शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
2
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
3
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
4
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
5
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
6
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
7
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
8
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
9
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
10
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
11
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
12
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
13
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
14
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
15
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
16
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
17
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन
18
बीडची लेक अन् जावयाची काश्मीरमध्ये पर्यटकांना मदत; दहशतवाद्यांविरोधात आंदोलनही केलं
19
सर्जिकल स्ट्राईकपेक्षा मोठा हल्ला; अजित डोभाल कामाला लागले, पाकिस्तावर मोठी कारवाई होणार?
20
पहलगाम हल्ला: मृतांच्या कुटुंबीयांना ५ लाख रुपयांची मदत देणार; CM देवेंद्र फडणवीसांची घोषणा

नागपूर जिल्हा परिषद : अखेर तडजोडीतून सुटला विषय समितीची तिढा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 24, 2020 20:30 IST

विषय समितीच्या सभापतींवरून रंगलेल्या चर्चेला अखेर काँग्रेसने विराम दिला. भारती पाटील यांच्याकडे शिक्षण व वित्त समितीची जबाबदारी दिली तर कृषी व पशुसंवर्धन समितीचे तापेश्वर वैद्य सभापती बनले.

ठळक मुद्देपाटील यांच्याकडे शिक्षण, वैद्य यांना मिळाले कृषी

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : विषय समितीच्या सभापतींवरून रंगलेल्या चर्चेला अखेर काँग्रेसने विराम दिला. भारती पाटील यांच्याकडे शिक्षण व वित्त समितीची जबाबदारी दिली तर कृषी व पशुसंवर्धन समितीचे तापेश्वर वैद्य सभापती बनले.सोमवारी सकाळी पशुसंवर्धनमंत्री सुनील केदार यांच्याकडे झालेल्या काँग्रेस नेत्यांच्या बैठकीत यावर शिक्कामोर्तब झाले. त्यानंतर दुपारी जि.प.अध्यक्षा रश्मी बर्वे यांनी विषय समितीच्या वाटपाची घोषणा केली. अध्यक्ष आणि उपाध्यक्षाच्या निवडीनंतर ३० जानेवारीला सभापतींची निवड झाली होती. निवड झाल्याच्या दुसऱ्या दिवसापासून भारती पाटील यांनी शिक्षण समितीच्या कक्षाचा ताबा घेतला. त्यामुळे तापेश्वर वैद्य यांना कृषी समितीच्या कक्षात बसावे लागले. पण समितीचे सभापती कोण, हे काही निश्चित झाले नव्हते. सूत्राच्या माहितीनुसार भारती पाटील यांनी शिक्षण समितीच्या सभापतीसाठी विषय प्रतिष्ठेचा केला होता. तिकडे तापेश्वर वैद्य यांनी कृषीत राम नसल्याची ओरड करीत शिक्षणाकडे लक्ष वेधले होते. त्यामुळे विषय समितीवर सभापती निवडीचा तिढा वाढतच होता. १७ फेब्रुवारी रोजी झालेल्या आमसभेत हा तिढा सुटेल अशी अपेक्षा होती. पण सूत्रांच्या माहितीनुसार सभागृहातच घोषणा झाली असती, तर गोधळ उडाला असता, अशी भीती असल्याने सभापती निवडीचा चेंडू जि.प. अध्यक्षाच्या कोर्टात टाकला. या निर्णयामुळे सभापतींमध्ये रस्सीखेच सुरू असल्याची चर्चा रंगली. काँग्रेसमध्ये अंतर्गत वादाची ठिणगी पडल्याची चर्चा सुरू झाली. तिकडे राष्ट्रवादीने विषय समितीच्या सभापती निवडीवरून काँग्रेसला घरचा अहेर दिला.सभापती निवडीवरून चौफेर टार्गेट होत असल्याचे लक्षात घेता, सोमवारी पशुसंवर्धन मंत्री सुनील केदार यांच्या नेतृत्वात तातडीने बैठक घेऊन सभापतींची निवड करण्यात आली. शिक्षण व वित्त समिती, कृषी व पशुसंवर्धन समितीसाठी सभापती निवडल्यामुळे बांधकाम व आरोग्य समिती उपाध्यक्ष मनोहर कुंभारे यांच्याकडे सोपविण्यात आली.आम्ही नाराज नव्हतोचसभापती निवडीची घोषणा झाल्यानंतर सायंकाळच्या सुमारास तापेश्वर वैद्य व भारती पाटील जिल्हा परिषदेत आल्या. वैद्य यांनी मिळालेल्या जबाबदारीबद्दल समाधानी असल्याचे सांगितले. आम्ही नाराज नव्हतोच तांत्रिक कारणाने वाटपास उशीर झाल्याचे ते म्हणाले. पण त्यांनी कृषीत काही राम नसल्याची खंत वारंवार बोलून दाखविली. भाजप सत्तेत असताना कृषीकडे लक्ष न दिल्याने कृषीच्या सर्व योजना राज्याकडे स्थानांतरित झाल्यामुळे, काम करण्यास स्कोप नसल्याची भावना बोलून दाखविली.

 

टॅग्स :Nagpur Z.P.जिल्हा परिषद नागपूर