शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

नागपूर विद्यापीठ : तीनच वर्षांत फेरमूल्यांकनाच्या अर्जांत तिपटीने वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2020 21:42 IST

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या मूल्यांकनाला मागील काही वर्षांपासून वेग आला आहे. निकाल लवकर घोषित होत असले तरी विद्यार्थ्यांमध्ये मूल्यांकनासंदर्भात प्रश्नदेखील उपस्थित होत आहे.

ठळक मुद्देअर्जांच्या माध्यमातून कोट्यवधींचा महसूल

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या मूल्यांकनाला मागील काही वर्षांपासून वेग आला आहे. निकाल लवकर घोषित होत असले तरी विद्यार्थ्यांमध्ये मूल्यांकनासंदर्भात प्रश्नदेखील उपस्थित होत आहे. संबंधित प्रक्रिया सुलभ झाल्यामुळे मागील काही कालावधीपासून फेरमूल्यांकनासाठी येणाऱ्या अर्जांमध्ये सातत्याने वाढ होते आहे. २०१६ च्या उन्हाळी परीक्षांच्या तुलनेत २०१९ च्या उन्हाळी परीक्षांच्या निकालानंतर फेरमूल्यांकनासाठीच्या अर्जांमध्ये तब्बल ३०९ टक्के म्हणजेच तिपटीने वाढ झाली आहे. माहितीच्या अधिकारातून ही बाब समोर आली आहे.उपराजधानीतील माहिती अधिकार कार्यकर्ते अभय कोलारकर यांनी माहितीच्या अधिकारांतर्गत नागपूर विद्यापीठाकडे विचारणा केली होती. १ जानेवारी २०१६ ते ३१ नोव्हेंबर २०१९ या कालावधीत विद्यापीठाकडे फेरमूल्यांकनासाठी किती अर्ज आले, यातील किती अर्ज नाकारण्यात आले, फेरमूल्यांकनासाठीच्या अर्जांतून किती महसूल प्राप्त झाला, इत्यादी प्रश्न त्यांनी विचारले होते. विद्यापीठाच्या फेरमूल्यांकन कक्षाकडून प्राप्त झालेल्या अधिकृत माहितीनुसार, २०१६ च्या उन्हाळी परीक्षेत विद्यापीठाकडे फेरमूल्यांकनासाठी ११ हजार ११६ अर्ज आले होते. त्यानंतर प्रत्येक परीक्षेत अर्जांची संख्या वाढत गेली. २०१६ च्या हिवाळी परीक्षेत २० हजार ८५८, उन्हाळी-२०१७ मध्ये २३ हजार ७७४, हिवाळी-२०१७ मध्ये २९ हजार ५४४, उन्हाळी-२०१८ मध्ये ३८ हजार ९९६ तर हिवाळी-२०१८ मध्ये ४५ हजार १५९ अर्ज आले. २०१९ च्या उन्हाळी परीक्षांच्या निकालानंतर फेरमूल्यांकनासाठी आलेल्या अर्जांचा आकडा ४५ हजार ५०० इतका होता. उन्हाळी-२०१६ च्या तुलनेत उन्हाळी-२०१९ मध्ये फेरमूल्यांकनाच्या अर्जांमध्ये तब्बल ३४ हजार ३८४ म्हणजेच ३०९.३२ टक्क्यांनी वाढ झाली.तीन कोटींहून अधिकचा महसूल२०१६-१७ ते २०१८-१९ या कालावधीत विद्यापीठाला फेरमूल्यांकनाच्या माध्यमातून तीन कोटींहून अधिकचा महसूल प्राप्त झाला. २०१६-१७ मध्ये ४७ लाख ६६ हजार ४०४, २०१७-१८ मध्ये १ कोटी १५ लाख ५३ हजार ६५७ तर २०१८-१९ मध्ये १ कोटी ६६ लाख ९२ हजार ७३७ रुपयांचा महसूल प्राप्त झाला. तीनच वर्षांत महसुलामध्ये १ कोटी १९ लाख २६ हजार ३३३ रुपयांची वाढ झाली. टक्केवारीतील वाढ २५०.२२ टक्के इतकी ठरली.फेरमूल्यांकनाचे परीक्षानिहाय अर्जपरीक्षा                     अर्जउन्हाळी-२०१६        ११,११६हिवाळी-२०१६         २०,८५८उन्हाळी-२०१७        २३,७७४हिवाळी-२०१७        २९,५४४उन्हाळी-२०१८        ३८,९९६हिवाळी-२०१८        ४५,१५९उन्हाळी-२०१९        ४५,५००

टॅग्स :Rashtrasant Tukdoji Maharaj Nagpur Universityराष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठRTI Activistमाहिती अधिकार कार्यकर्ता