शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठीवरून मविआत फूट? काँग्रेसला बोलावले नाही, आता ठाकरेंच्या मेळाव्याला शरद पवार जाणार नाहीत
2
ENG vs IND : कमबॅकसाठी टीम इंडियानं उभारला धावांचा डोंगर; पहिल्या डावात फक्त एकाच गोष्टीची खंत!
3
जे कधी नाही जमलं ते टीम इंडियानं करून दाखवलं; जड्डू अन् वॉशिंग्टनसह गिलनं उचलला सिंहाचा वाटा
4
शुबमन धमाका...; इंग्लंडमध्ये द्विशतक ठोकत केली विराटची बरोबरी; 'हे' मोठे विक्रम करत रचला इतिहास!
5
Shubman Gill Double Century : शुबमन गिलचं विक्रमी 'द्विशतक'; अशी कामगिरी करणारा पहिला भारतीय कॅप्टन
6
मोहम्मद शमी दरमहा देणार ४ लाखांची पोटगी; निर्णयावर Ex पत्नी हसीन जहाँ म्हणते- कायद्याचं राज्य आहे..!!
7
"हे दोघे एकत्र येणे म्हणजे, मराठी...; फक्त स्वार्थासाठी एकत्र येताहेत!" नारायण राणे यांचा एकाच वेळी दोन्ही ठाकरेंवर हल्लाबोल
8
Viral Video : पावसात पळत जाऊन दोरीवरचे कपडे काढण्याची गरजच नाही! 'हा' जुगाड सोशल मीडियावर व्हायरल
9
WTC मध्ये २००० धावांसह १०० पेक्षा अधिक विकेट्स! जडेजाच्या नावे झाला वर्ल्ड रेकॉर्ड
10
“शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी करावी, त्यासाठी समिती नको”; विजय वडेट्टीवारांची सरकारकडे मागणी
11
थायलंडच्या निलंबित पंतप्रधान शिनावात्रा यांनी सत्ता वाचवण्यासाठी खेळला नवा 'डाव', नेमकं काय केलं?
12
डोक्यावर पदर घेतला नाही म्हणून पती चिडला, पत्नीचा राग लेकराला आपटून काढला! चिमुकल्याचा मृत्यू
13
"तो वाद मराठी-अमराठी नव्हता"; ठाण्यात शिवसैनिकाला झालेल्या मारहाणीवर आदित्य ठाकरेंचे स्पष्टीकरण
14
Smriti Irani : "मुलगा झाला नाही म्हणून आईला सोडावं लागलं घर"; स्मृती इराणींनी सांगितला 'तो' वाईट प्रसंग
15
त्रिभाषा समितीचे अध्यक्ष नरेंद्र जाधव यांनी स्पष्ट केली भूमिका; राज ठाकरेंबद्दल म्हणाले...
16
जगातील या 5 देशांमध्ये राहतात सर्वाधिक हिंदू! टॉप टेनमध्ये 3 मुस्लीम देशांचाही समावेश, चकित करणारी आहे आकडेवारी
17
दिशा सालियान प्रकरणी आदित्य ठाकरे स्पष्टच बोलले; म्हणाले, “गेल्या ५ वर्षांत ठराविक लोक...”
18
“धारावी पुनर्विकास की देवनार डम्पिंग डील? २,३६८ कोटींचा ‘कचरा प्रकल्प’ कोणाच्या फायद्याचा?”
19
लुटेरी दुल्हन! नवऱ्याला भाऊ बनवलं अन् दुसरं लग्न केलं; रोख रक्कम, दागिने घेऊन झाली पसार
20
एकाच ताटात किती जण जेवतात? शिवभोजन थाळी लाभार्थ्यांचा हा व्हिडीओ बघितला का?

नागपूर आरटीओ कार्यालयांचे उत्पन्न घटले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 20, 2019 10:39 IST

मागील आर्थिक वर्षात महसूल वसुलीचे उद्दिष्ट १०० टक्के पूर्ण करण्यास राज्यातील ४६ आरटीओ कार्यालयांच्या वायू पथकाला अपयश आले आहे.

ठळक मुद्देवायू पथकांची ६६ टक्केच उद्दिष्टपूर्ती केवळ दोनच पथकाचे यश

सुमेध वाघमारे ।लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : मागील आर्थिक वर्षात महसूल वसुलीचे उद्दिष्ट १०० टक्के पूर्ण करण्यास राज्यातील ४६ आरटीओ कार्यालयांच्या वायू पथकाला अपयश आले आहे. केवळ दोनच आरटीओ कार्यालयाच्या पथकाला आपले लक्ष्य पूर्ण करता आले. विशेष म्हणजे संपूर्ण कार्यालये मिळून वायू पथकाला महसूल वसुलीचे ५००८६.३९ लाखांचे लक्ष्य देण्यात आले होते. परंतु पथकाला ६६ टक्के म्हणजे ३३१२७.१३ लाख महसूल गोळा करण्यात यश आले. वायू पथकांच्या अपयशामुळे कार्यालयांचे उत्पन्न घटले आहे.आरटीओ कार्यालयांमध्ये सोर्इंचा अभाव व मनुष्यबळाची कमतरता आहे. मात्र त्याकडे डोळेझाक करत राज्याकडून महसुलाचे लक्ष्य न विसरता वाढवून दिले जाते. नुकतेच सरलेले आर्थिक वर्षदेखील त्याला अपवाद नव्हते. विशेष म्हणजे, वायुवेग पथकाचा आधुनिकीकरणाचा अभाव, हे या मागील एक कारण असल्याचे, या क्षेत्रातील तज्ज्ञांचे मत आहे. त्यांच्यानुसार शासनाने वायू पथकाला आवश्यक त्या प्रमाणात वाहने उपलब्ध करून दिली नाहीत. यातच शासनाने मालवाहू वाहनाची भार क्षमता वाढविण्याचा निर्णय घेतला. यामुळे ‘ओव्हरलोड’ वाहने ‘अंडरलोड’ झाली. दोन टनापासून १० टनापर्यंत त्यांची क्षमता वाढली. यामुळे येथून मिळणारा महसूल कमी झाला. सीमा तपासणी नाक्यावर ‘स्टॅण्डर्ड आॅपरेटिंग सिस्टम’ला (एसओपी) सुरुवात झाली. या प्रणालीअंतर्गत १०० टक्के वाहने तपासू नका, असे आदेश आले. या सर्वांचा परिणाम वायू पथकाना उद्दिष्ट पूर्ण करण्यावर झाला. यामुळे राज्यातील ४६ आरटीओ कार्यालयातील वायू पथकाला आपले लक्ष्यच गाठता आले नाही. केवळ पिंपरी चिचवड आरटीओ कार्यालयाच्या पथकाला १०८ टक्के तर अहमदनगर आरटीओ कार्यालयाच्या पथकाला १४३ टक्के उद्दिष्ट पूर्ण करता आले.पाच कार्यालयांचे वायू पथक ५० टक्क्यांपर्यंतही पोहचले नाहीराज्यातील मुंबई सेंटर आरटीओ कार्यालयाच्या पथकाला ३६ टक्के, कोल्हापूर आरटीओ कार्यालयाच्या पथकाला ४० टक्के, सातारा आरटीओ कार्यालयाच्या पथकाला ४९ टक्के, धुळे आरटीओ कार्यालयाच्या पथकाला ३० टक्के तर हिंगोली आरटीओ कार्यालयाच्या पथकाला ४५ टक्के उद्दिष्ट पूर्ण करता आले. या पाच कार्यालयांच्या वायू पथकाला ५० टक्के लक्ष्यही पूर्ण करता आले नाही.विदर्भातील कार्यालयांच्या पथकांनी गाठली सत्तरीविदर्भातील अमरावती कार्यालयाच्या पथकाने ७३ टक्के, बुलडाणा कार्यालयाच्या पथकाने ८३ टक्के, यवतमाळ कार्यालयाच्या पथकाने ६५ टक्के, अकोला कार्यालयाच्या पथकाने सर्वाधिक म्हणजे ९६ टक्के, वाशीम कार्यालयाच्या पथकाने ७४ टक्के, नागपूर शहर कार्यालयाच्या पथकाने ७६ टक्के, वर्धा कार्यालयाच्या पथकाने ७५ टक्के, नागपूर ग्रामीण कार्यालयाच्या पथकाने ७१ टक्के, गडचिरोली कार्यालयाच्या पथकाने ५९ टक्के, चंद्रपूर कार्यालयाच्या पथकाने ७५ टक्के, गोंदिया कार्यालयाच्या पथकाने ८५ टक्के तर भंडारा कार्यालयाच्या पथकाने ७३ टक्के लक्ष्य गाठले. विशेष म्हणजे, दोन वर्षांपूर्वी यातील बहुसंख्य आरटीओ कार्यालयांच्या पथकाने १०० टक्क्यांवर महसूल गोळा केला होता.

टॅग्स :Rto officeआरटीओ ऑफीस