शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

नागपूर जिल्हा परिषदेच्या ३३ कोटी ८७ लाखांचा अर्थसंकल्पाला मंजुरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 28, 2020 01:01 IST

जिल्हा परिषदेचा वर्ष २०२०-२१ करिता ३३ कोटी ८७ लाखांच्या अर्थसंकल्पाला मुख्य कार्यकारी अधिकारी संजय यादव यांनी मंजुरी दिली.

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : जिल्हा परिषदेचा वर्ष २०२०-२१ करिता ३३ कोटी ८७ लाखांच्या अर्थसंकल्पाला मुख्य कार्यकारी अधिकारी संजय यादव यांनी मंजुरी दिली. वर्ष २०१९-२० च्या तुलनेत ४ कोटीने कमीचा हा अर्थसंकल्प आहे. जिल्हा परिषदेच्या इतिहासात पहिल्यांदाच कमीचा अर्थसंकल्प सादर केला आहे. अर्थ समितीकडून तयार करण्यात आलेल्या अर्थसंकल्पावर सीईओ यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत चर्चा झाली. या बैठकीत सर्व विभागप्रमुख उपस्थित होते. यामुळे तयार होणारा कायद्याचा पेच टाळण्यात आला. वर्ष २०२०-२१ च्या अर्थसंकल्पात आरोग्यासाठी अतिरिक्त तरतूद करण्यात आल्याचे समजते. गेल्यावर्षीच्या तुलनेत हा अर्थसंकल्प वास्तविकतेवर आधारित असल्याचे सांगण्यात येते.सीईओच देणार मान्यता : भविष्यात होणाऱ्या सभेत मांडणार अहवालकोरोनाच्या खबरदारीच्या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषदेची अर्थसंकल्पीय सभा रद्द करण्यात आली आहे. जिल्हा परिषदेच्या कायद्यानुसार ही सभा २७ मार्चपूर्वी घ्यायची होती. सभाच झाली नसल्याने शासनाकडे अर्थसंकल्प मान्यतेसाठी पाठविण्यात आला नाही. त्यामुळे वित्त विभागाने राज्यातील सर्व जि.प.च्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना अर्धसंकल्पाला मान्यता देण्याचे अधिकार प्रदान केले आहेत.जिल्हा परिषदेची अर्थसंकल्पीय सभा २७ मार्चपूर्वी घेणे शक्य नसल्याने अर्थसंकल्पाबाबत राज्य सरकारने पुढील मार्गदर्शन करावे, अशी विनंती जिल्हा परिषदेच्या वतीने राज्य सरकारकडे केली होती. यावर वित्त विभागाने दिलेल्या उत्तरात अर्थसंकल्पाचे अधिकार मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी संपूर्ण देशात व राज्यात कठोर पावले उचलण्यात आलेली आहेत. राज्यात जमावबंदी लावण्यात आली आहे. अशा स्थितीत आमसभा होणे शक्य नसून जिल्हा परिषदांचे २०१९-२० चे अंतिम सुधारित आणि २०२०-२१ चे मूळ अंदाजपत्रक मान्य होणे शक्य नाही. त्याचे विपरीत परिणाम जिल्ह्यातील सर्वच मुख्यत्वे आरोग्यविषयक कामांवर पडतील. त्यामुळे अशा परिस्थितीत संबंधित मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी २०१९-२० चे अंतिम सुधारित आणि २०२०-२१ चे मूळ अंदाजपत्रक यांना मान्यता द्यावी व स्थिती नियंत्रणात आल्यानंतर संपन्न होणाऱ्या जिल्हा परिषदेच्या आमसभेत या अंदाजपत्रकाचा अहवाला मांडावा, असे वित्त विभागाचे उप-सचिव प्रवीणकुमार जैन यांनी सूचित केले आहे.२४ मार्च रोजी जि. प. ची अर्थसंकल्पीय सभा होणार होती. याला जिल्हाधिकाऱ्यांनी परवानगीसुद्धा दिली होती. त्यामुळे सभेसाठी आवश्यक सर्व काळजी घेतली जाणार होती. मात्र नंतर परिस्थिती बदलली, विरोधी पक्षानेसुद्धा सभा रद्द करण्याची मागणी केली. त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी सभा रद्द करण्याचे आदेश दिले. सभा रद्द झाल्याचे सीईओ यादव यांनी राज्य सरकारला कळविले व पुढील मार्गदर्शनाची विनंती केली. यावर जैन यांनी ही मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना अधिकार बहाल करणारे परिपत्रक गुरुवारी काढले.काही बदल करण्याचे अधिकार पुढील आमसभेला असतीलयाबाबत जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजय यादव म्हणाले, सरकारने स्थितीचे गांभीर्य आणि अंदाजपत्रकाचे महत्त्व लक्षात घेता मुख्य कार्यकारी अधिकारी या नात्याने हे अंदाजपत्रक मान्य करण्याचे अधिकार दिले आहेत. पुढील सभेत याचा अहवाल सादर केला जाईल. त्यात काही बदल करण्याचे अधिकार आमसभेला असतील. कोणतीही कामे विशेषत: आरोग्य विभागाची कामे खोळंबू नयेत यासाठी हे पाऊल उचलले गेले आहे.

 

 

टॅग्स :Nagpur Z.P.जिल्हा परिषद नागपूरBudgetअर्थसंकल्प