शहरं
Join us  
Trending Stories
1
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
2
‘मोदी-योगी आणि इतरांची नावे घेण्यास भाग पाडले’; साध्वी प्रज्ञा ठाकूर यांचे एटीएसवर गंभीर आरोप
3
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
4
भरधाव बोलेरो कालव्यात कोसळली; ११ जणांचा गाडीतच मृत्यू, बाहेर येण्यासाठी धडपडत राहिले
5
मैदानावर विराट, व्यवसायात विकास! विराट कोहलीच्या १०५० कोटींच्या साम्राज्याचा 'हा' आहे खरा हिरो!
6
'पाकिस्तानात नाही, तर बलुचिस्तानमध्ये तेल सापडले', बलोच नेत्याचे डोनाल्ड ट्रम्प यांना पत्र
7
भारती सिंगने सर्वांसमोर जाळली महागडी 'लाबूबू डॉल'! कारणही सांगितलं, म्हणाली- "माझा छोट्या मुलाला.."
8
पायी जाणाऱ्या दोघांना भरधाव कारने उडविले, दोघांचा जागीच मृत्यू; छत्रपती संभाजीनगरमधील घटना
9
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
10
खुशखबर! रक्षाबंधनपूर्वी RBI देणार मोठी भेट? कर्ज घेणाऱ्यांना दिलासा, तुमचा EMI होणार स्वस्त?
11
जिभेचे चोचले पडतील महागात! अल्ट्रा-प्रोसेस्ड फूडमुळे फुफ्फुसांच्या कॅन्सरचा धोका, रिसर्चमध्ये खुलासा
12
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
13
केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे नागपुरातील घर उडविण्याची धमकी, निनावी कॉलने सुरक्षायंत्रणांची धावपळ
14
सामाजिक न्याय विभागाचे ४१० कोटी लाडक्या बहिणींसाठी वळते : खोब्रागडे
15
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
16
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
17
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
18
कमाल झाली..! कुणाच्या स्वप्नातही नाही आली; ती गोष्ट टीम इंडियातील या तिघांनी सत्यात उतरवली
19
मालेगाव २००८; बॉम्बस्फोटातील तपासात एटीएस आणि एनआयएचा विरोधाभास 
20
सात महिन्यांत अक्षय कुमारने ११० कोटींची मालमत्ता विकली, कुठे किती रुपयांना केली विक्री? जाणून घ्या

नागपूर विद्यापीठ; आता ‘बी.ई.’ न म्हणता म्हणा, ‘बी.टेक.’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 20, 2022 19:55 IST

Nagpur News राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठातून अभियांत्रिकीचे शिक्षण पूर्ण करणाऱ्या विद्यार्थ्यांना ‘बी.ई.’ऐवजी ‘बी.टेक.’ ही पदवी प्रदान करण्यात येणार आहे. त्यामुळे आता ‘बी.ई.’ (बॅचलर ऑफ इंजिनिअरिंग) ही पदवी इतिहासजमा होणार आहे.

ठळक मुद्देपदवीच्या नावाच्या बाबतीत तरी अखेर राष्ट्रीय संस्थांच्या बरोबरीत

 

नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठातून अभियांत्रिकीचे शिक्षण पूर्ण करणाऱ्या विद्यार्थ्यांना ‘बी.ई.’ऐवजी ‘बी.टेक.’ ही पदवी प्रदान करण्यात येणार आहे. त्यामुळे आता ‘बी.ई.’ (बॅचलर ऑफ इंजिनिअरिंग) ही पदवी इतिहासजमा होणार आहे. यासंदर्भात नागपूर विद्यापीठाने निर्णय घेतला असून, त्यासंदर्भातील अधिसूचना अखेर जारी करण्यात आली आहे. त्यामुळे देशातील नामांकित अभियांत्रिकी संस्थांप्रमाणेच नागपूर विद्यापीठातील अभियांत्रिकीचे विद्यार्थी शिक्षण पूर्ण झाल्यानंतर ‘बी.टेक.’ पदवीधर म्हणून ओळखले जातील.

व्हीएनआयटीसह देशातील अनेक अभियांत्रिकी शिक्षण संस्थांमध्ये अभियांत्रिकीचा अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर ‘बी.टेक.’हीच पदवी प्रदान करण्यात येते. ‘एलआयटी’मध्येदेखील (लक्ष्मीनारायण इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी)‘बी.टेक.’ पदवीचाच अभ्यासक्रम आहे. मात्र नागपूर विद्यापीठांतर्गत येणाऱ्या इतर अभियांत्रिकी महाविद्यालयांमधील विद्यार्थ्यांना ‘बी.ई.’ हीच पदवी देण्यात येत होती. विद्यापीठाने २०२०-२१ या सत्रापासून अभियांत्रिकीच्या अभ्यासक्रमाचे स्वरूप ‘ॲक्टिव्हिटी बेस्ड लर्निंग’ असे केले आहे. त्यामुळे पदवीचे नामांतरण करण्याची मागणीदेखील समोर येत होती. यासंदर्भातील प्रस्ताव २७ ऑगस्ट २०२१ रोजी विद्वत परिषदेसमोर मांडण्यात आला होता. ३१ ऑगस्ट २०२१ रोजी विद्वत परिषदेच्या तातडीच्या बैठकीत ‘बी.ई.’चे नामांतरण ‘बी.टेक.’करण्याच्या प्रस्तावाला मान्यता देण्यात आली. संबंधित प्रस्ताव प्रारूप निदेश समितीकडे सुधारणांसाठी पाठविण्यात आला होता.

समितीने अंतिम प्रारूप तयार करून १७ डिसेंबर २०२१ रोजी कुलगुरू डॉ. सुभाष चौधरी यांच्याकडे सोपविला होता. त्यानंतर कुलगुरूंनी त्याला मान्यता दिली. त्या अनुषंगाने विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. राजू हिवसे यांनी याबाबत अधिसूचना जारी केली.

२०२०-२१ पासूनच्या विद्यार्थ्यांना लाभ

२०२०-२१ किंवा त्यानंतर ज्या विद्यार्थ्यांनी विद्यापीठाशी संलग्नित महाविद्यालये, संचालित महाविद्यालय, स्वायत्त महाविद्यालयात ‘बी.ई.’ प्रथम वर्षात प्रवेश घेतला असेल, अशा सर्व विद्यार्थ्यांना अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर ‘बी.टेक.’ पदवी प्रदान करण्यात येईल. यानुसार २०२३-२४ या सत्राच्या अखेरीस अभियांत्रिकीचा अभ्यासक्रम पूर्ण करणारा विद्यार्थी ‘बी.टेक.’ पदवीधारक असेल.

टॅग्स :Education Sectorशिक्षण क्षेत्रRashtrasant Tukdoji Maharaj Nagpur Universityराष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ