शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
5
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
6
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
7
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
8
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
9
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
10
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
11
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
12
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
13
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
14
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
15
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
16
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
17
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
18
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
19
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
20
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?

नागपूर विद्यापीठ : परीक्षांसाठी तयार करावे लागतील नवे पेपर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 9, 2020 00:10 IST

कोरोना प्रादुर्भावामुळे केवळ अंतिम वर्षाच्या अंतिम सत्राच्याच परीक्षा घेण्याचा निर्णय राज्याच्या उच्च व तंत्रशिक्षण विभागाने घेतला आहे. परंतु या निर्णयामुळे विद्यापीठांची धावपळ होणार आहे. परीक्षेची प्रणाली बदलणार असल्याने राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाला नव्याने सर्व पेपर ‘सेट’ करावे लागणार आहेत.

ठळक मुद्देपरीक्षा केंद्रांची संख्यादेखील वाढवावी लागेल : ‘फिजिकल डिस्टन्सिंग’चे आव्हान

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : कोरोना प्रादुर्भावामुळे केवळ अंतिम वर्षाच्या अंतिम सत्राच्याच परीक्षा घेण्याचा निर्णय राज्याच्या उच्च व तंत्रशिक्षण विभागाने घेतला आहे. परंतु या निर्णयामुळे विद्यापीठांची धावपळ होणार आहे. परीक्षेची प्रणाली बदलणार असल्याने राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाला नव्याने सर्व पेपर ‘सेट’ करावे लागणार आहेत. शिवाय परीक्षा केंद्रांवर ‘फिजिकल डिस्टन्सिंग’ पाळणे अनिवार्य असेल. त्यामुळे परीक्षा केंद्रांची संख्यादेखील त्या हिशेबाने वाढवावी लागणार आहे.राज्याचे उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत यांनी महाराष्ट्रातील विद्यापीठ परीक्षांसंदर्भात शुक्रवारी महत्त्वाच्या घोषणा केल्या आहेत. त्यानुसार पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या केवळ अंतिम वर्षातील अंतिम सत्राच्याच परीक्षा घेतल्या जाणार आहेत. या परीक्षा जुलै महिन्यात घ्यायच्या आहेत तर कुठल्याही परिस्थितीत निकाल १५ ऑगस्टपर्यंत जाहीर करायचे आहेत.

उन्हाळी परीक्षांचे सर्व पेपर अगोदरच ‘सेट’ झाले होते. परंतु आता परीक्षा या तीन तासांऐवजी दोन तासांच्या असतील. त्यामुळे साहजिकच नव्याने पेपर ‘सेट’ करावे लागणार आहेत. ही प्रक्रिया तातडीने सुरू करावी लागणार आहे. शिवाय एकाच महिन्यात इतक्या साºया परीक्षा घ्यायच्या असल्यामुळे संपूर्ण नियोजन या महिन्यातच तयार करावे लागणार आहे.परीक्षा केंद्रांवर ‘फिजिकल डिस्टन्सिंग’ पाळायचे आहे. त्यामुळे जास्त प्रमाणात परीक्षा केंद्र निश्चित करणे अनिवार्य आहे. यादृष्टीने विद्यापीठाकडून सोमवारपासूनच पावले उचलण्यात येतील, असे परीक्षा व मूल्यमापन संचालक डॉ. प्रफुल्ल साबळे यांनी सांगितले.

प्राधिकरणांची मंजुरी आवश्यक

राज्य शासनाचे अद्याप लिखित निर्देश आलेले नाहीत. परंतु परीक्षांचा कालावधी तीनऐवजी दोन तासाचा असेल अशी सूचना करण्यात आली आहे. नागपूर विद्यापीठात असे करण्यासाठी विद्वत्त परिषदेची मान्यता घ्यावी लागणार आहे. त्यानंतर परीक्षा मंडळाच्या बैठकीतदेखील परीक्षा प्रणालीबाबत मंजुरी घ्यावी लागेल. जुलै महिन्यात परीक्षा घ्यायच्या असल्याने युध्दपातळीवर ही सर्व प्रशासकीय प्रक्रिया पार पाडावी लागणार आहे, असे डॉ. साबळे यांनी सांगितले.

टॅग्स :Rashtrasant Tukdoji Maharaj Nagpur Universityराष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठexamपरीक्षा