शहरं
Join us  
Trending Stories
1
संसदेत काय घडतेय? पंतप्रधान मोदी आणि प्रियांका गांधी, सुप्रिया सुळे यांच्यात चाय पे चर्चा...; कटुता विसरून रंगल्या गप्पा
2
पंतप्रधान मोदींनी ओमानमध्ये कानातले घातले? व्हायरल व्हिडिओमागचे सत्य आले समोर; जाणून घ्या नेमका प्रकार काय!
3
काश्मीरमधील जलविद्युत प्रकल्पातील २९ कर्मचाऱ्यांचे दहशतवाद्यांशी संबंध, धक्कादायक माहिती समोर  
4
Video - "आई, माझ्यावर दया करा"; बायकोला घरी पाठवण्यासाठी सासूच्या पाया पडला जावई
5
मुंबईत शिंदेसेनेला ८४ जागा सोडण्यासही भाजपाचा स्पष्ट नकार; दोन्ही पक्षाकडून स्वबळाची तयारी?
6
ओलाचा शेअर रॉकेट बनला, झटक्यात 10% नं भाव वाढला; मालकानं घेतला मोठा निर्णय
7
बड्या उद्योगपतीकडून फडणवीसांचा 'पंतप्रधान' म्हणून उल्लेख; CM स्वतःही अवाक्! नेमकं काय घडलं?
8
बँका सेवांवरील शुल्क वाढवणार, अनेक सुविधा बंद करण्याच्या तयारीत; ग्राहकांसाठी निराशाजनक बातमी
9
२०२६ संपूर्ण वर्ष लाभ, ४ राशींचा भाग्योदय; ४ ग्रह गोचराने इच्छापूर्ती, मनात आणाल ते मिळेल!
10
"मला पॅनिक अटॅक यायचे", आईवडिलांच्या घटस्फोटावर पहिल्यांदाच बोलली गिरिजा ओक, म्हणाली- "त्यांच्या नात्यात..."
11
नवीन वर्ष २०२६: सुख-समृद्धीसाठी ९ प्रभावशाली उपाय, जे बदलून टाकतील तुमचे संपूर्ण आयुष्य!
12
१९७१ नंतरचं सर्वात मोठं संकट, बांगलादेशमधील अस्थिरतेमुळं भारतासमोर ५ मोठी आव्हाने
13
Osman Hadi : कोण आहे हा उस्मान हादी? ज्याच्या मृत्यूने पुन्हा पेटला बांगलादेश; डोक्याला लागली होती गोळी
14
'म्हाडाची जमीन हडपल्याप्रकरणी मंगेश कुडाळकरांवर गुन्हा दाखल करा'; विशेष न्यायालयाचे भ्रष्टाचार प्रतिबंधक विभागाला निर्देश
15
घराणेशाहीचा वाद! "BMC Election is not a Family Business" भाजपा सचिवाचं अमित साटम यांना पत्र
16
भारतीय जर्सी घालून पाकिस्तानी खेळाडू भारताकडून खेळला; आता पाक फेडरेशन कारवाई करणार
17
किंगफिशर एअरलाइन्सच्या माजी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! ईडीने ३१२ कोटी रुपये केले परत
18
YouTube वर ५ लाख सबस्क्रायबर्स होताच 'महाभंडारा'; दीड किमीच्या रांगा, ५ हजार लोकांची गर्दी
19
गौरव म्हणाला, 'रात्र झालीये इथेच थांबा'; मैत्रीण बाहेर गेली अन् २३ वर्षीय खेळाडू तरुणीवर हॉटेलमध्ये बलात्कार
20
वाळवंटी सौदीच्या बर्फाने डाव मांडला! विश्वास बसेना, पण अरब व्हिडीओ पोस्ट करू लागले...; उणे ४ अंशांवर गेला पारा
Daily Top 2Weekly Top 5

नागपूर विद्यापीठ कधी होणार ‘दिव्यांग फ्रेंडली’?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 24, 2018 11:44 IST

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठात दिव्यांग विद्यार्थीदेखील शिक्षण घेत आहेत. परंतु बहुतांश ठिकाणी पायाभूत सुविधांचा अभाव असल्यामुळे दिव्यांग विद्यार्थ्यांना दररोज परीक्षा द्यावी लागते.

ठळक मुद्देप्रशासकीय इमारत, परीक्षा भवनात दिव्यांगांना अडचण विभागांमध्ये सुविधा हव्या

योेगेश पांडे ।लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठात आजच्या घडीला पावणेसहाशेहून अधिक महाविद्यालये आहेत. यातील अनेक महाविद्यालयांत दिव्यांग विद्यार्थीदेखील शिक्षण घेत आहेत. परंतु बहुतांश ठिकाणी पायाभूत सुविधांचा अभाव असल्यामुळे दिव्यांग विद्यार्थ्यांना दररोज परीक्षा द्यावी लागते. ही परीक्षा असते महाविद्यालयांत पोहोचण्याची, लढा असतो वर्गखोल्यांत प्रवेश करण्याचा अन् संघर्ष असतो स्वत:चा आत्मविश्वास ढळू न देण्याचा. संलग्नित महाविद्यालयेच नव्हे तर विद्यापीठाची प्रशासकीय इमारत, परीक्षा भवन तसेच विद्यापीठाच्या विभागांमध्येदेखील दिव्यांग विद्यार्थ्यांच्या समस्यांकडे पूर्णपणे दुर्लक्ष करण्यात येत असल्याचे दुर्दैवी चित्र आहे. शिक्षण मनुष्याला स्वत:च्या पायावर उभे राहण्यासाठी सक्षम बनविते. परंतु अगोदरच दिव्यांग असलेल्या विद्यार्थ्यांना सुविधांचे पाठबळच नसल्याचे चित्र आहे. विद्यापीठ ‘दिव्यांग फ्रेंडली’ कधी होणार असा प्रश्न उपस्थित होत आहे.दिव्यांग विद्यार्थ्यांना प्रवेश घेण्यासाठी आरक्षण, शुल्क सवलती, शिष्यवृत्ती अशा सुविधा देण्यात आल्या आहेत. विद्यार्थी प्रवेशदेखील घेतात. परंतु महाविद्यालयांत गेल्यावर मात्र त्यांना पायाभूत सुविधाच नसल्याचे लक्षात येते. पुण्यातील सीए करणारी आकांक्षा काळे नावाच्या दिव्यांग विद्यार्थिनीला महाविद्यालयात जाण्याची काही सुविधाच नव्हती. त्यामुळे ती दोन वर्षे परीक्षेलाच बसू शकली नाही. परंतु या मुलीने हार न मानता उच्च न्यायालयापर्यंत लढा दिला. त्यानंतर न्यायालयाने सर्व विद्यापीठे तसेच महाविद्यालयांना दिव्यांगांसाठी प्राथमिक सुविधा पुरवण्याचे आदेश दिले होते. सोबतच केंद्र सरकारनेदेखील सरकारी कार्यालये, विद्यापीठातील कार्यालये, विद्यापीठ परिसर तसेच सर्व संलग्नित महाविद्यालयांमध्ये ‘दिव्यांग फ्रेंडली कॅम्पस’ तयार करण्याच्या सूचना दिल्या आहेत. मात्र प्रत्यक्षात विद्यापीठातच अशा प्रकारचे वातावरण नसल्याचे चित्र आहे.

प्रशासन कधी होणार गंभीर?नागपूर विद्यापीठातील काही मोजक्या विभागात व संलग्नित महाविद्यालयांत दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी सुविधा निर्माण करण्यात आल्या आहेत. परंतु काही अपवाद सोडले तर महाविद्यालयांत विद्यार्थ्यांच्या व्हिलचेअरसाठी रँप, वरच्या मजल्यावरील वर्गात जाण्यासाठी लिफ्ट, व्हिलचेअरवरून वापरता येण्याजोगे स्वच्छतागृह अशा मूलभूत सुविधा निर्माण करण्याकडे संपूर्ण दुर्लक्ष झाल्याचे दिसते. १९९५ पासून अपंग व्यक्ती (समान संधी, हक्कांचे संरक्षण आणि संपूर्ण सहभाग) अधिनियम अस्तित्वात असून,वारंवार सूचना, परिपत्रके काढूनही अपंग विद्यार्थ्यांसाठी सुविधाच निर्माण केलेल्या नाहीत व विद्यापीठ प्रशासनानेदेखील याची गंभीरतेने दखल घेतली नाही.

विद्यापीठ विभागांत निराशाजनक चित्रकेवळ संलग्नित महाविद्यालयांतच नव्हे तर अगदी विद्यापीठाच्या विभागांतदेखील निराशाजनक चित्रच आहे. अनेक विभागांमध्ये ‘रॅम्प’च उपलब्ध नाहीत. शिवाय वर्गदेखील तळमजल्यावर न घेता वरच्या मजल्यावर घेण्यात येतात. काही विभागांत तर तळमजल्यावर वर्गखोल्याच नाहीत. त्यामुळे दिव्यांग विद्यार्थ्यांना प्रचंड त्रास सहन करावा लागतो. न्यायालयाच्या निर्देशांचे पालन करण्यासंदर्भात महाविद्यालयांना सूचना केल्या आहेत की नाही यासंदर्भात विचारणा करण्यासाठी विद्यापीठाचे प्रभारी कुलसचिव डॉ.नीरज खटी यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.

टॅग्स :Rashtrasant Tukdoji Maharaj Nagpur Universityराष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ