शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
2
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
3
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
4
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
5
आयपीएलचा अर्धा हंगाम संपला, प्लेऑफसह ऑरेंज आणि पर्पल कॅपची शर्यतही झाली रंगतादार, कोण आघाडीवर? वाचा  
6
Gensol विरोधात इरेडानं दाखल केली तक्रार; दोन्ही कंपन्यांच्या शेअर्समध्ये भूकंप, तुमच्याकडे आहे का?
7
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
8
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
9
ती माझी मैत्रीण! दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीबाबत एल्विश यादवचा खुलासा, म्हणाला- "तो फोटो पाहिल्यानंतर..."
10
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
11
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
12
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
13
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
14
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!
15
जळगाव: घरात घुसला म्हणून वाचला! वाढदिवसाचं सेलिब्रेशन करतानाच आले अन् झाडल्या गोळ्या
16
भारत-पाकिस्तानमध्ये तणाव, डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतःला केलं दूर; म्हणाले, 'त्यांचं ते मिटवून घेतील'
17
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थयथयाट
18
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
19
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
20
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!

देशातील सर्वोत्कृष्ट संस्था म्हणून नागपूरचे आयटीआय स्मार्ट करणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 1, 2018 23:32 IST

मिहानसह सर्व उद्योगांना आवश्यक व उद्योजकांच्या गरजेनुसार तांत्रिक मनुष्यबळ उपलब्ध करून देण्यासाठी औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या विकासासोबतच नागपूर येथील आयटीआयचा देशातील सर्वोत्कृष्ट स्मार्ट संस्था म्हणून विकास करण्यात येणार आहे. या आयटीआयच्या सर्वांगीण विकासाचा आराखडा १५ दिवसात सादर करण्याच्या सूचना पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिल्या.

ठळक मुद्दे१५ दिवसात प्रस्ताव पाठवा : जिल्ह्यातील सर्व आयटीआयमध्ये सुविधा देणार

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : मिहानसह सर्व उद्योगांना आवश्यक व उद्योजकांच्या गरजेनुसार तांत्रिक मनुष्यबळ उपलब्ध करून देण्यासाठी औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या विकासासोबतच नागपूर येथील आयटीआयचा देशातील सर्वोत्कृष्ट स्मार्ट संस्था म्हणून विकास करण्यात येणार आहे. या आयटीआयच्या सर्वांगीण विकासाचा आराखडा १५ दिवसात सादर करण्याच्या सूचना पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिल्या.जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये उपलब्ध असलेल्या सुविधांसह विविध विभागांचा आढावा पालकमंत्री बावनकुळे यांनी घेतला. त्याप्रसंगी मार्गदर्शन करताना ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी सचिन कुर्वे, तंत्र शिक्षण विभागाचे सह संचालक चंद्रकांत निनाळे तसेच औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे सर्व प्राचार्य उपस्थित होते.नागपूर येथील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेकडे असलेल्या १९ एकर जागेवर अत्याधुनिक इमारतीचे बांधकाम करून तसेच विद्यार्थ्यांना एकाच ठिकाणी सर्व सुविधा व प्रशिक्षण उपलब्ध व्हावे या दृष्टीने या संस्थेचा विकास करण्यात येईल. तसेच देशातील सर्वोत्कृष्ट व स्मार्ट आयटीआय करण्यात येणार आहे. औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतून उत्तीर्ण होणाऱ्या   सर्वच विद्यार्थ्यांना चांगल्या संधी उपलब्ध व्हाव्यात या दृष्टीने २५ नवीन अभ्यासक्रम नव्याने सुरू करण्याचा प्रस्ताव असून यामध्ये नागपूर येथे १३ नवीन तुकड्या राहणार आहेत. या परिसराचा विकास करताना ग्रीन बिल्डिंग, अत्याधुनिक यंत्रसामुग्री व उपलब्ध असलेल्या सुविधांमध्ये वाढ करण्यात येणार आहे. यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना स्मार्ट नागपूर आयटीआयचे सादरीकरण दाखविण्यात येईल, असेही त्यांनी यावेळी सांगितले.पीक विमा काढलेल्या शेतकऱ्यांना संरक्षण द्याप्रधानमंत्री पीक विमा योजनेंतर्गत जिल्ह्यातील ४५ हजार ९३८ शेतकऱ्यांनी खरीप पिकांसाठी विमा उतरविला असून ज्या शेतकऱ्यांच्या शेतातील पिकांचे नुकसान झाले आहे. अशा शेतकऱ्यांना पीक विम्याच्या नुकसानी संदर्भातील अनुदान देण्याच्या सूचना पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी बैठकीत दिल्यात. तसेच वैयक्तिक पीक विमा योजनेतील अंमलबजावणी संदर्भातील अडचणी सोडविण्यासाठी कृषिमंत्र्याच्या अध्यक्षतेखाली मुंबई येथे बैठक घेण्यात येणार असल्याचेही सांगितले. यावेळी आमदार डी. मल्लिकार्जुन रेड्डी, माजी आमदार आशिष जयस्वाल, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी मिलिंद शेंडे, लीड बँक व्यवस्थापक अयुब खान, जिल्हा नियोजन अधिकारी कृष्णा फिरके उपस्थित होते.

टॅग्स :iti collegeआयटीआय कॉलेजChandrasekhar Bavankuleचंद्रशेखर बावनकुळे