शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकमत इम्पॅक्ट: गणेश मंडळांना मोठा दिलासा, मंडपासाठीच्या खड्ड्यांचा दंड १५ हजारावरुन २ हजारावर  
2
व्हॉट्सअपवरील विनाकामाचे फोटो अन् व्हिडिओंनी भरला फोन, ही ट्रिक वापरून पहा; गॅलरी रिकामी राहील
3
"भगवा दहशतवाद म्हणणाऱ्यांनी हिंदूंची जाहीर माफी मागावी’’, एकनाथ शिंदेंची काँग्रेसवर टीका   
4
'एक दिवस पाकिस्तान भारताला तेल विकेल'; अमेरिकेचा पाकिस्तानसोबत करार, डोनाल्ड ट्रम्प काय म्हणाले?
5
"काँग्रेसने संपूर्ण हिंदू समाजाची माफी मागावी..."; मालेगाव निकालावर CM फडणवीसांचं रोखठोक मत
6
हवेतच हेलकावे खाऊ लागले विमान, प्रवाशांचे प्राण संकटात, कर्मचाऱ्यांचा उडाला थरकाप, अखेर...
7
रतन टाटांच्या काळात जे घडलं नाही, ते आता घडणार; 'हा' मोठा ग्रुप टाटा सन्स सोडणार?
8
एक नंबर! गोड खाऊनही कमी करता येतं वजन; फक्त माहीत असायला हवी योग्य वेळ अन् पद्धत
9
बाईकचा चेसिस नंबर सापडलाच नाही! प्रज्ञा सिंह ठाकूर मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणातून कशा सुटल्या?
10
Gold Silver Price 31 July 2025: सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण, १० ग्रॅमसाठी किती खर्च करावे लागणार; पाहा नवे दर
11
Shravan Shukravar 2025: श्रावणातल्या कोणत्याही एका शुक्रवारी भरा देवीची ओटी आणि 'असा' मागा जोगवा!
12
मला माझे ९०० रुपये परत हवेत; मालेगाव बॉम्बस्फोटात निर्दोष सुटलेल्या समीर कुलकर्णींची मागणी 
13
मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरण निकाल: सर्व सात आरोपींची निर्दोष मुक्तता, कुणावर होते काय आरोप?
14
Upcoming Smartphones: विवो, रेडमीपासून ते गूगल पिक्सेलपर्यंत; ऑगस्टमध्ये पडणार स्मार्टफोनचा पाऊस!
15
पाकिस्तानी बॉर्डरजवळ विखुरलेल्या बांगड्यांचं सत्य काय?; भारताने शोधून काढलं दडलेलं रहस्य
16
मालेगाव बॉम्बस्फोटाच्या निर्णयावर ओवेसी नाराज, मोदी सरकारवर केले गंभीर आरोप...
17
शिक्षण महागलं! "ABCD शिकवण्याचे २.५ लाख द्यायचे?"; लेकीची नर्सरीची फी पाहून आई शॉक
18
सावधान! AI मुळे 'या' नोकऱ्या धोक्यात? मायक्रोसॉफ्टच्या अभ्यासात धक्कादायक खुलासा, तुमची नोकरी सुरक्षित आहे का?
19
ट्रम्प यांचा भारतावरील टॅरिफ बॉम्ब अमेरिकन लोकांवरच उलटणार? औषधांच्या किंमती वाढण्याचा धोका
20
"राजकीय बदनामीच्या षड्यंत्राचा पर्दाफाश, काँग्रेसने हिंदूंची माफी मागावी", भाजपाचा हल्लाबोल

नागपुरात वाहतूक कोंडीने घेतली बारावीच्या विद्यार्थ्यांची पूर्व परीक्षा !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 22, 2018 09:54 IST

राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे आयोजित बारावीच्या परीक्षेला बुधवारपासून सुरुवात झाली. उपराजधानीत सुरू असलेल्या विविध विकासकामांचा फटका विद्यार्थ्यांना बसला व अनेकांना वाहतूककोंडीचा सामना करावा लागला.

ठळक मुद्दे परीक्षेच्या पहिल्या दिवशीच फुटला घाम

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे आयोजित बारावीच्या परीक्षेला बुधवारपासून सुरुवात झाली. उपराजधानीत सुरू असलेल्या विविध विकासकामांचा फटका विद्यार्थ्यांना बसला व अनेकांना वाहतूककोंडीचा सामना करावा लागला. शिवाय सकाळी बसेसदेखील बंद असल्यामुळे परीक्षा केंद्रावर जाण्याअगोदरच अनेकांची दुहेरी परीक्षाच झाली. दरम्यान, विभागामध्ये काही तुरळक प्रकार वगळता परीक्षेचा पहिला दिवस शांततेतच पार पडला. नागपूर विभागातून या वर्षी सहा जिल्ह्यांतून एकूण १ लाख ७२ हजार ४११ परीक्षार्थ्यांनी यंदा परीक्षेसाठी नोंदणी केली आहे. विभागातील भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली, वर्धा, नागपूर जिल्ह्यांतील एकूण ४५२ केंद्रांवर परीक्षा होत आहे. उपराजधानीत सुरू असलेल्या विकासकामांमुळे होणारी वाहतूक कोंडी लक्षात घेता अनेक विद्यार्थी पालकांसोबत तासभर अगोदरपासूनच परीक्षा केंद्रावर पोहोचले होते. तर आपली बसचा संप असल्याचे वृत्त सकाळीच वाचल्यामुळे अनेक जण मिळेल त्या साधनांनी परीक्षा केंद्रावर पोहोचले. त्यामुळे आॅटोचालकांना मनमानी शुल्क देऊन विद्यार्थ्यांनी परीक्षा केंद्र गाठले. तर अनेकांना रस्त्यावरील व्यक्तींनी काही दूरपर्यंत सोडून दिल्याचेही केंद्रावरील विद्यार्थ्यांनी सांगितले. 

परीक्षा केंद्रांसमोर कोंडीदरम्यान १० वाजतापासूनच परीक्षा केंद्रांजवळील रस्त्यांवर वाहतुकीची कोंडी दिसून येत होती. त्यामुळे काही विद्यार्थ्यांना नियोजित वेळेपेक्षा केंद्रावर पोहचण्यात उशीर झाला. काही बेशिस्त पालकांनी परीक्षा केंद्रांसमोर अस्ताव्यस्तपणे चारचाकी वाहने लावली. मंडळातर्फे दुचाकी वाहनांनी येण्याचे आवाहन करण्यात आले होते हे विशेष. शिवाजी विज्ञान महाविद्यालयासमोर तर बराच वेळ वाहतुकीची कोंडी होती.

विभागात ‘कॉपीमुक्त’ मोहिमेचा प्रभावपरीक्षेत गैरप्रकार होऊ नयेत यासाठी नियुक्त करण्यात आलेल्या भरारी पथकांनी पहिल्याच दिवशी संपूर्ण विभागात १० कॉपीबहाद्दरांना पकडले. यात गोंदिया (१), भंडारा (१), गडचिरोली (४) व चंद्रपूर (४) या जिल्ह्यांतील विद्यार्थ्यांचा समावेश होता. विशेष म्हणजे नागपूर जिल्ह्यात एकही कॉपीबहाद्दर सापडला नाही. मंडळातर्फे राबविण्यात येणाऱ्या ‘कॉपीमुक्त’ मोहिमेचा हा प्रभाव असल्याचे मत व्यक्त करण्यात येत होते.

विद्यार्थ्यांसाठी सुरुवात ‘झक्कास’घरातून परीक्षा केंद्राकडे निघताना हृदयाची स्पंदने वाढलेली होती, परीक्षा केंद्रावर पोहोचल्यावर सातत्याने घसा कोरडा पडत होता, वेळेवर केलेला अभ्यास आठवेल की नाही ही भीती होती. परंतु हातात प्रश्नपत्रिका आली आणि ‘टेन्शन’ कुठल्याकुठे पळाले अन् परीक्षेची सुुरुवात ‘झक्कास’ झाली! इंग्रजीचा पहिलाच पेपर देऊन बाहेर निघालेल्या बहुतांश विद्यार्थ्यांनी अशाच प्रकारची प्रतिक्रिया व्यक्त केली.

पालकांची चलबिचलएकीकडे विद्यार्थी परीक्षाकेंद्राच्या आत पेपर सोडवित असताना त्यांना सोडण्यास आलेल्या अनेक पालकांनी पूर्ण वेळ केंद्राबाहेरच उभे राहून प्रतीक्षा केली. मुलांच्या परीक्षेचा तणाव पालकांवरच जास्त जाणवून येत होता. त्यांच्या मनातील चलबिचल स्पष्टपणे दिसून येत होती. काही पालकांनी तर मुलांच्या परीक्षेसाठी कार्यालयातून रजाच घेतली आहे. पेपर सुटल्यानंतर पाल्यांची विचारपूस केल्यानंतर पालकांचा तणाव दूर झाला.

टॅग्स :examपरीक्षा