शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
4
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
5
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
6
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
7
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
8
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
9
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
10
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
11
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
12
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
13
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
14
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
15
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
16
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
17
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
18
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
19
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
20
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
Daily Top 2Weekly Top 5

नागपूरचे प्रदूषण अनेक वर्षांच्या नीचांकीवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 15, 2020 00:42 IST

देशातील १०२ सर्वाधिक प्रदूषित शहरामध्ये राज्याच्या १०-१२ शहरात नागपूरचाही क्रमांक लागतो. या प्रदूषणाचे सर्वात मोठे कारण म्हणजे पार्टीकुलेट मॅटर म्हणजे धुलिकण होय. मात्र लॉकडाऊनच्या काळात याचे प्रमाण विक्रमी घटले असून एकूणच प्रदूषण अनेक वर्षांच्या नीचांकावर पोहचले आहे.

ठळक मुद्देधूलिकणांचे प्रमाण विक्रमी घटले : व्हीएनआयटीचा अभ्यास

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : देशातील १०२ सर्वाधिक प्रदूषित शहरामध्ये राज्याच्या १०-१२ शहरात नागपूरचाही क्रमांक लागतो. या प्रदूषणाचे सर्वात मोठे कारण म्हणजे पार्टीकुलेट मॅटर म्हणजे धुलिकण होय. मात्र लॉकडाऊनच्या काळात याचे प्रमाण विक्रमी घटले असून एकूणच प्रदूषण अनेक वर्षांच्या नीचांकावर पोहचले आहे.महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि राष्ट्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळ यांच्या निर्देशानुसार विश्वेश्वरय्या राष्ट्रीय तंत्रज्ञान संस्था (व्हीएनआयटी) द्वारे गेल्या अनेक वर्षांपासून शहरातील हवेच्या गुणवत्तेचे परीक्षण केले जात आहे. व्हीएनआयटीने लॉकडाऊनच्या काळात एप्रिल महिन्यात शहरातील चार स्थानावरून प्रदूषणाचे परीक्षण केले आहे. यात प्रामुख्याने धूलिकण (पीएम-१०) तसेच सल्फर डायऑक्साईड (एसओ2), नायट्रोजन डायऑक्साईड (एनओ2) यांच्या प्रदूषणाचा अभ्यास केला आहे. अभ्यास केलेल्या चार ठिकाणांमध्ये एमपीसीबीचे सिव्हील लाईन्स येथील कार्यालय, इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिआर्स उत्तर अंबाझरी मार्ग, एमआयडीसी हिंगणा रोड आणि शासकीय पॉलिटेक्निक कॉलेज सदर यांचा समावेश आहे.व्हीएनआयटीच्या २०१० पासूनच्या अभ्यासानुसार एसओ2 व एनओ2 चे प्रमाण कधीही प्रदूषण मर्यादेच्या बाहेर गेले नाही. शिवाय सिव्हील लाईन्समध्ये धुलिकणांचे प्रमाणही मर्यादेबाहेर गेले नाही. १०० मायक्रोग्रॅम ही सर्वोच्च मर्यादा आहे आणि ६० मायक्रोग्रॅम (म्युग्रॅ)हे आदर्श प्रमाण. मात्र तिन्ही ठिकाणी याचे प्रमाण २०१० पासून एप्रिल महिन्यात कायम मर्यादेच्या बाहेर गेले आहे. २०१५ मध्ये धुलिकणांचे प्रमाण सदर व सीताबर्डी येथे १४० म्युग्रॅ तर एमआयडीसी येथे १८० म्युग्रॅम पर्यंत वाढले होते. इतर वर्षी ते १०० च्या आसपास राहिले आहे. मात्र यावेळी हेच प्रमाण ६० ते ६५ म्युग्रॅम पर्यंत खाली घसरले आहे. ४० ते ६० वर राहणाऱ्या एसओ2 व १० ते २० दरम्यान राहणाऱ्या एनओ2 ने ८० म्युग्रॅमची मर्यादा कधी ओलांडली नाही.मोठ्या प्रमाणात चालणारे उद्योग, बांधकाम कार्य, कचरा जाळणे आणि काही प्रमाणात वाहनांमुळे धुलिकणांचे प्रदूषण अधिक असते. लॉकडाऊन काळात उद्योग व बांधकाम बंद आहेत व कचरा जाळणे दिसून येत नाही. त्यामुळे प्रदूषण मोठ्या प्रमाणात घटल्याचे दिसून येत आहे. यामुळे पुढचे अनेक वर्षे याचा फायदा होणार आहे.- डॉ. दिलीप लटाये, सिव्हील इंजिनिरिंग विभाग, व्हीएनआयटी

टॅग्स :pollutionप्रदूषणenvironmentपर्यावरणnagpurनागपूर