शहरं
Join us  
Trending Stories
1
विद्यापीठांच्या क्यूएस रँकिंगमध्ये IIT मुंबईची घसरण; ४८ व्या स्थानावरून ७१ व्या स्थानी
2
आजचे राशीभविष्य,०६ नोव्हेंबर २०२५: मनःस्ताप टाळण्यासाठी वाणी संयमित ठेवा; प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल
3
भाजपचे प्रभारी जाहीर; मंत्री आशिष शेलार यांच्याकडे मुंबई, बीडमध्ये पंकजा मुंडेंना जबाबदारी
4
“७ वर्षे नाही, मग आताच एवढी घाई का झाली? सगळे घोळ दूर करून निवडणुका घ्या”: सुप्रिया सुळे
5
महाराष्ट्राच्या न्यायालयीन सुविधा देशात सर्वोत्तम; भूमिपूजन सोहळ्यात सरन्यायाधीश गवईंचे मत
6
गजकेसरी योगात गुरू वक्री: १० राशींची बरकत, बँक बॅलन्स वाढ; बक्कळ लाभ, पद-प्रतिष्ठा-भरभराट!
7
“बिहारमध्ये पुन्हा जंगलराज नको, विधानसभा निवडणुकीत NDA ला पाठिंबा द्या”: DCM एकनाथ शिंदे
8
पाकिस्तान झिंदाबादच्या घोषणा, ९ ताब्यात; बागा, हडफडे येथील प्रकार, पोलिसांकडून तपास सुरू
9
पाण्यासाठी १०० अन् कॉफीसाठी ७०० रुपये घेतल्यास मल्टिप्लेक्स बंद होतील : सुप्रीम कोर्ट
10
हरयाणा निवडणुकांत चोरी, २५ लाख बनावट मतदार; राहुल गांधींनी काढली ‘एच फाइल’
11
राज्यात पाच खाण ब्लॉक सुरू; दरवर्षी ५.३ दशलक्ष टन खनिज उत्खनन होणार 
12
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
13
आचारसंहिता लागू तरीही सरकारला ४ दिवस घेता येणार धोरणात्मक निर्णय; आयोगाची पूर्वपरवानगी हवी
14
‘मोनो रेल’ला पुन्हा अपघात; तीन कर्मचारी जखमी; चाचणी करताना नवी गाडी बिमवरून घसरली
15
उच्च न्यायालयाची नवी इमारत न्यायमंदिर व्हावे; सरन्यायाधीशांच्या हस्ते वास्तूचे भूमिपूजन
16
एशियाटिक अध्यक्षपदासाठी २ माजी खासदार आमनेसामने; लढतीबाबत उत्सुकता
17
इंडक्शन कुकिंग वापरणाऱ्यांना फूटपाथवर अन्न शिजवण्यास मनाईचे ते परिपत्रक गैरलागू: हायकाेर्ट
18
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
19
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
20
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान

नागपुरात परंपरा डावलून मुलींनीच केले वडिलांवर अंत्यसंस्कार 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 5, 2019 23:40 IST

आजच्या काळात मुली अनेक ठिकाणी ही परंपरा मोडताना दिसत आहेत आणि असाच एक प्रसंग बुधवारी नागपुरातील गंगाबाई घाटावर सर्वांनी अनुभवला. नेताजीनगरातील गजानन तकीतकर यांच्या सात मुलींनी परंपरा डावलून वडिलांना खांदा देत भडाग्नी दिला.

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : आधुनिक काळात मुली कोणत्याच क्षेत्रात मागे नाहीत. जमिनीपासून आकाशालाही गवसणी घातली. पण, आई-वडिलांचे अंत्यसंस्कार करण्यासाठी मुलगाच पाहिजे, ही समाजाची परंपरा. आजच्या काळात मुली अनेक ठिकाणी ही परंपरा मोडताना दिसत आहेत आणि असाच एक प्रसंग बुधवारी नागपुरातील गंगाबाई घाटावर सर्वांनी अनुभवला. नेताजीनगरातील गजानन तकीतकर यांच्या सात मुलींनी परंपरा डावलून वडिलांना खांदा देत भडाग्नी दिला.पारडी परिसरातील नेताजीनगर येथील गजानन गोविंदराव तकीतकर (८०) यांचे ३ सप्टेंबरला निधन झाले. ते रेल्वेतून सेवानिवृत्त झाले होते. त्यांना मुलगा नसून सात मुली आहेत. या सातही मुलींचे लग्न झाले आहे. या मुली नागपुरात, भंडारा आणि दिल्लीत राहतात. वडिलांच्या निधनाची वार्ता कळताच वंदना झोडे, संगीता पिसे, योगिता भलमे, अरुणा चांदेकर, करुणा बोरकर, संध्या आगाशे या सहा मुली त्यांच्या घरी पोहोचल्या. तर दिल्ली येथे राहणारी मुलगी राखी सातोने ही येण्यासाठी वेळ असल्यामुळे अंत्यसंस्कार दुसऱ्या दिवशी ४ सप्टेंबरला करण्याचे ठरविण्यात आले. दुसऱ्या दिवशी दिल्लीतील मुलगी आल्यानंतर सातही मुली अंत्यसंस्कारासाठी पुढे आल्या. सात बहिणींनी वडिलांना खांदा दिला, तर एका बहिणीने आकटं पकडले. गंगाबाई घाट येथे अंत्ययात्रा पोहोचल्यानंतर सातही भगिनींनी वडिलांच्या अंत्यसंस्काराचे सोपस्कार पार पाडले. तकीतकर यांच्या मुलींनी वडिलांच्या निधनानंतर त्यांचे अंत्यसंस्कार करून मुलीही मुलाचे कर्तव्य बजावू शकतात, हे समाजाला दाखवून दिले आहे.

टॅग्स :nagpurनागपूर