शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

नागपूर विद्यापीठाची उत्तरपत्रिका मूल्यांकन प्रक्रिया संशयाच्या भोवऱ्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 18, 2019 10:07 IST

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाची उत्तरपत्रिका मूल्यांकन प्रक्रिया संशयाच्या भोवºयात सापडली आहे.

ठळक मुद्देफेरमूल्यांकनात गुणवाढअभियांत्रिकी, विज्ञान, विधी अभ्यासक्रमाचा समावेश

आशिष दुबे।लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाची उत्तरपत्रिका मूल्यांकन प्रक्रिया संशयाच्या भोवºयात सापडली आहे. सामान्यत: उन्हाळी व हिवाळी परीक्षेच्या निकालानंतर फेरमूल्यांकनात विद्यार्थ्यांचे गुण वाढण्याची शक्यता फार कमी असते. परंतु, गेल्या दोन वर्षापासून फेरमूल्यांकनात विद्यार्थ्यांच्या गुणांमध्ये भरमसाट वाढ होत आहे. तसेच, फेरमूल्यांकनासाठी अर्ज करणाºया विद्यार्थ्यांच्या संख्येत वाढ होणेही संशयाला बळ देत आहे.‘लोकमत’ला मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या हिवाळी परीक्षेतील फेरमूल्यांकनात विद्यार्थ्यांचे १० ते २३ पर्यंत गुण वाढले. अभियांत्रिकी, विज्ञान, वाणिज्य, विधी यासह अन्य काही अभ्यासक्रमांतील विद्यार्थ्यांचे गुण सर्वाधिक वाढले.उल्लेखनीय बाब म्हणजे, परीक्षा उत्तीर्ण व अनुत्तीर्ण या दोन्ही प्रकारच्या विद्यार्थ्यांनी फेरमूल्यांकनासाठी अर्ज केले होते. त्यापैकी बहुतांश विद्यार्थ्यांचे गुण वाढले. यामागे काय कारण आहे, याची विचारणा परीक्षा विभागाचे अधिकाऱ्यांना केली असता कुणीच उत्तर दिले नाही.सूत्रांच्या माहितीनुसार, उत्तरपत्रिका मूल्यांकनात अक्षम्य निष्काळजीपणा केला जातो. मूल्यांकनासाठी पात्र व अनुभवी शिक्षकांची नियुक्ती करणे आवश्यक आहे. परंतु, गेल्या दोन वर्षापासून काही अभ्यासक्रम सोडल्यास बहुतांश अभ्यासक्रमाच्या उत्तरपत्रिकांचे मूल्यांकन अपात्र व अनुभवहीन शिक्षक, अंशकालीन शिक्षक व पदव्युत्तर पदवीच्या विद्यार्थ्यांकडून करून घेतले जात आहे.घाईगडबडीने मूल्यांकन संपविण्याच्या प्रयत्नामध्ये उत्तरपत्रिका योग्य पद्धतीने तपासल्या जात नाहीत. त्यामुळे अनेक विद्यार्थी अनुत्तीर्ण झाले किंवा त्यांना अपेक्षेपेक्षा कमी गुण मिळाले. परिणामी, त्यांनी फेरमूल्यांकनासाठी अर्ज केले होते. त्यानंतर त्यांच्या गुणांमध्ये वाढ झाली.

कुणाचेच लक्ष नाहीसूत्रांनी सांगितले की, परीक्षा विभाग व परीक्षा कार्याबाबत प्रचंड उदासीनता आहे. त्यामुळे प्रश्नपत्रिकेतील गोंधळासह उत्तरपत्रिका मूल्यांकनावरही प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहेत. यासंदर्भात अनेक तक्रारी करण्यात आल्या आहेत. परंतु, कोणत्याही प्रकारच्या ठोस उपाययोजना करण्यात आल्या नाहीत. चार स्क्रूटिनियरवर कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आले होते, पण त्यात पुढे काहीच झाले नाही.

टॅग्स :Rashtrasant Tukdoji Maharaj Nagpur Universityराष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ