शहरं
Join us  
Trending Stories
1
धुळ्यात विधानसभेला 45 हजार बोगस मतदारांचे मतदान; अनिल गोटेंकडे यादीच, गंभीर आरोप
2
जगातील ५० इस्लामिक देश एकटवणार; पहिल्यांदाच 'असं' काही घडणार, अमेरिकेची चिंता वाढली
3
Video: "इरफान... प्रामाणिक राहा..."; IND vs PAK सामन्यानंतर गौतम गंभीर कॅमेऱ्यासमोर असं का बोलला?
4
अनंत अंबानी यांच्या वनताराला क्लीनचिट; जाणून घ्या काय आहे संपूर्ण प्रकरण?
5
हवाई दलात इंजिनिअर लोकेश बहिणीच्या घरी आला आणि अचानक २४व्या मजल्यावरून मारली उडी
6
सत्तापालटाच्या अवघ्या ३ दिवसांत नेपाळच्या Gen Z आंदोलकांमध्ये असंतोष; सुशीला कार्कींच्या घराबाहेर निदर्शने!
7
पाकिस्तानला धूळ चारल्यानंतर सूर्यकुमार यादवचं पत्नीसोबत जंगी सेलिब्रेशन, पाहा खास फोटो
8
Astro Tips: घर, प्लॉट विक्रीसाठी सगळे उपाय करून पाहिले? तरी निराशा? करा 'हा' प्रभावी तोडगा!
9
मुंबई महापालिका निवडणुकीपूर्वी शिंदेसेनेला धक्का? १५ माजी नगरसेवक नाराजीची चर्चा
10
सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय, वक्फ कायद्याला अभय; बोर्डात ३ गैर मुस्लीम सदस्य बनू शकतात, परंतु...
11
Acharya Devvrat: आचार्य देवव्रत यांनी महाराष्ट्राचे राज्यपाल म्हणून घेतली शपथ 
12
घाव भर गया है! परेश रावल यांचं 'हेरा फेरी ३'वर भाष्य, दिग्दर्शकासोबतचं नातं बिघडलं? म्हणाले...
13
४०% पार्ट्स होणार स्वस्त! सर्व्हिसिंगच्या बिलातही दिलासा; GST कपातीनंतर सोपा होणार कार-बाईकचा मेंटेनन्स
14
पाकिस्तान फायनलमध्ये हवीय...! प्लीज भारताने पुढला सामना बॉयकॉट करावा; पाकिस्तानी चाहत्यांची मागणी
15
"...तर माझ्या वडिलांचा जीव वाचला असता"; नवजोत सिंग यांच्या मुलाने केला गंभीर आरोप
16
शुक्र गोचर २०२५: शुक्रादित्य राजयोग; 'या' ६ राशी हात लावतील तिथे सोनं करतील!
17
ITR भरण्याची अंतिम मुदत वाढणार? सोशल मीडियावर चर्चा; आयकर विभागाने केलं स्पष्ट
18
"आपण कधी काळी तोडले गेलो, पण तेही परत मिळवू"; सरसंघचालक मोहन भागवत यांचे मोठे विधान
19
टीम इंडियाने हस्तांदोलन नाकारल्याने पाकिस्तानचा तीळपापड, पत्रक जारी करत नोंदवला निषेध
20
बाबाचं लक्ष फोनमध्ये, आई चेंजिंगरूममध्ये; स्विमिंग पूलमध्ये पडलेल्या ४ वर्षांच्या मुलीकडे कुणी पाहिलच नाही अन्...

नागपुरात वाहतूकदारांच्या संपाचा तिसरा दिवस; जीवनावश्यक वस्तू महाग होणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 23, 2018 11:21 IST

ट्रकमालक व वाहतूकदारांच्या संपाचा परिणाम जीवनावश्यक वस्तूंच्या किमतीवर होऊ लागला आहे. संपाच्या तिसऱ्या दिवशी भाजीपाला आणि दुधाच्या टँकरची वाहतूक कमी झाली आहे.

ठळक मुद्देसरकारची चर्चेसाठी टाळाटाळ

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : ट्रकमालक व वाहतूकदारांच्या संपाचा परिणाम जीवनावश्यक वस्तूंच्या किमतीवर होऊ लागला आहे. संपाच्या तिसऱ्या दिवशी भाजीपाला आणि दुधाच्या टँकरची वाहतूक कमी झाली आहे. केंद्र सरकारचे मंत्री संघटनांच्या पदाधिकाऱ्यांसोबत चर्चा करण्यास टाळाटाळ करीत आहे. त्यामुळे संप आणखी तीव्र होण्याचे संकेत आहेत. संपाच्या तीन दिवसात नागपुरात वाहतूकदारांचा जवळपास ५० कोटींचा व्यवसाय ठप्प झाल्याची माहिती नागपूर ट्रकर्स युनिटीचे अध्यक्ष कुक्कू मारवाह यांनी लोकमतशी बोलताना दिली.संघटनेने जीवनावश्यक वस्तूंना संपातून वगळले असले तरीही ट्रक मालक आणि वाहतूकदार या मालाची वाहतूक करण्यास मनाई करीत आहेत. संपामुळे आवश्यक वस्तू एका जिल्ह्यातून दुसºया जिल्ह्यात आणि राज्यातून अन्य राज्यात नेण्यास प्रतिबंध आले आहेत. त्यांचा फटका गरीब, सामान्यांसह व्यापारी आणि शेतकºयांना बसत आहे. अन्य राज्यातून भाजीपाला आणण्यास ट्रक मालकांनी मनाई केली आहे. हा संप आणखी ७ ते ८ दिवस सुरू राहिल्यास जीवनावश्यक वस्तूंचा तुटवडा होऊन किमती आकाशाला भिडतील, अशी भीती मारवाह यांनी व्यक्त केली.केंद्र शासनाने मागण्या मान्य कराव्यासंपापूर्वी केंद्रीय पीयूष गोयल आणि नितीन गडकरी यांच्याशी आॅल इंडिया मोटर ट्रान्सपोर्ट काँग्रेसचे अध्यक्ष एस.के. मित्तल यांनी चर्चा केली होती. पण त्यांनी मागण्या मान्य करण्यास वा चर्चेस मनाई केली. तीन महिन्यानंतर चर्चा करण्याचे आश्वासन दिले. यापूर्वीही आश्वासनाने संप मागे घेतला होता. त्यानंतर सरकारने असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांसोबत कुठलीही चर्चा केली नाही. आता चर्चा नाही, तर कृती हवी, असे मारवाह यांनी सांगितले.

वस्तूंच्या महाग किमतीसाठी सरकार दोषीमारवाह म्हणाले, संपामुळे विविध राज्यातून येणाऱ्या औषधांच्या वाहतुकीवर परिणाम होणार आहे. त्यामुळे मेडिकल स्टोरमध्ये आवश्यक औषध मिळणार नाही. नागपुरात बटाटे कानपूर आणि अलाहाबाद येथून येतात. मिरची आंध्रच्या गुंटूर येथून तर विजयवाडा येथून हळद येते. आता सणासुदीत नारळ आंध्रप्रदेश आणि केरळातून मोठ्या प्रमाणात येतात. संपाचा धान्याच्या वाहतुकीवर परिणाम होणार आहे. दुधाचे टँकरही बंद होतील. वाहतूक बंद झाल्यामुळे जीवनाश्यक माल येणार नाही आणि त्याच्या कमतरतेमुळे किमती आकाशाला भिडतील. याकरिता केंद्र सरकार दोषी राहील, असे त्यांनी सांगितले.

टॅग्स :Strikeसंप