शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

नागपूरच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या धावपट्टीसाठी दोन इमारतींची ‘एनओसी’ रद्द

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 6, 2018 12:23 IST

डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या धावपट्टीसाठी जयताळाकडे निर्माण झालेल्या दोन इमारतींचे ना-हरकत प्रमाणपत्र नागरी विमानतळ प्राधिकरणाने (एएआय) रद्द केले आहे. यामध्ये ‘रेणुका’ आणि ‘हायवूड’ या इमारतींचा समावेश आहे.

ठळक मुद्दे’एआयए’चा निर्णयधावपट्टीसाठी होती समस्या१० मीटरपर्यंत उंची वाढवून केले होते बांधकाम

वसीम कुरैशीनागपूर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या धावपट्टीसाठी जयताळाकडे निर्माण झालेल्या दोन इमारतींचे ना-हरकत प्रमाणपत्र नागरी विमानतळ प्राधिकरणाने (एएआय) रद्द केले आहे. यामध्ये ‘रेणुका’ आणि ‘हायवूड’ या इमारतींचा समावेश आहे.एएआयकडून ना-हरकत प्रमाणपत्र प्राप्त करून मंजूर झालेल्या उंचीपेक्षा दोन्ही इमारतींचे बांधकाम १० मीटरने जास्त आहे. त्यामुळे एएआयने ना-हरकत प्रमाणपत्र रद्द केले आहे. विमानतळालगतच्या उंच इमारतींचे ना-हरकत प्रमाणपत्र रद्द करण्यासाठी आता एमआयएल एरोनॉटिकल आॅब्सटिकल सर्वेक्षण करीत आहे. एएआय आणि मिहान इंडिया लिमिटेडची (एमआयएल) संयुक्त बैठक १९ सप्टेंबरला होणार आहे. या बैठकीत विमानतळाचे संचालन करणाऱ्या एजन्सींसोबत पहिल्यांदाच नगरसेवक उपस्थित राहणार आहेत. या बैठकीत मार्गदर्शन करण्यासाठी दिल्लीहून एएआयच्या दोन विशेषज्ञांना बोलविण्यात आले आहे.जयताळा येथील उंच इमारतींमुळे आता धावपट्टीच्या लांबीत अडचणी निर्माण होत आहे. या कारणामुळे ३२०० मीटर लांबीची धावपट्टी ५६० मीटरने कमी करण्याचा प्रस्ताव एमआयएला देण्यात आला आहे. नियमानुसार विमानतळाच्या चारही बाजूला २० कि़मी.च्या परिसरात उंच इमारतींचे बांधकाम करण्यासाठी एएआयचे ना-हरकत प्रमाणपत्र आवश्यक असते. पण या कामात कुणीही रुची दाखवीत नसल्याचे दिसून येत आहे. याच कारणामुळे राजस्थान येथील राजकोट विमानतळाचे दुसऱ्या जागेवर स्थानांतरण करावे लागले होते.मुंबई विमानतळावरही हीच समस्या आहे. आता नागपुरातही हेच संकट उभे राहिले आहे. ३२०० मीटर लांब धावपट्टीच्या थ्रेसहोल्ड मार्करला ५६० मीटर मागे घेण्याचा सल्ला देण्यात आला आहे. अशास्थितीत टचडाऊन झोन मार्करला मागे न्यावे लागेल. अशास्थितीत वेगाने उडणाºया मोठ्या विमानांना धावपट्टीवर पुढे जाऊन थांबण्यासाठी जागा कमी पडणार आहे.

सर्वेअर नियुक्त करण्याची कवायतएमआयएलने एरोनॉटिकल आॅब्सटिकल सर्वेक्षणासाठी सर्वेअर नियुक्त करण्यासाठी निविदा काढल्या आहेत. निविदा भरण्याची अंतिम तारीख ६ सप्टेंबर आहे. चार ते पाच जणांची चमू विमानतळालगत विमानांच्या सुलभ ये-जाच्या उद्देशाने जास्त उंच इमारतींचे सर्वेक्षण करून अहवाल तयार करणार आहे. या कामासाठी १० ते १५ लाख रुपये खर्च होणार आहे. एवढा खर्च करून काय मिळणार, यावर जबाबदार अधिकारी काहीही बोलण्यास तयार नाही. अहवाल तयार झाल्यानंतर नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाकडे (डीजीसीए) पाठविण्यात येणार आहे. त्यानंतर डीजीसीए संबंधित एजन्सींना निर्देश देतील.

‘एएआय’ने साधली चुप्पीया मुद्यावर ‘एएआय’ने नागपुरात एका कार्यशाळेचे आयोजन केले होते. ही कार्यशाळा जास्त पैसा खर्च करून वर्धा रोडवरील पंचतारांकित हॉटेलमध्ये घेण्यात आली होती. कार्यशाळेत विभागीय आणि अन्य विमानतळांचे एएआयचे अधिकारी व कर्मचारी सहभागी झाले होते. उल्लेखनीय बाब अशी की, सुमारे १३ वर्षांपूर्वी एरोनॉटिकल आॅब्सटिकल सर्वेक्षणाचे काम खुद्द एएआय करायचे. त्यानंतर हे काम काही कारणांमुळे बंद करून या कामासाठी आऊटसोर्स करणे सुरू केले. यासंदर्भात बुधवारी नागपूर विमानतळाचे एएआय प्रभारी (समन्वय) युधिष्ठिर साहू यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा केली. पण त्यांनी यासंदर्भात बोलण्यास रुची दाखविली नाही. विमानतळाच्या हस्तांतरणानंतर अनेकदा एएआय आणि एमआयएलमध्ये समन्वयाचा अभाव दिसून आला. याच कारणांमुळे तब्बल नऊ वर्षांपासून नागपूर विमानतळ खासगी भागीदाराच्या प्रतीक्षेत आहे.होऊ शकतो घातक परिणामसंबंधित एजन्सींना अशा बांधकामाकडे लक्ष देण्याची आवश्यकता आहे. विमानतळालगत उंच इमारत उभारण्यासाठी मनपाने परवानगी देऊ नये. काही बांधकाम तर विमानतळाच्या सीमेलगतच्या भिंतीला लागून आहेत. असे बांधकाम विमानतळाच्या सुरक्षेसाठी घातक आहे. हाच क्रम सुरू राहिला तर भविष्यात विमानतळाच्या सुरेक्षबाबत अडचणी निर्माण होतील. शहराच्या विकासात या गोष्टींवर गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे.- विजय मुळेकर, वरिष्ठ विमानतळ संचालक, मिहान इंडिया लिमिटेड.

टॅग्स :Airportविमानतळ