शहरं
Join us  
Trending Stories
1
“पाक कायम शत्रू, मोदी-शाहांनी परवानगी दिल्यास युद्धास जायला तयार”; कर्नाटकातील मंत्री आक्रमक
2
Charanjit Singh Channi : "सर्जिकल स्ट्राईकचा पुरावा मागत नाही"; टीकेची झोड उठताच चरणजीत सिंग चन्नी यांचा यू-टर्न
3
पाकिस्तानची आर्थिक कोंडी; भारताने ट्रेड स्ट्राईक करत आयातीवर घातली बंदी, जहाजांचा मार्ग रोखला
4
“मोदींनी अद्यापही युद्ध सुरू केलेले नाही, त्यांची मानसिकता...”; संजय राऊतांची पुन्हा टीका
5
Bhiwandi Crime: पती कामावरून घरी आला अन् पत्नीसह तीन लेकींचे मृतदेहच दिसले, पोलिसही हादरले!
6
Delhi Rains : हृदयद्रावक! मुसळधार पावसामुळे उद्ध्वस्त झालं कुटुंब; २० दिवसांपूर्वी आलेल्या ४ जणांचा मृत्यू
7
House Arrest Ullu app: एजाज खानच्या अडचणी वाढल्या! 'हाउस अरेस्ट शो' प्रकरणात पोलिसांकडून पहिली अ‍ॅक्शन
8
तुम्हाला धीरुभाई अंबानींचं खरं नाव माहितीये का, कोणत्या वयात उभी केलेली रिलायन्स?
9
Pune Crime: 'कोयता काढला अन्...'; पुण्यातील बिबवेवाडीत भररस्त्यात थरकाप उडवणारी घटना, व्हिडीओ व्हायरल
10
गोव्यातील लईराई जत्रोत्सवात चेंगराचेंगरी, CM प्रमोद सावंतांची प्रतिक्रिया; म्हणाले, “५० हजार लोक...”
11
रोज १२ तास मोबाईलवर गेम खेळायचा मुलगा; पाठीच्या कण्याचे वाजले तीन तेरा, परिस्थिती गंभीर
12
Charanjit Singh Channi : "सर्जिकल स्ट्राईक कुठेही दिसला नाही, जर बॉम्ब पडला तर…"; काँग्रेस नेत्याने मागितले पुरावे
13
लईराई देवी यात्रा चेंगराचेंगरी: यात्रेला आले अन् काकू-पुतण्याने गमावला जीव, मृतांची नावे आली समोर
14
मुकेश अंबानींची 'ही' कंपनी IPO साठी करतेय तयारी, नफ्यासाठी रणनीतीमध्ये केला बदल
15
लईराई देवीच्या जत्रोत्सवात चेंगराचेंगरी; ६ भाविकांचा मृत्यू, ४० जण जखमी, उत्सवाला गालबोट
16
अक्षय्य तृतीयेला येणार होते, पण अजून ‘लाडकी बहीण’चे पैसे आले नाहीत; नेमका का होतोय उशीर?
17
५०० वर्षांनी गुरु अतिचारी गोचर: ६ राशींना लाभ, गुरु करेल मालामाल; अच्छे दिन येणार, शुभ घडणार!
18
IPO आणण्याची तयारी करतेय कंपनी; बुमराह, रोहित शर्मा, आमिर खान यांनीही केली गुंतवणूक; जाणून घ्या 
19
"हेच कारण आहे पहलगाममध्ये जे झालं ते..," असं काय म्हणाला सोनू निगम; दाखल झाला FIR
20
मस्क यांच्या स्टारलिंक कंपनीचं पाकिस्तान-बांगलादेश कनेक्शन; भारतानं मागवली कामकाजाची माहिती, प्रकरण काय?

नागपूर; भाडे थकल्याने भरलीच नाही मनस्क विद्यार्थ्यांची शाळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 27, 2018 11:11 IST

सरकार एकीकडे दिव्यांगांना प्रगतीच्या प्रवाहात आणण्यासाठी विविध योजना राबवित आहे तर दुसरीकडे शाळेचे भाडे शासन देऊ न शकल्याने दिव्यांग गटातील मनस्क विद्यार्थी शाळेपासून वंचित राहत आहेत.

ठळक मुद्देघरमालकाने इमारत तोडल्याने विद्यार्थी बाहेर समाजकल्याण विभागाकडूनही दुर्लक्ष

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : सरकार एकीकडे दिव्यांगांना प्रगतीच्या प्रवाहात आणण्यासाठी विविध योजना राबवित आहे तर दुसरीकडे शाळेचे भाडे शासन देऊ न शकल्याने दिव्यांग गटातील मनस्क विद्यार्थी शाळेपासून वंचित राहत आहे. अयोध्यानगर येथे विदर्भ जीवन विकास संस्थेद्वारा संचालित दुर्बल व मनस्क तथा मतिमंद विद्या निकेतन ही शाळा सुरू करण्यात आली होती. ही शाळा भाड्याच्या घरात असल्याने घरमालकाने भाडे थकल्यामुळे शाळेला कुलूप ठोकले. त्यामुळे शिक्षक, विद्यार्थी पहिल्याच दिवशी शाळेत पोहचूनही शाळा भरू शकली नाही.या शाळेत ६५ मतिमंद विद्यार्थी शिक्षण घेतात. समाजकल्याण विभागातर्फे शाळेला भाड्याचे अनुदान प्राप्त होते. किरायाच्या संदर्भात घरमालकाशी करार सुद्धा झाला आहे. परंतु गेल्या काही महिन्यापासून किरायाचे अनुदान समाजकल्याण विभागाकडून शाळेला न मिळाल्याने घरमालकाचे भाडे थकले आहे. घरमालकाशी झालेला भाडेकरार हा आॅगस्ट महिन्यापर्यंत असला तरी, घरमालकाने ३ मे रोजी शाळेला कुलूप ठोकून दुरूस्तीचे काम सुरू केले. शाळेचे बांधकाम पाडण्यात आले. शाळेचे बॅनर काढून टाकले. शाळेला कुलूप ठोकल्याने कार्यालयीन बायोमेट्रिक मशीन, पगार बिल कागदपत्रे, मस्टर रजिस्टर, वेतनेतर अनुदान, शाळेच्या भाडे पावत्या, विद्यार्थ्यांची कागदपत्र सर्व अडकून पडले आहे. या संदर्भात शाळा व्यवस्थापनाने हुडकेश्वर पोलिसात सुद्धा तक्रार दाखल केली आहे. पण कुठलाच फायदा झाला नाही. यासंदर्भात समाजकल्याण विभागाला सुद्धा कळविण्यात आले आहे. आता तर शाळेचे स्लॅप सुद्धा तोडण्यात आल्याने शाळा कुठे भरणार असा प्रश्न शाळा व्यवस्थापनापुढे आहे.

टॅग्स :Studentविद्यार्थी