शहरं
Join us  
Trending Stories
1
बेस्ट पतपेढी कोणाच्या ताब्यात? आज मतदान, उद्या फैसला! ठाकरे बंधूंच्या युतीची पहिली कसोटी
2
बेस्ट पतपेढीच्या निवडणुकीआधी मतदारांच्या घरी पोहोचले पैसे; महायुतीच्या पॅनलवर मनसेचा गंभीर आरोप
3
लंडनमध्ये आज ‘लोकमत ग्लोबल इकॉनॉमिक कन्व्हेन्शन’! भारतीय अर्थव्यवस्थेच्या लक्ष्यावर मंथन
4
Stock Market Today: शेअर बाजारात तुफान तेजी, ७१८ अंकांच्या तेजीसह बाजार उघडला; Midcap आणि बँकिंग शेअर्समध्ये खरेदी
5
पुन्हा निळ्या ड्रमाची दहशत, ड्रममध्ये सापडला तरुणाचा मृतदेह, पत्नी आणि तीन मुले बेपत्ता  
6
PF मधून १, २ की ३, किती वेळा काढू शकता पैसे? सतत काढण्यापूर्वी पाहा हा महत्त्वाचा नियम
7
‘कबुतर आ आ...’ कधी करावे? दाणे टाकण्यासंदर्भात पालिकेने मागवल्या सूचना; ई-मेल आयडीही दिला
8
मुंबईत इमारतीचा भाग कोसळला, तिघे जखमी; मुसळधार पावसात बचावकार्य सुरु
9
दहीहंडीच्या दिवशी वाहतूक पोलिसांनी फोडली कोट्यवधीच्या ‘दंडाची हंडी’; मुंबईत नियमांचे उल्लंघन
10
आपल्या आई, बहिणीचे मतदानावेळचे CCTV फुटेज द्यावे का? राहुल गांधींच्या मागणीवर आयोगाचा सवाल
11
दहीहंडी दुर्घटनेतील महेशच्या कुटुंबाला ५ लाखांचा धनादेश; दहिसर येथे घडला होता दुर्दैवी प्रकार
12
जे भारतात तयार होते तेच खरेदी करा; दिवाळीत ‘डबल बोनस’ मिळणार आहे : पंतप्रधान मोदी
13
फक्त महिला रडत होती म्हणून हुंड्यासाठी छळाचा गुन्हा होत नाही- दिल्ली उच्च न्यायालय
14
लेख: कुठे नाचताय जनाब मुनीर, शुद्धीवर तरी आहात का? चेष्टामस्करीलाही काही मर्यादा असते!
15
पुन्हा निसर्ग कोपला, ढगफुटीने हाहाकार! जम्मू-काश्मिरातील कठुआमध्ये ७ मृत्युमुखी; अनेक जखमी
16
आजचा अग्रलेख: भारताच्या प्रवासाचा ‘रोडमॅप’! विक्रमांपेक्षाही भाषणाचा आशय अधिक महत्त्वाचा
17
वर्गात मुलांनी सरळ रांगेत बसावे की ‘यू’ आकारात? शिक्षकापेक्षा मुले एकमेकांकडून जास्त शिकतात!
18
निवडणूक आयोग भाजपशी हातमिळवणी करून करतोय मतांची चोरी: राहुल गांधींचा आरोप
19
बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्या-नाले तुडुंब; जीप वाहून सहा जण अडकल्याची भीषण घटना
20
चिनी बदकांमुळे ‘शटलकॉक’ महाग! लोकांच्या खानपानाच्या सवयी बदलल्या अन् परिणाम किमतींवर झाला...

नागपूर आरटीओ कार्यालयांचे उत्पन्न घटले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 20, 2019 10:39 IST

मागील आर्थिक वर्षात महसूल वसुलीचे उद्दिष्ट १०० टक्के पूर्ण करण्यास राज्यातील ४६ आरटीओ कार्यालयांच्या वायू पथकाला अपयश आले आहे.

ठळक मुद्देवायू पथकांची ६६ टक्केच उद्दिष्टपूर्ती केवळ दोनच पथकाचे यश

सुमेध वाघमारे ।लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : मागील आर्थिक वर्षात महसूल वसुलीचे उद्दिष्ट १०० टक्के पूर्ण करण्यास राज्यातील ४६ आरटीओ कार्यालयांच्या वायू पथकाला अपयश आले आहे. केवळ दोनच आरटीओ कार्यालयाच्या पथकाला आपले लक्ष्य पूर्ण करता आले. विशेष म्हणजे संपूर्ण कार्यालये मिळून वायू पथकाला महसूल वसुलीचे ५००८६.३९ लाखांचे लक्ष्य देण्यात आले होते. परंतु पथकाला ६६ टक्के म्हणजे ३३१२७.१३ लाख महसूल गोळा करण्यात यश आले. वायू पथकांच्या अपयशामुळे कार्यालयांचे उत्पन्न घटले आहे.आरटीओ कार्यालयांमध्ये सोर्इंचा अभाव व मनुष्यबळाची कमतरता आहे. मात्र त्याकडे डोळेझाक करत राज्याकडून महसुलाचे लक्ष्य न विसरता वाढवून दिले जाते. नुकतेच सरलेले आर्थिक वर्षदेखील त्याला अपवाद नव्हते. विशेष म्हणजे, वायुवेग पथकाचा आधुनिकीकरणाचा अभाव, हे या मागील एक कारण असल्याचे, या क्षेत्रातील तज्ज्ञांचे मत आहे. त्यांच्यानुसार शासनाने वायू पथकाला आवश्यक त्या प्रमाणात वाहने उपलब्ध करून दिली नाहीत. यातच शासनाने मालवाहू वाहनाची भार क्षमता वाढविण्याचा निर्णय घेतला. यामुळे ‘ओव्हरलोड’ वाहने ‘अंडरलोड’ झाली. दोन टनापासून १० टनापर्यंत त्यांची क्षमता वाढली. यामुळे येथून मिळणारा महसूल कमी झाला. सीमा तपासणी नाक्यावर ‘स्टॅण्डर्ड आॅपरेटिंग सिस्टम’ला (एसओपी) सुरुवात झाली. या प्रणालीअंतर्गत १०० टक्के वाहने तपासू नका, असे आदेश आले. या सर्वांचा परिणाम वायू पथकाना उद्दिष्ट पूर्ण करण्यावर झाला. यामुळे राज्यातील ४६ आरटीओ कार्यालयातील वायू पथकाला आपले लक्ष्यच गाठता आले नाही. केवळ पिंपरी चिचवड आरटीओ कार्यालयाच्या पथकाला १०८ टक्के तर अहमदनगर आरटीओ कार्यालयाच्या पथकाला १४३ टक्के उद्दिष्ट पूर्ण करता आले.पाच कार्यालयांचे वायू पथक ५० टक्क्यांपर्यंतही पोहचले नाहीराज्यातील मुंबई सेंटर आरटीओ कार्यालयाच्या पथकाला ३६ टक्के, कोल्हापूर आरटीओ कार्यालयाच्या पथकाला ४० टक्के, सातारा आरटीओ कार्यालयाच्या पथकाला ४९ टक्के, धुळे आरटीओ कार्यालयाच्या पथकाला ३० टक्के तर हिंगोली आरटीओ कार्यालयाच्या पथकाला ४५ टक्के उद्दिष्ट पूर्ण करता आले. या पाच कार्यालयांच्या वायू पथकाला ५० टक्के लक्ष्यही पूर्ण करता आले नाही.विदर्भातील कार्यालयांच्या पथकांनी गाठली सत्तरीविदर्भातील अमरावती कार्यालयाच्या पथकाने ७३ टक्के, बुलडाणा कार्यालयाच्या पथकाने ८३ टक्के, यवतमाळ कार्यालयाच्या पथकाने ६५ टक्के, अकोला कार्यालयाच्या पथकाने सर्वाधिक म्हणजे ९६ टक्के, वाशीम कार्यालयाच्या पथकाने ७४ टक्के, नागपूर शहर कार्यालयाच्या पथकाने ७६ टक्के, वर्धा कार्यालयाच्या पथकाने ७५ टक्के, नागपूर ग्रामीण कार्यालयाच्या पथकाने ७१ टक्के, गडचिरोली कार्यालयाच्या पथकाने ५९ टक्के, चंद्रपूर कार्यालयाच्या पथकाने ७५ टक्के, गोंदिया कार्यालयाच्या पथकाने ८५ टक्के तर भंडारा कार्यालयाच्या पथकाने ७३ टक्के लक्ष्य गाठले. विशेष म्हणजे, दोन वर्षांपूर्वी यातील बहुसंख्य आरटीओ कार्यालयांच्या पथकाने १०० टक्क्यांवर महसूल गोळा केला होता.

टॅग्स :Rto officeआरटीओ ऑफीस