शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
2
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
3
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
4
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
5
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे
6
"निर्लज्ज पाकिस्तान", दहशतवाद्यांना 'स्वातंत्र्य सैनिक' म्हटल्यावर पाक क्रिकेटर प्रचंड संतापला
7
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
8
१९७१ च्या युद्धात भारताने पश्चिम पाकिस्तानमधील या भागांवर केला होता कब्जा, नंतर दिले होते परत, कारण काय?
9
धक्कादायक! लग्नातील जेवणामुळे उलट्या; ३७ मुलांसह ५१ जणांना अन्नातून विषबाधा
10
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
11
घटस्फोटानंतर फळफळलं धनश्री वर्माचं नशीब, या चित्रपटामधून करणार सिनेसृष्टीत पदार्पण
12
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
13
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून
14
पोलिसाच्या घरातच चोरी; सोन्याचे मंगळसूत्र, २ मोबाईलसह मौल्यवान वस्तू घेऊन चोर फरार!
15
जिंकलंस भावा! मजुराचा मुलगा कष्टाने झाला IPS; देशाची सेवा करण्याचं स्वप्न होणार साकार
16
सोन्याच्या दरात मोठी घसरण; १० ग्रॅम सोन्यासाठी किती करावा लागणार खर्च, जाणून घ्या
17
पाकिस्तानला जाणारे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
18
"पहलगाममध्ये हल्ला करणारे दहशतवादी नव्हेत तर स्वातंत्र्यसैनिक’’, पाकिस्तानच्या उपपंतप्रधानांचं विधान 
19
Pahalgam Terror Attack : पहलगाममधील भाजपा कार्यकर्त्यासाठी नजाकत बनला 'देवदूत'; पत्नीचा, लेकीचा वाचवला जीव
20
चीननं उचललं मोठं पाऊल, भारताच्या 'या' कंपन्यांचे शेअर्स क्रॅश; विकण्यासाठी गुंतवणूकदारांची रांग

नागपुरातील  आयुर्वेदच्या पीजीच्या जागा धोक्यात!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 24, 2019 22:42 IST

राज्यातील खासगी व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील एमबीबीएसच्या जागा १० टक्क्याने वाढल्या असताना, नागपुरातील शासकीय आयुर्वेद महाविद्यालयाच्या पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या (पीजी) जागा मात्र रिक्त पदांमुळे धोक्यात आल्या आहेत. गेल्या १२ वर्षांपासून पदभरतीच झाली नाही. ‘सीसीआयएम’ने नुकत्याच केलेल्या महाविद्यालयाच्या पाहणीत रिक्त पदाच्या त्रुटीवर बोट ठेवले आहे तर, शासनाने ‘सीसीआयएम’ला तीन महिन्यात त्रुटी दूर करू, असे आश्वासन देऊन वेळ मारून नेली आहे.

ठळक मुद्देरिक्त पदांचे संकट : कशी होणार त्रुटींची पूर्तता

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : राज्यातील खासगी व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील एमबीबीएसच्या जागा १० टक्क्याने वाढल्या असताना, नागपुरातील शासकीय आयुर्वेद महाविद्यालयाच्या पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या (पीजी) जागा मात्र रिक्त पदांमुळे धोक्यात आल्या आहेत. गेल्या १२ वर्षांपासून पदभरतीच झाली नाही. ‘सीसीआयएम’ने नुकत्याच केलेल्या महाविद्यालयाच्या पाहणीत रिक्त पदाच्या त्रुटीवर बोट ठेवले आहे तर, शासनाने ‘सीसीआयएम’ला तीन महिन्यात त्रुटी दूर करू, असे आश्वासन देऊन वेळ मारून नेली आहे.शासकीय आयुर्वेद महाविद्यालयात सध्या १०० जागांवर पदवी (यूजी) व ६० जागांवर पदव्युत्तर(पीजी)साठी विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जातो. या कॉलेजमध्ये एकूण ६४ अध्यापकांचा जागा मंजूर आहेत, परंतु त्यापैकी ११ जागा रिक्त आहेत. यातच ऑगस्ट २०१९ मध्ये तीन अध्यापक निवृत्त होणार असल्याने महाविद्यालय आणखी अडचणीत येणार आहे. सूत्रानुसार, तीन महिन्यांपूर्वी ‘सेंट्रल कौन्सिल ऑफ इंडियन मेडिसीन’ (सीसीआयएम) दिल्लीच्या चमूने महाविद्यालयाचे निरीक्षण केले. यात अध्यापकांची कमतरता, पायाभूत सोयींचा अभाव, पुस्तकांची कमतरता, जागांचा अभाव आदी त्रुटी काढल्या. तीन महिन्यांमध्ये त्रुटींची पूर्तता करू, असे आश्वासन महाविद्यालय प्रशासनाच्यावतीने राज्य शासनाने २० मे २०१९ रोजी ‘सीसीआयएम’ला दिले. या आश्वासनावर तूर्तास ६० जागांवर प्रवेश देण्याची परवानगी मिळाली. परंतु अपुऱ्या मनुष्यबळामुळे पीजीच्या जागा संकटात आल्याचे वास्तव आहे.पीजीच्या ८४ जागांसाठी ७५ अध्यापकाची गरजशासकीय आयुर्वेद रुग्णालय ‘पीजी’च्या ६० वरून ८४ जागांवर प्रवेश देण्याच्या प्रयत्नात आहे. या जागांसाठी ७५ अध्यापकांची गरज आहे. मात्र, जी रिक्त आहेत तीच पदे २००७ पासून भरण्यात आली नाहीत. यामुळे भविष्यात ‘पीजी’च्या जागा वाढण्याऐवजी त्यावर संकट येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्रुटी दूर करण्याचा प्रयत्न‘पीजी’च्या जागेला घेऊन ‘सीसीआयएम’ने काढलेल्या त्रुटी दूर करण्याचा प्रयत्न सुरू आहे. राज्य शासनानेही यासंदर्भात आश्वासन दिले आहे. यामुळे ‘पीजी’च्या जागा संकटात येणार नाही, याची खात्री आहे.डॉ. गणेश मुक्कावारअधिष्ठाता, शासकीय आयुर्वेद रुग्णालय

टॅग्स :Government ayurvedic college nagpurशासकीय आयुर्वेदिक महाविद्यालय व रुग्णालय, नागपूरdoctorडॉक्टर