शहरं
Join us  
Trending Stories
1
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
2
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
3
६ किलो सोने, ३१३ किलो चांदी अन् ४.६२ कोटी रोख; दिल्लीतील ट्रॅव्हल एजंटवर ईडीची कारवाई, १२ छापे
4
एकतर मैत्रिपूर्ण लढा किंवा समसमान जागावाटप करा; भाजपमधील युती नकोच म्हणणाऱ्यांची नवी भूमिका
5
'सर तन से जुदा' घोषणा देणे देशद्रोह : हायकोर्ट; प्रेषित मोहम्मदांच्या आदर्शाचा केलेला अवमान
6
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
7
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
8
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
9
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
10
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
11
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
12
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
13
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
14
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
15
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
16
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
17
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
18
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
19
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
20
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
Daily Top 2Weekly Top 5

नागपूर स्मार्ट सिटी प्रकल्प बाधितांची संख्या निम्म्यावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 16, 2018 01:29 IST

पूर्व नागपुरातील प्रस्तावित स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत शहर विकास नियोजन(टीपीएस)योजनेला राज्य सरकारने मंजुरी दिली आहे. राज्य सरकारने याबाबतची अधिसूचना राजपत्रात जारी केली. सुधारित आराखड्यात प्रकल्पबाधितांची संख्या निम्म्यावर आली आहे. या आराखड्याला शासनाने मंजुरी दिल्याने प्रकल्पाला लवकरच गती मिळण्याची आशा आहे.

ठळक मुद्देसुधारित आराखडा मंजूर : राज्य सरकारची ‘टीपी’ योजनेला मंजुरी

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : पूर्व नागपुरातील प्रस्तावित स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत शहर विकास नियोजन(टीपीएस)योजनेला राज्य सरकारने मंजुरी दिली आहे. राज्य सरकारने याबाबतची अधिसूचना राजपत्रात जारी केली. सुधारित आराखड्यात प्रकल्पबाधितांची संख्या निम्म्यावर आली आहे. या आराखड्याला शासनाने मंजुरी दिल्याने प्रकल्पाला लवकरच गती मिळण्याची आशा आहे.३४०० कोटींचा हा प्रकल्प असून, १७३० एकर क्षेत्राचा ‘एरिया बेस्ड डेव्हलपमेंट’ (एबीडी) केला जाणार आहे. नगरविकास विभागाने सुधारित आराखड्याला मंजुरी दिल्याने प्रकल्पाचा मार्ग मोकळा झाला आहे. गुजरातमधील एचसीपी कंपनीने आराखडा तयार के ला आहे. आराखडा तयार करताना यात चार हजार घरे बाधित होणार होती. परंतु सुधारित आराखड्यात ही संख्या २,३०० झाली आहे. स्थानिक नागरिकांनी या प्रकल्पाला विरोध दर्शविला होता. त्यानंतर नागपूर स्मार्ट अ‍ॅन्ड सस्टेनेबल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेडचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. रामनाथ सोनवणे यांच्या नेतृत्वात या भागाचा दौरा करण्यात आला होता. त्यानंतर काही मार्गांची रुंदी कमी करण्याची सूचना केली होती. नागरिकांच्या सूचना व आक्षेप विचारात घेता, स्मार्ट सिटी प्रकल्पाच्या नकाशात बदल करून तो मंजुरीसाठी राज्य सरकारकडे पाठविला होता. मंजूर आराखड्यानुसार १२०० घरे बाधित होणार आहेत. यातील ५०० घरे पूर्णपणे बाधित होतील. पारडी, पुनापूर, भरतवाडा व भांडेवाडी आदी भागांचा स्मार्ट सिटी प्रकल्पात समावेश करण्यात आला आहे.नागपूर स्मार्ट सिटी प्रकल्प हा देशातील एकमेव रिट्रोफिटिंग आधारावर साकार होणारा प्रकल्प असल्याची माहिती रामनाथ सोनवणे यांनी दिली. ज्यांची घरे पाडली जातील वा बाधित होतील त्या सर्वांचे पुनर्वसन केले जाणार आहे. घरे बाधित होतील. त्यांना नवीन घरे देण्यात येतील. काही प्रमाणात बाधित होणाऱ्या घरांचा मोबदला दिला जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.या प्रकल्पामुळे कुणीही बेघर होणार नाही. मोकळे भूखंड असलेल्यांना ६० टक्के जागा विकसित करून मिळेल, तर ४० टक्के जागा स्मार्ट सिटीसाठी आरक्षित केली जाणार आहे. अध्यादेशाची प्रत अद्याप प्राप्त झालेली नाही. त्यामुळे नेमका कोणता भाग बाधित होणार, याची स्पष्ट माहिती अद्याप प्राप्त झालेली नाही.पूर्व नागपुरातील स्मार्ट सिटी प्रकल्प देशापुढे एक आदर्श प्रकल्प ठरणार असल्याचा विश्वास आमदार कृष्णा खोपडे यांनी व्यक्त केला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची वेळ मिळताच या प्रकल्पाचे भूमिपूजन केले जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.४५ कि.मी. मार्गावर एकही घर तुटणार नाहीस्मार्ट सिटी प्रकल्पात ५२ कि.मी. रस्त्यांचे बांधकाम व रुंदीकरण केले जाणार आहे. यातील ४५ कि.मी. लांबीच्या मार्गावर एकही घर बाधित होणार नाही. सात कि.मी. लांबीच्या भागात बाधित होणाऱ्यांचे पुनर्वसन केले जाणार आहे. शापूरजी पालोंजी पायाभूत काम करणार असून अहमदाबाद येथील एचसीपी प्रकल्पाचा आराखडा तयार केला आहे.सामाजिक व आर्थिक सर्वेक्षणया प्रकल्पामुळे बाधित होणाऱ्यांचा पायाभूत सर्वे केला जाणार आहे. सामाजिक व आर्थिक आधारावर सर्वेक्षण केले जाणार आहे. यासाठी एजन्सी नियुक्त करण्याबाबतची निविदा काढण्यात आली आहे. पात्र कंत्राटदाराला काम दिले जाईल. निविदाला प्रतिसाद न मिळाल्यास पुन्हा निविदा काढण्यात येतील.मिळालेल्या ४३५ कोटीतील ११० कोटी खर्चस्मार्ट सिटी प्रकल्पासाठी ४३५ कोटींचा निधी प्राप्त झाला आहे. यात केंद्राकडून १९० कोटी तर राज्य सरकारकडून १४५ कोटी तसेच नासुप्रकडून १०० कोटी प्राप्त झाले आहे. महापालिकेच्या वाट्याची पहिल्या टप्प्यातील रक्कम नासुप्र देत आहे. आतापर्यंत ११० कोटी खर्च करण्यात आले. स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत शहरात कॅमेरे लावण्यात आले आहेत. यासाठी लार्सन अ‍ॅन्ड टुब्रो कंपनीला १०३ कोटी देण्यात आले आहे.

 

टॅग्स :Nagpur Municipal Corporationनागपूर महानगर पालिकाnagpurनागपूर