शहरं
Join us  
Trending Stories
1
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
2
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
3
BRICS ची महत्वपूर्ण बैठक; परराष्ट्र मंत्री अन् राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अनुपस्थिती, कारण काय...
4
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
5
खळबळजनक! भाजी बनवण्यासाठी मोठा बटाटा घेतला म्हणून पत्नीची कुऱ्हाडीने हत्या
6
एथर कंपनीसाठी बॅड न्यूज? ग्रे मार्केटमध्ये चांगले संकेत नाही, आयपीओ उघडण्यापूर्वीच जीएमपी क्रॅश
7
"मला अनुभव आला तो मांडला, तरी दिलगिरी व्यक्त करतो"; पोलिसांविषयी वादग्रस्त वक्तव्य करुन गायकवाडांचा माफीनामा
8
रेखा झुनझुनवाला ते खन्ना यांच्यासह ५ मोठ्या गुंतवणूकदारांची शेअर्स खरेदी, तुमच्या पोर्टफोलिओमध्येही आहे का?
9
"एक दिवस पाकिस्तानी स्वतःच्याच सरकारविरोधात बंड पुकारतील" विजय देवरकोंडा स्पष्टच बोलला
10
बायकोसोबत काश्मिरमध्ये अडकलेल्या मराठी कलाकाराचा सुन्न करणारा अनुभव, म्हणाला- "गेल्या पाच दिवसात आम्हाला..."
11
लेडी सिंघम! डॉक्टरने पाहिलं UPSC चं स्वप्न; दिवसा रुग्णांवर उपचार अन् रात्री अभ्यास, झाली IPS
12
Cars24 ने एकाच वेळी २०० कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढलं; कपातीचे कारणही सांगितलं
13
पहलगाम हल्ल्यातील मृतांच्या वारसांना शासकीय नोकरी देण्याबाबत मुख्यमंत्र्यांचं मोठं वक्तव्य; म्हणाले...
14
"मी तिच्याशिवाय राहू शकत नाही, दहशतवाद्यांना कठोर शिक्षा झाली पाहिजे"; आईपासून दुरावली मुलं
15
रिकी पाँटिंगमुळे पंजाब आयपीएलची ट्रॉफी जिंकणार नाही, माजी क्रिकेटपटूचे गंभीर आरोप
16
परदेशी गुंतवणूकदारांची आठवड्यात १७,४२५ कोटी रुपयांची गुंतवणूक; 'ही' आहेत २ मुख्य कारणं
17
मुदत संपली! मायदेशात परतण्यासाठी पाकिस्तानी नागरिकांची धावाधाव, बॉर्डरवर रांगा...
18
पहलगाम हल्ल्याचा तपास NIA च्या हाती; पाकिस्तानी कनेक्शन अन् 26/11 सारख्या कटाचा संशय
19
पाकिस्तान प्रेग्नेंट, कधीही बलुचिस्तानची डिलीवरी होऊ शकते; विकास दिव्यकीर्ती यांनी पाकिस्तानची परिस्थिती सांगितली

नागपूर अधिवेशनात राज्यकर्त्यांना सामान्य नागरिकांसाठी वेळ मिळेल?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 2, 2018 11:24 IST

मुंबईत आमदार निवासाचे काम पूर्ण न झाल्यामुळे नागपुरात पावसाळी अधिवेशन होत आहे. हे अधिवेशनही नेहमीप्रमाणे औपचारिकताच ठरेल, असा दावा तज्ज्ञांकडून केला जात आहे.

ठळक मुद्देअधिवेशन ठरते केवळ औपचारिकतामोजक्याच प्रश्नांवर होते चर्चा

कमल शर्मा/आनंद शर्मा।लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : नागपूर करारांतर्गत विधिमंडळाचे वर्षातील एक अधिवेशन नागपूरला घेणे बंधनकारक आहे. १९७१ पासून २०१७ पर्यंत शहरात हिवाळी अधिवेशन झाले. यावेळी मुंबईत आमदार निवासाचे काम पूर्ण न झाल्यामुळे नागपुरात पावसाळी अधिवेशन होत आहे. हे अधिवेशनही नेहमीप्रमाणे औपचारिकताच ठरेल, असा दावा तज्ज्ञांकडून केला जात आहे.२०१४ मध्ये देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रिपदाची सूत्रे स्वीकारली. फडणवीस हे नागपुरातील असल्यामुळे येथील अधिवेशनालाही विशेष महत्व आले. विदर्भाचे समर्थक अशी फडणवीस यांची ओळख असल्यामुळे विदर्भातील नागरिकांच्याही अपेक्षा वाढल्या आहेत. गेल्या चार वर्षांपासून नागपूर अधिवेशनात विदर्भावर खूप चर्चा झाली. मात्र, पुरेसा वेळ न मिळाल्याने सामान्य नागरिकांच्या प्रश्नांवर फारसा प्रकाश टाकण्यात आला नाही. आमदार शेकडो प्रश्नांचे प्रस्ताव विधिमंडळ सचिवालयाकडे पाठवितात. मात्र, त्यातील निवडक सभागृहात येतात व त्यातही मोजक्याच प्रश्नांवर चर्चा होते. यावरून विषयांना किती न्याय मिळतो याचा अंदाज येतो. सूत्रांच्या मते बहुतांश प्रश्न दुसऱ्या संबंधित प्रश्नांशी जोडले जातात. लक्षवेधी सूचनांबाबतही असेच केले जाते. याशिवाय औचित्याच्या मुद्यांद्वारेही आपले म्हणणे सरकारपर्यंत पोहचविण्याची आमदारांना संधी असते.अधिवेशनावर निवडणुकीची छाया१९७१ नंतर पहिल्यांदा नागपुरात पावसाळी अधिवेशन होत आहे. मात्र, या अधिवेशनावर निवडणुकीची छाया आहे. विधान परिषदेच्या ११ जागांसाठी १६ जुलै रोजी निवडणूक होत आहे. विधानसभा सदस्य आपला मताधिकार बजावतील. संबंधित ११ आमदारांचा कार्यकाळ २७ जुलै रोजी संपुष्टात येत आहे. या जागांसाठी भाजपा, शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी सक्रिय झाले आहेत. ४ जुलै रोजी अधिवेशनाला सुरुवात होताच हालचाली सुरू होतील. दरम्यान, शेतकरी व सामान्य नागरिकांच्या हिताच्या काही घोषणा होण्याचीही शक्यता आहे.

टॅग्स :Nagpur Monsoon Session 2018नागपूर पावसाळी अधिवेशन २०१८