शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑस्ट्रेलियात दहशतवादी हल्ला, १२ पर्यटक ठार, २९ जखमी; सिडनीतील बाँडी बीचवर बेछूट गोळीबार 
2
फुटबॉलचा किंग अन् क्रिकेटचा देव एकाच व्यासपीठावर! वानखेडेवर '१०'ची जादू
3
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष; सरकार आणि संघटनात्मक अनुभवाची दखल
4
बाइक टॅक्सीचालकाचा तरुणीवर अतिप्रसंग; धैर्याने प्रतिकार करीत गाठले पोलिस ठाणे
5
नवी मुंबई विमानतळामुळे मुंबईत सकाळच्या वेळी येता येईल का? संध्याकाळी परत जाता येईल का?
6
नवी मुंबई विमानतळावर तिसरीही धावपट्टी! दीर्घकालीन हवाई वाहतुकीचा आढावा; सल्लागार नियुक्तीची प्रक्रिया सुरू
7
गोवा अग्निकांड; अपघात नव्हे, अक्षम्य बेपर्वाई! २५ जणांच्या मृत्यूनंतर मालकांचे थायलंडमध्ये पलायन
8
IND vs SA 3rd T20I : टीम इंडियानं मॅच जिंकत दक्षिण आफ्रिकेला टाकले मागे; पण सूर्या-गिल पुन्हा फेल!
9
अपहरणाचा कट नगर पोलिसांनी उधळला! पुण्याच्या दिशेने जाताना नागापूर पुलावर थरार, दोघांना अटक
10
"मोदी, शाह, राजनाथ, नड्डा...!" भाजपचे कार्यकारी अध्यक्ष होताच काय म्हणाले नितीन नवीन?
11
‘लोकमत महागेम्स’मुळे पुन्हा मैदानावर दिसली क्रीडासंस्कृती: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
12
'मिसेस मुख्यमंत्री' GOAT मेस्सीला भेटल्या, खास PHOTO पोस्ट करून अमृता फडणवीसांनी लिहिले...
13
पंतप्रधान मोदी, रशियाचे पुतिन यांच्या खास मैफलीत झंकारली नागपूरकर लावण्य अंबादे यांची सतार
14
मीरा भाईंदर महापालिका, परिवहन ठेकेदाराच्या वादात बससेवा डबघाईला; सामान्य नागरिकांना मनस्ताप
15
महिनाभर आधी झालेलं प्रेयसीचं लग्न, पहिल्या प्रियकराने नवऱ्याला भेटायला बोलवलं अन् संपवलं...
16
VIDEO: आधी गणपती बाप्पाचा जयजयकार, नंतर CM देवेंद्र फडणवीसांनी मेस्सीला केलं एक 'प्रॉमिस'
17
U19 Asia Cup, IND vs PAK : टीम इंडियाने उडवला पाकचा धुव्वा; हायव्होल्टेज मॅचमध्ये काय घडलं?
18
"राहुल गांधींचे सैनिक बणून मोदींविरोधात...!" रामलीला मैदानावरून रेवंत रेड्डीची गर्जना
19
IND vs SA : पांड्याच्या 'सेंच्युरी'सह चक्रवर्तीची 'फिफ्टी'! शेवटच्या षटकात बर्थडे बॉयचा जलवा अन्....
20
VIDEO : क्रिकेटचा 'देव' सचिन आणि फुटबॉलचा 'जादूगार' मेस्सीची ग्रेट भेट; खास गिफ्ट अन् बरंच काही
Daily Top 2Weekly Top 5

नागपूरच्या महापौरांचा प्रशासनावर ‘वचक ’नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 20, 2018 21:29 IST

मागील काही दिवसापासून शहराच्या पाणीपुरवठ्यात अघोषित पाणी कपात करण्यात आली आहे. अनेक वस्त्यात दूषित पाण्याचा पुरवठा व पाणीटंचाई आहे. तक्र र करूनही ओसीडब्ल्यू व महापालिका प्रशासनाकडून दखल घेतली जात नाही. महापौर नंदा जिचकार यांचा प्रशासनावर वचक राहिलेला नाही. अशा परिस्थितीत पाणीटंचाईतून नागरिकांना दिलासा कसा मिळणार, असा हल्ला आरोप माजी उपहमहापौर व भाजपाचे ज्येष्ठ नगरसेवक सतीश होले यांनी शुक्रवारी महालिकेच्या सर्वसाधारण सभेत पाणीटंचाईच्या प्रश्नावरील चर्चेच्यावेळी केला.

ठळक मुद्देभाजपाचे नगरसेवक सतीश होलेंचा आरोप : विरोधकडी भिडलेपाणीटंचाई वरून प्रशासनाला धरले धारेवर : प्रभाग ३१ चे पाणी माजी महापौरांनी पळविले

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : मागील काही दिवसापासून शहराच्या पाणीपुरवठ्यात अघोषित पाणी कपात करण्यात आली आहे. अनेक वस्त्यात दूषित पाण्याचा पुरवठा व पाणीटंचाई आहे. तक्र र करूनही ओसीडब्ल्यू व महापालिका प्रशासनाकडून दखल घेतली जात नाही. महापौर नंदा जिचकार यांचा प्रशासनावर वचक राहिलेला नाही. अशा परिस्थितीत पाणीटंचाईतून नागरिकांना दिलासा कसा मिळणार, असा हल्ला आरोप माजी उपहमहापौर व भाजपाचे ज्येष्ठ नगरसेवक सतीश होले यांनी शुक्रवारी महालिकेच्या सर्वसाधारण सभेत पाणीटंचाईच्या प्रश्नावरील चर्चेच्यावेळी केला. होले यांच्या आरोपामुळे सत्ताधारी विचारात पडले. याचा फायदा घेत काँग्रेसचे हरीश ग्वालबंशी यांनीही महापौरांचा वचक नसेल तर त्यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी केली.प्रभाग ३१ मध्ये गेल्या दीड महिन्यापासून पाणीटंचाईची समस्या आहे. तक्रार करूनही प्रशासन व ओसीडब्ल्यू लक्ष देत नाही. माजी महापौर(प्रवीण दटके) यांनी आमच्या प्रभागाचे पाणी पळविल्याने नागरिकांना पाणी मिळत नाही. सत्तापक्षाचा नगरसेवक असल्याने हात बांधले आहे. आंदोलनही करता येत नाही. अशी व्यथा सतीश होले यांनी मांडली. होले यांच्या आरोपावर त्यांची फिरकी घेत काँग्रेसचे नगरसेवक प्रफुल्ल गुडधे म्हणाले, सत्ताधारी असल्याने आंदोलन करू शकत नाही. पण निवेदन देऊ न समस्या तर मांडू शकता. विरोधीपक्षनेते तानाजी वनवे यांनी प्रश्नोत्तराच्या तासात पाणीटंचाईचा मुद्दा उपस्थित केला होता. प्रभाग २७ मध्ये दूषित पाणीपुरवठा होत असल्याबाबतचे निवेदन आयुक्तांना दिले होते. परंतु प्रशासनाने याकडे लक्ष दिले नाही. दूषित पाण्याची समस्या बाळाभाऊ पेठ, रामेश्वर, नारा, नारी, हसनबाग,सुदामपुरी, हसनबाग, मोमीनपुरा, दर्शन कॉलनी यासह अनेक वस्त्यात असल्याचे वनवे यांनी निदर्शनास आणले.पाणीटंचाईमुळे नागरिकांना टँकरव्दारे पाणीपुरवठा करावा लागतो. यामुळे महापालिकेवर आर्थिक भूर्दंड बसतो. १२ एप्रिलपासून पाणीपुरवठा सुरळीत नसल्याचे भाजपाचे नगरसेवक प्रकाश भोयर यांनी निदर्शनास आणले. प्रवीण भिसीकर म्हणाले, प्रभाग ५ मध्ये नळाव्दारे पाणीपुरवठा सुरळीत होत नाही. नागरिक टँकरची मागणी करतात. परंतु सकाळी मागणी केल्यानंतर रात्रीला टँकर येतो. दिव्या धुरडे यांनी सुदामपुरी भागात मागणी करूनही पुरेसे टँकर मिळत नसल्याची व्यथा मांडली.

टॅग्स :Nagpur Municipal Corporationनागपूर महानगर पालिकाPoliticsराजकारण