शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

नागपूर विद्यापीठ :सांस्कृतिक पथकाच्या निवडीवरच प्रश्नचिन्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 3, 2019 01:04 IST

राज्य व विभाग पातळीवरील सांस्कृतिक स्पर्धांसाठी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या निवड प्रक्रियेवरच प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत आहे. निवड झाल्यावरदेखील पथकात समावेश झालेला नाही, तसेच स्पर्धांत पाठविण्यात आलेले नाही, असा आरोप विद्यार्थ्यांनी केला आहे. तर निवड प्रक्रियेत कुठलाही गोंधळ झाला नसल्याचा दावा विद्यापीठाच्या विद्यार्थी विकास विभागाने केला आहे.

ठळक मुद्देनिवड झाल्यावरदेखील पथकात समावेश नाही

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : राज्य व विभाग पातळीवरील सांस्कृतिक स्पर्धांसाठी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या निवड प्रक्रियेवरच प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत आहे. निवड झाल्यावरदेखील पथकात समावेश झालेला नाही, तसेच स्पर्धांत पाठविण्यात आलेले नाही, असा आरोप विद्यार्थ्यांनी केला आहे. तर निवड प्रक्रियेत कुठलाही गोंधळ झाला नसल्याचा दावा विद्यापीठाच्या विद्यार्थी विकास विभागाने केला आहे.राज्य व विभाग पातळीवरील स्पर्धांसाठी विद्यापीठाच्या सांस्कृतिक पथकाची निवड ऑक्टोबर महिन्यात झाली होती. दोन्ही स्पर्धांसाठी वेगवेगळ्या चमू बनविण्यात आल्या होत्या. एका विद्यार्थ्याने त्याची निवड राज्य व विभाग पातळीवर स्पर्धेसाठी झाली होती, असा दावा केला. राज्यस्तरीय स्पर्धा नाशिक येथे होणार होती. मात्र प्रत्यक्षात पथकाच्या समन्वयकांनी निवड प्रक्रियेत दुसऱ्या स्थानावर आलेल्या अन्य विद्यार्थ्याला राज्यस्तरीय स्पर्धेत पाठविणार असल्याची माहिती दिली. तर संबंधित विद्यार्थ्याला विभागीय पातळीवरील स्पर्धेत पाठविण्याची माहिती दिली. त्याला राज्य पातळीवर स्पर्धेत छायाचित्रकार म्हणून समाविष्ट करण्यात आले होते. नाशिकहून परतल्यानंतर ओडिशा येथील संभलपूर येथे होणाऱ्या विभाग पातळीवर स्पर्धेत जाण्याची तयारी करीत होता. मात्र प्रत्यक्ष स्पर्धेला जाणाऱ्या पथकात त्याचे नावच नसून, निवड प्रक्रियेत दुसऱ्या स्थानी असलेल्या विद्यार्थ्यालाच तेथे पाठविण्यात येत असल्याची माहिती त्याला मिळाली. यासंबंधात विद्यार्थी विकास विभागाचे संचालक डॉ. दिलीप कावडकर यांना विचारणा केली असता, त्यांनी समाधानकारक उत्तर दिले नाही. दरम्यान, या प्रकरणाबाबत प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद येवले यांच्याकडे तक्रार करण्यात आली आहे.निवड प्रक्रिया योग्यच असल्याचा दावाविद्यार्थ्यांचे आरोप तथ्यहीन असल्याचा दावा डॉ. दिलीप कावडकर यांनी केला आहे. निवड प्रक्रिया योग्यच असून त्यात काहीही गडबड झालेली नाही. ज्यांची नावे यादीत आहेत, त्यांनाच चमूसोबत स्पर्धेला पाठविण्यात येत आहे. चमूमध्ये कुठलाही बदल करणे शक्य नाही. जर यादीत फेरबदल झाला होता तर विद्यार्थ्यांनी त्याची तक्रार का केली नाही. ज्या कर्मचाऱ्याला विद्यार्थी समन्वयक म्हणत आहेत, त्याची कधीच नियुक्ती करण्यात आली नव्हती, असे त्यांनी सांगितले.

टॅग्स :Rashtrasant Tukdoji Maharaj Nagpur Universityराष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठcultureसांस्कृतिक