शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतासाठी मिळणार चांगली बातमी? H-1B च्या तणावादरम्यान एस जयशंकर आणि अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्र्यांची भेट
2
ट्रम्प यांच्या 50 टक्के टॅरिफला भारतानं का दिलं नाही उत्तर? राजनाथ सिंह यांचा परदेशातून मोठा खुलासा!
3
IND vs PAK : भारताला हरवायचंय? मग सेना प्रमुखांसोबत ओपनिंग करा! इम्रान खानचा PCB अध्यक्षाला यॉर्कर
4
'मला रिकामं ठेवू नका'; धनंजय मुंडेंच्या विनंतीवर अजित पवार म्हणाले, 'सूचनेचे पालन केलं जाईल'
5
"ED, EVM, भौकने वाले..., फौज तेरी भारी है; जंजीरों में जकड़ा हुआ जयंत पाटील..." पडळकरांच्या वक्तव्यावरून अमोल कोल्हेंचा हल्लाबोल
6
'सुप्रीम कोर्ट आता बेल कोर्ट बनलं आहे'; जामीन अर्जांची संख्या पाहून न्यायमूर्ती नागरत्ना यांनी व्यक्त केली चिंता
7
IND vs AUS : मॅच आधी टीम इंडियाचा कॅप्टन बदलला! श्रेयस अय्यर अचानक घरी परतला; कारण....
8
"सनातनी हज यात्रेला जात नाहीत, त्यांच्या लोकांनीही...; गरबा मंडपाच्या दरवाजावर गोमूत्र ठेवा!"; धीरेंद्र शास्त्री यांचा सल्ला
9
"२० ओव्हर्स टिकणार त्या दिवशी २०० धावा ठोकणार"; अभिषेक शर्मासंदर्भात मोठी भविष्यवाणी
10
बाई, काय हा प्रकार! पाकिस्तान बेक्कार हरला, तरीही हॅरिस रौफच्या बायकोने केली 'तशी' पोस्ट
11
उद्धवसेनेच्या दसऱ्या मेळाव्याला राज ठाकरे जाणार? टिझरने वेधले लक्ष, मिळाले सूचक संकेत!
12
'Before आणि After चा बोर्ड पाहून आनंद झाला', GST 2.0 बाबत PM मोदींचे देशाच्या नावे पत्र
13
India vs West Indies Test Series: गिलच्या संघातून रिषभ पंत 'आउट'; कोण घेणार त्याची जागा?
14
IND vs PAK: "तुम्ही जर पातळी सोडून वागायला लागलात तर बॅटने..."; इरफानने पाकिस्तानला सुनावलं
15
'पोलीस बाजूला ठेवा, दम असेल तर एकदा रणांगणात या'; निलेश लंकेंचा गोपीचंद पडळकरांना जाहीर इशारा
16
‘मला रिकामे ठेवू नका’, मुंडेंच्या विधानावर जरांगेची प्रतिक्रिया; म्हणाले, “रोजगार हमीवर जा”
17
'बेनिफिट ऑफ डाउट' मिळाला असता तर आम्ही जिंकलो असतो; 'त्या' निर्णयावर अख्तरची 'बोलंदाजी'
18
नेपाळमध्ये ‘Gen Z’चे आंदोलन, RSS नेत्यांचे विधान; म्हणाले, “जगात षड्‍यंत्र, हिंदू समाज...”
19
१५ दिवसात भाजपच्या दुसऱ्या नगरसेवकाला अटक; टोळीला हाताशी धरुन केला गोळीबार, पैसेही पुरवले
20
मुक्या जीवाचे हाल! गायीच्या डोळ्यांवर पट्टी बांधली, फेकलं नाल्यात; काळजात चर्र करणारी घटना

नागपूर विद्यापीठ : बृहत् आराखड्यात कौशल्यविकासावर भर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2018 10:40 IST

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या बृहत् आराखड्यात विद्यार्थी व विद्यापीठ विकासाचे ‘व्हिजन’ ठेवण्यात आले असून कौशल्यविकासावर भर ठेवण्यात आला असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

ठळक मुद्दे‘माहेड’द्वारा लवकरच मंजुरी मिळण्याची शक्यता

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचा पंचवार्षिक बृहत् विकास आराखडा तयार झाला असून प्रशासनाने तो राज्य शासनाला सादर केला आहे. विद्यापीठाच्या बृहत् आराखड्यात विद्यार्थी व विद्यापीठ विकासाचे ‘व्हिजन’ ठेवण्यात आले असून कौशल्यविकासावर भर ठेवण्यात आला असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. या बृहत् आराखड्याला ह्यमाहेडह्ण या वैधानिक आयोगाची लवकरच मान्यता मिळेल, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.आतापर्यंत बृहत् आराखड्याच्या नावाखाली डोळे मिटून नवीन महाविद्यालये व अभ्यासक्रमांना मान्यता देण्यात आली. त्यामुळे विद्यापीठाच्या उच्च शिक्षणाचा स्तर खालावला. मात्र २०१६ च्या सार्वजनिक विद्यापीठ अधिनियमातील तरतुदींनुसार प्रत्येक विद्यापीठाने पंचवार्षिक बृहत् विकास आराखडा तयार करणे अपेक्षित आहे. विद्यापीठांचे बृहत् आराखडे म्हणजे निव्वळ नवीन महाविद्यालयांना मान्यता ही संकल्पना मोडून काढत सर्वांगीण विकासावर भर कसा राहील, असे यात अपेक्षित आहे. त्यानुसार विद्यापीठाने तज्ज्ञांचा समावेश असलेली विशेष समिती स्थापित केली होती. विद्यापीठाने शिक्षकांसोबतच विद्यार्थी, पालक यांच्याकडूनदेखील ‘आॅनलाईन’ प्रतिक्रिया मागविल्या होत्या.सखोल अभ्यास केल्यानंतर विद्यापीठाने शास्त्रीय पद्धतीने बृहत् आराखडा तयार केला. यात वैज्ञानिक दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवून नियोजन प्रस्तावित करण्यात आले आहे. बृहत् आराखड्यात कौशल्याधिष्ठित व विविध विद्याशाखांना एकत्रितपणे जोडणारे नवे अभ्यासक्रम सुरू करण्यावर भर देण्यात आला आहे. यात सुमारे २०० नवे अभ्यासक्रम अधोरेखित करण्यात आले आहेत. उद्योगक्षेत्राला अपेक्षित असणारे कुशल मनुष्यबळ विद्यापीठातून तयार कसे होईल, याचा यात विचार करण्यात आला आहे. त्याचप्रमाणे विद्यापीठ व महाविद्यालयांत संशोधन वाढीसंदर्भातदेखील विशेष उद्दिष्टे प्राधान्यक्रमाने ठरविण्यात आली आहेत.

ग्रामीण भागासाठी विशेष उद्दिष्टेबृहत् विकास आराखडयाची चौकट निश्चित करताना ग्रामीण भागातील शिक्षणाचा दर्जा वाढविण्याबाबतदेखील मुद्दे प्रस्तावित आहेत. सोबतच या भागातील उच्चशिक्षण सुविधा, सामाजिक समस्या संशोधनातून सोडविण्याची जबाबदारी, उद्योजकता विकास, स्वायत्तता यावरदेखील भर देण्यात आला आहे. परीक्षा प्रणालीतील सुधारणांचे उद्दीष्टदेखील ठेवण्यात आले आहे.

काय असतो बृहत् आराखडा?येणाऱ्या कालावधीत विद्यापीठाचा विकास नेमका कसा व्हावा, विद्यार्थ्यांना कोणते शिक्षण देण्यात येईल, कशाप्रकारचे नवे अभ्यासक्रम सुरू होतील, कौशल्य विकासासाठी काय पावले उचलली जातील या बाबींचा बृहत् आराखड्यात समावेश असतो. सोबतच उच्च शिक्षणाच्या गुणवत्तेचा स्तर उंचावणे, रोजगारासाठी प्रयत्न करणे, या बाबींना डोळ्यासमोर ठेवूनदेखील सर्वांच्या प्रतिक्रिया मागवून मग एक योजना तयार करण्यात येते. सर्वसमावेशक विकास असा उद्देश असलेली ही योजना दीर्घ कालावधीसाठी असते.

टॅग्स :Rashtrasant Tukdoji Maharaj Nagpur Universityराष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ