शहरं
Join us  
Trending Stories
1
“राज्यात हिंदी सक्ती धोरण उद्धव ठाकरेंनी स्वीकारले, आदित्य ठाकरेंकडून पाठराखण”; कुणाचा दावा?
2
राज ठाकरेंच्या मोर्चात जाणार का? शरद पवारांचे सूचक विधान; म्हणाले, “दोन्ही ठाकरे बंधू...”
3
इंडियन एअर फोर्समध्ये अग्निवीर होण्याची सुवर्णसंधी...! 11 जुलैपासून सुरू होणार अर्ज प्रक्रिया; जाणून घ्या सविस्तर
4
भारताच्या 'ध्वनि'मुळे शत्रू हादरेल, पाकिस्तान अन् चीनमध्येही उडेल खळबळ! कसं आहे नवं क्षेपणास्त्र?
5
मनसेनं मोर्चाची तारीख बदलली, राज ठाकरेंनी जारी केलं निवेदन, काय म्हणाले? जाणून घ्या...
6
“दिल्लीतील आकाच्या इशाऱ्याने शक्तिपीठ महामार्गाचा घाट, हिंदी सक्तीला विरोधच”; काँग्रेस ठाम
7
आषाढ गुप्त नवरात्र प्रारंभ, वराही देवीची पूजा आणि लवकर विवाह ठरण्यासाठी उपयुक्त मंत्र
8
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
9
"एनआरसी सारखे षड्‍यंत्र..."; बिहारमधील मतदार यादीवरून ममता बॅनर्जी यांचा निवडणूक आयोगाला टोला
10
'अमेरिकेच्या थोबाडीत मारली...', युद्धविराम जाहीर केल्यानंतर खामेनी यांनी केला विजयाचा दावा
11
..त्यामुळे हिंदी सक्तीचे नकोच; राज्य शासनाने हट्ट सोडावा, शरद पवार यांचा सल्ला 
12
“जनतेच्या पैशातून शेतकरी योजना, नरेंद्र मोदी पैसे देतात हा भाजपाचा भ्रम”: हर्षवर्धन सपकाळ
13
इतिहास घडला! 'ड्रॅगन'मधून शुभांशु शुक्ला आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर पोहोचले, १४ दिवस करणार संशोधन
14
"हिंदी कुठल्याही भाषेची शत्रू नाही..."; भाषावादावर पुन्हा एकदा अमित शाह स्पष्ट बोलले
15
जगन्नाथ रथयात्रा 2025: लाखो भाविक अनुभवतात अद्भूत सोहळा; पाहा, प्रथा, परंपरा, महात्म्य अन् महत्त्व
16
२०३३ पर्यंत भारतात अजून काय-काय घडेल? जगन्नाथ पुरी मंदिराचे मोठे भाकित; पाहा, १० बडे संकेत
17
२८ जुलैपर्यंत मंगळ राहु-केतु अशुभ योग: ८ राशींना बंपर लाभ, बक्कळ पैसा; शुभ-कल्याणाचा काळ!
18
दोन दिग्गज एकत्र आले; अदानी-अंबानी यांच्यात मोठा करार, 'या' क्षेत्रात क्रांती घडणार...
19
"राज्यात मराठीच सक्तीची, पण..."; त्रिभाषा सूत्रावरून भाजपाने स्पष्ट केली भूमिका
20
काँग्रेस नेते शशी थरुर अचानक रशिया दौऱ्यावर; रशियन परराष्ट्र मंत्र्यांची घेतली भेट, कारण काय?

२६/११ चा तपास करणारे शेंगळे नागपुरात !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 14, 2017 21:51 IST

 स्वातंत्र्यानंतर भारतावर सर्वात मोठा दहशतवादी हल्ला पाकिस्तानने करवून घेतला, हे अजमल कसाब जीवंत हाती लागल्यामुळेच सिद्ध होऊ शकले.

- नरेश डोंगरे 

नागपूर, दि. 14 -  स्वातंत्र्यानंतर भारतावर सर्वात मोठा दहशतवादी हल्ला पाकिस्तानने करवून घेतला, हे अजमल कसाब जीवंत हाती लागल्यामुळेच सिद्ध होऊ शकले. देश हादरवून सोडणा-या या हल्ल्याच्या तपास करणारे तसेच हा हल्ला घडवून आणणारा क्रूरकर्मा, पाकिस्तानी दहशतवादी अजमल कसाब याला फासावर टांगण्यात महत्वाची भूमीका वठविणारे तत्कालीन तपास अधिकारी केशव सखाराम शेंगळे यांनी लोकमत प्रतिनिधींशी बोलताना २६/११ च्या आठवणी ताज्या केल्या.  

मुळचे मुंबईतील रहिवासी असलेले शेंगळे १९९० मध्ये पोलीस उपनिरीक्षक म्हणून राज्य पोलीस दलात रुजू झाले. त्यानंतरची सलग २७ वर्षे  मुंबई पोलीस दलात सेवा देताना त्यांनी वेगवेगळळ्या जबाबदा-या सांभाळल्या. २९ जुलैला त्यांची सहायक पोलीस आयुक्त (एसीपी) म्हणून पदोन्नतीवर नागपुरात बदली झाली. आज स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला ते नागपुरात रुजू होण्यासाठी आल्याचे कळाल्यानंतर लोकमतने त्यांना गाठले. २६/ ११ च्या आव्हानात्मक तपासाबाबत त्यांच्याशी चर्चा करताना त्यांनी अनेक बाबींचा उलगडा केला. 

२६/११ चा हल्ला म्हणजे, देशाविरुद्धचे युद्ध होते. त्यामुळे संपूर्ण देश हादरला होता. हा हल्ला करणारा केवळ एक दहशतवादी जीवंत हाती लागला होता आणि केवळ ९० दिवसात या हल्लयाचा तपास पूर्ण करायचा होता. हे आव्हान आम्ही स्विकारले होते.  त्यासाठी  मुख्य तपास अधिकारी रमेश महाले यांच्या नेतृत्वात मी आणि अन्य १० (एकूण १२) अधिकारी तसेच १५० कर्मचा-यांची चमू रात्रंदिवस तपास कामात गुंतली होती. मरण्याच्या तयारीनेच आलेला क्रूरकर्मा कसाब काही बोलायला तयार नव्हता.  देश हादरवणा-या या हल्लयामागे पाकिस्तान आहे हे सांगण्यासाठी तो आढेवेढे घेत होता. पोलिसांच्या चौकशीला टाळत होता.   त्याच्या भाषेला पंजाबी टच होता. स्पष्ट हिंदी बोलत नसला तरी त्याला सारेच समजायचे. त्यामुळे तपास पथकाशी संबंधित पंजाबी महिलांकडून त्याची भाषा समजण्यास मदत होत होती. काहीही बोलायला, विचारायला गेलो की तुम्हारे पास पिस्तूल है... निकालो और मुझे शूट करदो... मै घबराता नही... असे म्हणायचा. आम्ही जन्नत मध्ये जाण्यासाठीच भारतात आलो.  त्याच्याजवळ बनावट आयटी प्रूफ होते. त्यामुळे तो जीवंत हाती लागला म्हणूनच पाकिस्तानी असल्याचे आणि या दहशतवादी हल्लयामागे पाकिस्तानच असल्याचे आपण सिद्ध करू शकलो. ९० दिवसात तपास पूर्ण करण्याचे आव्हान होते. १२ अधिकारी आणि १५० कर्मचा-यांच्या तपास पथकांसह अनेक वरिष्ठांनी रात्रीचा दिवस करून हे आव्हान  पेलले. त्या दिवसात कुणी झोपण्याची कल्पनाही करीत नव्हते अन कुणाला झोपही येत नव्हती. तपासादरम्यानच्या थरारक अनुभवाने आजही अंगावर शहारे उभे राहतात. 

भक्कम पुराव्याची साखळी जोडली गेल्यामुळे कसाबला फासावर टांगता आले. भारतावर सर्वात मोठा हल्ला करणा-या पाकिस्तानी दहशतवाद्याला फासावर टांगण्यासाठी करण्यात आलेल्या तपास पथकात आपण खारीचा वाटा उचलला, ही आपल्यासाठी कायम अभिमानाची बाब राहणार आहे, असेही शेंगळे यांनी सांगितले. 

१६ निघाले, ६ परतले !

२६/ ११ च्या दहशतवादी हल्लयाचा कट आखला गेल्यानंतर भारताकडे कसाबसह १६ पाकिस्तानी दहशतवादी निघाले. मात्र, त्यातील सहा जण वेगवेगळळ्या कारणामुळे माघारी परतले. येथील हिंदू असो अथवा मुसलमान, छोटी मुल असो की वृद्ध, माणसं असो की जनावरं सारेच्या सारेच आमचे शत्रू आहेत, असे तो सांगत होता. त्यांना संपवण्यासाठीच आम्ही आलो. ‘मिशन संपल्यानंतर  शेवटचा बॉम्बस्फोट घडवून स्वत:ही आत्मघात करण्याचा त्यांचा कट होता‘, असे कसाबने अखेर तपास अधिका-यांना माहिती देताना कबुल केले होते.