शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
5
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
6
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
7
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
8
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
9
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
10
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
11
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
12
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
13
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
14
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
15
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
16
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
17
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
18
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
19
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
20
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?

नागपूर हिवाळी अधिवेशन २०१९; अजित पवारप्रकरणी मंत्र्यांना सोडून अधिकाऱ्यांना अडकवण्याचा प्रयत्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 20, 2019 15:30 IST

: लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) अजित पवारांना दिलेल्या क्लीन चीटच्या आधारावर महासंचालक परमवीरसिंग यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात सादर केलेले प्रतिज्ञापत्र हे दिशाभूल करणारे असल्याचे स्पष्ट मत माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर: लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) अजित पवारांना दिलेल्या क्लीन चीटच्या आधारावर महासंचालक परमवीरसिंग यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात सादर केलेले प्रतिज्ञापत्र हे दिशाभूल करणारे असल्याचे स्पष्ट मत माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले आहे.विधानभवन परिसरात आज शुक्रवारी दुपारी त्यांनी प्रसिद्धीमाध्यमांशी संवाद साधला.न्यायालयात सादर केलेलं प्रतिज्ञापत्र हे अधिकाऱ्यांना दोषी ठरवणारं असून ते चुकीचं असल्याचं ते यावेळी म्हणाले. जाणीवपूर्वक सगळी जबाबदारी अधिकाऱ्यांवर ढकलली जात आहे. अतिशय सोयीस्कर असे अर्थ त्यातून काढले जात आहेत. या प्रकरणी आवश्यकता भासल्यास आम्ही उच्च न्यायालयात मध्यस्थी करू ही  बाब न्यायप्रविष्ट असल्यामुळे सभागृहात त्याच्यावर मत मांडणे योग्य ठरणार नाही. सादर करण्यात आलेले प्रतिज्ञापत्र हे सारांश स्वरुपातले असल्याने यात सत्य लपविण्यात आले आहे. त्यात संशयाला वाव आहे. याप्रकरणी तपास अजूनही संपलेला नाही असे ते पुढे म्हणाले. आमचे सरकार राज्यात असताना आम्ही या प्रकरणी कोणालाही क्लीन चिट दिलेली नाही. आम्ही २६ नोव्हेंबरला राजीनामा दिला आणि प्रतिज्ञापत्र २७ नोव्हेंबरला सादर करण्यात आले होते, असे ते पुढे म्हणाले. 26 नोव्हेंबर 2018 रोजीच्या प्रतिज्ञापत्रात अजित पवार सिंचन घोटाळ्यास जबाबदार असल्याचे सांगण्यात आले होते. परंतु, तो निष्कर्ष त्यावेळी उपलब्ध असलेल्या माहितीच्या आधारावर काढण्यात आला होता. मात्र आता सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात त्यावेळचे मुद्दे समाविष्ट करण्यात आलेले नाहीत. हे एक विसंगत प्रतिज्ञापत्र आहे असे परखड मत त्यांनी मांडले.

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसWinter Session Maharashtraविधानसभा हिवाळी अधिवेशन