लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : जिल्हा परिषदेचे ५८ गट व पंचायत समितीच्या ११६ गणासाठी मंगळवारी शांततेत मतदान पार पडले. मतदार यादीतील त्रुटींमुळे जिल्ह्यात बहुतांश ठिकाणी मतदारांची धावपळ दिसून आली. जिल्ह्यात सरासरी ६४.१३ टक्के मतदान झाले. यात ९,१०,७३३ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. यात ४,८२,७७९ पुरुष तर ४,२७,९४४ महिलांचा समावेश आहे. बुधवारी जिल्ह्यातील १३ ही तालुक्यात सकाळी १० वाजतापासून मतमोजणीला सुरुवात होईल. साधारणत: दुपारी १२ वाजतानंतर कौल येण्याची शक्यता आहे. ग्रामीण भागात नरखेड, सावनेर, काटोल येथील काही मतदान केंद्रावर रात्री ७.३० पर्यंत मतदानाची प्रक्रिया चालली. जिल्ह्यात एकुण झालेल्या मतदानापैकी सर्वाधिक ७४.२१ टक्के मतदान उमरेड तालुक्यात तर सर्वात कमी ५१.४५ टक्के मतदान नागपूर ग्रामीण तालुक्यात झाले.जिल्ह्यात सावनेर तालुक्यातील पाटणसावंगी मतदान केंद्रावर राज्याचे पशु व दुग्ध संवर्धन विकास मंत्री सुनील केदार यांनी मतदानाचा हक्क बजावला.
नागपूर जि.प. व पं.स. ला ६४.१३ टक्के मतदान : आज फैसला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 7, 2020 23:47 IST
जिल्हा परिषदेचे ५८ गट व पंचायत समितीच्या ११६ गणासाठी मंगळवारी शांततेत मतदान पार पडले. मतदार यादीतील त्रुटींमुळे जिल्ह्यात बहुतांश ठिकाणी मतदारांची धावपळ दिसून आली. जिल्ह्यात सरासरी ६४.१३ टक्के मतदान झाले.
नागपूर जि.प. व पं.स. ला ६४.१३ टक्के मतदान : आज फैसला
ठळक मुद्देमतदारांचा कौल कुणाला?