शहरं
Join us  
Trending Stories
1
MHT CET Exam Result: एमएचटी सीईटीच्या परीक्षेत पीसीएममध्ये २२ जण अव्वल!
2
Israel Iran Conflict : अमेरिका आता इराणवर हल्ला करणार? ट्रम्प यांनी दिला इशारा; म्हणाले, तेहरान रिकामे करा...
3
'केवळ एका फोन कॉलने इराण-इस्रायल युद्ध थांबवता येऊ शकतं..."; परराष्ट्र मंत्री अराघची यांचा दावा
4
"इराणच्या अयातुल्ला खामेनींना संपवल्यानंतरच हा संघर्ष थांबेल"; बेंजामिन नेतन्याहूंचे मोठे विधान
5
Devendra Fadnavis: स्थलांतरित शाळाबाह्य मुलांना जबरदस्तीने शाळेत आणा, मुख्यमंत्र्यांचे आवाहन
6
क्रिकेटच्या इतिहासात असं पहिल्यांदाच घडलं, सलग तीन वेळा टाय झाला टी-२० सामना, अखेर असा लागला निकाल
7
'सैराट'मधील हा अभिनेता लवकरच गर्लफ्रेंडसोबत बांधणार लग्नगाठ, ती दिसायला आहे खूप सुंदर
8
UPI Changes: ट्रान्झॅक्शन टाईम, बॅलन्स चेक लिमिट... UPI शी निगडीत या मोठ्या बदलांबाबत जाणून घ्या 
9
रस्त्यावरील लोखंडी वस्तूमुळे पायाला पडले १८ टाके, महापालिकेचा ढिसाळ कारभार अभिनेत्रीला पडला महागात
10
नाशिक भाजपाचा आज प्रवेशोत्सव ! माजी मंत्री बबनराव घोलप, उद्धव सेनेचे सुधाकर बडगुजर यांच्यासह दहा ते बारा माजी नगरसेवक कमळ हातात घेणार 
11
तुमच्या नोकरीवर टांगती तलवार? मे महिन्यात बेरोजगारीचा दर वाढला, 'या' लोकांना सर्वाधिक फटका
12
विकीने दुसऱ्याच अभिनेत्रीचा पकडला हात, अंकिताचा रागराग; Video व्हायरल
13
"ट्रम्प यांचं वर्तन अनिश्चित, ट्रेड तेव्हाच जेव्हा टॅरिफबाबत..," भारतानं अमेरिकेसमोर ठेवली मोठी अट
14
Sheetal Chaudhary: बॉयफ्रेंडनेच केली शीतलची हत्या! अपघाताचा बनाव, पण सुनील अडकला; हत्येचे कारण अखेर समोर   
15
Israel-Iran War: संरक्षणावर किती खर्च करतात इराण आणि इस्रायल? कोणत्या सैन्याची ताकद आहे जास्त
16
आजचे राशीभविष्य - १७ जून २०२५, सरकारी कामे सफल होतील, मोठ्यांचा सहवास लाभेल
17
Thane: ट्रेकिंगला गेले असता पाय घसरुन दरीत कोसळला, ठाण्यातील धक्कादायक प्रकार!
18
'सगळे या..सगळे या...', मराठीत बोलून के-पॉप स्टार जॅक्सन वांगनं सर्वांना केलं थक्क, व्हिडीओ होतोय व्हायरल
19
"थोडी माणुसकी दाखवा"; अपघातानंतर रडत व्यथा मांडणाऱ्या डॉक्टरचा नवा व्हिडीओ समोर; म्हणाला, "मी खूप बोलून गेलो..."
20
Plane Crash: बोइंग विमानाचे 'दिवसच खराब'... अहमदाबाद अपघातानंतर आणखी ४ विमानांचे 'इमर्जन्सी लँडिंग'

नागपूर जिल्हा परिषद : अखेर तडजोडीतून सुटला विषय समितीची तिढा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 24, 2020 20:30 IST

विषय समितीच्या सभापतींवरून रंगलेल्या चर्चेला अखेर काँग्रेसने विराम दिला. भारती पाटील यांच्याकडे शिक्षण व वित्त समितीची जबाबदारी दिली तर कृषी व पशुसंवर्धन समितीचे तापेश्वर वैद्य सभापती बनले.

ठळक मुद्देपाटील यांच्याकडे शिक्षण, वैद्य यांना मिळाले कृषी

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : विषय समितीच्या सभापतींवरून रंगलेल्या चर्चेला अखेर काँग्रेसने विराम दिला. भारती पाटील यांच्याकडे शिक्षण व वित्त समितीची जबाबदारी दिली तर कृषी व पशुसंवर्धन समितीचे तापेश्वर वैद्य सभापती बनले.सोमवारी सकाळी पशुसंवर्धनमंत्री सुनील केदार यांच्याकडे झालेल्या काँग्रेस नेत्यांच्या बैठकीत यावर शिक्कामोर्तब झाले. त्यानंतर दुपारी जि.प.अध्यक्षा रश्मी बर्वे यांनी विषय समितीच्या वाटपाची घोषणा केली. अध्यक्ष आणि उपाध्यक्षाच्या निवडीनंतर ३० जानेवारीला सभापतींची निवड झाली होती. निवड झाल्याच्या दुसऱ्या दिवसापासून भारती पाटील यांनी शिक्षण समितीच्या कक्षाचा ताबा घेतला. त्यामुळे तापेश्वर वैद्य यांना कृषी समितीच्या कक्षात बसावे लागले. पण समितीचे सभापती कोण, हे काही निश्चित झाले नव्हते. सूत्राच्या माहितीनुसार भारती पाटील यांनी शिक्षण समितीच्या सभापतीसाठी विषय प्रतिष्ठेचा केला होता. तिकडे तापेश्वर वैद्य यांनी कृषीत राम नसल्याची ओरड करीत शिक्षणाकडे लक्ष वेधले होते. त्यामुळे विषय समितीवर सभापती निवडीचा तिढा वाढतच होता. १७ फेब्रुवारी रोजी झालेल्या आमसभेत हा तिढा सुटेल अशी अपेक्षा होती. पण सूत्रांच्या माहितीनुसार सभागृहातच घोषणा झाली असती, तर गोधळ उडाला असता, अशी भीती असल्याने सभापती निवडीचा चेंडू जि.प. अध्यक्षाच्या कोर्टात टाकला. या निर्णयामुळे सभापतींमध्ये रस्सीखेच सुरू असल्याची चर्चा रंगली. काँग्रेसमध्ये अंतर्गत वादाची ठिणगी पडल्याची चर्चा सुरू झाली. तिकडे राष्ट्रवादीने विषय समितीच्या सभापती निवडीवरून काँग्रेसला घरचा अहेर दिला.सभापती निवडीवरून चौफेर टार्गेट होत असल्याचे लक्षात घेता, सोमवारी पशुसंवर्धन मंत्री सुनील केदार यांच्या नेतृत्वात तातडीने बैठक घेऊन सभापतींची निवड करण्यात आली. शिक्षण व वित्त समिती, कृषी व पशुसंवर्धन समितीसाठी सभापती निवडल्यामुळे बांधकाम व आरोग्य समिती उपाध्यक्ष मनोहर कुंभारे यांच्याकडे सोपविण्यात आली.आम्ही नाराज नव्हतोचसभापती निवडीची घोषणा झाल्यानंतर सायंकाळच्या सुमारास तापेश्वर वैद्य व भारती पाटील जिल्हा परिषदेत आल्या. वैद्य यांनी मिळालेल्या जबाबदारीबद्दल समाधानी असल्याचे सांगितले. आम्ही नाराज नव्हतोच तांत्रिक कारणाने वाटपास उशीर झाल्याचे ते म्हणाले. पण त्यांनी कृषीत काही राम नसल्याची खंत वारंवार बोलून दाखविली. भाजप सत्तेत असताना कृषीकडे लक्ष न दिल्याने कृषीच्या सर्व योजना राज्याकडे स्थानांतरित झाल्यामुळे, काम करण्यास स्कोप नसल्याची भावना बोलून दाखविली.

 

टॅग्स :Nagpur Z.P.जिल्हा परिषद नागपूर