शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

नागपूर विद्यापीठ : ५८ महाविद्यालयांचे संलग्नीकरण काढणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 12, 2018 11:01 IST

मागील अनेक वर्षांपासून कुठलाही प्रकारे विद्यापीठाच्या पत्रव्यवहारांना उत्तर न देणाऱ्या ५८ महाविद्यालयांचे संलग्नीकरण रद्द करण्यात येणार आहे.

ठळक मुद्देअधिष्ठाता मंडळाच्या बैठकीत प्रस्तावाला मंजुरी

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : मागील अनेक वर्षांपासून कुठलाही प्रकारे विद्यापीठाच्या पत्रव्यवहारांना उत्तर न देणाऱ्या ५८ महाविद्यालयांचे संलग्नीकरण रद्द करण्यात येणार आहे. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या अधिष्ठाता मंडळाच्या बैठकीत याबाबत मंगळवारी ़निर्णय घेण्यात आला. पुढील पावले उचलण्यासाठी विद्वत् परिषदेला शिफारस करण्यात आली असल्याची माहिती प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद येवले यांनी दिली.जून महिन्यात नागपूर विद्यापीठाने २५६ महाविद्यालयांतील प्रथम वर्ष प्रवेशांवर बंदी लावली होती. यातील ९८ महाविद्यालयांची संलग्नताच रद्द करण्याचा प्रस्ताव होता. यातील अनेक महाविद्यालयांनी मागील ७ ते ८ वर्षांपासून संलग्नीकरणाच्या नूतनीकरणासाठी अर्जच केला नव्हता. यासंदर्भात महाविद्यालयांना पत्रदेखील पाठविण्यात आले होते. यानंतर ११ महाविद्यालयांनी संलग्नीकरण नूतनीकरणासाठी अर्ज केला. दोन महाविद्यालये बंद करण्याबाबत प्रस्ताव आला. एका महाविद्यालयाने न्यायालयात धाव घेतली. ५८ महाविद्यालयांनी ७ ते ८ वर्षांपासून संपर्कच केला नाही तर उर्वरित महाविद्यालयांनी मागील दोन वर्षांपासून संलग्नीकरणाच्या नूतनीकरणासाठी अर्ज केलेला नाही. या महाविद्यालयांना परत नोटीस पाठविण्यात आली आहे. ५८ महाविद्यालयांची संलग्नता रद्द करण्यासंदर्भात अधिष्ठाता मंडळाने निर्णय घेतला. याबाबतचा प्रस्ताव विद्वत् परिषदेला पाठविण्याची शिफारस करण्याचादेखील निर्णय घेण्यात आला. यानुसार या महाविद्यालयांची संलग्नता निश्चित रद्द होणार असल्याचे डॉ.येवले यांनी सांगितले.समाजकार्य महाविद्यालयाला स्वायत्तता मिळणार ?दरम्यान, अधिष्ठाता मंडळाच्या बैठकीत तिरपुडे समाजकार्य महाविद्यालयाला स्वायत्तता देण्याच्या प्रस्तावावरदेखील चर्चा करण्यात आली. याबाबत दीर्घकाळ चर्चा चालली व अखेर महाविद्यालयाच्या प्रस्तावाला मान्यता देण्यात आली. समोरील प्रक्रियेसाठी हा प्रस्ताव विद्वत् परिषदेकडे पाठविण्यात आला आहे. सोबतच या बैठकीत दोन नवीन संशोधन केंद्रांनादेखील मान्यतेच्या प्रस्तावाला हिरवी झेंडी दाखविण्यात आली.

टॅग्स :Rashtrasant Tukdoji Maharaj Nagpur Universityराष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ