शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

नागपूर विद्यापीठ : ५० टक्के विषय काढा, एटीकेटी मिळेल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2019 00:09 IST

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे. नवीन शैक्षणिक वर्षांत त्यांना ‘एटीकेटी’चा लाभ मिळविण्यासाठी नियमांच्या फेऱ्यात अडकावे लागणार नाही. अनेक वर्षांनंतर राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ प्रशासनाने ‘एटीकेटी’च्या नियमांना सुकर केले आहे. यानुसार पदवी अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांना ‘एटीकेटी’चा लाभ मिळविण्यासाठी कमीत कमी ५० टक्के विषयांत उत्तीर्ण व्हावे लागेल. तर पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांना दोन तृतीयांशी विषयांची अट ठेवण्यात आली आहे.

ठळक मुद्दे‘सीबीएस’, ‘सीबीसीएस’चे नवीन नियम जारी

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे. नवीन शैक्षणिक वर्षांत त्यांना ‘एटीकेटी’चा लाभ मिळविण्यासाठी नियमांच्या फेऱ्यात अडकावे लागणार नाही. अनेक वर्षांनंतर राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ प्रशासनाने ‘एटीकेटी’च्या नियमांना सुकर केले आहे. यानुसार पदवी अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांना ‘एटीकेटी’चा लाभ मिळविण्यासाठी कमीत कमी ५० टक्के विषयांत उत्तीर्ण व्हावे लागेल. तर पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांना दोन तृतीयांशी विषयांची अट ठेवण्यात आली आहे.मंगळवारी विद्यापीठ प्रशासनाने यासंदर्भात नवीन दिशानिर्देश जारी केलेत. यानुसार पदवी अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्याला ‘एटीकेटी’चा लाभ मिळविण्यासाठी व चौथ्या सत्रात प्रवेश मिळविण्यासाठी प्रथम, द्वितीय व तृतीय सत्र मिळून ५० टक्के विषयांत उत्तीर्ण होणे आवश्यक आहे. सोबतच चौथ्या सत्राचा परीक्षा अर्जदेखील भरणे आवश्यक आहे. तर सहाव्या सत्रात प्रवेशासाठी त्याला पाचव्या सत्रापर्यंतच्या एकूण विषयांपैकी ५० टक्के विषयांत उत्तीर्ण व्हावे लागेल. पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांना चौथ्या सत्रात प्रवेश घेण्यासाठी प्रथम, द्वितीय व तृतीय सत्रातील एकूण विषयांपैकी दोन तृतीयांश विषयांत उत्तीर्ण व्हावे लागेल.विद्यापीठात ‘एटीकेटी’चा नियम अनेक वर्षांपासून आहे. मात्र नियमांत स्पष्टता नसल्याने विद्यार्थ्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागायचा. काही नियमांनुसार तर चौथ्या सत्रात ‘एटीकेटी’चा फायदा मिळविण्यासाठी विद्यार्थ्यांना प्रथम सत्रात उत्तीर्ण होणे आवश्यक होते. तर काही नियमांनुसार प्रथम व द्वितीय सत्रात उत्तीर्ण झाल्यावरच विद्यार्थ्याला चौथ्या सत्रात प्रवेश मिळत होता. एकसारखे नियम नसल्यामुळे विद्यापीठ प्रशासनासमोर संभ्रम निर्माण व्हायचा. आता सर्व नियम स्पष्ट झाल्याने भविष्यात ‘एटीकेटी’संदर्भात कुठलाही संभ्रम राहणार नाही, असे विद्यापीठाचे प्रभारी कुलसचिव डॉ.निरज खटी यांनी सांगितले. विद्यार्थ्यांच्या अडचणी लक्षात घेता ही समानता आणण्यात आली आहे. याचा त्यांना खूप फायदा होईल. सोबतच कुठल्याही अडचणींचा सामना करावा लागणार नाही, असे कुलगुरू डॉ.सिद्धार्थविनायक काणे म्हणाले.

टॅग्स :Rashtrasant Tukdoji Maharaj Nagpur Universityराष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठexamपरीक्षा