शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेत मोठी घटना! दोन खासदारांवर घरात घुसून गोळीबार; महिला खासदार, पतीचा मृत्यू
2
नीट-यूजीचा निकाल जाहीर! राजस्थानचा महेश कुमार पहिला, तर महाराष्ट्राचा कृष्णांग जोशी तिसरा
3
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
4
दुबईतील ६७ मजली गगनचुंबी इमारतीला भीषण आग; ३,८२० रहिवाशांना बाहेर काढले
5
उल्हासनगरला पावसाने झोडापले, नाल्यावरील पूल कोसळला 
6
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
7
टेम्बा बावुमाच्या कॅप्टन्सीला तोड नाही; आतापर्यंत एक टेस्ट नाही हारला! ऑस्ट्रेलिया तोंड पाडून घरला
8
Ahmedabad Plane Crash : "माणुसकी दाखवा, माझी मुलगी रुग्णालयात..."; विमान अपघातानंतर डॉक्टरची हात जोडून विनंती
9
राज-उद्धव ठाकरे एकत्र आले तर महापालिका निवडणुकीत ५४ टक्के मते मिळतील; सर्व्हे आल्याचा शिवसेना नेत्याचा दावा
10
बलात्कार करणाऱ्याला महिलेने घडवली जन्माची अद्दल; विळ्याने नराधमाचे गुप्तांगच कापले
11
लंच ब्रेक झाला म्हणून २० वर्षीय तरुणी घरी गेली; बेडरुममध्ये तिचा बॉस... 
12
SA Won WTC Final 2025 : 'चोकर्स'चा शिक्का पुसला, द. आफ्रिकेने इतिहास रचला; ऑस्ट्रेलियाला हरवून २७ वर्षांनी जिंकली ICC ट्रॉफी! मार्करमचे धमाकेदार शतक
13
Israel Rran War: 'हल्ले थांबवा नाहीतर तेहरानला आग लावू'; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इराणच्या खोमेनींना इशारा
14
आत्महत्येबाबत इन्स्टावर तरूणाने टाकली पोस्ट; १२ मिनिटांत पोलिसांनी फासावरून खाली उतरवला
15
WTC 2025 Final Prize Money : चांदीची गदा अन् IPL चॅम्पियन्स RCB पेक्षा अधिक रक्कम; दक्षिण आफ्रिकेसह कोणत्या संघाला किती बक्षीस मिळालं?
16
रोज विमाने उडतात, पण या विमानातून आवाजच येत नव्हता...; व्हिडीओ काढणाऱ्या तरुणाच्या काकीला वाटले...
17
इराण-इस्रायल युद्ध लांबलं तर 'या' महत्वाच्या वस्तू महागणार! जाणून घ्या, या देशांकडून काय-काय आयात करतो भारत?
18
Air India Plane Crash: ज्या आगीत जिवंत माणसांची झाली राख, त्यात एकच मानवी अवयव वाचला
19
दिवसभर खुर्चीवर बसून वाढतंय वजन? ३०-३०-३० नियमाची जादू, लठ्ठपणाला कराल बाय-बाय
20
अ‍ॅमेझॉनवर १६ जूनला अवघ्या १६ रुपयांना स्मार्टवॉच वाटली जाणार; कुपन कोड अन् वेळ लक्षात ठेवा...

नागपुरात वाहतूक कोंडीने घेतली बारावीच्या विद्यार्थ्यांची पूर्व परीक्षा !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 22, 2018 09:54 IST

राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे आयोजित बारावीच्या परीक्षेला बुधवारपासून सुरुवात झाली. उपराजधानीत सुरू असलेल्या विविध विकासकामांचा फटका विद्यार्थ्यांना बसला व अनेकांना वाहतूककोंडीचा सामना करावा लागला.

ठळक मुद्दे परीक्षेच्या पहिल्या दिवशीच फुटला घाम

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे आयोजित बारावीच्या परीक्षेला बुधवारपासून सुरुवात झाली. उपराजधानीत सुरू असलेल्या विविध विकासकामांचा फटका विद्यार्थ्यांना बसला व अनेकांना वाहतूककोंडीचा सामना करावा लागला. शिवाय सकाळी बसेसदेखील बंद असल्यामुळे परीक्षा केंद्रावर जाण्याअगोदरच अनेकांची दुहेरी परीक्षाच झाली. दरम्यान, विभागामध्ये काही तुरळक प्रकार वगळता परीक्षेचा पहिला दिवस शांततेतच पार पडला. नागपूर विभागातून या वर्षी सहा जिल्ह्यांतून एकूण १ लाख ७२ हजार ४११ परीक्षार्थ्यांनी यंदा परीक्षेसाठी नोंदणी केली आहे. विभागातील भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली, वर्धा, नागपूर जिल्ह्यांतील एकूण ४५२ केंद्रांवर परीक्षा होत आहे. उपराजधानीत सुरू असलेल्या विकासकामांमुळे होणारी वाहतूक कोंडी लक्षात घेता अनेक विद्यार्थी पालकांसोबत तासभर अगोदरपासूनच परीक्षा केंद्रावर पोहोचले होते. तर आपली बसचा संप असल्याचे वृत्त सकाळीच वाचल्यामुळे अनेक जण मिळेल त्या साधनांनी परीक्षा केंद्रावर पोहोचले. त्यामुळे आॅटोचालकांना मनमानी शुल्क देऊन विद्यार्थ्यांनी परीक्षा केंद्र गाठले. तर अनेकांना रस्त्यावरील व्यक्तींनी काही दूरपर्यंत सोडून दिल्याचेही केंद्रावरील विद्यार्थ्यांनी सांगितले. 

परीक्षा केंद्रांसमोर कोंडीदरम्यान १० वाजतापासूनच परीक्षा केंद्रांजवळील रस्त्यांवर वाहतुकीची कोंडी दिसून येत होती. त्यामुळे काही विद्यार्थ्यांना नियोजित वेळेपेक्षा केंद्रावर पोहचण्यात उशीर झाला. काही बेशिस्त पालकांनी परीक्षा केंद्रांसमोर अस्ताव्यस्तपणे चारचाकी वाहने लावली. मंडळातर्फे दुचाकी वाहनांनी येण्याचे आवाहन करण्यात आले होते हे विशेष. शिवाजी विज्ञान महाविद्यालयासमोर तर बराच वेळ वाहतुकीची कोंडी होती.

विभागात ‘कॉपीमुक्त’ मोहिमेचा प्रभावपरीक्षेत गैरप्रकार होऊ नयेत यासाठी नियुक्त करण्यात आलेल्या भरारी पथकांनी पहिल्याच दिवशी संपूर्ण विभागात १० कॉपीबहाद्दरांना पकडले. यात गोंदिया (१), भंडारा (१), गडचिरोली (४) व चंद्रपूर (४) या जिल्ह्यांतील विद्यार्थ्यांचा समावेश होता. विशेष म्हणजे नागपूर जिल्ह्यात एकही कॉपीबहाद्दर सापडला नाही. मंडळातर्फे राबविण्यात येणाऱ्या ‘कॉपीमुक्त’ मोहिमेचा हा प्रभाव असल्याचे मत व्यक्त करण्यात येत होते.

विद्यार्थ्यांसाठी सुरुवात ‘झक्कास’घरातून परीक्षा केंद्राकडे निघताना हृदयाची स्पंदने वाढलेली होती, परीक्षा केंद्रावर पोहोचल्यावर सातत्याने घसा कोरडा पडत होता, वेळेवर केलेला अभ्यास आठवेल की नाही ही भीती होती. परंतु हातात प्रश्नपत्रिका आली आणि ‘टेन्शन’ कुठल्याकुठे पळाले अन् परीक्षेची सुुरुवात ‘झक्कास’ झाली! इंग्रजीचा पहिलाच पेपर देऊन बाहेर निघालेल्या बहुतांश विद्यार्थ्यांनी अशाच प्रकारची प्रतिक्रिया व्यक्त केली.

पालकांची चलबिचलएकीकडे विद्यार्थी परीक्षाकेंद्राच्या आत पेपर सोडवित असताना त्यांना सोडण्यास आलेल्या अनेक पालकांनी पूर्ण वेळ केंद्राबाहेरच उभे राहून प्रतीक्षा केली. मुलांच्या परीक्षेचा तणाव पालकांवरच जास्त जाणवून येत होता. त्यांच्या मनातील चलबिचल स्पष्टपणे दिसून येत होती. काही पालकांनी तर मुलांच्या परीक्षेसाठी कार्यालयातून रजाच घेतली आहे. पेपर सुटल्यानंतर पाल्यांची विचारपूस केल्यानंतर पालकांचा तणाव दूर झाला.

टॅग्स :examपरीक्षा