शहरं
Join us  
Trending Stories
1
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
2
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
3
पगार येताच, ५ मिनिटांनी कर्मचाऱ्याने राजीनामा दिला! एचआरची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल
4
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
5
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
6
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
7
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
8
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
9
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
10
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं
11
महाराष्ट्राच्या पैठणीला लंडनमध्ये मोठा मान, व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयामध्ये दिसणार!
12
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
13
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
14
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
15
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
16
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक
17
"देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत की निवडणूक आयुक्त? प्रश्न आयोगाला विचारले तर तुम्ही उत्तर का देता?", रमेश चेन्निथला यांचा सवाल   
18
RCB मुळं वर्ल्ड कप स्पर्धेवर संकट! एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर बंदी; BCCI सह ICC चं टेन्शन वाढलं
19
९ महिने पाठपुरावा केला तरीही ऊसाचे बिल थकवले; चिठ्ठी लिहून तरुण शेतकऱ्यानं आयुष्य संपवले
20
भारतासाठी धोक्याची घंटा; चीन LAC जवळ उभारतोय नवीन रेल्वे प्रकल्प, तणाव वाढणार..?

नागपूर शौचालयाचे पाणी प्रकरण विधानसभेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2018 23:23 IST

जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धेत शौचालयाचे पाणी विद्यार्थ्यांना पाजल्याचा प्रकार उघडकीस आला होता. यासंदर्भात विधानसभेचे सदस्य आमदार डॉ. मिलिंद माने यांनी विधानसभेत प्रश्न उपस्थित केला आहे. यासंदर्भात शासनाच्या अवर सचिवांनी जिल्हा परिषदेला या संपूर्ण प्रकरणाची सविस्तर माहिती मागितली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धेत शौचालयाचे पाणी विद्यार्थ्यांना पाजल्याचा प्रकार उघडकीस आला होता. यासंदर्भात विधानसभेचे सदस्य आमदार डॉ. मिलिंद माने यांनी विधानसभेत प्रश्न उपस्थित केला आहे. यासंदर्भात शासनाच्या अवर सचिवांनी जिल्हा परिषदेला या संपूर्ण प्रकरणाची सविस्तर माहिती मागितली आहे.जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण विभागाच्यावतीने २३ व २४ फेब्रुवारीला जिल्हा क्रीडा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. यास्पर्धेत सहभागी विद्यार्थ्यांना शौचालयाचे पाणी प्यायला दिल्याचा व्हीडिओ व्हायरल झाला होता. प्रसार माध्यमांनी हे प्रकरण चांगलेच लावून धरल्याने जि.प.च्या सीईओंनी यासंदर्भात उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रमिला जाखलेकर यांच्या अध्यक्षतेत समिती गठित केली होती. समितीने आपला अहवाल सीईओंकडे दिला आहे. या स्पर्धेच्या आयोजनात अनेक त्रुटी आढळल्या आहेत.आमदार डॉ. माने यांनी हा प्रश्न विधानसभेत लावल्याने, या संपूर्ण प्रकरणाचा तपशील जिल्हा परिषदेला मागितला आहे. यासंदर्भातील पत्र जिल्हा परिषदेला प्राप्त झाले आहे. यासंदर्भात समितीचा अहवाल प्राप्त झाल्यानंतरही सीईओनी कुठलाही निर्णय न घेतल्याने जिल्हा परिषदेत उलटसुलट चर्चा रंगल्या होत्या. आता शासनाच्या पत्रानंतर सीईओंना या प्रकरणात योग्य निर्णय घेणे भाग पडणार आहे.विस्तार अधिकाऱ्याचा बळीजिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धेत शौचालयाचे पाणी पाजल्याप्रकरणात विस्तार अधिकारी सुरेश थोटे यांनाच टार्गेट करण्यात येत आहे. विशेष म्हणजे या आयोजनात वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या, कंत्राटदारांच्या त्रुटी आढळल्यानंतरही त्यांना बगल दिली जात आहे. महाराष्ट्र राज्य शिक्षण विस्तार अधिकारी संघटनांनी यासंदर्भात फेरचौकशीची मागणी सीईओंकडे केली आहे.स्पर्धेचे नियंत्रण अधिकारी म्हणून शिक्षणाधिकाऱ्यांनी विस्तार अधिकारी थोटेंची नियुक्ती केली होती. तसेच पंचायत समितीस्तरावर गटशिक्षणाधिकाऱ्यांना थोटेंच्या सहकार्याकरिता समित्या नियुक्त करण्याचे पत्र दिले होते. या स्पर्धा परीक्षेच्या तोंडावर आल्याने सर्व विस्तार अधिकारी परीक्षेच्या कामात व्यस्त असल्याने समित्याच स्थापन करण्यात आल्या नाही. त्यामुळे संपूर्ण आयोजनाची जबाबदारी थोटेंवर आली. त्यामुळे आयोजनाच्या सर्वच प्रक्रियेत ते वैयक्तिक लक्ष घालू शकले नाही. परिणामी कंत्राटदारानेही मनमानी कारभार केला. वरिष्ठ अधिकाऱ्यांना तक्रार आल्यानंतरही त्यांनी अपेक्षित यंत्रणा कार्यक्रमास्थळी उभी केली नाही. विशेष म्हणजे ज्या संघटनेच्या कार्यकर्त्यांनी ही तक्रार केली, त्या संघटनेच्या कार्यकर्त्यांची स्पर्धेच्या उपस्थिती रजिस्टरवर स्वाक्षरी नव्हती. त्यामुळे संघटनेने थोटेंवर कारवाई करताना या सर्व गोष्टी लक्षात घेण्याची विनंती सीईओंना केली आहे. स्पर्धेच्या जेवणाचे कंत्राट दिलेला चव्हाण नावाच्या कंत्राटदाराची जि.प. पदाधिकारी, सदस्यांशी जवळीक असल्यामुळे कंत्राटदाराकडून झालेल्या चुका दाबल्या जात असल्याचीही चर्चा आहे.

 

टॅग्स :vidhan sabhaविधानसभाMumbaiमुंबई