शहरं
Join us  
Trending Stories
1
Parth Pawar Land Deal: भूखंड खरेदी प्रकरणात तिघांविरोधात गुन्हा दाखल, FIR मध्ये पार्थ पवारांचे नाव नाही 
2
प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री सुलक्षणा पंडित यांचं निधन, मुंबईतील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
3
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
4
...अखेर मनोहर शिंदेंनी दाखवला काँग्रेसला 'हात'! पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह जिल्हाध्यक्षांना पाठवला राजीनामा
5
पुण्यातील इंजिनिअरचे साडेनऊ तोळे सोने घेऊन पळाला, पोलिसांनी 'साशी गँग'च्या सदस्याला हरयाणात केली अटक
6
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
7
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
8
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
9
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
10
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
11
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
12
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
13
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
14
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
15
नागपुरात सडक्या सुपारीचे दलाल परत सक्रिय, सहा हजार किलोंहून अधिक माल जप्त
16
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
17
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
18
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
19
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
20
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात

नागपूर जिल्हा परिषद : अखेर तडजोडीतून सुटला विषय समितीची तिढा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 24, 2020 20:30 IST

विषय समितीच्या सभापतींवरून रंगलेल्या चर्चेला अखेर काँग्रेसने विराम दिला. भारती पाटील यांच्याकडे शिक्षण व वित्त समितीची जबाबदारी दिली तर कृषी व पशुसंवर्धन समितीचे तापेश्वर वैद्य सभापती बनले.

ठळक मुद्देपाटील यांच्याकडे शिक्षण, वैद्य यांना मिळाले कृषी

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : विषय समितीच्या सभापतींवरून रंगलेल्या चर्चेला अखेर काँग्रेसने विराम दिला. भारती पाटील यांच्याकडे शिक्षण व वित्त समितीची जबाबदारी दिली तर कृषी व पशुसंवर्धन समितीचे तापेश्वर वैद्य सभापती बनले.सोमवारी सकाळी पशुसंवर्धनमंत्री सुनील केदार यांच्याकडे झालेल्या काँग्रेस नेत्यांच्या बैठकीत यावर शिक्कामोर्तब झाले. त्यानंतर दुपारी जि.प.अध्यक्षा रश्मी बर्वे यांनी विषय समितीच्या वाटपाची घोषणा केली. अध्यक्ष आणि उपाध्यक्षाच्या निवडीनंतर ३० जानेवारीला सभापतींची निवड झाली होती. निवड झाल्याच्या दुसऱ्या दिवसापासून भारती पाटील यांनी शिक्षण समितीच्या कक्षाचा ताबा घेतला. त्यामुळे तापेश्वर वैद्य यांना कृषी समितीच्या कक्षात बसावे लागले. पण समितीचे सभापती कोण, हे काही निश्चित झाले नव्हते. सूत्राच्या माहितीनुसार भारती पाटील यांनी शिक्षण समितीच्या सभापतीसाठी विषय प्रतिष्ठेचा केला होता. तिकडे तापेश्वर वैद्य यांनी कृषीत राम नसल्याची ओरड करीत शिक्षणाकडे लक्ष वेधले होते. त्यामुळे विषय समितीवर सभापती निवडीचा तिढा वाढतच होता. १७ फेब्रुवारी रोजी झालेल्या आमसभेत हा तिढा सुटेल अशी अपेक्षा होती. पण सूत्रांच्या माहितीनुसार सभागृहातच घोषणा झाली असती, तर गोधळ उडाला असता, अशी भीती असल्याने सभापती निवडीचा चेंडू जि.प. अध्यक्षाच्या कोर्टात टाकला. या निर्णयामुळे सभापतींमध्ये रस्सीखेच सुरू असल्याची चर्चा रंगली. काँग्रेसमध्ये अंतर्गत वादाची ठिणगी पडल्याची चर्चा सुरू झाली. तिकडे राष्ट्रवादीने विषय समितीच्या सभापती निवडीवरून काँग्रेसला घरचा अहेर दिला.सभापती निवडीवरून चौफेर टार्गेट होत असल्याचे लक्षात घेता, सोमवारी पशुसंवर्धन मंत्री सुनील केदार यांच्या नेतृत्वात तातडीने बैठक घेऊन सभापतींची निवड करण्यात आली. शिक्षण व वित्त समिती, कृषी व पशुसंवर्धन समितीसाठी सभापती निवडल्यामुळे बांधकाम व आरोग्य समिती उपाध्यक्ष मनोहर कुंभारे यांच्याकडे सोपविण्यात आली.आम्ही नाराज नव्हतोचसभापती निवडीची घोषणा झाल्यानंतर सायंकाळच्या सुमारास तापेश्वर वैद्य व भारती पाटील जिल्हा परिषदेत आल्या. वैद्य यांनी मिळालेल्या जबाबदारीबद्दल समाधानी असल्याचे सांगितले. आम्ही नाराज नव्हतोच तांत्रिक कारणाने वाटपास उशीर झाल्याचे ते म्हणाले. पण त्यांनी कृषीत काही राम नसल्याची खंत वारंवार बोलून दाखविली. भाजप सत्तेत असताना कृषीकडे लक्ष न दिल्याने कृषीच्या सर्व योजना राज्याकडे स्थानांतरित झाल्यामुळे, काम करण्यास स्कोप नसल्याची भावना बोलून दाखविली.

 

टॅग्स :Nagpur Z.P.जिल्हा परिषद नागपूर