शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीयांनी घाम गाळून ज्या वस्तू बनवल्या, त्याच तुम्ही खरेदी करा; व्यापाऱ्यांनीही पुढाकार घ्यावा; पंतप्रधान मोदींचं आवाहन
2
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
3
IND vs ENG : "मी रोहित भाईला पाहिलं अन्..." शतकी खेळीनंतर यशस्वीनं शेअर केली ती खास गोष्ट (VIDEO)
4
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
5
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
6
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
7
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
8
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
9
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
10
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
11
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
12
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
13
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
14
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
15
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
16
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
17
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
18
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
19
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
20
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना

नागपूरचे प्रदूषण अनेक वर्षांच्या नीचांकीवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 15, 2020 00:42 IST

देशातील १०२ सर्वाधिक प्रदूषित शहरामध्ये राज्याच्या १०-१२ शहरात नागपूरचाही क्रमांक लागतो. या प्रदूषणाचे सर्वात मोठे कारण म्हणजे पार्टीकुलेट मॅटर म्हणजे धुलिकण होय. मात्र लॉकडाऊनच्या काळात याचे प्रमाण विक्रमी घटले असून एकूणच प्रदूषण अनेक वर्षांच्या नीचांकावर पोहचले आहे.

ठळक मुद्देधूलिकणांचे प्रमाण विक्रमी घटले : व्हीएनआयटीचा अभ्यास

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : देशातील १०२ सर्वाधिक प्रदूषित शहरामध्ये राज्याच्या १०-१२ शहरात नागपूरचाही क्रमांक लागतो. या प्रदूषणाचे सर्वात मोठे कारण म्हणजे पार्टीकुलेट मॅटर म्हणजे धुलिकण होय. मात्र लॉकडाऊनच्या काळात याचे प्रमाण विक्रमी घटले असून एकूणच प्रदूषण अनेक वर्षांच्या नीचांकावर पोहचले आहे.महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि राष्ट्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळ यांच्या निर्देशानुसार विश्वेश्वरय्या राष्ट्रीय तंत्रज्ञान संस्था (व्हीएनआयटी) द्वारे गेल्या अनेक वर्षांपासून शहरातील हवेच्या गुणवत्तेचे परीक्षण केले जात आहे. व्हीएनआयटीने लॉकडाऊनच्या काळात एप्रिल महिन्यात शहरातील चार स्थानावरून प्रदूषणाचे परीक्षण केले आहे. यात प्रामुख्याने धूलिकण (पीएम-१०) तसेच सल्फर डायऑक्साईड (एसओ2), नायट्रोजन डायऑक्साईड (एनओ2) यांच्या प्रदूषणाचा अभ्यास केला आहे. अभ्यास केलेल्या चार ठिकाणांमध्ये एमपीसीबीचे सिव्हील लाईन्स येथील कार्यालय, इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिआर्स उत्तर अंबाझरी मार्ग, एमआयडीसी हिंगणा रोड आणि शासकीय पॉलिटेक्निक कॉलेज सदर यांचा समावेश आहे.व्हीएनआयटीच्या २०१० पासूनच्या अभ्यासानुसार एसओ2 व एनओ2 चे प्रमाण कधीही प्रदूषण मर्यादेच्या बाहेर गेले नाही. शिवाय सिव्हील लाईन्समध्ये धुलिकणांचे प्रमाणही मर्यादेबाहेर गेले नाही. १०० मायक्रोग्रॅम ही सर्वोच्च मर्यादा आहे आणि ६० मायक्रोग्रॅम (म्युग्रॅ)हे आदर्श प्रमाण. मात्र तिन्ही ठिकाणी याचे प्रमाण २०१० पासून एप्रिल महिन्यात कायम मर्यादेच्या बाहेर गेले आहे. २०१५ मध्ये धुलिकणांचे प्रमाण सदर व सीताबर्डी येथे १४० म्युग्रॅ तर एमआयडीसी येथे १८० म्युग्रॅम पर्यंत वाढले होते. इतर वर्षी ते १०० च्या आसपास राहिले आहे. मात्र यावेळी हेच प्रमाण ६० ते ६५ म्युग्रॅम पर्यंत खाली घसरले आहे. ४० ते ६० वर राहणाऱ्या एसओ2 व १० ते २० दरम्यान राहणाऱ्या एनओ2 ने ८० म्युग्रॅमची मर्यादा कधी ओलांडली नाही.मोठ्या प्रमाणात चालणारे उद्योग, बांधकाम कार्य, कचरा जाळणे आणि काही प्रमाणात वाहनांमुळे धुलिकणांचे प्रदूषण अधिक असते. लॉकडाऊन काळात उद्योग व बांधकाम बंद आहेत व कचरा जाळणे दिसून येत नाही. त्यामुळे प्रदूषण मोठ्या प्रमाणात घटल्याचे दिसून येत आहे. यामुळे पुढचे अनेक वर्षे याचा फायदा होणार आहे.- डॉ. दिलीप लटाये, सिव्हील इंजिनिरिंग विभाग, व्हीएनआयटी

टॅग्स :pollutionप्रदूषणenvironmentपर्यावरणnagpurनागपूर