शहरं
Join us  
Trending Stories
1
"एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्याने वाईट वाटलं आणि घरी निघून गेलो,पण पुन्हा..."; रवींद्र चव्हाणांचा गौप्यस्फोट
2
शेवटच्या 3 सेकंदांत 'RUN' वरून 'CUTOFF' झालं 'फ्यूल कंट्रोल स्विच' अ्न...; एअर इंडिया प्लेन क्रॅशवेळी शेवटच्या क्षणाला नेमकं काय घडलं?
3
"माझा नातेवाईक का असेना, टायरमध्ये घालून झोडायला सांगणार"; बारामतीत अजित पवारांचा कडक इशारा
4
KL राहुलची विक्रमी सेंच्युरी; लॉर्ड्सच्या मैदानात अशी कामगिरी करणारा ठरला दुसरा भारतीय
5
भारतातील रस्त्यावरही टेस्लाच्या कार धावणार; या दिवशी पहिलं शोरूम सुरू होणार, लवकरच डिलिव्हरी सुरू होईल
6
Air India Plane Crash :'रिपोर्ट लीक कसा झाला?' अहमदाबाद विमान अपघाताच्या अहवालावर पायलट असोसिएशनने आक्षेप घेतला
7
पंतची मोठी चूक! चोरटी धाव घेण्याच्या नादात फुकटात फेकली विकेट! बेन स्टोक्सचा डायरेक्ट थ्रो अन्...
8
नरेंद्र मोदींनंतर PM म्हणून काँग्रेसकडून राहुल गांधींचा पर्याय? शं‍कराचार्यांचे मोठे विधान
9
“७५ वर्षांचा नियम RSSला लागू करायचा असेल, म्हणून मोहन भागवत तसे म्हणाले असतील”: शंकराचार्य
10
गुरु-चंद्र-राहुचा वसुमान ग्रहण योग: ७ राशींना भरभराट, भाग्योदय; पैसा-प्रतिष्ठा, कल्याण होईल!
11
सात वर्षांपूर्वीच दिला होता ७३७ जेटमधील स्विचच्या समस्येबद्दल इशारा; एअर इंडिया विमान अपघाताला ठरले कारण?
12
"जयंत पाटलांच्या राजीनाम्याची बातमी खोडसाळपणा...", प्रदेशाध्यक्षपदावरुन जितेंद्र आव्हाड यांनी स्पष्टच सांगितलं
13
पंतची कडक फटकेबाजी! चौकारासह जोफ्राचं स्वागत अन् स्टोक्सला उत्तुंग षटकार मारत साजरी केली फिफ्टी
14
Radhika Yadav : "मी मुलीचा वध केला, मला फाशी द्या"; राधिकाला संपवल्यावर भावासमोर काय म्हणाले वडील?
15
'तो मला बायको म्हणायचा', मुंबईतील शिक्षिकेचा विद्यार्थ्यासोबतच्या संबंधाबद्दल चक्रावून टाकणारा खुलासा
16
Sankashti Chaturthi 2025: चातुर्मासातली पहिली संकष्टी, बाराही राशींसाठी ठरणार खास; पूर्ण होणार प्रत्येक आस!
17
१८० प्रवाशांऐवजी केवळ १५५ जणांनाच घेऊन उडाले एअर इंडियाचे विमान! विमानतळावर गोंधळ,नेमके झाले काय?
18
पतीचा भर रस्त्यात तमाशा; पत्नीवर केले सपासप वार, जांघेत अडकली तलवार! कशावरून झाला वाद?
19
“२० देशांनी भारताच्या बाजूने मतदान केले, १२ किल्ले जागतिक वारसा स्थळ घोषित झाले”: CM फडणवीस
20
CHYD च्या नवीन पर्वात निलेश साबळेंना मिस करशील का? गौरव मोरे म्हणाला, "मी त्यांच्यासोबत..."

नागपूर राज्यातील पहिला डिजिटल जिल्हा

By admin | Updated: October 3, 2016 02:56 IST

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपूर डिजिटल जिल्ह्याची घोषणा मुंबई येथून केली.

मुख्यमंत्र्यांनी साधला शेतकरी, बचतगट, विद्यार्थ्यांशी संवाद : मुंबई ते डोंगरगाव ठरले थेट संवाद होण्याचे माध्यम नागपूर : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपूर डिजिटल जिल्ह्याची घोषणा मुंबई येथून केली. त्यानंतर डोंगरगाव, आदिवासी आश्रमशाळा बेलदा तसेच ब्राह्मणी येथील ग्रामस्थांना मायक्रो एटीएमच्या माध्यमातून श्रावणबाळ योजनेचा लाभ घरपोच देण्याचा उपक्रमासोबतच शेतकरी, महिला बचत गट व विद्यार्थ्यांशी डिजिटल व्हिलेज व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून संवाद साधला. पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा शेतकरी व ग्रामस्थांना लाभ देण्यासाठी प्रभावी वापर करणार असल्याचे यावेळी सांगितले. डोंगरगाव येथे ग्रामपंचायत भवनामध्ये डिजिटल व्हिलेज अंतर्गत मुंबई येथून व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारा संवाद हा उपक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कादंबरी बलकवडे, आमदार समीर मेघे, जिल्हा परिषदेचे सदस्य रुपराव शिंदे, पंचायत समिती सभापती दिलीप नंदागवळी, रेखाताई मसराम, उपमुख्य कार्यपालन अधिकारी अरुण निंबाळकर, उपविभागीय अधिकारी बाळासाहेब कोळेकर, डोंगरगावचे सरपंच देवेंद्र गौर उपस्थित होते.जिल्हा परिषद थेट संपर्क यंत्रणाने जोडणारग्रामीण जनतेला जलद सेवा उपलब्ध व्हाव्यात. तसेच प्राथमिक आरोग्य केंद्र, पंचायत समिती तसेच तालुका कृषी अधिकारी यांचेसोबत मुख्य कार्यपालन अधिकारी थेट संपर्क करतांना तसेच सर्व पंचायत समित्या आॅनलाईन करण्यात येऊन माहिती तंत्रज्ञानाचा इंटरनेट व वायफायचा प्रभावी वापर करणार असल्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी ग्रामस्थांशी संवाद साधताना सांगितले. कृषी सहायक व ग्राम सहायकांना स्मार्टफोन देऊन त्यांना शेतकरी व बचत गटांशी थेट संवाद साधता येईल त्यासाठी निधी उपलब्ध करुन देण्यात येणार असल्याचे यावेळी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले.मायक्रो एटीएमद्वारे मिळाला घरपोच लाभडिजिटल कनेक्टिविटीमुळे अतिदुग्रम अशा ब्राह्मणी (उमरेड) येथील वृद्ध महिलेला बँक आॅफ बडोदाच्या माध्यमातून मायक्रो एटीएमद्वारा श्रावणबाळ योजनेचे ६०० रुपयाचे अनुदान देण्यात आले. ब्राह्मणी या गावात बँकेची सुविधा नसल्यामुळे व डिजिटल कनेक्टिव्हीटी उपलब्ध झाल्यामुळे घरपोच बँकेची सेवा उपलब्ध करून देणे शक्य झाले आहे. शासनाच्या विविध कल्याणकारी योजनेचा आर्थिक लाभ वायफाय सुविधेमुळे घरपोच देणे शक्य झाले असून वृद्ध महिलेने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार व्यक्त केले. यावेळी सुधीर पारवे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. मकरंदे उपस्थित होते.