शहरं
Join us  
Trending Stories
1
लाडकी बहीण अन् काय काय...! वर्षात १२ राज्यांनी महिलांना वाटले तब्बल १.६८ लाख कोटी रुपये
2
राहुल गांधींच्या 'हायड्रोजन बॉम्ब'ला निवडणूक आयोगाचे प्रत्युत्तर; 15 मुद्दे मांडत सर्व आरोप फेटाळले
3
देशविरोधी शक्तींसोबत मिळून भारतात षडयंत्र रचलं जातंय; भाजपाचा राहुल गांधींवर गंभीर आरोप
4
सोनाराच्या दुकानात ४ वर्ष काम केलं, रोज थोडं थोडं करून २.५ कोटींचं सोनं गायब केलं! कशी पकडली गेली चोरी?
5
पाकिस्तानातील सर्वात श्रीमंत महिला क्रिकेटर, जिचं नाव कायम चर्चेत; किती संपत्तीची आहे मालकीण?
6
१०० हून अधिक देशांमध्ये २०,००० स्टोअर्स, जागतिक विक्रीत २ टक्के वाढ; तरी का काढलंय विकायला?
7
अमेरिकेतील महापौर भारतातील महापौरापेक्षा किती पॉवरफुल असतो? जगभर इतकी चर्चा का होते?
8
"मी तेजश्रीच्या लग्नासाठी उत्सुक...", सुबोध भावे असं म्हणताच अभिनेत्री काय म्हणाली?
9
“उद्धव ठाकरेंचा निवडणुकीसाठी दौरा, CM असताना शेतकऱ्यांना काय दिले?”; शिंदे गटाचा पलटवार
10
Bigg Boss 19: 'बिग बॉस हिंदी'कडून मराठमोळ्या प्रणित मोरेवर अन्याय? शोसाठी मिळालं सगळ्यांपेक्षा कमी मानधन
11
Moto G67 Power: ७०००mAh बॅटरी आणि चार कॅमेरे; मोटो जी६७ पॉवर भारतात लॉन्च!
12
भारत, चीन, तुर्कस्तान... तीन देशांनी घेतला असा निर्णय की रशियाला होतंय नुकसान, ट्रम्प यांच्यामुळे नाईलाज
13
"अभी नहीं तो कभी नहीं!" अभिषेक शर्माला किंग कोहलीच्या ऑल टाइम रेकॉर्डची बरोबरी करण्याची शेवटची संधी
14
परदेशी सहल बजेटमध्ये! 'या' ५ देशांमध्ये भारतीय रुपया आहे मजबूत; कमी खर्चात करा परदेशवारी
15
महिला 'वर्ल्ड कप' पराभवानंतर कर्णधाराकडून खेळाडूंना मारहाण; वरिष्ठ खेळाडूच्या आरोपाने क्रिकेटविश्व हादरले
16
बिहारमध्ये एनडीएला मोठा धक्का! मतदानाच्या तोंडावर भाजप आमदाराने राजदमध्ये प्रवेश केला; नाराज का झाला...
17
देव दिवाळीच्या मुहुर्तावर सोनं पुन्हा स्वस्त...! पटापट चेक करा तुमच्या शहरातील लेटेस्ट रेट
18
चिंताजनक! शेजारच्या देशात जीवघेण्या आजाराचं थैमान; २९२ जणांचा मृत्यू, भारतासाठी धोक्याची घंटा
19
ढाका पोहोचण्याआधीच जाकिर नाईकला मोठा 'झटका'! भारताच्या दबावापुढे बांगलादेश झुकला?
20
राहुल गांधीचा हायड्रोजन बॉम्ब! 'एका महिलेचे 223 वेळा नाव; हरियाणात 25 लाख मतांची चोरी'

नागपूर हिवाळी अधिवेशन २०१९; अजित पवार सरकारवर भडकले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 21, 2019 11:25 IST

राष्ट्रवाद काँग्रेसचे अजित पवार हे अधूनमधून आपल्याच सरकारवर बरसत असतात. शनिवारी सुद्धा असेच काहीसे चित्र दिसून आले.

ठळक मुद्देम्हणाले मंत्री मंडळाचा विस्तार करायला कुणी रोखले होतेमंत्री उपस्थित नसल्याने सभागृहातील कामकाज स्थगित करावे लागले

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : राज्यात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाले असले तरी तिन्ही पक्षात अजुनही सर्व काही सुरळीत सुरु आहे, असे म्हणता येत नाही. राष्ट्रवाद काँग्रेसचे अजित पवार हे अधूनमधून आपल्याच सरकारवर बरसत असतात. शनिवारी सुद्धा असेच काहीसे चित्र दिसून आले. विधानसभेत मंत्री उपस्थित नसल्याचा मुद्यावर विरोधीपक्षाने आक्षेप घेतला असता अजित पवारही सरकारवर बरसले.शनिवारी हिवाळी अधिवेशनाचा शेवटचा दिवस होता. सकाळी १० वाजता सभागृहाचे कामकाज सुरु झाले. परंतु यावेळी एकह मंत्री उपस्थित नव्हते. विरोधी पक्षातील सदस्यांनी यावर आक्षेप घेतला. विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी दरम्यान औचित्याचे मुद्दे पुकारले. यावरही विरोधी पक्षाने आक्षेप घेतला. भाजपचे चंद्रकांत दादा पाटील यांनी मंत्री उपस्थित नसताना कामकाज चालवणे योग्य नाही. काही वेळ कामकाज स्थगित करा, अशी मागणी केली. दरम्यान राष्ट्रवादी कॉँग्रेसचे अजित पवारही भडकले. ते म्हणाले ‘‘ गेल्या २५ वर्षापासून मी या सभागृहात आहे. परंतु असे चित्र कधी पाहिले नाही. कॅबिनेट मंत्री उपस्थित नसताना सभाागृहााचे कामकाज चालूच शकत नाही. मंत्री कमी आहे. मग मंत्रिमंडळचा विस्तार करायला कुणी थांबवले होते’’ असा सवालही त्यांनी केला. यानंतर विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी १० मिनिटांसाठी कामकाज स्थगित केले. एकूणच अजित पवार यांच्या या संतापानंतर महाविकास आघाडीत सर्व काही आलबेल आहे का? अशी चर्चा सुरु झाली आहे.

टॅग्स :Ajit Pawarअजित पवारWinter Session Maharashtraविधानसभा हिवाळी अधिवेशन