शहरं
Join us  
Trending Stories
1
PBKS vs DC : दिल्लीकर समीरची मॅच विनिंग फिफ्टी; पंजाबचं टेन्शन वाढलं! Qualifier 1 च्या शर्यतीत नवं ट्विस्ट
2
Vaishnavi Hagawane: वैष्णवीच्या बाळाला एकनाथ शिंदेंनी घेतलं जवळ, आईवडिलांना दिला धीर; काय घडलं?
3
IPL 2025 Qualifier 1 Race : आता MI चे कट्टर चाहतेही करतील CSK ला चीअर; कारण...
4
हे वागणं बरं नव्हं... खासदारांनी नाराजीचा सूर आळवत रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना धरले धारेवर 
5
'दोषींना पाठिशी घालणाऱ्यांवरही कारवाई करणार', एकनाथ शिंदेंनी घेतली वैष्णवी हगवणेच्या आईवडिलांची घेतली भेट
6
टायपिंगमधून सुटका! तुम्ही जो विचार कराल तो दिसेल स्क्रीनवर; मनातील विचारांनी मोबाइलही चालवता येणार
7
तीन वर्षांच्या मुलाला अंधार असलेल्या खोलीत नेले अन्...; उल्हासनगरात डान्स टीचरचा अल्पवयीन मुलावर अत्याचार
8
अंबा एक्सप्रेसची ओव्हरहेड वायर तुटली! विदर्भ एक्स्प्रेस, नागपूर-पुणे एक्स्प्रेससह अनेक गाड्यांचे वेळापत्रक कोलमडले
9
EPF News: 7 कोटींपेक्षा जास्त लोकांसाठी गुड न्यूज! केंद्र सरकारने पीएफवरील व्याजाची केली घोषणा
10
मोठी कारवाई! मराठवाड्यातील चार जिल्ह्यात ४ कोटी ४८ लाखांचा माल जप्त, ४६४ जणांना अटक
11
'...तर कमी लोक मेले असते', पहलगाममध्ये कुंकू पुसलं गेलेल्या महिलांबद्दल भाजप खासदाराचं वादग्रस्त विधान
12
नाव ऐकून गुन्हेगारांना भरायची धडकी! नागपूरचे माजी पोलीस आयुक्त एस.पी. यादव यांचे मुंबईत निधन
13
वैष्णवी मृत्यु प्रकरण : 'कार, दोन पिस्तूल, चांदीची भांडी...' हगवणेंच्या घरून पोलिसांनी जप्त केलं घबाड
14
जिथं संधी मिळते तिथं तो 'बेस्ट'च देतो! टेस्टमधून डावललेल्या श्रेयस अय्यरनं पुन्हा दाखवली आपली ताकद
15
केरळजवळच्या समुद्रात बुडतंय परदेशी जहाज, तटरक्षक दलाने ९ जणांना वाचवले 
16
Mahayuti: छगन भुजबळ यांना काटशह देण्यासाठी शिंदेंच्या शिवसेनेकडून नरेंद्र दराडे, राजकारण काय?
17
"ज्यांना अजून देश समजला नाही त्यांना परराष्ट्र धोरण काय समजणार?’’, बावनकुळेंची राहुल गांधींवर बोचरी टीका  
18
"मला बऱ्याच दिवसांपासून हे सांगायचं होतं की, मी अनुष्कासोबत रिलेशनशिपमध्ये'; तेज प्रताप यादवांनी दिली प्रेमाची कबुली
19
Sai Sudharsan: भारतीय संघात निवड झाल्यानंतर साई सुदर्शनची पहिली प्रतिक्रिया, काय म्हणाला?
20
Crime: लग्न मोडल्याच्या रागातून दिवसाढवळ्या तरुणीची निर्घृण हत्या, घरात घुसून चिरला गळा

नागपूरची राशी विदर्भात टॉप

By admin | Updated: May 26, 2016 02:45 IST

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या बारावी परीक्षेचा आॅनलाईन निकाल बुधवारी जाहीर करण्यात आला.

बारावीत यंदाही मुलींची बाजी : अकोल्याची गरिमा दुसरी तर नागपूरची भारती तिसरीनागपूर : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या बारावी परीक्षेचा आॅनलाईन निकाल बुधवारी जाहीर करण्यात आला. यात नागपूरच्या एमकेएच संचेती पब्लिक स्कूल अ‍ॅण्ड ज्युनिअर कॉलेजची विद्यार्थिनी राशी महाजन हिने ९७.८५ टक्के (६३६) गुण प्राप्त करीत विदर्भात पहिले स्थान पटकाविले आहे. अकोला येथील नाके गोखले कनिष्ठ महाविद्यालयाची गरिमा वर्मा ९७.२३ टक्के गुण प्राप्त करीत दुसऱ्या क्रमांकावर आहे तर नागपूरच्या शिवाजी विज्ञान महाविद्यालयाची विद्यार्थिनी भारती बजाज हिने ९६.९२ टक्के (६३०) गुण प्राप्त करीत तिसरे स्थान पटकाविले. वाणिज्य शाखेतून हिस्लॉप महाविद्यालयाची विद्यार्थिनी कृतिका बदानी हिने ९५.२२ टक्के गुण मिळवीत प्रथम क्रमांक मिळविला आहे तर कला शाखेतून एलएडी महाविद्यालयाची रितिका श्रीवास्तव हिने ९६.६ टक्के (६२८) गुण मिळवीत ‘टॉप’ केले.नागपूर विभागाचा निकाल मागील वर्षीच्या तुलनेत नागपूर विभागाचा निकाल यंदा कमी लागला आहे. विभागाने राज्यात पाचवे स्थान मिळविले. संपूर्ण विभागाच्या निकालाची आकडेवारी ८६.३५ टक्के आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा निकालात ५.७६ टक्क्यांची घट झाली आहे. विभागात नेहमीप्रमाणे मुलींनीच बाजी मारली असून उत्तीर्णांमध्येदेखील विद्यार्थिनींचेच प्रमाण जास्त आहे. विभागातून ७७ हजार ६८६ विद्यार्थिनींनी परीक्षा दिली. त्यातील ६९ हजार २५० उत्तीर्ण झाल्या. त्यांच्या उत्तीर्ण होण्याची टक्केवारी ८९.१४ टक्के इतकी आहे तर विद्यार्थ्यांचे प्रमाण ८३.५७ टक्के इतके आहे. सोमवारी दुपारी १ वाजता नागपूर विभागाचे निकाल जाहीर करण्यात आले. नागपूर विभागीय मंडळाचे अध्यक्ष संजय गणोरकर यांनी निकालाची घोषणा केली. नागपूर विभागात एकूण १ लाख ५५ हजार ७२८ पैकी १ लाख ३४ हजार ४७३ परीक्षार्थ्यांनी यश संपादित केले.वर्धा जिल्ह्यातून मुलींनी बाजी मारली. जिल्ह्याचा निकाल ८३.५२ टक्के लागला. स्वराली विलास घोडखांडे ही विज्ञाननागपूरची राशी विदर्भात टॉप शाखेतून ६२४ (९६ टक्के) गुण घेत जिल्ह्यातून अव्वल आली आहे. प्रियाली संजय गाठे ही विज्ञान शाखेतून ६११ (९४ टक्के) गुण घेत दुसऱ्या स्थानावर तर कल्याणी ज्ञानेश्वर लोणकर ही वाणिज्य शाखेतून ६१० (९३.८४ टक्के) गुण घेत तिसऱ्या स्थानावर आहे. गोंदिया - नागपूर विभागीय मंडळात गोंदियाने तिसरे स्थान पटकावले आहे. अर्जुनी मोरगाव येथील सरस्वती विद्यालयाचा विद्यार्थी किशोर काळबांधे याने ९३.६९ टक्के गुण पटकावून जिल्ह्यात प्रथम येण्याचा बहुमान पटकावला आहे. यासोबतच गोंदिया एज्युकेशन सोसायटीद्वारे संचालित डी.बी. सायन्स कॉलेजची भाग्यश्री बिसेन हिने ९३.५४ टक्के गुण घेऊन जिल्ह्यात द्वितीय तर याच महाविद्यालयाचा आकाश कोतवाल याने ९२.९२ गुण घेऊन जिल्ह्यात तृतीय स्थान पटकावले आहे.भंडारा- साकोली येथील मनोहरभाई पटेल महाविद्यालयाची भुमेश्वरी केशव गहाणे ही विद्यार्थिनी ९२.३० टक्के गुण घेऊन जिल्ह्यातून प्रथम आली आहे. भंडारा येथील नूतन कन्या विद्यालयाची विद्यार्थिनी केतकी संजय पदवाड आणि जे.एम. पटेल महाविद्यालयाचा विद्यार्थी राज रोशन कटकवार ९१.८४ टक्के (५९७ गुण) घेऊन जिल्ह्यातून संयुक्तपणे द्वितीय आले. लालबहादूर शास्त्री विद्यालयाची रक्षंदा कोल्हेकर ९१.६५ टक्के गुण घेऊन तृतीय आली आहे. गडचिरोली : जिल्ह्याचा बारावीचा निकाल ८२.७१ टक्के लागला असून सर्वाधिक ८९.७२ टक्के निकाल एटापल्ली तालुक्याचा आहे. जिल्ह्यात सहा शाळांचा निकाल १०० टक्के असून शिवाजी कनिष्ठ विज्ञान महाविद्यालय गडचिरोलीचा सौरभ अविनाश तुरे हा ९२.४६ टक्के गुण घेऊन जिल्ह्यातून पहिला आला आहे. जिल्ह्यात सरासरी निकालात मुलांच्या तुलनेत मुलींचे प्रमाण जास्त आहे. चंद्रपूर - मातोश्री उच्च माध्यमिक विद्यालय, चंद्रपूरचे केतन रवींद्र खनके व रक्षित ठवरे हे दोघे ९४.१५ टक्के गुण घेऊन जिल्ह्यात प्रथम आले आहेत. दुसऱ्या स्थानावर जनता महाविद्यालयाची धनश्री निखाते ही असून तिला ९४.०३ टक्के गुण मिळाले आहेत.अमरावती विभागाचा निकाल अमरावती विभागाचा निकाल ८५.८१ टक्के लागला आहे. गतवर्षी बारावीचा निकाल ९२.५० टक्के लागला होता. यंदा तो सात टक्क्यांनी घसरला आहे. बुुलडाणा जिल्हा आघाडीवर असून यवतमाळ जिल्हा माघारला आहे. बुलडाणा जिल्ह्याचा निकाल ८७.८९ टक्के लागला असून अकोला जिल्ह्याने ८७.२३ टक्क्यांसह विभागात दुसरे स्थान पटकावले आहे. वाशिम जिल्ह्याचा निकाल ८५.८१ टक्के आहे. बुलडाणा जिल्ह्यातील मेहकर येथील महेश विद्यामंदिरचा विद्यार्थी तरुण गट्टाणी हा ९६.७६ टक्के गुण घेत जिल्ह्यातून प्रथम आला तर वाशिम जिल्ह्यातील मंगरुळपीर येथील जि.प. कनिष्ठ महाविद्यालयाची आकांक्षा मोरे ९५.६९ टक्के गुण मिळवीत पहिल्या क्रमांकावर आहे.अमरावती विभागातून १ हजार ४१३ कनिष्ठ महाविद्यालयांतील १ लाख ३१ हजार ५७१ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती. त्यापैकी १ लाख १२ हजार ९०६ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. यात प्रथम श्रेणीत ७५ टक्क्यांहून अधिक म्हणजे ८,८५५ विद्यार्थी, ६० टक्क्यांच्या पुढे ५०,०१९, ४५ टक्क्यांपेक्षा अधिक ५१,४६३ आणि ३५ टक्क्यांहून अधिक गुण घेऊन २५६९ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. अमरावती ब्रिजलाल बियाणी विज्ञान महाविद्यालयाचा विद्यार्थी आदित्य मेहकरे याने ९६.६१ टक्के गुण प्राप्त करून अमरावती जिल्ह्यातून अव्वल स्थान मिळविले आहे. आदित्य हा अंजनगाव सुर्जी तालुक्यातील मूळ रहिवासी आहे. तो स्थानिक नवाथेनगरात भाड्याच्या खोलीत राहतो. आदित्यने जेईई अभ्यासक्रमाकडे विशेष लक्ष केंद्रित केले आहे. याच महाविद्यालयातील वैष्णवी शांतिलाल कलंत्री हिने ९६.३० टक्के गुण मिळवून जिल्ह्यातून द्वितीय क्रमांक पटकावला आहे. याच महाविद्यालयातील हार्दिका प्रमोद रहाटे हिने ९६ टक्के गुणांसह जिल्ह्यातून तृतीय येण्याचा मान मिळविला. उपरोक्त तीनही विद्यार्थी विज्ञान शाखेचे आहेत. यवतमाळ जिल्ह्यातून यवतमाळच्या अ‍ॅग्लो हिंदी विद्यालयाचा विज्ञान शाखेचा विद्यार्थी मोहित विठ्ठलानी हा ९३ टक्के गुण घेऊन जिल्ह्यात अव्वल आला आहे. जिल्ह्यात विज्ञान शाखेचा निकाल ९४.१५ टक्के, कला शाखा ७६.०७ टक्के, वाणिज्य शाखा ९०.४५ टक्के तर व्यावसायिक अभ्यासक्रमाचा निकाल ७२.२५ टक्के लागला आहे. मोहित जयंतीलाल विठ्ठलानी हा ६५० पैकी ६०५ गुण घेऊन जिल्ह्यात अव्वल ठरला आहे. त्याच्या गुणांची टक्केवारी ९३ आहे. याच विद्यालयाचा विद्यार्थी जसवंतसिंग पवार ९२ टक्के गुण घेऊन दुसरा तर जयंत नरेंद्र भुसकट हा ९१.६९ टक्के गुण घेऊन तृतीय आला. येथील जवाहरलाल दर्डा इंग्लिश मीडियम स्कूलची विद्यार्थिनी लीना शंकर तलवार ही वाणिज्य शाखेत जिल्ह्यात अव्वल आली आहे. तिला ६५० पैकी ६०७ म्हणजे ९३.३८ टक्के गुण मिळाले आहे.