शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
2
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
3
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
4
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
5
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
6
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
7
कमाल झाली..! कुणाच्या स्वप्नातही नाही आली; ती गोष्ट टीम इंडियातील या तिघांनी सत्यात उतरवली
8
मालेगाव २००८; बॉम्बस्फोटातील तपासात एटीएस आणि एनआयएचा विरोधाभास 
9
सात महिन्यांत अक्षय कुमारने ११० कोटींची मालमत्ता विकली, कुठे किती रुपयांना केली विक्री? जाणून घ्या
10
महिलांसाठी मोठी संधी! LIC ची नवी योजना, फक्त ‘हे’ काम करा आणि दरमहा ७,००० रुपये कमवा!
11
भारतीय शेतकरी चुकून गेला पाकिस्तानात; न्यायालयाने सुनावली तुरुंगवासाची शिक्षा, वडील म्हणतात....
12
सरकारचा पैसा आहे, आपल्या बापाचं काय जातंय? संजय शिरसाटांचे विधान; सुप्रिया सुळे म्हणाल्या, "इशारा देऊन पण..."
13
कुलगाममध्ये तिसऱ्या दिवशीही चकमक सुरू; आतापर्यंत तीन दहशतवादी ठार, या वर्षातील सर्वात मोठी कारवाई
14
पनवेलमध्ये राडा झाला...! राज ठाकरेंच्या इशाऱ्यानंतर पनवेलमधील लेडीज बारवर मनसेचा हल्ला 
15
भारतीय निवडणूक प्रणाली मृत, निवडणुकीत घोटाळे! विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
16
मुद्द्याची गोष्ट : टॅरिफच्या खेळीने चेकमेट कोण? कुणाला बसणार फटका?
17
आजचे राशीभविष्य ३ ऑगस्ट २०२५ : सांसारिक गोष्टी बाजूला ठेवाल, गूढ रहस्यमय विद्येत रमाल
18
‘भीमराया…’ गीताची जन्मकथा सांगताना सरन्यायाधीश गवईंचा गळा दाटला! सुरेश भटांनी कसे लिहिले भीमरायाचे वंदना गीत? ऐकवली संपूर्ण कहाणी
19
प्रज्वल रेवण्णाला बलात्कारप्रकरणी जन्मठेप, १० लाख रुपयांचा दंडही; पीडित महिलेला ७ लाख रु. भरपाई देण्याचा आदेश
20
"हमे अयोध्या का मंदिर आरडीएक्स से उडाना है, पचास बंदे चाहिए..."; शिरूरच्या तरुणाला कराचीतून मेसेज, १ लाखाची ऑफर! गुन्हा दाखल

नागपूर विद्यापीठ :सांस्कृतिक पथकाच्या निवडीवरच प्रश्नचिन्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 3, 2019 01:04 IST

राज्य व विभाग पातळीवरील सांस्कृतिक स्पर्धांसाठी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या निवड प्रक्रियेवरच प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत आहे. निवड झाल्यावरदेखील पथकात समावेश झालेला नाही, तसेच स्पर्धांत पाठविण्यात आलेले नाही, असा आरोप विद्यार्थ्यांनी केला आहे. तर निवड प्रक्रियेत कुठलाही गोंधळ झाला नसल्याचा दावा विद्यापीठाच्या विद्यार्थी विकास विभागाने केला आहे.

ठळक मुद्देनिवड झाल्यावरदेखील पथकात समावेश नाही

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : राज्य व विभाग पातळीवरील सांस्कृतिक स्पर्धांसाठी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या निवड प्रक्रियेवरच प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत आहे. निवड झाल्यावरदेखील पथकात समावेश झालेला नाही, तसेच स्पर्धांत पाठविण्यात आलेले नाही, असा आरोप विद्यार्थ्यांनी केला आहे. तर निवड प्रक्रियेत कुठलाही गोंधळ झाला नसल्याचा दावा विद्यापीठाच्या विद्यार्थी विकास विभागाने केला आहे.राज्य व विभाग पातळीवरील स्पर्धांसाठी विद्यापीठाच्या सांस्कृतिक पथकाची निवड ऑक्टोबर महिन्यात झाली होती. दोन्ही स्पर्धांसाठी वेगवेगळ्या चमू बनविण्यात आल्या होत्या. एका विद्यार्थ्याने त्याची निवड राज्य व विभाग पातळीवर स्पर्धेसाठी झाली होती, असा दावा केला. राज्यस्तरीय स्पर्धा नाशिक येथे होणार होती. मात्र प्रत्यक्षात पथकाच्या समन्वयकांनी निवड प्रक्रियेत दुसऱ्या स्थानावर आलेल्या अन्य विद्यार्थ्याला राज्यस्तरीय स्पर्धेत पाठविणार असल्याची माहिती दिली. तर संबंधित विद्यार्थ्याला विभागीय पातळीवरील स्पर्धेत पाठविण्याची माहिती दिली. त्याला राज्य पातळीवर स्पर्धेत छायाचित्रकार म्हणून समाविष्ट करण्यात आले होते. नाशिकहून परतल्यानंतर ओडिशा येथील संभलपूर येथे होणाऱ्या विभाग पातळीवर स्पर्धेत जाण्याची तयारी करीत होता. मात्र प्रत्यक्ष स्पर्धेला जाणाऱ्या पथकात त्याचे नावच नसून, निवड प्रक्रियेत दुसऱ्या स्थानी असलेल्या विद्यार्थ्यालाच तेथे पाठविण्यात येत असल्याची माहिती त्याला मिळाली. यासंबंधात विद्यार्थी विकास विभागाचे संचालक डॉ. दिलीप कावडकर यांना विचारणा केली असता, त्यांनी समाधानकारक उत्तर दिले नाही. दरम्यान, या प्रकरणाबाबत प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद येवले यांच्याकडे तक्रार करण्यात आली आहे.निवड प्रक्रिया योग्यच असल्याचा दावाविद्यार्थ्यांचे आरोप तथ्यहीन असल्याचा दावा डॉ. दिलीप कावडकर यांनी केला आहे. निवड प्रक्रिया योग्यच असून त्यात काहीही गडबड झालेली नाही. ज्यांची नावे यादीत आहेत, त्यांनाच चमूसोबत स्पर्धेला पाठविण्यात येत आहे. चमूमध्ये कुठलाही बदल करणे शक्य नाही. जर यादीत फेरबदल झाला होता तर विद्यार्थ्यांनी त्याची तक्रार का केली नाही. ज्या कर्मचाऱ्याला विद्यार्थी समन्वयक म्हणत आहेत, त्याची कधीच नियुक्ती करण्यात आली नव्हती, असे त्यांनी सांगितले.

टॅग्स :Rashtrasant Tukdoji Maharaj Nagpur Universityराष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठcultureसांस्कृतिक