैठकी

काँग्रेसने आघाडीसंदर्भात प्रदेशाकडे भूमिका मांडली. प्रदेशाने आघाडीसंदर्भात सकारात्मकताही दर्शविली. त्यामुळे राष्ट्रवादीशी दिवसभर बैठकी झाल्या. विद्यमान जागेवर दोन्ही पक्ष आपापले उमेदवार लढविणार आहेत. पण भाजपाकडे असलेल्या चार जागेवर उमेदवार देण्याबाबत रात्रीसुद्धा बैठकीचे सत्र सुरूच होते. दोन्ही पक्षाचे नेते उमेदवारांच्या यादीबद्दल काहीही स्पष्ट करू शकले नाही.

- सोमवारीच माहिती पडेल उमेदवार कोण?

भाजपाने आपले चार उमेदवार निश्चित करून त्यांचे उमेदवारी अर्जही दाखल केले आहेत. तर उर्वरित १२ उमेदवार सोमवारी दिसतील, असे त्यांच्या नेत्यांनी सांगितले. सोमवारी दुपारपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करायचा आहे. त्यामुळे काँग्रेस, राष्ट्रवादीच्या उमेदवारांची वेळेवरच घोषणा होईल, असे दिसत आहे.