शहरं
Join us  
Trending Stories
1
एकाचवेळा तीन बिबट्यांच्या घराला घिरट्या; शिकारीच्या शोधात आलेले सीसीटीव्ही कॅमेरात कैद 
2
अल-फलाह विद्यापीठाचा संस्थापक जावेद सिद्दीकीवर मोठी कारवाई; ईडीने केली अटक! मनी लॉन्ड्रिंग, घोटाळ्याचा आरोप
3
मोठी दुर्घटना: पुलावरच दोन बसची समोरासमोर धडक; एका नेपाळी महिलेचा मृत्यू, ३५ हून अधिक प्रवासी जखमी
4
राज ठाकरेंनी फटकारले, पिट्याभाईने मनसेलाच सोडले; नाराज रमेश परदेशीचा भाजपमध्ये प्रवेश 
5
Asia Cup Rising Stars 2025 : विदर्भकराची मॅच विनिंग फिफ्टी! भारतीय संघाची सेमीफायनलमध्ये एन्ट्री
6
डॉ. उमरला करायचा होता 9/11 सारखा घातपात, पण मुजम्मिल सोबत झाले मतभेद अन् फेल झाला संपूर्ण मनसुबा!
7
ऑटोमोबाईल क्षेत्रातील चमत्कार! होंडाकडे आहे जगातील सर्वात 'स्वस्त' प्रायव्हेट जेट; जाणून घ्या किंमत आणि वैशिष्ट्ये
8
चीन-जपानमध्ये अचानक तणाव वाढला, युद्धाच्या उंबरठ्यावर; जपानच्या दूताने बिजिंग सोडले...
9
दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीला साबरमती तुरुंगात कैद्यांकडून मारहाण; एटीएस, पोलिसांत उडाली खळबळ 
10
"८-९ महिन्यापूर्वी उदय सामंत यांच्यासह एकनाथ शिंदे यांचे २० आमदार फुटत होते, पण...!"; शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांचा मोठा गौप्यस्फोट
11
अजित पवारांच्या राष्ट्रवादीला मोठा धक्का! उज्वला थिटे यांचा नगराध्यक्षपदासाठीचा अर्ज बाद
12
मुळशी पॅटर्न फेम 'पिट्या भाई' भाजपात जाणार? राज ठाकरेंनी सुनावल्यानंतर पुन्हा केली फेसबुक पोस्ट, म्हणाले...
13
Travel : भारताचे १०००० रुपये 'या' देशात जाऊन होतील २५ लाख! ४ दिवसांच्या ट्रिपसाठी बेस्ट आहे ऑप्शन
14
झटक्यात ₹3900 रुपयांनी आपटलं सोनं! चांदीही झाली स्वस्त; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
15
"हिडीस, किळसवाणं, एखाद्या अबलेवर बलात्कार करावा, तसे भाजपा वागतेय", एकनाथ शिंदेंच्या नेत्याला संताप अनावर
16
लॉरेन्सच्या भावाला अमेरिकेतून गचांडी धरून भारतात आणले जाणार; बाबा सिद्दीकी हत्याकांड प्रकरणी मोठे खुलासे होणार... 
17
"शिंदे आणि अजित पवार यांच्या बाजूला बसून त्यांच्याच विरोधात ऑपरेशन कमळ..."; भाजपने डिवचताच काँग्रेसने काढली खपली
18
Tej Pratap Yadav : "आई-वडिलांचा मानसिक छळ...", तेज प्रताप यादव यांनी मोदी, शाह यांच्याकडे मागितली मदत
19
"एक बाटली रक्तावर ज्यांचे रक्त सुखते तेच उपदेश...", रोहिणी आचार्य यांनी तेजस्वी यादव यांच्यावर साधला निशाणा
20
"हो, एकनाथ शिंदेंसह CM फडणवीसांना भेटलो आणि आता निर्णय झालाय"; सरनाईकांनी सांगितलं नाराजी प्रकरणी काय घडलं?
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरात वाहतूकदारांच्या संपाचा तिसरा दिवस; जीवनावश्यक वस्तू महाग होणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 23, 2018 11:21 IST

ट्रकमालक व वाहतूकदारांच्या संपाचा परिणाम जीवनावश्यक वस्तूंच्या किमतीवर होऊ लागला आहे. संपाच्या तिसऱ्या दिवशी भाजीपाला आणि दुधाच्या टँकरची वाहतूक कमी झाली आहे.

ठळक मुद्देसरकारची चर्चेसाठी टाळाटाळ

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : ट्रकमालक व वाहतूकदारांच्या संपाचा परिणाम जीवनावश्यक वस्तूंच्या किमतीवर होऊ लागला आहे. संपाच्या तिसऱ्या दिवशी भाजीपाला आणि दुधाच्या टँकरची वाहतूक कमी झाली आहे. केंद्र सरकारचे मंत्री संघटनांच्या पदाधिकाऱ्यांसोबत चर्चा करण्यास टाळाटाळ करीत आहे. त्यामुळे संप आणखी तीव्र होण्याचे संकेत आहेत. संपाच्या तीन दिवसात नागपुरात वाहतूकदारांचा जवळपास ५० कोटींचा व्यवसाय ठप्प झाल्याची माहिती नागपूर ट्रकर्स युनिटीचे अध्यक्ष कुक्कू मारवाह यांनी लोकमतशी बोलताना दिली.संघटनेने जीवनावश्यक वस्तूंना संपातून वगळले असले तरीही ट्रक मालक आणि वाहतूकदार या मालाची वाहतूक करण्यास मनाई करीत आहेत. संपामुळे आवश्यक वस्तू एका जिल्ह्यातून दुसºया जिल्ह्यात आणि राज्यातून अन्य राज्यात नेण्यास प्रतिबंध आले आहेत. त्यांचा फटका गरीब, सामान्यांसह व्यापारी आणि शेतकºयांना बसत आहे. अन्य राज्यातून भाजीपाला आणण्यास ट्रक मालकांनी मनाई केली आहे. हा संप आणखी ७ ते ८ दिवस सुरू राहिल्यास जीवनावश्यक वस्तूंचा तुटवडा होऊन किमती आकाशाला भिडतील, अशी भीती मारवाह यांनी व्यक्त केली.केंद्र शासनाने मागण्या मान्य कराव्यासंपापूर्वी केंद्रीय पीयूष गोयल आणि नितीन गडकरी यांच्याशी आॅल इंडिया मोटर ट्रान्सपोर्ट काँग्रेसचे अध्यक्ष एस.के. मित्तल यांनी चर्चा केली होती. पण त्यांनी मागण्या मान्य करण्यास वा चर्चेस मनाई केली. तीन महिन्यानंतर चर्चा करण्याचे आश्वासन दिले. यापूर्वीही आश्वासनाने संप मागे घेतला होता. त्यानंतर सरकारने असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांसोबत कुठलीही चर्चा केली नाही. आता चर्चा नाही, तर कृती हवी, असे मारवाह यांनी सांगितले.

वस्तूंच्या महाग किमतीसाठी सरकार दोषीमारवाह म्हणाले, संपामुळे विविध राज्यातून येणाऱ्या औषधांच्या वाहतुकीवर परिणाम होणार आहे. त्यामुळे मेडिकल स्टोरमध्ये आवश्यक औषध मिळणार नाही. नागपुरात बटाटे कानपूर आणि अलाहाबाद येथून येतात. मिरची आंध्रच्या गुंटूर येथून तर विजयवाडा येथून हळद येते. आता सणासुदीत नारळ आंध्रप्रदेश आणि केरळातून मोठ्या प्रमाणात येतात. संपाचा धान्याच्या वाहतुकीवर परिणाम होणार आहे. दुधाचे टँकरही बंद होतील. वाहतूक बंद झाल्यामुळे जीवनाश्यक माल येणार नाही आणि त्याच्या कमतरतेमुळे किमती आकाशाला भिडतील. याकरिता केंद्र सरकार दोषी राहील, असे त्यांनी सांगितले.

टॅग्स :Strikeसंप