शहरं
Join us  
Trending Stories
1
Parth Pawar Land Deal: भूखंड खरेदी प्रकरणात तिघांविरोधात गुन्हा दाखल, FIR मध्ये पार्थ पवारांचे नाव नाही 
2
प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री सुलक्षणा पंडित यांचं निधन, मुंबईतील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
3
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
4
...अखेर मनोहर शिंदेंनी दाखवला काँग्रेसला 'हात'! पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह जिल्हाध्यक्षांना पाठवला राजीनामा
5
पुण्यातील इंजिनिअरचे साडेनऊ तोळे सोने घेऊन पळाला, पोलिसांनी 'साशी गँग'च्या सदस्याला हरयाणात केली अटक
6
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
7
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
8
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
9
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
10
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
11
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
12
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
13
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
14
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
15
नागपुरात सडक्या सुपारीचे दलाल परत सक्रिय, सहा हजार किलोंहून अधिक माल जप्त
16
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
17
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
18
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
19
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
20
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात

नागपूर हिवाळी अधिवेशन २०१९; नागरिकत्व सुधारणा कायद्याविरोधातील मोर्चे शांततेत काढावेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 20, 2019 16:27 IST

राज्यात काढण्यात येणारे मोर्चे शांततेत काढाले जावेत असे आवाहन राज्याचे गृह मंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानभवन परिसरात केले.

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर: नागरिकत्व सुधारणा कायद्याच्या विरोधात देशात काढण्यात येत असलेल्या मोर्चांना अनेक ठिकाणी गालबोट लागले आहे. महाराष्ट्रात अनेक जागी धर्म पंथाचे लोक राहतात. राज्यात काढण्यात येणारे मोर्चे शांततेत काढाले जावेत असे आवाहन राज्याचे गृह मंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानभवन परिसरात केले.लोकशाही मार्गाने मोर्चे काढल्यास उद्दिष्टही साध्य होते. नेत्यांनी लोकांना शांततेच्या मार्गाने निषेध करण्याचे आवाहन करावे आणि पोलिसांना सहकार्य करावे. कुठेही अनुचित प्रकार घडू नये याची काळजी नेत्यांनी घ्यावी. कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी नेत्यांनी आणि लोकांनी पोलिसांन सहकार्य करावे असे ते पुढे म्हणाले. एका प्रश्नाच्या उत्तरादाखल ते म्हणाले, राज्यात महिला निर्भयपणे वावराव्यात याकरिता आंध्रप्रदेशात तयार करण्यात आलेल्या दिशा कायद्यावर मुख्यमंत्र्यांशी बोलणे झालेले आहे. आरोपींना मृत्युदंडापर्यंत शिक्षा झालीच पाहिजे. आंध्रचा कायदा आम्ही तपासून पाहू, शिवाय राज्यातील यासंदर्भातील कायदे तपासून पाहण्याबाबत चर्चा करू असे ते पुढे म्हणाले.अजित पवार यांना क्लीन चिट देण्याच्या संदर्भात ते म्हणाले, ही न्यायालयीन बाब आहे व त्यावर बोलणे योग्य नाही.नारायण राणे यांचा जळफळाटमहाविकास आघाडीचे सरकार जास्त दिवस टिकणार नाही असे वक्तव्य नारायण राणे यांनी आज एका पत्रपरिषदेत केले होते. ते मुख्यमंत्री शिवसेनेमुळेच झाले होते, हे त्यांनी विसरू नये. महाविकास आघाडीचे सरकार आहे. शिवसेनेची भूमिका कायम आहे. किमान समान कार्यक्रमानुसार शेतकऱ्यांपासून नागरिकांपर्यंत सर्वांना सुरक्षा प्रदान करण्याचे काम सरकारचे आहे. नारायण राणे यांच्या वक्तव्यातून त्यांचा जळफळाट दिसून येतो अशी टीका एकनाथ शिंदे यांनी केली.

टॅग्स :Winter Session Maharashtraविधानसभा हिवाळी अधिवेशनEknath Shindeएकनाथ शिंदे