शहरं
Join us  
Trending Stories
1
जम्मू-काश्मीर पोलिसांची मोठी कारवाई, मुफ्ती इरफानला शोपियानमधून अटक; मोठे टेरर नेटवर्क उद्ध्वस्त
2
"ही पाकची जुनी खोड..."; इस्लामाबादच्या स्फोटाचं खापर भारतावर फोडणाऱ्या पाकिस्तानला मिळालं चोख उत्तर! 
3
न्यायालयाचा दणका! महिलांना मारहाण व शिवीगाळ केल्याप्रकरणी पुणे पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश
4
लाल किल्ला स्फोटात मोठा खुलासा! सुरक्षा यंत्रणांच्या जोरदार कारवाईमुळे मोठा धोका टळला
5
शेख हसीनानंतर आता युनूस सरकारविरोधात विद्यार्थी रस्त्यावर; बांगलादेशात पुन्हा चळवळ सक्रिय
6
बिहारमध्ये प्रशांत किशोर यांची जनसुराज्य खाते उघडणार? ८ एक्झिट पोलमध्ये तेजस्वी यादवांचे गणित बिघडले
7
लग्नाला नऊ वर्षे पूर्ण झाली, पतीने आपल्याच मित्रासोबत पत्नीचे लग्न लावून दिले; धक्कादायक कारण आले समोर
8
बिहारमध्ये काँग्रेसला मोठा धक्का! दुसऱ्या टप्प्यातील निवडणूक संपताच मोठ्या नेत्याने दिला राजीनामा
9
Bihar Exit Poll : बिहारमध्ये उत्सुकता शिगेला! पहिला एक्झिट पोल आला, नितीश की तेजस्वी?
10
'तो शांत होता, त्याचे जास्त मित्र नव्हते'; दिल्ली बॉम्बस्फोटातील संशयित डॉक्टरच्या कुटुंबीयांची प्रतिक्रिया
11
राहुल द्रविडच्या लेकाची भारतीय U19 संघात वर्णी ; वैभव सूर्यवंशीचं नाव 'गायब' कारण...
12
छत्तीसगडच्या बीजापूरमध्ये मोठी चकमक, 6 नक्षलवादी ठार; मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा जप्त...
13
बॉसनं नोकरीवरून काढलं, पठ्ठ्यानं असं काही केलं की आता कंपनीला बसणार मोठा दंड!
14
फरीदाबाद मॉड्यूलचा खरा मास्टरमाईंड आला समोर; डॉक्टरांना कट्टरपंथी बनवणारा मौलवी इरफान अहमद कोण?
15
Travel : भारताशी कनेक्शन, 'या' देशात जाताच करोडपती व्हाल! परदेशवारीचा प्लॅन करताय तर नक्की विचार करा
16
ती चूक यामाहा नाही करणार...! पहिली वहिली इलेक्ट्रीक स्कूटर आली!  Aerox लूक; इतकी रेंज देणार की...
17
Delhi Red Fort Blast : जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्याचे कॉल डिटेल्स उघड; दिल्ली स्फोटाचं रहस्य उलगडलं, उमरने ‘तारिक’ नावाने घेतलं सिम कार्ड
18
Yamaha ची नव्या जमान्याची RX100...! स्टायलिश बाईक लाँच; किंमत फक्त ₹ १.** लाख!
19
IND vs SA : ईडन गार्डन्सच्या खेळपट्टीवर गंभीर नाराज; गांगुलीनं असं दिलं उत्तर
20
संत्र्याच्या साली कचरा समजून फेकून देता, थोडं थांबा... त्वचेसह घरालाही होईल मोठा फायदा

नागपूर विद्यापीठ :सांस्कृतिक पथकाच्या निवडीवरच प्रश्नचिन्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 3, 2019 01:04 IST

राज्य व विभाग पातळीवरील सांस्कृतिक स्पर्धांसाठी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या निवड प्रक्रियेवरच प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत आहे. निवड झाल्यावरदेखील पथकात समावेश झालेला नाही, तसेच स्पर्धांत पाठविण्यात आलेले नाही, असा आरोप विद्यार्थ्यांनी केला आहे. तर निवड प्रक्रियेत कुठलाही गोंधळ झाला नसल्याचा दावा विद्यापीठाच्या विद्यार्थी विकास विभागाने केला आहे.

ठळक मुद्देनिवड झाल्यावरदेखील पथकात समावेश नाही

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : राज्य व विभाग पातळीवरील सांस्कृतिक स्पर्धांसाठी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या निवड प्रक्रियेवरच प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत आहे. निवड झाल्यावरदेखील पथकात समावेश झालेला नाही, तसेच स्पर्धांत पाठविण्यात आलेले नाही, असा आरोप विद्यार्थ्यांनी केला आहे. तर निवड प्रक्रियेत कुठलाही गोंधळ झाला नसल्याचा दावा विद्यापीठाच्या विद्यार्थी विकास विभागाने केला आहे.राज्य व विभाग पातळीवरील स्पर्धांसाठी विद्यापीठाच्या सांस्कृतिक पथकाची निवड ऑक्टोबर महिन्यात झाली होती. दोन्ही स्पर्धांसाठी वेगवेगळ्या चमू बनविण्यात आल्या होत्या. एका विद्यार्थ्याने त्याची निवड राज्य व विभाग पातळीवर स्पर्धेसाठी झाली होती, असा दावा केला. राज्यस्तरीय स्पर्धा नाशिक येथे होणार होती. मात्र प्रत्यक्षात पथकाच्या समन्वयकांनी निवड प्रक्रियेत दुसऱ्या स्थानावर आलेल्या अन्य विद्यार्थ्याला राज्यस्तरीय स्पर्धेत पाठविणार असल्याची माहिती दिली. तर संबंधित विद्यार्थ्याला विभागीय पातळीवरील स्पर्धेत पाठविण्याची माहिती दिली. त्याला राज्य पातळीवर स्पर्धेत छायाचित्रकार म्हणून समाविष्ट करण्यात आले होते. नाशिकहून परतल्यानंतर ओडिशा येथील संभलपूर येथे होणाऱ्या विभाग पातळीवर स्पर्धेत जाण्याची तयारी करीत होता. मात्र प्रत्यक्ष स्पर्धेला जाणाऱ्या पथकात त्याचे नावच नसून, निवड प्रक्रियेत दुसऱ्या स्थानी असलेल्या विद्यार्थ्यालाच तेथे पाठविण्यात येत असल्याची माहिती त्याला मिळाली. यासंबंधात विद्यार्थी विकास विभागाचे संचालक डॉ. दिलीप कावडकर यांना विचारणा केली असता, त्यांनी समाधानकारक उत्तर दिले नाही. दरम्यान, या प्रकरणाबाबत प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद येवले यांच्याकडे तक्रार करण्यात आली आहे.निवड प्रक्रिया योग्यच असल्याचा दावाविद्यार्थ्यांचे आरोप तथ्यहीन असल्याचा दावा डॉ. दिलीप कावडकर यांनी केला आहे. निवड प्रक्रिया योग्यच असून त्यात काहीही गडबड झालेली नाही. ज्यांची नावे यादीत आहेत, त्यांनाच चमूसोबत स्पर्धेला पाठविण्यात येत आहे. चमूमध्ये कुठलाही बदल करणे शक्य नाही. जर यादीत फेरबदल झाला होता तर विद्यार्थ्यांनी त्याची तक्रार का केली नाही. ज्या कर्मचाऱ्याला विद्यार्थी समन्वयक म्हणत आहेत, त्याची कधीच नियुक्ती करण्यात आली नव्हती, असे त्यांनी सांगितले.

टॅग्स :Rashtrasant Tukdoji Maharaj Nagpur Universityराष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठcultureसांस्कृतिक