शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
2
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
4
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
5
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
6
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
7
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
8
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
9
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
10
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
11
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
12
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
13
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
14
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
15
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
16
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
17
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
18
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
19
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
20
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...

नागपुरात तरुणीचे अपहरण करून मध्यप्रदेशात केली विक्री

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 18, 2019 14:45 IST

गुंगीच्या पदार्थाचा रुमाल नाकाला लावून बेशुद्ध केल्यानंतर चौघांनी नागपूरमधील एका तरुणीला मध्यप्रदेशात नेले. तेथे एका व्यक्तीला तिची ७५ हजार रुपयात विक्री करून आरोपींनी तिचे त्याच्यासोबत लग्न लावून दिले. या घटनेचा तब्बल सात महिन्यांनंतर उलगडा झाला.

ठळक मुद्देबेशुद्ध करून मध्यप्रदेशात नेले७५ हजारात विकलेलग्नानंतर सात महिन्यांनी उलगडा

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : गुंगीच्या पदार्थाचा रुमाल नाकाला लावून बेशुद्ध केल्यानंतर चौघांनी गिट्टीखदानमधील एका तरुणीला मध्यप्रदेशात नेले. तेथे एका व्यक्तीला तिची ७५ हजार रुपयात विक्री करून आरोपींनी तिचे त्याच्यासोबत लग्न लावून दिले. जुलै २०१८ मध्ये घडलेल्या या घटनेचा तब्बल सात महिन्यांनंतर उलगडा झाला. या प्रकरणी पोलिसांनी तीन महिलांसह चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.२२ वर्षीय तरुणीने नोंदविलेल्या तक्रारीनुसार, आरोपी आशा रोकडे, उषा रोकडे, चंदा गजभिये आणि त्यांचा एका साथीदार हे सर्व गिट्टीखदानमधील जगदीशनगरात तरुणीच्या शेजारी राहतात. त्यामुळे तरुणीसोबत त्यांची बोलचाल होती. तरुणीचे पालक तिच्या लग्नासाठी वर शोधत होते. ते माहित असल्यामुळे तरुणीसोबत आशा, उषा आणि चंदाने सलगी वाढवली. तिला चांगला वर शोधून देतो, असे सांगून १४ जुलै २०१८ ला दुपारी १२ च्या सुमारास आपल्या घरी बोलविले. तेथे बोलता बोलता आरोपीने तिच्या नाकावर रुमाल ठेवला. ती बेशुद्ध झाल्यानंतर आरोपींनी तिला तशाच अवस्थेत मध्यप्रदेशातील शहजानपूर येथे नेले. तेथील अशोक कैलास सिसोदिया याला ७५ हजार रुपयात तरुणीला विकले. त्यानंतर सिसोदियासोबत तिचे लग्न लावून दिले. यावेळी आरोपी महिलांनी सिसोदियाला आपली ओळख तरुणीची आई तसेच मावशीच्या रुपात दिली.दरम्यान, तरुणीचा संसार सुरळीत सुरू झाला. आता सात महिन्यानंतर तरुणी आणि तिचा पती सिसोदिया कौटुंबिक गप्पा करीत असताना त्यांच्यात लग्नापूर्वीच्या गोष्टी निघाल्या. यावेळी सिसोदियाने तुझी मला विक्री करताना तुझ्या आई आणि मावशीने ७५ हजार रुपये माझ्याकडून घेतल्याचे तरुणीला सांगितले. तेव्हा या प्रकरणाचा उलगडा झाला. आशा, उषा आणि चंदा पैकी कुणीच नातेवाईक नसल्याचे तरुणीने सांगितले. त्यानंतर सिसोदिया आणि त्याची पत्नी (तक्रारदार तरुणी) शहजानपूरच्या पोलीस ठाण्यात तेले. त्यांनी सर्व माहिती तेथील पोलिसांना दिली. शहजानपूर पोलिसांनी गिट्टीखदान पोलिसांना कळविले. त्यानंतर सिसोदिया दाम्पत्य शुक्रवारी नागपुरात पोहचले. तरुणीने दिलेल्या तक्रारीवरून गिट्टीखदान पोलिसांनी आरोपी आशा, उषा, चंदा आणि त्यांच्या एका साथीदाराविरुद्ध अपहरण करून तरुणीची विक्री केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला.त्यांचा तोच धंदा ?आरोपी महिला सध्या परप्रांतात गेल्या आहेत. त्यांनी पुन्हा कुण्या दुस-या तरुणीला अशाच प्रकारे तिकडे नेले असावे, असा संशय आहे. एका विशिष्ट समाजातील रितीरिवाजाप्रमाणे लग्नाच्या बदल्यात वधूच्या माहेरच्यांना वर पक्षाकडून रोख स्वरूपात रक्कम दिली जाते. आरोपी महिला आणि त्यांचे साथीदार गरजू तरुणींना भूलथाप देऊन बाहेर प्रांतात नेत असावे आणि त्यांची तिकडे विक्री करीत असावेत, असा संशय आहे. पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.

 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी