शहरं
Join us  
Trending Stories
1
तुमच्या आकांसमोर झुकू नका, सॅलरी कापणार नाहीत; सुप्रीम कोर्टाने केली IPS अधिकाऱ्याची कानउघडणी
2
चुकीचा निवडणूक डेटा पोस्ट करणं संजय कुमारांना भोवलं; महाराष्ट्र निवडणूक आयोगाची मोठी कारवाई
3
वासनांध भोंदूबाबाचा प्रताप, महिलेसोबत अश्लील कृत्य; तंत्रमंत्राने कुटुंबियांना भस्म करण्याची धमकी
4
पाकिस्तानची झोप उडणार! ५ हजार किमी रेंज असणाऱ्या 'अग्नी ५' मिसाइलची भारतानं केली यशस्वी चाचणी
5
राजधानी दिल्ली तिहेरी हत्याकांडानं हादरली; एकाच घरात ३ मृतदेह सापडले, कारण समजताच पोलीस हैराण
6
ODI Rankings मध्ये गडबड घोटाळा! ICC चा रिव्ह्यू अन् टॉप ५ मध्ये पुन्हा झळकलं रोहित-विराटचं नाव
7
अमेरिकेत ५ तास थांबणे व्लादिमीर पुतिन यांना महागात पडले! डोनाल्ड ट्रम्प यांनी २.२ कोटी आकारले; नेमके प्रकरण काय?
8
खराब अन् खड्डेमय रस्त्यांसाठी टोल घेणे योग्य नाही; सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय
9
रुग्णालयाने भरती करण्यास दिला नकार, 12 वर्षाच्या मुलाने बापाच्या खांद्यावरच सोडला जीव
10
जिओ वापरकर्त्यांसाठी वाईट बातमी! दररोज १.५ जीबी डेटासह ८४ दिवसांचा प्लॅन बंद
11
'मी अटक होण्यापूर्वीच राजीनामा दिला होता', अमित शाहांनी सोडलं मौन; वादाचा मुद्दा काय?
12
थयथयाट होणार! रशियाने भारताला कच्च्या तेलावर ५ टक्के सूट सुरुच ठेवली; पुतीन ट्रम्पना भेटून येताच...
13
एरिया मॅनेजरचा पराक्रम! टारगेट पूर्ण करण्यासाठी रेव्ह पार्टी दिली, ३७ जणांना अडकवलं अन्...
14
'ऑनलाइन गेमिंग विधेयक' लोकसभेत मंजूर; Online Games खेळणाऱ्यांसाठी काय आहे शिक्षेची तरतूद?
15
'मोठा धक्का बसला, पण आता...', हल्ल्यानंतर मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांची पहिली प्रतिक्रिया
16
'रॅपिडो'ला जबर झटका! १० लाखांचा दंड, ग्राहकांना पैसे करण्याचे कंपनीला आदेश; प्रकरण काय?
17
महाराष्ट्रातील कोणकोणत्या टोल नाक्यांवर चालणार ३ हजार रूपयांचा वार्षिक FASTag पास? वाचा यादी
18
लोकसभेत मोठा गोंधळ, विरोधकांनी फाडले विधेयक; कागद अमित शाहांच्या दिशेने भिरकावले, काय घडलं?
19
ऑनलाईन दरोडा! दरवर्षी ४५ कोटी भारतीय गमावताहेत २० हजार कोटी रुपये
20
धाडसाला सलाम; पती आणि मुलाचा जीव वाचवण्यासाठी मगरीशी लढल्या, गावातून कौतुकाचा वर्षाव

नागपूर विद्यापीठ : ५० टक्के विषय काढा, एटीकेटी मिळेल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2019 00:09 IST

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे. नवीन शैक्षणिक वर्षांत त्यांना ‘एटीकेटी’चा लाभ मिळविण्यासाठी नियमांच्या फेऱ्यात अडकावे लागणार नाही. अनेक वर्षांनंतर राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ प्रशासनाने ‘एटीकेटी’च्या नियमांना सुकर केले आहे. यानुसार पदवी अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांना ‘एटीकेटी’चा लाभ मिळविण्यासाठी कमीत कमी ५० टक्के विषयांत उत्तीर्ण व्हावे लागेल. तर पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांना दोन तृतीयांशी विषयांची अट ठेवण्यात आली आहे.

ठळक मुद्दे‘सीबीएस’, ‘सीबीसीएस’चे नवीन नियम जारी

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे. नवीन शैक्षणिक वर्षांत त्यांना ‘एटीकेटी’चा लाभ मिळविण्यासाठी नियमांच्या फेऱ्यात अडकावे लागणार नाही. अनेक वर्षांनंतर राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ प्रशासनाने ‘एटीकेटी’च्या नियमांना सुकर केले आहे. यानुसार पदवी अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांना ‘एटीकेटी’चा लाभ मिळविण्यासाठी कमीत कमी ५० टक्के विषयांत उत्तीर्ण व्हावे लागेल. तर पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांना दोन तृतीयांशी विषयांची अट ठेवण्यात आली आहे.मंगळवारी विद्यापीठ प्रशासनाने यासंदर्भात नवीन दिशानिर्देश जारी केलेत. यानुसार पदवी अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्याला ‘एटीकेटी’चा लाभ मिळविण्यासाठी व चौथ्या सत्रात प्रवेश मिळविण्यासाठी प्रथम, द्वितीय व तृतीय सत्र मिळून ५० टक्के विषयांत उत्तीर्ण होणे आवश्यक आहे. सोबतच चौथ्या सत्राचा परीक्षा अर्जदेखील भरणे आवश्यक आहे. तर सहाव्या सत्रात प्रवेशासाठी त्याला पाचव्या सत्रापर्यंतच्या एकूण विषयांपैकी ५० टक्के विषयांत उत्तीर्ण व्हावे लागेल. पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांना चौथ्या सत्रात प्रवेश घेण्यासाठी प्रथम, द्वितीय व तृतीय सत्रातील एकूण विषयांपैकी दोन तृतीयांश विषयांत उत्तीर्ण व्हावे लागेल.विद्यापीठात ‘एटीकेटी’चा नियम अनेक वर्षांपासून आहे. मात्र नियमांत स्पष्टता नसल्याने विद्यार्थ्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागायचा. काही नियमांनुसार तर चौथ्या सत्रात ‘एटीकेटी’चा फायदा मिळविण्यासाठी विद्यार्थ्यांना प्रथम सत्रात उत्तीर्ण होणे आवश्यक होते. तर काही नियमांनुसार प्रथम व द्वितीय सत्रात उत्तीर्ण झाल्यावरच विद्यार्थ्याला चौथ्या सत्रात प्रवेश मिळत होता. एकसारखे नियम नसल्यामुळे विद्यापीठ प्रशासनासमोर संभ्रम निर्माण व्हायचा. आता सर्व नियम स्पष्ट झाल्याने भविष्यात ‘एटीकेटी’संदर्भात कुठलाही संभ्रम राहणार नाही, असे विद्यापीठाचे प्रभारी कुलसचिव डॉ.निरज खटी यांनी सांगितले. विद्यार्थ्यांच्या अडचणी लक्षात घेता ही समानता आणण्यात आली आहे. याचा त्यांना खूप फायदा होईल. सोबतच कुठल्याही अडचणींचा सामना करावा लागणार नाही, असे कुलगुरू डॉ.सिद्धार्थविनायक काणे म्हणाले.

टॅग्स :Rashtrasant Tukdoji Maharaj Nagpur Universityराष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठexamपरीक्षा